'मनोज जरांगेंनी सर्व सीमा पार केल्या, आता त्यांनी…' प्रसाद लाड यांचं खुलं आव्हान

'मनोज जरांगेंनी सर्व सीमा पार केल्या, आता त्यांनी…' प्रसाद लाड यांचं खुलं आव्हान


Manoj Jarange vs Prasad Lad : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) मोठा निर्णय घेतलाय. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलंय. विशेष म्हणजे जरांगेंचं उपोषण त्यांनी स्वत:च सोडायचा निर्णय़ घेतलाय. कुठलाही राजकीय नेता यावेळी येणार नाहीय. उपोषण स्थगित करुन दुसऱ्या कामाला लागण्याचा विचार असल्याचं पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. केवळ सलाईन लावून अंतरवालीत पडून राहण्यात काही अर्थ नाही. सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीत आम्ही लागू असा इशारा जरांगेंनी दिलाय. तसंच फडणवीसांनी अनेक राजकीय नेत्यांना अडचणीत आणलं. मराठे संपवून तुम्हाला मोठं व्हायचंय का असा सवालही त्यांनी केलाय. 

प्रवीण दरेकर यांच्यावर टीका
यावेळी मनोज जरांगे यांनी भाजप नेते प्रवीण दरेकरांवरही (Pravin Darekar) निशाणा साधलाय. 5 ते 7 जणं भाजपला लागलेली कीड असून दरेकरांमुळे भाजपला फटका बसणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. तसंच दरेकरांनी आपल्या नादी लागू नये असा इशारा त्यांनी दिलाय.

भाजप नेते प्रसाद लाड यांचं आव्हान
मनोज जरांगे यांनी दिलेल्या इशाऱ्याला भाजप नेते प्रसाद लाड (Parasad Lad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमचे बंधू मनोजदादा यांनी दरेकरांवर शिवराळ भाषेत टीका केली, आज त्यांनी सर्व सीमा पार केल्या आहेत. त्यांना आमचे उमेदवार पाडायचं असतील तर त्यांनी 288 उमेदवार उभे करावेत, आम्हीही बघू कसे पाडता असं आव्हान लाड यांनी दिलंय. दरेकर मराठा आहेत का तुम्ही विचारता, आम्ही मराठे आहोत का याचं सर्टिफिकेट आम्हाला तुमच्याकडून नकोय. आम्ही तुमच्या सत्य परिस्थितीकर बोललो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशाराच प्रसाद लाड यांनी दिलाय.

फडणवीसांनी दिलेलं आरक्षण तुम्हाला मान्य नाही का? कोर्टत महाविकास आघाडीने आरक्षण टिकवलं नाही हे मान्य आहे का? असे सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेत. तुमच्यावर कुणी गुन्हा दाखल केला तर त्यातही फडणवीसांचा दाखला देत असाल तर ते बोलणं योग्य नाही, त्या प्रकरणाशी फडणवीसांचा संबंध नाही असं सांगत फडणवीस आणि दरेकरांसाठी वापरलेली भाषा सहन करणार नाही असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय. आमच्यावर संस्कार आहेत, तुम्ही शिव्या देऊनही मी शिव्या दिल्या नाही. पण हे तुम्ही सुरूच ठेवला तर आम्हालाही या भाषेत बोलावं लागेल असा इशाराही प्रसाद लाड यांनी दिलाय.

मनोज जरांगे निजामशाहीकडे मोगलाईकडे जात आहेत, जरांगे यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला, त्यांना महिलांचं चालणारं घर बंद करायचं आहे का? महाविकास आघाडीचे ऐकून तुम्ही हे करताय का?लहान भावाला जर सरकार पैसे देत असेल, दोन कोटी मराठ्यांना याचा फायदा होत असेल तर त्याचा त्रास तुम्हाला आहे का ? असे प्रश्न प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना विचारले आहेत. जरांगे जी भाषा बोलत आहेत, त्यातून शरद पवार यांच्या पाठीशी असल्याच्या वास येतोय असा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय.

मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढलं आहे. नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक  केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात 2013 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याप्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होतं. पण त्यानंतर ते एकदा कोर्टात हजर झाले होते.





Source link

आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्यांवर अमोल मिटकरी यांची जहरी टीका; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल

आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्यांवर अमोल मिटकरी यांची जहरी टीका; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल



आमदार अमोल मिटकरींनी अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप केलाय. 6 महिन्यांपासून पालकमंत्री अकोल्यात फिरकले नसल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.



Source link

टोमॅटोने मोडले सफरचंदाचे रेकॉर्ड, गृहिणींनो आता बेतानेच वापरा टोमॅटो, एक किलो तब्बल…

टोमॅटोने मोडले सफरचंदाचे रेकॉर्ड, गृहिणींनो आता बेतानेच वापरा टोमॅटो, एक किलो तब्बल…



Tomato Price Hike In Maharashtra: टोमॅटोच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळं गृहिणींचे बजेट बिघडले आहे. आता टोमॅटोचे दर जाणून घेऊयात. 



Source link

OBC आरक्षण बचाव यात्रा; प्रकाश आंबेडकर यांचे खास निमंत्रण छगन भुजबळ स्वीकारणार?

OBC आरक्षण बचाव यात्रा; प्रकाश आंबेडकर यांचे खास निमंत्रण छगन भुजबळ स्वीकारणार?


Prakash Ambedkar : राज्यात मराठा आरक्षण आणि OBC आरक्षणाचा विषय चांगलाच पेटला आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर   OBC आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) गटाचे नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना प्रकाश आंबेडकर यांनी खास निमंत्रण दिले आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी  यांना ई-मेलद्वारे निमंत्रण पाठवले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याची माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट करुन दिली आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा  25 जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार आहे. याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.  तसेच, ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणाऱ्यासाठी ओबीसी आंदोलकांसह, महाराष्ट्रातील काही बड्या नेत्यांनाही  निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची तब्येत आता खालावली आहे.. वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली.. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री पुजारे यांनी स्वतः त्यांची तपासणी केली.. अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या माध्यमातून ओबीसीमध्येच आरक्षण द्यावं, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. 

राज्यातलं सामाजिक वातावरण बिघडलं असताना शरद पवार मूग गिळून गप्प पसलेत, असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. उद्धव ठकरे आणि काँग्रेस नेत्यांनी यावर बोललं पाहिजे असं आवाहन हक्के यांनी केलंय. तर पवारांना आरक्षण द्यायचं नाही, त्यांना मराठा-ओबीसी वाद लावाचाय, असा आरोप भाजपचे ओबीसी नेते आमदार परिणय फुके यांनी केलीय.





Source link

Maharashtra Weather News : सतर्क व्हा! सूर्यनारायणाचं दर्शन आजही नाहीच; मुंबईसह कोल्हापूर, विदर्भात कोसळधार

Maharashtra Weather News : सतर्क व्हा! सूर्यनारायणाचं दर्शन आजही नाहीच; मुंबईसह कोल्हापूर, विदर्भात कोसळधार


Maharashtra Weather News : साधारण मागील आठवड्याभरापासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं उसंत घेतलेली नाही. इथं मुंबई आणि उपनगरांमध्येही सूर्यनारायणानं दर्शन दिलं नसून, येत्या 24 तासांमध्येतरी हे चित्र फारसं बदलणार नसल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

मुंबईत पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगत शहरासह उपनगरांमध्येही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरातील काही भागांमध्ये पाऊस अडचणी वाढवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

कोल्हापूर, रायगडसह विदर्भात मुसळधार 

रायगड जिल्ह्यातल्या 4 तालुक्यात आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. महाड, पोलादपूर, माणगाव आणि कर्जत तालुक्यात आज शाळा, कॉलेजेस बंद असतील. रायगड जिल्ह्यात हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळं त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली. 

कोणत्या भागाला कोणता अलर्ट? 

मुंबई – यलो
ठाणे – यलो 
रायगड – ऑरेंज
रत्नागिरी – ऑरेंज 
पुणे – यलो 
सातारा – ऑरेंज
अकोला – यलो
अमरावती – यलो
भंडारा – ऑरेंज
गोंदीया – यलो
गडचिरोली – यलो
चंद्रपूर – यलो
नागपूर -यलो

हवामान खात्याच्या माहितीनुसार नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता येथील सर्व शैक्षणिक संस्था प्रशासकीय कार्यालयं आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयांना आज (22 जुलै 2024) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  

कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीवर सर्वांचं लक्ष 

कोल्हापूरात पंचगंगा नदीची रविवारी रात्रीपासून संथ गतीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु असल्यामुळं जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पंचगंगेची पाणीपातळी 38 फुट 8 इंचावर  असून, नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट असून सध्या जिल्ह्यातील 86 बंधारे पाण्याखाली गेले असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 

जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून, राधानगरी धरण 80% भरल्याने प्रतीसेकंद 1450 क्यूसेक पाण्यचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तिथं कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप सुरु असतानाच पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर आणखी वाढला आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या पात्राबाहेर पडल्याने वाहतूक विस्कळी झालीय. ही एकंदर परिस्थिती पाहता शिवाजी विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगिती, नवीन तारखा लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. शाळा देखील तेथील परिस्थिती बघून सुरू ठेवण्याच्या किंवा बंद करण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

पावसाचा जोर का वाढला? 

बंगालच्या उपसागरारत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुशळे विदर्भापासून कोकणापर्यंत पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. येत्या काळात हा कमी दाबाचा पट्टा निवळणार असून, पावसाचा जोरही कमी होताना दिसणार आहे.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp