लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! आचारसंहितेमुळे नोव्हेंबरला हप्ता लांबणार का? मोठी अपडेट

लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! आचारसंहितेमुळे नोव्हेंबरला हप्ता लांबणार का? मोठी अपडेट



महाराष्ट्र सध्या सगळीकडे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची तयारी पाहायला मिळत आहे. आचारसंहिता लागू झाली झाले अशावेळी लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 



Source link

ना फडणवीस, ना अजित पवार, ना बावनकुळे शिंदेंनी शाहांकडे केली 'या' नेत्याची तक्रार; 'पैसे देऊन…'

ना फडणवीस, ना अजित पवार, ना बावनकुळे शिंदेंनी शाहांकडे केली 'या' नेत्याची तक्रार; 'पैसे देऊन…'


Eknath Shinde Meet Amit Shah: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच फोडाफोडीचं राजकारण सुरु असून यावरुनच शिंदे गट आणि भाजपामध्ये मंगळवारी नाराजीनाट्य घडलं. निवडणुकीआधी कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीवरुन राजकारण तापलेलं असतानाच अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठली.

Add Zee News as a Preferred Source

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन शिंदेंनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान शिंदेंनी थेट नाव घेऊन महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची तक्रार अमित शाहांकडे केली. या व्यक्तीमुळेच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याचं शिंदेंनी सांगितल्याचं समजतं. खास बाब म्हणजे ही व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांपैकी एकही नाही. शिंदेंनी नेमकी कोणाविरुद्ध आणि काय तक्रार केलीये याचा तपशील समोर आलाय.

नाराजी नाट्य काय? मुख्यमंत्र्यांबद्दलही शिंदे सेनेत नाराजी

शिवसेनेनेच्या महायुतीमध्ये महत्वाचा घटक पक्ष असूनही पक्षाची, मंत्र्यांची कोंडी केली जात असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता असून उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे आम्हालाही गृहत धरु नका असा संदेश देण्यासाठीच शिवसेना मंत्र्यांनी मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावल्याबद्दल शिवसेनेते नाराजी आहे.

शिंदेंनी अमित शाहांकडे कोणाची तक्रार केली?

शिंदेंनी बुधवारी सायंकाळी जवळपास 50 मिनिटे अमित शाहांशी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. यावेळी शिंदेंनी शहा यांच्याकडे राज्यातील भाजप नेत्यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याची तीव्र प्रतिक्रिया महायुतीमध्ये उमटली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेही जास्त न ताणता नमते घेण्याची भूमिका घेत प्रकरणावर पडदा टाकला. मात्र असं असलं तरी अमित शाहांच्या भेटीदरम्यान एकनाथ शिंदेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात तक्रार करताना गंभीर आरोप केल्याचे समजते.

भाजपचे काही नेते जाणीवपूर्वकपणे…

चव्हाण हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पैसे देऊन फोडत असल्याची तक्रार शिंदेंनी केली आहे. निवडणुकांमध्ये महायुतीला पोषक वातावरण असताना भाजपचे काही नेते जाणीवपूर्वक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून विरोधकांना आयते कोलित मिळत असल्याचे शिंदे यांनी शहा यांच्या निदर्शनास आणून दिले. भाजप नेत्यांच्या गोंधळामुळे महायुतीत उगाचच बिघाडी होत असल्याचेही शिंदे यांनी सांगितल्याचे समजते. 

एकमेकांवर टीका टाळली पाहिजे

विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. मात्र काही नेते ते वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याने मीडीयात नाहक उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे जनमानसात उगाचच संभ्रम निर्माण होत आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. युतीच्या विजयी घोडदौडीत त्यामुळे विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत त्यांच्याकडून अशा पध्दतीने काम यापुढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असं शिंदेंनी अमित शाहांशी झालेल्या चर्चेत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 





Source link

पाणी भरण्याच्या वादात महिलेने तोंडावर मारला झुरळांचा स्प्रे; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, कारण….

पाणी भरण्याच्या वादात महिलेने तोंडावर मारला झुरळांचा स्प्रे; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, कारण….


Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

…Read More





Source link

महाराष्ट्राचे राजकारण हे असचं आहे! कार्यकर्ते राहिले बाजूला… आमदार, मंत्र्यांची मुलं, भाऊ, पत्नी, आई यांनाच मिळाली उमेदवारी

महाराष्ट्राचे राजकारण हे असचं आहे! कार्यकर्ते राहिले बाजूला… आमदार, मंत्र्यांची मुलं, भाऊ, पत्नी, आई यांनाच मिळाली उमेदवारी


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

20 एकरमधील MHADA इमारती…; निवडणुकीच्या धामधुमीत निर्णयांचा धडाका, मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय

20 एकरमधील MHADA इमारती…; निवडणुकीच्या धामधुमीत निर्णयांचा धडाका, मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय


Maharashtra Cabinet Meeting: राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनपेक्षित युती घडत असून, आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जात आहेत. यादरम्यान राज्य मंत्रिमंडळाने आज बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये म्हाडा गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता 339 पदांची निर्मिती, शिक्षकांची 232आणि शिक्षकेतर 107 पदांना मान्यता देण्यात आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मंत्रिमंडळ बैठकीत नगर विकास विभाग, गृहनिर्माण विभाग, मदत व पुनर्वसन विभाग; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि विधि व न्याय विभागासंदर्भात निर्णय घेतला आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

1) नगर विकास विभाग

राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर. सिडकोसह, अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनांवर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याकरिता अधिकार मिळणार. निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी होणार. सिडकोसह, विविध प्राधिकऱणांकडील लॅँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी धोरण

2) गृहनिर्माण विभाग
बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित. यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होणार

3) मदत व पुनर्वसन विभाग
भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापनेची प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी नवीन पदांची निर्मिती. यामुळे भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम ६४ अन्वये दाखल असलेल्या प्रलंबित प्रकऱणांचा जलदगतीने निपटारा होणार

4) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता 339 पदांची निर्मिती. शिक्षकांची 232आणि शिक्षकेतर १०७ पदांना मान्यता

5) महिला व बाल विकास विभाग
महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील मानहानीकारक शब्द वगळण्यास मान्यता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधि व न्याय विभागाने केलेल्या शिफारशींनुसार महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम, १९५९ या अधिनियमातील कलम ९ व कलम २६ मधील महारोगाने पिडीत, कुष्ठरोगी, कुष्ठालये असे शब्द वगळणार

6) विधि व न्याय विभाग
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा कऱण्यास मान्यता





Source link

बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा आहे शरद पवारांचा जावई, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, यांचे नाव जाणून शॉक व्हाल

बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा आहे शरद पवारांचा जावई, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, यांचे नाव जाणून शॉक व्हाल


Balasaheb Thackeray And Sharad Pawar Relation :  हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेते शरद पवार यांची मैत्री जगजाहीर आहे. यांचे नाते मात्र, मैत्रीपलिकडचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा आहे शरद पवारांचा जावई आहे. शरद पवारांचा जावई हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उद्योगपती देखील आहे. यांचे नाव जाणून तुम्ही शॉक व्हाल. बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा आहे शरद पवारांचा जावई कसा झाला. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे सोयरीक कसे जुळले जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

सदानंद भालचंद्र सुळे…. यांच्या नावाची फारशी चर्चा होत नाही. मात्र, सुप्रिया सदानंद सुळे म्हंटले की सदानंद सुळे हे नाव देखील चर्चेत येते.  सदानंद सुळे महाराष्ट्रातील मोठे उद्योगपती आहेत. सदानंद सुळे हे खासदार सुप्रिया सुळे यांचे पती आहेत. बाळासाहेब ठाकरे हे सदानंद सुळे यांचे मामा आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची बहिण सुधा सुळे यांचे सदानंद हे सुपूत्र आहेत. 

सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची ओळख कशी झाली?

 सुप्रिया सुळे यांचं 12 वी पर्यंत शिक्षण पुण्यातच झालं. 12 वी नंतर त्यांनी मुंबईतील जय हिंद काँलेजमधून मायक्रोबायलाॅजी विषयात Bsc केली. त्यावेळी शऱद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ठाकरे आणि पवार कुंटुंबाचे चांगले संबध होते.  याच दरम्यान फॅमिली फ्रेंडच्या माध्यमाथून सुप्रिया यांची सदानंद सुळे य़ांच्यासोबत ओळख झाली. त्यावेळेस संदानद सुळे हे अमेरिकेमध्ये नोकरी करत होते. 

सुप्रिया आणि सदानंद सुळे यांच्या दोघांचा स्वभाव शांत आणि मनमिळावू असल्यामुळे यांच्या मैत्रीचं रूपातंर प्रेमात झालं. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना विरोधी बाकावर होती. मात्र असं असलं शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री होती. हीच मैत्री त्यांनी राजकारणापलिकडे जपली होती.पवारांचं आणि ठाकरे कुटुंबियांच पूर्वी पासून एकमेकांच्या घरी येण जाण असायचं. बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई आणि प्रतिभाताई पवार यादेखील सख्ख्या मैत्रिणी होत्या. 

सुप्रिया आणि सदानंद सुळे यांचे मनं जुळले होते. स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी लग्न ठरवण्यास पुढाकार घेतला. या लग्नाला तसा कोणाचा विरोध नव्हताच. सगळं जुळून आलं. तारीख ठरली गेली. शरद पवारांनी स्वत: अनेक गावात जाऊन सुप्रियाताईच्या लग्न पत्रिका वाटल्या.  देशभरातून दिग्गज नेते या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते. लाखो लोकांच्या उपस्थितीत 4 मार्च 1991 मध्ये हा दिमाखदार लग्ना सोहऴा पार पडला.

लग्नानंतर सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे अमेरिकेत गेले. सदानंद सुळे यांची नोकरी तिथं सुरू होती.  काही काळानंतर सदानंद सुळे यांची सिंगापुरला बदली झाली. सुप्रिया आणि सदानंद सुळे काही काळ तिथे राहिले. त्यानंतर जकार्ताला काही ते नोकरीला होते. मात्र त्यानंतर त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. भारतात परतल्यानंतर सदानंद सुळे यांनी व्यवसाय क्षेत्रात आपलं नशिब आजमावलं. तर, सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय झाल्या. 

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp