by Hansraj Agrawal | Jul 14, 2024 | Trending News
Bhavali Dam : नाशिक जिल्ह्यातील 35 पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. बंदीच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. नाशिकच्या भावली धबध्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पहायला मिळत आहे. भावली धरण परिसरात पर्यटक आपला जीव धोक्यात घालून धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेवर तोबा गर्दी करत आहेत.
पावसाळा सुरू झाल्याने नाशिक जिल्ह्यातील धबधबे आणि मनमोह दृश्यांची जिल्ह्यातील नव्हे तर इतर शहरातील पर्यटकांना सुद्धा भुरळ पडत असते. त्यामुळे पर्यटकांचा ओढ नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे असतो. धरण क्षेत्राच्या परिसरात आणि पर्यटनस्थळावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी व्हायला लागली आहे.
नाशिक जिल्ह्यातील तब्बल 35 पर्यटनस्थळांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असले तरी धोकादायक ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात जात आहेत. भावली धबधब्या वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी वाडीवरे, पेठ, हरसुल, नांदुरी गड, सुरगाणा, हरणबारी, निफाड, मांगीतुंगी या परिसरात पावसाळ्यामुळे बऱ्याच ठिकाणी धबधबे तयार झाले आहेत. विशेषता भावली, मुकणे, वैतरणा, वालदेवी, दारणा,कश्यापी,गंगापूर, नांदूर मध्यमेश्वर,चणकापूर धरण या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी येत आहेत.
कुंडमळा धबधब्यावर धोकादायक पर्यटन
लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर पर्यटकांनी काहीही धडा घेतला नसल्याचंच दिसून येतं. मावळमधल्या कुंडमळा धबधब्यावर तरुणाई धोकादायकरित्या पर्यटन करताना दिसून येतायत. कुंडमळा इथं पाण्याचा फ्लो मोठा आहे. तसंच मोठ मोठे खड्डे आहेत. मात्र केवळ सेल्फी, फोटोसाठी असा धोका पत्करताना पर्यटक दिसतायत. याठिकाणी असलेला साकव पूल धोकादायक असल्याचंही सांगण्यात आलंय. मात्र त्यावरूनही प्रवाशांची ये-जा सुरूय.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 14, 2024 | Trending News
Vishalgad Illegal Construction Matter: कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्याला हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. असं असतानाच आता विशाळगडावर स्थानिक नागरिकांना मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही अज्ञातांनी विशाळगडावजळील घरांवर दगडफेक केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात जमावबंदीचा आदेश आधीच लागू करण्यात आला आहे. विशाळगड परिसरात पोलिसांचा मोठा फौजपाठा तैनात असून या परिसरामध्ये तणाव दिसत आहे.
संभाजीराजे विशाळगडच्या दिशेने
विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आज संभाजी राजे छत्रपती यांनी चलो विशाळगड अशी हात दिली असल्याने कोल्हापूरमध्ये सकाळपासूनच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच आता गडावरुन ही बातमी समोर येत असल्याने कोल्हापूरमधील वातावरण चांगलेच तापले आहे. विशाळगडाच्या वाटेवर असलेल्या संभाजी राजे छत्रपतींनी ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं तो आज संकटात आहे, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना नोंदवली. विशाळगडाला जाण्यासाठी निघण्यापूर्वी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलातना “माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर त्याचा मला आनंद आहे,” असं वक्तव्य संभाजी राजे छत्रपती यांनी केलं होतं.
सरकारवर टीका
“राज्य सरकार हे स्थानिक आमदाराच्या दबावाखाली विशाळगडला अतिक्रमण मुक्त होवू देत नाहीये,” असा आरोप देखील संभाजी राजे यांनी केला आहे. “विशाळगडावर एकूण 156 जणांनी अतिक्रमण केले आहे, त्यातील फक्त 6 जणांना न्यायालयाने अतिक्रमण काढायला स्थगिती दिली आहे, मग राज्य सरकार उर्वरित अतिक्रमण का काढत नाही,” असा सवाल देखील संभाजी राजे यांनी उपस्थितीत केला आहे.
कोल्हापूर अलर्टवर
संभाजी राजे छत्रपती यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. प्रशासनाने जिल्ह्यात जमाव बंदी आदेश जारी केले आहेत. त्याचबरोरीने विशाळगड मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजी राजे यांनी संपर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांना चलो विशाळगडचा नारा दिला आहे. त्यामुळे विशाळगडाच्या दिशेने हजारो शिवभक्त येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रकरण पुन्हा चर्चेत
कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनं केले जात आहे. विशाळगड अतिक्रमणावरून कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित केला आहे. बकरी ईदला उच्च न्यायालयाने विशाळगडावर कुर्बानीला परवानगी दिल्यानंतर विशाळगडावरील अतिक्रम पुन्हा चर्चेत आलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 13, 2024 | Trending News
अ अननसाचा… ब बदकाचा… शाळेत हे असंच शिकवलं जातं. मात्र पोषण आहाराचे कंत्राटदार आहेत की या मुलांना काही वेगळेच धडे देत आहेत. पोषण आहाराचे कंत्राटदार म्हणतायत ब बेडकाचा… च चिमणीचा… उ उंदराचा…. स सापाचा… पाठ्यपुस्तकांमधून हे धडे मिळत नाहीएत तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना हे धडे मिळतायत.. कारण कधी पोषण आहारात मेलेला उंदीर मिळतो.. कधी याच पोषण आहारात साप मिळतो. तर कधी मेलेली चिमणी.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 13, 2024 | Trending News
Nitin Gadkari Warn BJP Party Workers: भाजपने काँग्रेससारख्या चुका करू नयेत, काँग्रेस करत होती तेच आपण करत राहिलो तर फायदा नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय ते गोव्यामध्ये बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाबाबत मोठं विधान केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. काय म्हणाले गडकरी? सविस्तर जाणून घेऊया.
काँग्रेसच्या चुकांमुळेच भाजपला निवडून दिलंय
भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष असून, त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे.मात्र, ज्यामुळे लोकांनी काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं, त्याच चुका आपण करत राहिलो तर काँग्रेसला सत्तेतून जाण्यात आणि आपण सत्तेत येण्याला काही अर्थ राहत नाही.काँग्रेसच्या चुकांमुळेच भाजपला निवडून दिलंय असं गडकरी म्हणालेत.
‘काँग्रेसच्या चुकीची पुनरावृत्ती नको’
गडकरी म्हणाले की, काँग्रेस जे करत होती तेच करत राहिलो तर सत्तेतून जाण्यात आणि आम्ही सत्तेत येण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे काँग्रेसने जी चूक केली तीच चूक भाजपने करू नये, त्यामुळे त्यांना बाहेर व्हावे लागले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याच पक्षाबाबत (भाजप) मोठे विधान केले आहे. भाजपने काँग्रेसच्या चुकीची पुनरावृत्ती करू नये, असे ते म्हणाले आहेत. गडकरी म्हणाले की, भाजप हा वेगळ्या विचारसरणीचा पक्ष आहे, त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे.काँग्रेस जे करत होती तेच करत राहिलो तर त्यांच्या सत्ता सोडण्यात आणि आमच्या येण्यात काही अर्थ नाही. गडकरी पुढे म्हणाले की, काँग्रेसने जी चूक केली तीच चूक भाजपने करू नये, त्यामुळे सत्तेतून बाहेर पडावे लागले.काँग्रेसच्या चुकांमुळेच लोकांनी भाजपला निवडले, असे नागपूरचे लोकसभा खासदार गडकरी म्हणाले.
भ्रष्टाचारमुक्त देश बनवण्यासाठी योजना हवी
भ्रष्टाचारमुक्त देश बनवायचा आहे आणि त्यासाठी योजना आखली पाहिजे. ते म्हणाले की, राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडवून आणण्याचे माध्यम आहे, हे आगामी काळात कार्यकर्त्यांनी जाणून घेतले पाहिजे. गोव्यातील पणजी येथे झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत गडकरी यांनी या गोष्टी सांगितल्या
भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष
भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष असून, त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे.मात्र, ज्यामुळे लोकांनी काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं, त्याच चुका आपण करत राहिलो तर काँग्रेसला सत्तेतून जाण्यात आणि आपण सत्तेत येण्याला काही अर्थ राहत नाही.असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजप नेत्यांना दिला.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 12, 2024 | Trending News
Jalgoan Crime News : भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या हत्याकांडातील आरोपी सध्या जळगाव मध्यवर्ती कारागृहात आरोपींमध्ये अंतर्गत वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यावरून आता जिल्ह्यातील राजकारण तापले असून ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी पोलीस अधीक्षक जेलर आणि या सर्वांची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 12, 2024 | Trending News
IAS Pooja Khedkar Case: महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशामध्ये सध्या आयएसएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आहेत. असं असतानाच आता या प्रकरणामध्ये थेट दिल्लीने लक्ष घातल्याचं दिसत आहे.
Source link