by Hansraj Agrawal | Jun 25, 2024 | Trending News
HAL Recruitment 2024: शिक्षण कमी असेल तर आपल्याला नोकरी कुठे मिळणार नाही असा अनेकांचा समज असतो. त्यातली नोकरी मिळालीच तर जास्त पगार मिळणार नाही, असेही अनेकांना वाटते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण दहावी उत्तीर्ण, डिप्लोमा धारकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे आता कमी शिक्षण असेल तरी काळजी करत बसू नका. हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे विविध विभागांमधील 58 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.
रिक्त पदांचा तपशील
ऑपरेटर सिव्हिलची 2 पदे भरली जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावे. तसेच सिव्हिल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/ मॅकेनिकल कोर्स केले असावा. ऑपरेटर इलेक्ट्रीकलची 14 पदे भरली जाणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सिव्हिल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/ मॅकेनिकल पूर्ण केलेले असावे. ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्सची 6 पदे भरली जातील. यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण, सिव्हिल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/ मॅकेनिकल डिप्लोमामध्ये किमान 60 टक्के गुण मिळवलेले असावेत.
ऑपरेटर मॅकेनिकलची 6 पदे भरली जाणार असून उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण असावे. तसेच सिव्हिल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/ मॅकेनिकल डिप्लोमामध्ये 60 टक्के गुण मिळवलेले असावेत. ऑपरेटर फीटरची 26 रिक्त पदे भरली जाणार असून उमेदवाराने फिटर/इलेक्ट्रॉनिक्स/ मॅकेनिकमध्य डिप्लोमा केलेला असावे. ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक्सची 4 पदे भरली जाणार असून उमेदवार दहावी उत्तीर्ण सोबतच फिटर किंवा इलेक्ट्रॉनिक मॅकेनिकमध्ये 60 टक्के गुणांसह आयटीआय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क
या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षांदरम्यान असावे. एसएसी/एसटी उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात आली असून ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, याची नोंद घ्या.
अर्जाची शेवटची तारीख
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या रिक्त पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पद आणि अनुभवानुसार 22 हजार ते 23 हजार रुपयांपर्यंत पगरा दिला जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक येथे काम करण्याची तयारी हवी. 30 जून याची अर्ज करण्याची शेवटची तारीख असून 14 जुलै रोजी अर्ज आलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी आढळल्यास, दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
Source link
by Hansraj Agrawal | Jun 24, 2024 | Trending News
Pankaja Munde : पराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार बनणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार अशी चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेत लागणार अशी चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे पंकजा मुंडे यांना मंत्रीपद द्यावे अशीही मागणी केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील सानपवाडी गावाने एक मुखी ठराव करत पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची मागणी केलीय. पराभवानंतर अनेकवेळा पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत येतं मात्र त्यांना कोणतही मंत्रीपद मिळत नसल्यानं त्यांना संधी द्यावी अशी या गावक-यांची मागणी आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंचं पुनर्वसन झाल्याशिवाय भाजपला मतदान करणार नसल्याची भूमिका या गावक-यांनी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा निसटता पराभव झाला.. मात्र या पराभवानंतर मराठवाड्यासह महाराष्ट्रातला ओबीसी समाज दुखावल्याची चर्चा आहे.. त्यामुळेच आता पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीत झालेल्या बैठकीतही पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची चर्चा झाल्याची माहिती आहे.. राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलाय.. त्याचमुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घ्या असा सूर राज्यातल्या काही नेत्यांचा आहे.. केंद्रीय नेतृत्त्वाला तशी विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
दरम्यान, पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला.. या पराभवानंतर काही जणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. महाराष्ट्रात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आल्यानं त्यांची जागा रिक्त आहे. पीयूष गोयल यांचीही जागा रिक्त झाली आहे. उदयनराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून निवडून आल्यानं ती जागाही रिक्त आहे. तिन्ही जागा भाजपच्या आहेत, मात्र एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाऊ शकते.
दुसरीकडे एकनाथ खडसेंनीही काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची सून तसंच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या. या भेटीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणा-या एकनाथ खडसेंचा स्वगृही परतण्याचा मुहूर्त ठरल्याचा दावा केला जातोय.
राज्यसभा तसंच विधानपरिषद मागणार नाही, विधानसभा लढवणार नाही मात्र पक्षानं संधी दिल्यास ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवेल असं स्पष्ट मत माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलंय. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा महाराष्ट्रभर चिंतन बैठकीचं आयोजन करत आहेत याच अनुषंगाने रावसाहेब दानवे हे संपूर्ण मराठवाड्यात फिरून कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक घेत आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 24, 2024 | Trending News
Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांबरोबरच मराठा नेत्यांवरही निशाणा साधला आहे. मराठ्यांचे नेते मतांचा विचार करतात आरक्षणाचा नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
‘आम्ही सत्य बोलतो, कायद्याने मराठ्यांना आरक्षण दिलं आहे. सरकारी नोंदी आहेत. मराठा हा कुणबी असल्याचा उल्लेख आहे.मी नेमकं महत्त्वाच्या विषयावर बोट ठेवल्याने सगळ्यांना पोटदुखी होऊ लागले. हा मुलगा जो पर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळून देणार आहे. सत्यता बाहेर आली आहे. मराठ्यांच्या जीवावर निवडून येणारे ओबीसी नेते आता मराठा समाजासमोर उघडे पडले आहेत,’ असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि मराठे नेत्यांना सांगतो सगळ्या पक्षातीले ओबीसी नेते मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ते एकटवले आहेत. ते मतांचा विचार नाही तर आरक्षणाचा विचार करायला लागले आहेत. त्याउलट मराठ्यांचे नेते आरक्षणाचा नाही तर मतांचा विचार करत आहेत. हा फरक आहे त्यांच्यात आणि मराठ्यांच्या नेत्यांमध्ये. आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणे महत्त्वाचं नाहीये त्यांच्यासाठी,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘भाजपामधले ओबीसींची सर्व नेते आमदार , मंत्री एकत्र झाले. राष्ट्रवादी, शिंदे गटाचे, पवार गटाचे तर, विरोधी पक्षातील सर्व ओबीसी नेते एकत्र आले आहेत. सर्व ओबीसी नेते एकटवले आहेत आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचे नाही. पण हेच मराठ्यांच्या नेत्यांना समजत नाही का आरक्षण किती मोठं आहे. ओबीसी नेते पदाला आणि मताला किंमत द्यायला तयार नाहीत. याचा अर्थ तुम्हाला कळतंय का आरक्षण किती महत्त्वाचं आहे. मराठ्यांची जात किती मोठी होईल, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
‘आणखी एक सांगतो मराठा समाज आणि मराठ्यांच्या नेत्याला सांगतो मी एकटा पडलोय. मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलं आहे. मी एकटा पडलोय. मग सत्ताधाऱ्यांचे मराठ्यांचे मंत्री तेही कोणी बोलत नाही असो किंवा विरोधी पक्षातील नेतेही बोलत नाही. मराठा समाजाला माझी विनंती आहे तुम्ही एकजूट राहा,’ असं अवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
‘मराठ्यांच्या नेत्याने ताकदीने उभं राहा. 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे मराठा आरक्षण रॅली ठेवली आहे. त्याला सर्वांनी उपस्थित राहा. 6 जुलैला एकही मराठा घरी राहणार नाही सगळे जणांनी आपल्या परिसरात जिथे कुठे जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅली असेल तिथे उपस्थित राहा,’ असं अवाहन जरांगे यांनी केलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 23, 2024 | Trending News
सगेसोयरेसंदर्भात अंमलबजावणी करताना आमच्या व्याख्येप्रमाणे करा. वाशीत उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका. नाहीतर विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर गुलाल रूसेल असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 23, 2024 | Trending News
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 22, 2024 | Trending News
Pankaja Munde on Rajya Sabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती केंद्र सरकारकडे केल्याचं समजत आहे. दरम्यान यावर आता पंकजा मुंडे व्यक्त झाल्या आहेत.
Source link