by Hansraj Agrawal | Jun 15, 2024 | Trending News
UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. यासाठी ती खूप मेहनत घेत असते, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत असते. स्वत:चे अश्रू लपवून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत असते. अशा आईचं स्वप्न पूर्ण होतं तेव्हा तिला कसं वाटत असेल? हो. ठाणे शहरातील रस्त्यावर सफाई करणाऱ्या एका महिलेच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. जेव्हा तिला कळाले की आपल्या मुलाने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. या महिलेचा 32 वर्षांचा मुलगा प्रशांत सुरेश भोजने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झाला. त्याला यूपीएससी परीक्षेत 894 वा क्रमांक मिळाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रशांतचे नेहमीच स्वप्न होते.
9व्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण
प्रशांत भोजनेंना मिळालेल्या यशाच्यामागे मोठ्या संघर्षाची कहामी आहे. एकदा यूपीएससी उत्तीर्ण होण्याआधी ते आधीच्या 8 परीक्षा अनुत्तीर्ण झाले होते. संघर्ष त्यांच्या पाचवीला पूजला होता. 2015 मध्ये प्रशांत यांनी पहिल्यांदा यूपीएससी दिली. यात त्यांना यश मिळाले नाही. दुसरा, तिसरा प्रयत्न केला पण यश दूरच चालले होते. सातव्या, आठव्या प्रयत्नानंतरही त्यांच्या पदरी निराशाच येत होती. घरची जबाबदारी वाढत होती. आर्थिक परिस्थिती तोंड वासून पाहत होती. अशावेळी काहीही करुन यूपीएससी तर उत्तीर्ण करायचीच हा ठाम निश्चय त्यांनी केला. नवव्यांदा परीक्षा दिली. अखेर नवव्या प्रयत्नात ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले.
त्यांच्या या कामगिरीनंतर खार्तन रोड सफाई कामगार कॉलनीतील रहिवासी आणि कुटुंबीयांनी मिळून जल्लोष केला. यानंतर लोकांनी रात्री प्रशांतची मिरवणूक काढली होती. त्यात काही स्थानिक राजकारणीही सहभागी झाले होते.
आई ठाणे पालिकेत सफाई कामगार
प्रशांत भोजने यांची आई ठाणे महानगरपालिकेत (TMC) सफाई कामगार म्हणून काम करते. तर त्यांचे वडील नागरी संस्थेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. प्रशांत यांनी इंजिनीअरिंगची पदवी घेतली प त्या क्षेत्रात काम करण्यात त्यांना अजिबात रस नव्हता. कारण आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांना खुणावत होते.
प्रशांत सातत्याने यूपीएससी परीक्षा देत होते. 2020 मध्ये दिल्लीतील स्पर्धात्मक परीक्षा कोचिंग सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. येथे त्यांना विद्यार्थ्यांच्या मॉक परीक्षेचे पेपर तपासण्याचे काम देण्यात आले. हे काम करुन मी माझ्या अभ्यासासोबतच माझा उदरनिर्वाह चालवायचो असे प्रशांत सांगतात.
‘माझा स्वतःवर विश्वास होता’
परीक्षेला बसणे थांबव आणि घरी परत असे पालकांनी अनेकदा सांगितले होते. पण मला माझ्यावर विश्वास होता. माझा निश्चय दृढ होता. एकना एक दिवस मी माझे ध्येय साध्य करेल, असे मला वाटायचे असे प्रशांत यांनी सांगितले.
जेव्हा मी UPSC परीक्षेला बसत होतो, तेव्हा माझे आई-वडील काहीही न बोलता सर्वकाही सहन करत होते. पण आता माझा निकाल लागला आहे. आपला मुलगा यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे पाहून खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सुरेश भोजने यांनी दिली. माझ्या मुलाने नोकरी करावी असे मला आधी वाटायचे पण आता आम्हाला वाटते की त्याने घेतलेला निर्णय अगदी योग्य होता, असेही ते म्हणाले.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 14, 2024 | Trending News
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड कऱण्यात आली आहे. यानंतर पुण्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी केंद्रात मंत्रीपद मिळालं तर संधीचं सोनं करेन असं म्हटलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 14, 2024 | Trending News
Sanjay Raut Slams Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाला मराठी मतं मिळालेली नाहीत, असं विधान केलं. तसेच हिंदू मतदार ठाकरेंपासून दूर गेल्याचंही फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यावरुन आता उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. मराठी मतं आम्हाला नाही मिळाली तर मुंबई परदेशी नागरिकांनी मतदान केलं का? असा सवाल राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे.
…मग मुंबईत कोणी मतदान केलं?
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी लोकांची मतं मिळाली नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे, असा संदर्भ देत मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, ‘मग कोणाची मतं मिळाली आहेत?’ असा प्रतिप्रश्न केला. “ही मतं तुम्हाला मिळाली का?” असा सवालही राऊत यांनी फडणवीस यांना केला आहे. “आम्हाला लाखो मतं मिळाली आहेत की कोणाची मतं आहेत? इथे दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इराण आणि इराकमधील लोकांनी येऊन मतदान केलं का?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
नक्की वाचा >> ‘शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..’; खळबळजनक दावा
तुमचा विजय चोरीचा
“धारावीत बघा, गिरगावात बघा, भांडूपमध्ये मतदान बघा. जिथे जिथे आमचे लोक जिंकले आहेत किंवा थोडक्या फरकाने पडले आहेत तिथे मराठीच लोक राहतात. ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनी आम्हाला मतदान केलं आहे. तुमचा विजय हा सरळ मिळालेला विजय नाही. तुम्ही अमोल किर्तीकरची जागा चोरली. आमचा विजय निर्मळ आणि निर्णायक आहे. या राज्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे. मराठी, मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी असो किंवा गुजराती असो सर्वांनी आम्हाला मतदान केलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> ‘अहंकारामुळे रामाने 241 वरच रोखलं’, जाहीर कार्यक्रमात RSS चा BJP ला घरचा आहेर
संघाच्या टीकेवरुन टोला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता राऊत यांनी मागील 10 वर्षांपासून देशात अहंकारच पाहायला मिळाल्याचा टोला राऊत यांनी लगावला. तसेच देश टिकून रहावा असं वाटत असेल तर संघाने पडद्यामागे राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधताना फडणवीस हे मराष्ट्रतील राजकारणातील खलनायक आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच वायनाडमधून राहुल गांधींनी मतदासंघ सोडल्यास तिथून प्रियंका गांधी लढणार असतील तर आमचा त्यांना पाठींबा असेल असंही राऊत म्हणाले.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 13, 2024 | Trending News
Aditya Thackeray Birthday : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोशल मिडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. आदित्य ठाकरे यांचे कौतुक करताना किरण माने यांनी विरोधकांवर शाब्दिक बाण सोडले आहेत.
किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी…
काळानुसार जगण्याची पद्धत बदलत जाते. भवतालातली परिस्थिती बदलत जाते. माणसाचं वागणं-बोलणं बदलत जातं. आज्जा जसा बोलत होता, वागत होता तसं तंतोतंत आपला बाप नसतो… आणि आपण बापासारखे वागणारे-बोलणारे नसतो. जुन्यातलं नेमकं काय घ्यायचं, काय टाकायचं…आणि घेतलेलं नव्याशी कसं जोडायचं हे ज्याला कळलं तो घराण्याचं नांव काढतो !
ज्यांचे बापजादे महान, कर्तृत्त्ववान होऊन गेलेत त्यांच्यावर तर जबाबदारीचं प्रचंड मोठं ओझं असतं. कारण समाजाच्या त्यांच्याकडून खुप अपेक्षा असतात. लोक त्यांच्यात महामानव ठरलेल्या त्याच्या पुर्वजाला बघतात. म्हणून त्या अपेक्षा बर्याचदा फोल ठरतात. पण लाखात एखादा असा हिरा असतो, जो आपल्या थोर पुर्वजांचं नांव आणखी ऊंच तर करतोच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवण्याची क्षमता बाळगतो. असाच एक लखलखता सुर्य महाराष्ट्राकडे आहे, ज्याचं नांव आहे आदित्य ठाकरे !
…ज्याचे पणजोबा होते साक्षात प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधनकार म्हणजे वर्चस्ववादी भिक्षुक्यांचा कर्दनकाळ… प्रतिगामी किड जाळणारा पुरोगामी विचारांचा जाळ… बहुजनांना प्रकाशवाट दाखवणारी धगधगती मशाल ! …ज्याचे आजोबा होते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. मुंबईतल्या मराठी माणसांचा तारणहार… सिनेनाट्य कलाकारांचा आधार… तमाम हिंदुंच्या काळजातलं भगवं शिवार !
आणि ज्याचा बाप आहे द ग्रेट उद्धव ठाकरे. जणू वर्चस्ववाद्यांनी प्रबोधनकारांचा बदला घेण्यासाठी की काय, पण या नातवाला एकाकी खिंडीत गाठला. ज्याला संपवण्यासाठी जबरदस्त सापळा रचला. पण हा ठाकरी वाघ त्या हिंस्त्र लांडग्यांच्या झुंडीला भिडला, नडला, एकेकाला फाडून पुरून उरला !
अशी थोर परंपरा लाभलेला हा पोरगा. ‘आदित्य’ हे नांव सार्थ ठरवत दुश्मनांनी रचलेली बदनामीची सगळी कारस्थानं भेदून तेजानं लखलखत वर आलाय. वरवर कोवळ्या दिसणार्या या मुलात तिन पिढ्यांचा सगळा अर्क तर आहेच, पण भवतालाचं सखोल भान असलेलं स्वत:चं म्हणून एक संवेदनशील, भक्कम व्यक्तीमत्त्व आहे !
आदित्यजी, तुम्ही महाराष्ट्र पिंजून सगळे नवे-जुने शिवसैनिक शिवबंधनाच्या अनमोल धाग्यात बांधलेत… आता आम्ही एकजुटीनं तुमच्या सोबत आहोत. शिवसेनेच्या घातक्यांना आता निष्ठेची खरी ताकद दाखवूया. समाजातही आणि राजकारणातही विषारी तण माजलंय… सगळी ताकद लावून ते उपटून फेकून देऊया. या महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला शुद्ध बनवू या, सुंदर बनवुया.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, आदित्यजी. जय महाराष्ट्र.
– किरण माने.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 13, 2024 | Trending News
Mahayuti Leaders Come Forward To Oppose This Project: कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी श्रमिक महासंघच्या वतीने 18 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपेक्षा सत्ताधारी नेते शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीला शक्तीपीठ महामार्ग प्रकरणाचा जबर फटका महायुतीला बसला. त्यामुळेच हा महामार्ग रद्द करावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेते एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सत्ताधारी एकवटले
माजी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश अबिटकर, भाजप नेते समरजित घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत शेतकरी हिताचा नसणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा दिलाय. तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी देखील हा महामार्ग रद्द करावा अशी आग्रही मागणी केली आहे. शक्तिपीठ महामार्ग हा गावांचा विनाश करणारा असून भांडवलदार आणि कंत्राटदार यांना मालामाल करणार आहे असं श्रमिक महासंघाचे म्हणणं आहे. केवळ संपत्तीची लूट करून हा माल परदेशात पाठवण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला गेला असा आरोप देखील श्रमिक महासंघाने केला आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विरोधकांनी चांगली मोट बांधली आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, स्वामिनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी शेतकऱ्याची चांगली मोट बांधून वातावरण निर्मिती केली आहे.
कसा आहे हा महामार्ग?
– राज्य सरकारने नागपूर ते गोवा असा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचे काम हाती घेतले आहे.
– यासाठी 27 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे.
– या महामार्गाठी 85 हजार कोटी खर्च होणार आहे.
– या माहामार्गाच्या भूमी संपादनालां सुरूवात झाल्यानंतर तीव्र विरोध सुरू झाला.
– या महामार्गासाठी संपादित करण्यात येणारी जमीन सर्वाधिक सुपीक असल्याच शेतकऱ्यांचे म्हणणं आहे .
सत्ताधारी नेत्यांनी या महामार्गाला तीव्र विरोध का केला आहे याची प्रमुख कारणे पाहूया…
– लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या पट्ट्यात महायुतीच्या उमेदवाराला कमी मतदान झाले.
– सत्ताधारी नेत्यांच्या मतदारसंघातून हा महामार्ग जात असल्यामुळे याचा फटका विधानसभेला बसू शकतो.
– शक्तीपीठ महामार्ग ज्या भागातून जातो त्या भागांचा विचार केल्यास लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला 12 जागांचा फटका बसल्याचं सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 12, 2024 | Trending News
चार महिन्यांत सरकार बदलायचंय आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Source link