Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहिती

Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहिती


Who’s Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना अटक करण्यात आली आहे. या मुलाच्या रक्ताऐवजी नेमकं कोणाचं रक्त घेण्यात आलं होतं याची माहिती समोर आली आहे. तावरेंच्या आदेशानंतर हळनोरने एका महिलेच्या रक्ताचा नमुना घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या प्रकरणामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीनेही काही शिफारशी केल्या आहेत. 

कोणाचं रक्त घेतलं?

कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनी फेरफार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही डॉक्टरांना रविवारी रात्री (26 मे 2024 रोजी) उशीरा अटक केली. तसेच सोमवारी पोलिसांनी ससून रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळेला अटक केली. या तिघांच्या अटकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नेमका घटनाक्रम सांगितला होता. तावरेच्या सांगण्यावरुन हळनोरने या मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले खरे पण ते नंतर कचऱ्यात फेकून दिले. मात्र त्याऐवजी नेमके कोणाचे रक्त पाठवण्यात आलं होतं यासंदर्भात खुलासा करण्यात आलेला नव्हता. यासंदर्भातील खुलासा आता झाला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वयस्कर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने हळनोरने घेतले होते. तसेच अन्य एका महिलेच्या रक्ताचे नमुनेही या अल्पवयीन मुलाच्या रक्ताऐवजी घेतले होते. याच महिलेचं रक्त या मुलाच्या रक्ताचे नमुने म्हणून तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं.

समितीचा अभिप्राय

मेडिको लीगल केस (एमएलसी) प्रकरण हाताळणीसंदर्भात प्रचलित हॉस्पीटल अॅडमिनिस्ट्रेशन मॅन्यूअल अॅण्ड सिव्हीक मेडिकल कोड (Hospital Administration Manual & Civil Medical code) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम मधील तरतुदींचा एकत्रित विचार करुन समितीने आपला अभिप्राय व शिफारशी कळवल्या आहेत. या शिफारशी काय आहेत पाहूयात…

1) ससून रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल परीसरात माध्यम प्रतिनिधी यांच्या वावराबाबत अधिष्ठाता यांनी दक्षता घेतली नाही. (महाराष्ट्र नागरी सेवा हॉस्पीटल अॅडमिनीस्ट्रेशन मॅन्युअल)

2) डॉ. श्रीहरी हळनोर यांनी दिनांक 19 मे 2024 रोजी एमएलसी तपासणी व रक्त नमुने घेताना नियमाचे पालन केलेले दिसत नाही. (चेन ऑफ कस्टडी ऑफ एव्हिडन्स)

3) डॉ. श्रीहरी हरनोल यांनी रक्ताचे नमुन्यांमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने महिला व दोन वयस्कर व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेतले.

नक्की वाचा >> Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत

4) ऑन ड्युटी आरएमओ व वैद्यकीय अधिक्षक यांनी नियमाप्रमाणे अभिप्रेत असताना एमएलसी कामाची देखरेख केलेली दिसत नाही. (हॉस्पीटल अॅडमिनीस्ट्रेशन मॅन्युअल)

5) प्राध्यापक व न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. अजय तावरे यांनी उपभोगलेल्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत तफावत दिसून येते, न्यायवैद्यक विभागाला 25 एप्रिल रोजी पाठवण्यात आलेल्या पत्र क्रमांक 322/2024 नुसार डॉ. अजय तावरे विहित केलेल्या दिर्घ सुट्टीच्या कालावधीत कर्तव्यावर हजर राहणार होते. न्यायवैद्यकशास्र विभागाच्या पत्र क्रमांक 350/2024 मध्ये डॉ. तावरे हे 2 मे 2024 ते 21 मे 2024 दरम्यान दिर्घ सुट्टीवर असतील असं म्हटलं होतं. या दिर्घ सुट्टीच्या दुसऱ्या सत्रात 22 मे पासून ते कार्यरत होतील असं सांगण्यात आलेलं. मात्र 21 मे रोजी तावरे कामावर हजर होते असं बायोमेट्रीकच्या नोंदीवरुन स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार उन्हाळी दिर्घ सुट्टीचा कालावधी केवळ प्रथम अथवा द्वितीय सत्रात उपभोगता येतो तसेच सदरचा कालावधी आपल्या सोयीनुसार विभागून उपभोगण्याकरीता अधिष्ठातांची पूर्व परवानगी आवश्यक असते.

6) अधिष्ठातांनी या प्रकरणाचे शासकीय व सामाजिक गांभीर्य ओळखून यापुर्वीच वेळेत (26 मे 2024 पूर्वी) चौकशी करुन सदरची माहिती शासनास उपलब्ध केली असती तर ससून रुग्णालय प्रशासनाकडून स्वतःहून पोलीस तपासात अधिकचे सहकार्य झाले असते. तसेच ससून रुग्णालयाची व एकंदरीत शासनाची प्रतिमा राखली गेली असती. (महाराष्ट्र नागरी सेवा नियम)

समितीने केलेल्या शिफारशी :

1) अपघात विभाग वैद्यकीय अधिकारी यांनी एमएलसी तपासणी, रक्ताचे नमुने घेणे, लेबल लावणे, सिलबंद करणे व पोलीसांच्या ताब्यात देणे हे व्यक्तीशः व स्वत: च्या देखरेखील करणे अभिप्रेत आहे.

2) अपघात विभागातील इनडोअर एमएलसी आणि ओपीडी एमसली अशी दोन वेगवेगळे रजीस्टर हे एकत्र ठेवणे अभिप्रेत आहे.

3) अंमली पदार्थ सेवनाची शक्यता असलेल्या एमएलसी प्रकरणात रक्ताच्या नमुन्यासह लघवी तपासणी करणे अभिप्रेत आहे. तरी त्याबाबतीत न्याय सहाय्यक प्रयोगशाळा यांच्याशी सल्लामसलत करुन विहित नमुने घेण्यात यावेत.

4)  मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची डयुटी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे न्यायवैद्यक प्रकरण हाताळणी विषयी पिरिऑडिक रिफ्रेशर ट्रेनिंग (Periodic Refresher Training) करणे अपेक्षीत आहे. (सिव्हिल मेडिकल कोड हॉस्पीटल अॅडमिनिस्ट्रेशन मॅन्यूअल ) (Civil Medical Code Hospital Administration Manual) 

5) अधिष्ठातांनी ससून रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात माध्यम प्रतिनिधींना नियमाप्रमाणे माहिती देण्यासाठी डॉक्टर अथवा कर्मचारी यांची नियुक्ती करुन सुसुत्रता ठेवावी.





Source link

जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल; महाड आंदोलन अंगलट आले

जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल; महाड आंदोलन अंगलट आले



राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात  पुण्यात तसेच  महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.. महाडमध्ये मनुस्मृती दहन कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र फाडलं. 



Source link

Maharashtra Weather News : उष्णतेचा रेड अलर्ट! तापमानानं कुठं ओलांडली पन्नाशी? मान्सूनच्या आगमनाआधी नुसती होरपळ

Maharashtra Weather News : उष्णतेचा रेड अलर्ट! तापमानानं कुठं ओलांडली पन्नाशी? मान्सूनच्या आगमनाआधी नुसती होरपळ


Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon) आगमनासाठी अवघे काही दिवस उरलेले असतानाच उकाडा दिवसागणिक वाढू लागला आहे. सध्या देशातील राजस्थान आणि दिल्लीमध्ये तापमानानं पन्नाशी ओलांडली असून, या उच्चांकामुळं इतर राज्यांवरही या परिस्थितीचे परिणाम होताना दिसत आहेत. राज्यातही उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून, ब्रह्मपूरी इथं सर्वाधिक 48 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 

राज्यातील सध्याचं हवामान पाहता वर्धा, अकोला, नागपूर, चंद्रपूर इथं उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून, तापमान कमी असेल. मात्र, सूर्याचा दाह कायम राहील. तिथं हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्ये तापमानाचा आकडा 50 अंशांच्या घरात पोहोचला असून, इथं उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, हवामान विभागानं पुढील 24 तासांमध्ये पंजाब, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. 

 

कुठवर पोहोचला मान्सून? 

मान्सून सध्या प्रगतीशील वाटचाल करत असून, दरवर्षी ठरल्या काळात येणारा हा पाहुणा अर्थात हे मोसमी वारे पुढील 72 तासांमध्ये केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्रात मान्सून पुढे सरकला असून, मादिवच्याही भागातही त्यानं प्रगती केली आहे. आयएमडीनं यंदाच्या मान्सूनचा प्राथमिक अंदाज वर्तवत असतानाच तो 31 मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचं सांगितलं होतं. ज्या धर्तीवर मान्सूनचा प्रवासही याच कलानं होताना दिसला ज्यामुळं आता पुढील तीन ते चार दिवसात मान्सून केरळात, दाखल होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. पुढे हे वारे लक्षद्वीप आणि त्यानंतर हळुवार गतीनं देशाचा आणखी भाग व्यापणार असून, 10 जूनपर्यंत मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 





Source link

लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणार

लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणार


पुढील
बातमी

Maharastra Politics : ‘अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे…’, अंजली दमानिया यांची मागणी





Source link

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी


विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गावातल्या मंदिराच्या पारावर गावकरी जमले असून ही एका समाजाची बैठक आहे. या बैठकीत दुसऱ्या समाजावर बहिष्कार (Boycott) घालण्याचं आवाहन केलं जातंय.

बैठकीत काय ठरलं? 
या बैठकीत काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले. यात दुसऱ्या समाजाच्या दुकानात जायचं नाही. दुसऱ्या समाजाच्या महाराजाला कीर्तनाला बोलवायचं नाही. त्यांच्या चहाच्या टपरीवर, बिअर बार, हॉटेल, मेडिकलमध्ये जायचं नाही. जो कुणी या नियमाचं उल्लंघन करेल, त्याला 5 हजार रुपये दंड ठोठावला जाईल, अशी घोषणा लाऊडस्पीकरवरून करण्यात येत होती

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जोरदार आंदोलन केलं. त्यामुळं सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतरच गावागावात दोन समाजांमध्ये दुहीचं बीज पेरलं गेल्याची चर्चा सुरू आहे. या व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी झी 24 तासची टीम मुंडेवाडी गावात पोहोचली.  

तर एका समाजाच्या बहिष्कारामुळं दुसऱ्या समाजाच्या व्यवहारावर कसा परिणाम झाला, याचीही माहिती झी २४ तासनं नांदूर फाटा परिसरातून जाऊन घेतली. त्या समाजाने आमच्यावर बहिष्कार घातल्याने आमच्या वैयक्तिक जीवनावर काही परिणाम झाला नाही, पण उद्योगांवर परिणाम होऊ नये, असं एका दुकानदाराने सांगितलं. तर आधी आमचा व्यवसाय चांगला चालायचा पण या ताणतणावामुळे परिणाम झाल्याचं दुसऱ्या दुकानदारानेही मान्य केलं. 

दरम्यान, मुंडेवाडीतल्या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर स्वतः गावात पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. कोणीतरी उत्साहाच्या भरात त्या बैठकीत बोललं, पण त्याला गावकऱ्यांनी एकमताने मान्यता दिलेली नाही. दोन्ही समाजात सुरळीत व्यवहार सुरु असल्याचं बीडच्या पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.

गावागावात निर्माण झालेली ही सामाजिक दुही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणारी नाही. जातीपातीच्या संघर्षातून हाती काहीच लागणार नाही. उलट गावागावात जातीय सलोखा नांदावा, यासाठी सगळ्यांनी एकोप्यानं राहण्याची गरज आहे.





Source link

5 नव्हे तर आता दीड तासांत पोहोचणार अलिबागमध्ये, पावसाळ्यानंतर सुरू होतंय प्रकल्पाचे काम

5 नव्हे तर आता दीड तासांत पोहोचणार अलिबागमध्ये, पावसाळ्यानंतर सुरू होतंय प्रकल्पाचे काम


Virar Alibaug Mulitmodal Corridor: मान्सूननंतर विरार-अलिबाग कॉरिडोरचे बांधराम सुरू होण्याची शक्यता आहे. 126 किमी लांबीच्या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी 7 कंपन्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विभाग मंडळाने मंजुरी दिली आहे. आता केवळ निविदा वाटपाची औपचारिक प्रक्रिया उरली आहे. MSRDC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत टेंडर अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पासाठी 14 कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात 11 पॅकेज तयार करण्यासाठी 14 कंपन्यांनी 33 टेंडर भरण्यात आले आहेत. मात्र, त्यातील 7 कंपन्यांनीच टेंडर पास करण्यात आले आहेत.

126 किमी लांबीच्या कॉरिडोरचे बांधकाम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 98 किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यात 28 किलोमीटर लांबीचा मार्ग बनवण्यात येणार आहे. 98 किमीचा मार्ग 11 पॅकेजमध्ये तयार होणार आहे. आर्थिक बोलीमध्ये पहिल्या टप्प्यात चार कंपन्यांना प्रत्येकी दोन पॅकेजेससाठी तर तीन कंपन्यांना प्रत्येकी एका पॅकेजसाठी निवडण्यात आले आहे. वडघर ते पनवेल हा ९.१२ किमी लांबीचा रस्ता तयार करण्यात मेघा इंजिनीअरिंगने स्वारस्य दाखवले आहे. त्यात 1.8 किमी लांबीच्या बोगद्याचाही समावेश असेल. हा कॉरिडॉर पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून जाणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी सुमारे 18,431.15 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

एमएमआरमध्ये वाहतुककोंडीची समस्या हा प्रश्न आ वासून उभा आहे. अशा स्थितीत हा मार्ग तयार झाल्यानंतर वाहतुकीची समस्या कमी होऊन नागरिकांचा प्रवास जलदगतीने पूर्ण करता येणार आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, पनवेल-जेएनपीटी आणि अटल सेतू हे अलिबाग-विरार प्रकल्पाला जोडले जातील. या प्रकल्पामुळं विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या दीड ते दोन तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या विरारहून अलिबागला जाण्यासाठी ४ ते ५ तास लागतात. मात्र, या महामार्गामुळं हे अंतर कमी होणार आहे. 

विरार-अलिबाग कॉरिडोरचा पहिला डीपीआर 2016मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, भूसंपादनामुळं या प्रकल्पास विलंब झाला त्यामुळं हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. मागील वर्षापर्यंत हा प्रकल्प MMRDA कडे होता. मात्र, भूसंपादनाचे काम रखडल्यामुळं हा प्रकल्प MSRDCकडे सोपवण्यात आला. MSRDCने मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाने प्रकल्पासाठी खूप कमी वेळात भूसंपादनाचे काम पूर्ण केले होते. त्यामुळंच सरकारने 126 किमी लांबीच्या महामार्गाचे काम MSRDCकडे सोपवले आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp