अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार

अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार


Nationalist Congress Party Ajit Pawar Faction : एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काहीसा पिछाडीवर पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, महाराष्ट्राबाहेर म्हणजेच  अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादीने दणक्यात  एन्ट्री केली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेतील यशानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला  राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळावी यासाठी दावा करणार आहेत. 

अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचे 3 आमदार विजयी झाले आहेत. अजित पवार पक्षाचे  टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन या तीन उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार आहेत.  लवकरच अजित पवार निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी दावा करणार आहेत.  मागच्या वर्षी NCP चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला होता. मात्र, आता अरुणाचल प्रदेशमधील विजयानंतर राष्ट्रवादी पक्ष पुन्हा मान्यतेसाठी दावा करणार  असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 

अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला होता.  2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.  यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली.  राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच, पक्ष आणि चिन्ह असं म्हणत अजिच पवार पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता.  यानंतर निवडणुक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह दिले आहे. 

वर्षभरापूर्वी रद्द झाली होती राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्षाची मान्यता

राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी अनेक निकष पूर्ण करावे लागतात. या निकषांची पूर्तता न केल्यामुळे निवडणुक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केल्याचे समजते. 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. राष्ट्रवादीला 2014 नंतरच्या कामगिरीमुळे तो धोक्यात आला होता.  2019 नंतर 21 पैकी 12 राज्यात राष्ट्रवादीने निवडणुक लढवली होती. या निकालातील राष्ट्रावादीची कमजोरी विचारात घेऊन एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रावदीची मान्यता रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले होते. 

काय आहेत निवडणुक आयोगाचे निकष

विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत
लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 4 जागा मिळाल्या पाहिजेत.
लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 2% जागा मिळाल्या पाहिजेत
या जागा कमीत कमी 3 राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत
संबधीत पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. (पश्चिम बंगाल,त्रिपुरा,मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे तृणमूल काँग्रेसला नुकताच 7 व्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला गेला आहे.)

राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे 

राखीव निवडणूक चिन्ह
सरकारतर्फे पक्षाच्या कार्यालयासाठी subsidized दरांमध्ये जमीन
दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण
निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण
 





Source link

कोण असली? कोण नकली? महाराष्ट्राच्या मतदारांनी दिला कौल; पाहा एक्झिट पोलचे आकडे

कोण असली? कोण नकली? महाराष्ट्राच्या मतदारांनी दिला कौल; पाहा एक्झिट पोलचे आकडे


Maharashtra Exit Poll Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्याआधी विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एनडीए की ‘इंडिया’? कोण पंतप्रधान होणार? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला 4 तारखेला मिळतीलच. दरम्यान महाराष्ट्रातील निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. 

देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या जास्त लोकसभा जागा असलेला महाराष्ट्र निर्णायक ठरणार आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पडली. दोन्हीकडचा एक गट भाजपसोबत जाऊन सत्तेत बसला. दरम्यान असली शिवसेना आणि नकली शिवसेना तसेच असली राष्ट्रवादी आणि नकली राष्ट्रवादी हा मुद्दा रंगला. पण मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिलाय हे महत्वाचे आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कोणाचे पारडे जड आहे हे पाहुया. 

रिपब्लिक मॅट्रीजच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात ठाकरे गटाला 9 जागा तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 7 तर अजित पवार गटाला 1 जागा मिळेल.

इंडिया टीव्हीच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ठाकरे गटाला 11 जागा तर शिंदे गटाला 6 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 5 तर अजित पवार गटाला 1 जागा मिळेल.

एबीच्या सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 9 जागा तर शिंदे गटाला 6 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला  तर अजित पवार गटाला 

टीव्ही 9 पोलस्ट्रेट सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 14 जागा तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 6 तर अजित पवार गटाला शुन्य जागा मिळेल.

न्यूज 18 च्या सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 7 जागा तर शिंदे गटाला 7 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 4  तर अजित पवार गटाला 2 जागा मिळतील. 

एकूण एक्झिट पोल पाहिले असता महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट आघाडीवर दिसत आहेत. तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गट पिछाडीवर दिसत आहेत.





Source link

हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, वाशिममध्ये ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी दिवस रात्र भटकंती

हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, वाशिममध्ये ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी दिवस रात्र भटकंती



वाशिम जिल्ह्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दिवस रात्र भटकंती करावी लागत आहे.



Source link

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!


Chhagan Bhujbal On Jitendra Awhad : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांची मागल्या काही दिवसांमधली ही वक्तव्य चर्चेत आहेत. या वक्तव्यांवरून भुजबळांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. भुजबळांची मागील काही दिवसांमधली बरीचशी विधानं ही महायुतीच्या विरोधातली आहे. विधानसभेसाठी 90 जागांची मागणी, मनुस्मृतीवरून झालेला वादात आव्हाडांची (Jitendra Awhad) केलेली पाठराखण यासारख्या अनेक विषयांवर भुजबळांनी केलेली विधानं महायुतीच्या भूमिकेशी विसंगत आहेत.

भुजबळ काय म्हणाले ?

काय समज द्या, समज द्या, असं लावलंय. मी माझ्या पक्षात बोलणारच. मी जागावाटपाचा मुद्दा माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडला होता.  मी आता मीडियासमोर बोलणार नाही. मात्र मला जे काही सांगायचं असतं, ते मी पक्षाला सांगेन. आम्ही महायुतीमध्ये येताना भाजप नेते काय बोलले होते, त्याची आठवण फक्त मी त्यांना करुन दिली, असं म्हणत भुजबळांनी आपली भूमिका मांडली होती.

मनुस्मृती प्रकरणावरुन बाबासाहेबांचा फोटो फाडल्यापकरणी आव्हाड यांच्याकडून अनवधानाने चुक झाली. त्याची त्यांनी माफीही मागितली. त्यामुळे त्यावरुन विनाकरण राजकारण करु नये, असं म्हणत आव्हाडांची पाठराखण केली होती.

अमित शहांनी लोकसभेला नाव सुचवूनही उमेदवारी मिळाली नाही आपली अवहेलना झाल्याचं म्हणत भुजबळ यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली. तर उद्धव आणि पवारांबद्दल जनतेमध्ये सहानुभूती असल्याचं म्हणत भूजबळ यांनी महायुतीमध्ये बॉम्ब टाकला होता. तर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांनाही टोला लगावला होता. त्यामुळे अनेकांचा भूवया उंचावल्या होत्या. तर होर्डिंग प्रकरणात त्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली होती.

दरम्यान, छगन भुजबळांची ही वक्तव्य विचार करायला लावणारी आहेत. भुजबळ जरी आपण नाराज नसल्याचं सांगत असले तरी त्यांच्या मनात काय चाललंय हे सांगायला राजकीत पंडितांची गरज नाहीय. समझने वालों को इशारा काफी है, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.





Source link

पुणे हादरले! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडले, 30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली माती

पुणे हादरले! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडले, 30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली माती


Pune News Today:  पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात 307 कलमअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ धमकावणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधीत तरुणीने आणि तिच्या आईने केला होता. ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन दावा न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आलेल्या 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या सहाय्याने अंगावर माती टाकून तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिनी आणि तिच्या घरच्यांनी केला आहे. 

तरुणीने केलेल्या आरोपानुसार, नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असताना तरुणी आणि त्या नागरिकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओत तरुणी कंबरेपर्यंत मातीमध्ये गाडली गेली असल्याचं दिसतंय. तरुणीने घडलेल्या घटनेबाबत वेल्हा पोलीस स्टेशनंमध्ये रीतसर लेखी तक्रार केली आहे. त्यानंतर राजगड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसंच, या प्रकरणात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 

काय आहे हे प्रकरण?

2006 मधल्या प्रकरणात तत्कालीन कलेक्टर साहेबांनी एक जागा भूसंपादन केले. मात्र, त्या जागेचा मोबदला या पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना मिळाला नाहीये. त्यामुळं त्यांनी जागेवरील ताबा सोडण्यास नाकार दिला. तसंच, ज्यांनी ही जागा घेतली आहे त्या जागेच्या मालकाने बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 22 वर्षीय तरुणीच्या गाडल्याचा प्रकार केला. तसंच, तरुणीच्या अंगावर ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने माती टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

या प्रकरणी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, जमिनीचा ताबा घेण्यासाठी मुंबईवरुन गुंड मागवल्याचाही प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेल्या ट्रॅक्टर आणि जेसीबीदेखील जप्त करण्यात आले आहेत. 





Source link

Maharastra Politics : 'सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर…', रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharastra Politics : 'सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर…', रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट


Rohit Pawar On Ambulance Scam : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने निविदा देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. राज्यातील अत्यावश्यक सेवांसाठी दावोसमध्ये एका स्पॅनिश कंपनीबरोबर करार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील सुमित या कंपनीने त्यांना निविदा करून दिली होती, असा आरोप देखील काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी केला होता. अशातच आता पुन्हा रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून (Ambulance Scam) सरकारला धारेवर धरलंय.

काय म्हणाले रोहित पवार? 

राज्याच्या आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या अँब्युलन्स घोटाळ्यात ज्या कंपनीला टेंडर मिळाले, त्या कंपनीची स्थापनाच मुळी चक्क टेंडर मिळाल्यानंतर झालीय. म्हणजे आधी पेपर पास झाले आणि नंतर परीक्षेचा फॉर्म भरला असा हा सगळा सावळा गोंधळ आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

मर्जीतल्या लोकांना काम मिळावं म्हणून सर्व कायदे आणि नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर बसवणं, हे बाजारातून खेकडा विकत घेण्याइतकं सोपं नाही! तरीही पोखरलेल्या व्यवस्थेने ते करून दाखवलं. पण न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतल्याने आज नाही तरी उद्या मात्र या प्रकरणाचा भांडाफोड झाल्याशिवाय राहणार नाही, असं खुलं आव्हान रोहित पवार यांनी दिलं आहे. 

दरम्यान, राज्य सरकारमधील अनेकांचा विरोध डावलून आणि प्रशासनावर दबाव आणून विशिष्ट आणि ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून ही टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप होता.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp