नवी मुंबईतील (Navi Mumbai) भूखंड विक्री प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (Gamesh Naik) संतप्त झालेत. विधानसभेमध्ये गणेश नाईक यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे आमदार असलेले गणेश नाईक यांनी राज्य सरकारमधले काही अधिकारी आणि सिडकोचे काही अधिकारी भ्रष्ट असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. एकप्रकारे एकनाथ शिंदेंवरच टीका असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
“गार्डनचे, मैदानाचे, हॉस्पिटलचे आणि शाळांचे भूखंड यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी 13 महिन्यापूर्वी निर्देश देऊनही हे अधिकारी त्यावर कारवाई करायला तयार नाहीत. बिल्डरांच्या हितासाठी महानगरपालिकेला पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी आदेश दिले जातात. राज्य शासनात जे दलाल अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना उघड करण्यासाठी मी आरोप केले आहेत. जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला तुम्ही पाच पैशांची किंमत देणार नसाल तर तुम्ही तसं उत्तर द्या, आम्ही लोकांना सांगू,” असं गणेश नाईक म्हणाले आहेत.
गणेश नाईक अस्वस्थ का?
– लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवं होतं, ते मिळालं नाही. ती जागा शिंदे गटाकडे गेली. – एकेकाळी नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेले नाईक गेल्या काही वर्षात बाजूला गेल्याचं चित्र – सिडको आणि महापालिकेतील वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र – एकनाथ शिंदेंकडून नाईक विरोधकांना बळ दिलं जात असल्याची चर्चा – आता ऐरोलीवर शिंदे गटाचा दावा
गणेश नाईकांच्या मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा
नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. लोकसभेला शिंदे गटाच्या उमेदवाराला मोठी आघाडी ऐरोलीतून दिली, तसंच या मतदारसंघात शिंदे गटाचे जास्त नगरसेवक निवडून आले होते असं सांगत हा दावा करण्यात आला आहे. यामुळे भाजपा आणि शिंदे गटात नवी मुंबईत वाद उफळण्याची शक्यता आहे.
“मागच्या वेळी आम्ही युती म्हणून सहकार्य केलं. मोठा लीड आम्ही मिळवून दिला. पण याचं फलित काय मिळालं? विरोधी पक्षापेक्षा येथील स्थानिक नेते आम्हाला टार्गेट करतं. आम्हाला स्वत:चं अस्तित्व टिकवायचं आहे. ऐरोलीत शिवसेनेचे जास्त नगरसेवक आहे, त्यामुळे आम्ही ठाम राहणार आहोत. पुढे काय होईल ते पाहू,” असं नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले म्हणाले आहेत.
Manoj Jarange On Pankaja Munde : लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला. बीडमधील जातीय समीकरण पंकजा मुंडे यांच्या विरोधात गेलं, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. उदयनराजे भोसले यांनी प्रचार करून देखील पंकजा मुंडे यांना मराठा मतांचा फटका बसल्याचं दिसून आलं. अशातच बीड मधील पंकजा मुंडेंचा पराभव कोणामुळे झाला? असा सवाल मनोज जरांगे यांना ‘झी 24 तास’च्या मुलाखतीत विचारण्यात आला. तेव्हा जरांगे यांनी काय उत्तर दिलं? पाहा
काय म्हणाले मनोज जरांगे ?
आपण जेव्हा मोठ्या नेत्याचा वारसा चालवत असतो, तेव्हा जनतेची भावना समजून घेणं गरजेचं असतं. ज्यावेळेस जातीय तेढ निर्माण व्हायला लागला, आम्ही म्हणाल तसंच करा, असं म्हटलं तर मराठा समाज कसं ऐकेल? आम्ही कधी विरोध केला? आम्ही सांगितलं का कोणाला पाडा, आम्ही कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. समाजाचा निर्णय घेतला. आधी तुम्ही पडला नाहीत का? तुम्ही फक्त मराठ्यांना द्वेष देयला लागला, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे जरांगे यांनी केलेलं आवाहन नाहीये का? असा सवाल जरांगेंना विचारला गेला. आमचं म्हणणं फक्त एवढंच होतं की, सरकारने आमची फसवणूक केली. यावेळेस ताकदीनं पाडा. मराठ्यांच्या मताला एकजूट दिसली पाहिजे. आपल्या मताची भीती वाटली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं होतं. मराठ्यांनी एकजुटीने मतदान केल्याने मराठ्यांच्या पोरगरिबाच्या पाया पडायला लागले.
पाहा Video
दरम्यान, आपण जेव्हा एखाद्या पक्षाच्या मोठ्या पदावर काम करतो, एखाद्या मोठ्या नेत्याचा वारसा चालवतो तेव्हा भावनेच्या, जातीय द्वेषाच्या आहारी न जाता जनतेची भावना समजून घ्यावी लागते. जातीय तेढ निर्माण झाल्यास हे का झालं हे समजून घेणं त्यांचीही जबाबदारी आहे, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले. आम्ही मोठ्या मनाने दिली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी ही आम्ही दिलेल्या वाख्येप्रमाणे व्हायला हवी अशी आमची प्रमुख मागणी असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
Ashadhi Wari 2024 : महाराष्ट्राला लाभलेल्या थोर संत परंपरेसाठी जितकं कृतज्ञ रहावं तितकं कमीच. प्रपंचही तितकाच महत्त्वाचा आणि परमात्त्म्याशी एकरुप होणंही तितकंच महत्त्वाचं असं सांगत देवाच्या भक्तीसह समाजप्रबोधनाचं काम संतांनी केलं. दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांच्या आधारावर संतांनी समाजाला सन्मार्गावर नेण्यासाठी मोठा हातभार लावला. अशा या संतांच्या मेळ्यातलं अनेकांच्याच तोंडी असणारं एक नाव म्हणजे, श्री संत ज्ञानेश्वर माऊली. पसायदान असो किंवा ज्ञानेश्वरी… माऊलींचा प्रत्येक शब्द म्हणजे प्रमाण. याच माऊलींनी इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला असं म्हटलं जातं.
निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई या भावंडांनी पैठण मुक्कामी असताना धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला. असं म्हणतात की, धर्म, समाजानं आपल्याला स्वीकारून मुंजीची परवानगी द्यावी या हेतूनं ही मंडळी इथं आली, पण धर्मशास्त्राच्या अभ्यासामुळं त्यांनी वेगळा मार्ग निवडला होता. त्या काळात त्यांच्या एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे संस्कृतात असणारं तत्त्वंज्ञान फक्त ब्राह्मणांनाच वाचता येत होतं. ज्यामुळं सामान्यांना या ठेव्यात डोकावण्याचीही परवानगी नव्हती.
पुढं समाजाला उपदेश करणारी ही भावंड पैठणहून आळंदीच्या दिशेनं निघाली आणि त्यांचा किर्तीमान जनमानसात पसरू लागला. वाटेत लागलेल्या नेवासा या गावी त्यांचं आपुलकीनं स्वागत झालं. ही आपुलकी आणि गावकऱ्यांचं प्रेम या भावंडांना भारावून गेलं आणि या ठिकाणाला आध्यात्मिक साहित्यात ओळख असावी अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.
नेवासा येथे मुक्कामी असतानाच ज्ञानेश्वरांनी आपल्या वैचारिक ज्ञानाचा ठेवा वापरत गीता सामान्यांपर्यंत पोहोचवावी अशी इच्छा निवृत्तीनाथांनी व्यक्त केली आणि गीतेचा उपदेश सामन्यांनाही ग्रहण करता यावा यासाठी त्यांनी तो मराठीत लिहिला आणि गीतेचं हे मराठी सार भावार्थदीपिका नावानं ओळखलं जाऊ लागलं. हे शब्द मराठी साहित्यातील उपलब्ध ठेव्यापैकी सर्वात जुनं साहित्य असल्याचं सांगितलं जातं.
आख्यायिका सांगते…
ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील पसायदानानंतरच्या ओवी क्रमांक 1802 आणि 1803 नुसार…
ऐसे युगी वरी कळी | आणि महाराष्ट्रमंडळी | श्री गोदावरीच्या कूळी | दक्षिणिली || 1802||
त्रिभुवनैकपवित्र | अनादी पंचकोश क्षेत्र || जेथ जगाचे जीवन सूत्र || श्री महालया असे ||1803||
म्हणजेच, अशा रितीनं कलियुगात, महाराष्ट्रदेशात गोदावरीच्या दक्षिण तटावर जिथं जगाचे जीवनसूत्र मोहिनीराज यांचं वास्तव्य आहे, असं अत्यंत पवित्र आणि अत्यंत पुरातन पंचक्रोश (नेवासे) क्षेत्र वसलं आहे.
आख्यायिकेनुसार श्री विष्णूनं इथंच मोहिनी रूप धारण केलं होतं. त्याचं प्रतीक म्हणून इथं श्री मोहिनीराज मंदिर असून ते अतिशय पवित्र क्षेत्र आहे. म्हणूनच माऊलींनी गीतेवरील सार मराठीत लिहिण्यासाठी अर्थात ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी या ठिकाणाची निवड केली असावी.
(वरील माहिती उपलब्ध संदर्भ आणि आख्यायिकांवर आधारित असून, त्यामध्ये साधर्म्य नसू शकतं याची नोंद घ्यावी.)
Nawab Malik : नवाब मलिक सांगा कुणाचे? असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय… ईडी कारवाईनंतर जेलमधून बाहेर आलेल्या नवाब मलिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय… हिवाळी अधिवेशनात ते सत्ताधारी बाकावर येऊन बसले होते. मात्र नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्यात… मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपनं विरोध केला. आता विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकेका आमदाराचं मत महत्त्वाचं आहे. विधानपरिषदेची रणनीती आखण्यासाठी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला नवाब मलिकही हजर होते. याबाबत पत्रकारांनी जेव्हा अजित पवारांकडे विचारणा केली असता त्यांनी संतप्त प्रत्युत्तर दिले.
महायुतीत घेण्यास भाजपनं विरोध केलाय. आता विधानपरिषद निवडणुकीत मलिकांचं मत महायुतीसाठी महत्त्वाचं असणाराय.. त्यामुळं असून अडचण नसून खोळंबा अशी अजित पवार गटाची अवस्था आहे… दरम्यान, नवाब मलिकांच्या उपस्थितीबाबत जेव्हा पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे विचारणा केली, तेव्हा तुला का त्रास होतोय असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं.
नवाब मलिकांबाबतचा प्रश्न अजित पवारांना आवडला नाही, हे यातून स्पष्ट दिसलं… तर कोर्टानं मला मीडियाशी बोलण्यास मनाई केलंय, असं सांगत मलिकांनी प्रतिक्रिया देणं टाळलं…दरम्यान, मलिकांवरून आता विरोधकांनीही अजितदादांना चिमटे काढायला सुरूवात केलीय…
एकूणच काय तर नवाब मलिक असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अजित पवारांची अवस्था झालीय.. आताच ही स्थिती असेल तर विधानसभा निवडणुकीत मलिकांचं भवितव्य काय, असा सवालही उपस्थित होतोय.
सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्याने नवाब मलिक चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नबाव मलिकांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. मात्र, कामकाज सुरु झाल्यानंतर मलिक थेट सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले.. आणि त्याचमुळे महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आलंय. मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचीच चर्चा आहे.. जामिनावर सुटल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर चर्चा सुरु होती. मात्र आज अधिवेशनासाठी दाखल झाल्यावर मलिकांनी आधी अजित पवार गटाच्या कार्यालयात भेट दिली.. त्यानंतर मग शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांची गळाभेट घेतली होती.
Education Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.