…असं झाल नाही तर अजित पवार मोठा निर्णय घेणार? महायुतीत प्रचंड तणाव

…असं झाल नाही तर अजित पवार मोठा निर्णय घेणार? महायुतीत प्रचंड तणाव



राष्ट्रवादी अजित पवार गट विधानसभा निवडणुका महायुतीसोबत लढणार की स्वतंत्र लढणार अशी चर्चा सुरू झालीय. याचं कारण म्हणजे अमोल मिटकरी यांनी केलेलं एक ताजं विधान… पाहुया त्यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट..



Source link

Video : आषाढी एकादशीआधी पंढरपुरात मोठा अनर्थ टळला; चेंगराचेंगरीची दृश्य चिंतेत टाकणारी

Video : आषाढी एकादशीआधी पंढरपुरात मोठा अनर्थ टळला; चेंगराचेंगरीची दृश्य चिंतेत टाकणारी



Ashadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पंढरपुरात आतापासूनच राज्यातून आणि देशातूनही भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. 
 



Source link

पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी, राज्यात मुलांच्या आरोग्याशी खेळ

पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी, राज्यात मुलांच्या आरोग्याशी खेळ


अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात मेलेली चिमणी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायतीमधील ही घटना आहे. नील शिंदेकर या मुलाला देण्यात आलेल्या पोषण आहारात  मेलेली चिमणी आढळली. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार (Poor Nutrition) देत असल्याचा आरोप करण्यात येतोय. यासंदर्भात, सरपंच आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना निवेदन दिलंय.दरम्यान, तक्रारीनंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीनं दिलीय.

पुण्यातही (Pune) अशाच एका घटनेनं खळबळ उडाली. शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचं समोर आलंय. तांदुळ, मटकीसह मुगडाळीत किडे आणि अळ्या आढळल्या. खेड तालुक्यातल्या बहुळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पोषण आहाराचा उपक्रम सुरू करण्यात आलाय. मात्र, यासाठी लागणारं धान्य निकृष्ट दर्जाचं असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होतायत.

नागपूर असो वा पुणे. दोन्ही घटनांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होतोय, हे वास्तव आहे. शालेय पोषण आहाराच्या नावाखाली नेमकं कोण कुणाचं पोषण करतंय, हा देखील मोठा सवाल आहे.

शालेय पोषण आहार योजना म्हणजे काय?
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसंच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचं प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी राज्यामध्ये 22 नोव्हेंबर 1995 पासून इयत्ता 1 ली ते 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येतं. राज्यामध्ये ही योजना राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानीत व अंशत: अनुदानीत शाळा, वस्तीशाळा, महात्मा फुले शिक्षण हमी योजना केंद्रे यांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते. 2008-09 पासून राज्यातील इयत्ता 6 वी ते 8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेमध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ घरी न देता शिजवलेले अन्न (Cooked Food) द्यावे, असे आदेश दिले. त्यानुसार 2002 पासून या योजनेचे स्वरुप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेले अन्न देण्यात येत आहे. यासाठी काही संस्थांची नेमणुक करण्यात आली आहे. पण अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं जात असल्याच्या तक्रारी करण्यात प्राप्त झाल्यात.





Source link

10 वी उत्तीर्णांना हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये नोकरी; कुठे, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या

10 वी उत्तीर्णांना हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये नोकरी; कुठे, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या


HAL Recruitment 2024: शिक्षण कमी असेल तर आपल्याला नोकरी कुठे मिळणार नाही असा अनेकांचा समज असतो. त्यातली नोकरी मिळालीच तर जास्त पगार मिळणार नाही, असेही अनेकांना वाटते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण दहावी उत्तीर्ण, डिप्लोमा धारकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी चालून आली आहे.  त्यामुळे आता कमी शिक्षण असेल तरी काळजी करत बसू नका. हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे विविध विभागांमधील 58 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. 

रिक्त पदांचा तपशील

ऑपरेटर सिव्हिलची 2 पदे भरली जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावे. तसेच सिव्हिल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/ मॅकेनिकल कोर्स केले असावा. ऑपरेटर इलेक्ट्रीकलची 14 पदे भरली जाणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सिव्हिल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/ मॅकेनिकल पूर्ण केलेले असावे. ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्सची 6 पदे भरली जातील. यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण, सिव्हिल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/ मॅकेनिकल डिप्लोमामध्ये किमान 60 टक्के गुण मिळवलेले असावेत. 

ऑपरेटर मॅकेनिकलची 6 पदे भरली जाणार असून उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण असावे. तसेच सिव्हिल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन/ मॅकेनिकल डिप्लोमामध्ये 60 टक्के गुण मिळवलेले असावेत. ऑपरेटर फीटरची 26 रिक्त पदे भरली जाणार असून उमेदवाराने फिटर/इलेक्ट्रॉनिक्स/ मॅकेनिकमध्य डिप्लोमा केलेला असावे. ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक्सची 4 पदे भरली जाणार असून उमेदवार दहावी उत्तीर्ण सोबतच फिटर किंवा इलेक्ट्रॉनिक मॅकेनिकमध्ये 60 टक्के गुणांसह आयटीआय उत्तीर्ण असावा. 

वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क

या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षांदरम्यान असावे. एसएसी/एसटी उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात आली असून ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, याची नोंद घ्या. 

अर्जाची शेवटची तारीख

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या रिक्त पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पद आणि अनुभवानुसार 22 हजार ते 23 हजार रुपयांपर्यंत पगरा दिला जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक येथे काम करण्याची तयारी हवी. 30 जून याची अर्ज करण्याची शेवटची तारीख असून 14 जुलै रोजी अर्ज आलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी आढळल्यास, दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा





Source link

पराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार बनणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार? पण हे सगळ कसं होणार?

पराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार बनणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार? पण हे सगळ कसं होणार?


Pankaja Munde :  पराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार बनणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार अशी चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेत लागणार अशी चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे पंकजा मुंडे यांना मंत्रीपद द्यावे अशीही मागणी केली जात आहे. 

बीड जिल्ह्यातील सानपवाडी गावाने एक मुखी ठराव करत पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची मागणी केलीय. पराभवानंतर अनेकवेळा पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत येतं मात्र त्यांना कोणतही मंत्रीपद मिळत नसल्यानं त्यांना संधी द्यावी अशी या गावक-यांची मागणी आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंचं पुनर्वसन झाल्याशिवाय भाजपला मतदान करणार नसल्याची भूमिका या गावक-यांनी घेतली आहे. 

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा निसटता पराभव झाला.. मात्र या पराभवानंतर मराठवाड्यासह महाराष्ट्रातला ओबीसी समाज दुखावल्याची चर्चा आहे.. त्यामुळेच आता पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दिल्लीत झालेल्या बैठकीतही पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची चर्चा झाल्याची माहिती आहे.. राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलाय.. त्याचमुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घ्या असा सूर राज्यातल्या काही नेत्यांचा आहे.. केंद्रीय नेतृत्त्वाला तशी विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

दरम्यान,  पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला.. या पराभवानंतर काही जणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. महाराष्ट्रात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आल्यानं त्यांची जागा रिक्त आहे.  पीयूष गोयल यांचीही जागा रिक्त झाली आहे. उदयनराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून निवडून आल्यानं ती जागाही रिक्त आहे. तिन्ही जागा भाजपच्या आहेत, मात्र एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाऊ शकते.

दुसरीकडे एकनाथ खडसेंनीही काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची सून तसंच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या. या भेटीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणा-या एकनाथ खडसेंचा स्वगृही परतण्याचा मुहूर्त ठरल्याचा दावा केला जातोय. 

राज्यसभा तसंच विधानपरिषद मागणार नाही, विधानसभा लढवणार नाही मात्र पक्षानं संधी दिल्यास ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवेल असं स्पष्ट मत माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलंय. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा महाराष्ट्रभर चिंतन बैठकीचं आयोजन करत आहेत याच अनुषंगाने रावसाहेब दानवे हे संपूर्ण मराठवाड्यात फिरून कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक घेत आहेत. 

 





Source link

मला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

मला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?


Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांबरोबरच मराठा नेत्यांवरही निशाणा साधला आहे. मराठ्यांचे नेते मतांचा विचार करतात आरक्षणाचा नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 

‘आम्ही सत्य बोलतो, कायद्याने मराठ्यांना आरक्षण दिलं आहे. सरकारी नोंदी आहेत. मराठा हा कुणबी असल्याचा उल्लेख आहे.मी नेमकं महत्त्वाच्या विषयावर बोट ठेवल्याने सगळ्यांना पोटदुखी होऊ लागले. हा मुलगा जो पर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळून देणार आहे. सत्यता बाहेर आली आहे.  मराठ्यांच्या जीवावर निवडून येणारे ओबीसी नेते आता  मराठा समाजासमोर उघडे पडले आहेत,’ असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि मराठे नेत्यांना सांगतो  सगळ्या पक्षातीले ओबीसी नेते मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ते एकटवले आहेत. ते मतांचा विचार नाही तर आरक्षणाचा विचार करायला लागले आहेत. त्याउलट मराठ्यांचे नेते आरक्षणाचा नाही तर मतांचा विचार करत आहेत. हा फरक आहे त्यांच्यात आणि मराठ्यांच्या नेत्यांमध्ये. आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणे महत्त्वाचं नाहीये त्यांच्यासाठी,’  असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘भाजपामधले ओबीसींची सर्व नेते आमदार , मंत्री एकत्र झाले. राष्ट्रवादी, शिंदे गटाचे, पवार गटाचे तर, विरोधी पक्षातील सर्व ओबीसी नेते एकत्र आले आहेत. सर्व ओबीसी नेते एकटवले आहेत आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचे नाही. पण हेच मराठ्यांच्या नेत्यांना समजत नाही का आरक्षण किती मोठं आहे. ओबीसी नेते पदाला आणि मताला किंमत द्यायला तयार नाहीत. याचा अर्थ तुम्हाला कळतंय का आरक्षण किती महत्त्वाचं आहे. मराठ्यांची जात किती मोठी होईल, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

‘आणखी एक सांगतो मराठा समाज आणि मराठ्यांच्या नेत्याला सांगतो मी एकटा पडलोय. मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलं आहे. मी एकटा पडलोय. मग सत्ताधाऱ्यांचे मराठ्यांचे मंत्री तेही कोणी बोलत नाही असो किंवा विरोधी पक्षातील नेतेही बोलत नाही. मराठा समाजाला माझी विनंती आहे तुम्ही एकजूट राहा,’ असं अवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. 

‘मराठ्यांच्या नेत्याने ताकदीने उभं राहा. 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे मराठा आरक्षण रॅली ठेवली आहे. त्याला सर्वांनी उपस्थित राहा. 6 जुलैला एकही मराठा घरी राहणार नाही सगळे जणांनी आपल्या परिसरात जिथे कुठे जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅली असेल तिथे उपस्थित राहा,’ असं अवाहन जरांगे यांनी केलं आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp