by Hansraj Agrawal | May 26, 2024 | Trending News
Rankala Talav : तांबडा पाढंरा रस्सा आणि रंकाळा तलाव म्हंटल की कोल्हापुरचे नाव तोंडात येते. रंकाळा तलाव हा कोल्हापुरची चौपाटी म्हणून ओळखला जातो.
Source link
by Hansraj Agrawal | May 26, 2024 | Trending News
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. या दिवसांमध्ये मूत्रमार्गाचे संक्रमण आणि मूतखड्याचे विकार होतात. पाठीत किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, मळमळ आणि लघवीतून रक्त येणे, वारंवार लघवी येणे ही काही सामान्य लक्षणे आहेत जी मूतखड्यामुळे संबंधीत व्यक्तींमध्ये आढळतात. पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड राहिल्याने ही स्थिती टाळता येते. अशावेळी दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | May 25, 2024 | Trending News
मसाले खरेदी करताना आता अत्यंत खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण, २ नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट मसाले विक्रीचा प्रकार भिवंडीत उघड झालाय. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्यात.
Source link
by Hansraj Agrawal | May 25, 2024 | Trending News
पुढील
बातमी
Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात?
Source link
by Hansraj Agrawal | May 24, 2024 | Trending News
Maharashtra Drought : हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात घागरभर पाण्यासाठी करावी लागणारी कसरत शब्दात सांगता येणारी नाहीय. मराठवाड्यात 1837 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यावरून याची दाहकता लक्षात येईल. हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात गेले आहेत.
पाणीटंचाईप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. मात्र, पालकमंत्र्यांना याचं काही देणं घेणं आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. तीव्र पाणी टंचाईच्या छळा सोसणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री मात्र परदेशात कुटुंबांसोबत थंड व्हायला गेलेत. तर कुणी देवदर्शनाला. पाणीटंचाईवर मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरला बोलवलेल्या बैठकीला चक्क अनेक पालकमंत्र्यांनीच दांडी मारली. मुख्यमंत्री शिंदे मुंबईवरून संभाजीनगरला पोहोचले.. मात्र पाणीटंचाईचं गांभिर्य नसेलेले पालकमंत्र्यांनी मात्र बैठकीला दांडी मारली. बीडमध्ये माणसांसोबत जनावरांनाही पाणीटंचाईच्या छळा सोसाव्या लागताहेत.
बीड जिल्ह्यात 434 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. पालकमंत्री धनंजय मुंडे परदेशात आहेत. हिंगोलीमध्ये पाण्यासाठी लोकांची भटकंती, विहिरी तलावांनी तळ गाठलाय. जिल्ह्यातील अनेक गांवांमध्ये टँकर सुरू आहे. पालकमंत्री अब्दूल सत्तार परदेशात आहेत. जालना जिहल्यात सहा मध्यम प्रकल्प कोरडे पडलेत. शहरी आणि ग्रामीण भागात तीव्र पाणीसंकट आहे. जिल्ह्यात 495 टँकर सुरू आहेत. पालकमंत्री अतुल सावे देवदर्शनाला गेले आहेत.
परभणी – जिल्ह्यातील 8 प्रकल्प कोरडेठाक पडलेत.. अनेक प्रकल्प मृतसाठ्यात गेलेत. पालकमंत्री संजय बनसोडे देवदर्शनाला तिरुपतीला गेलेत. संभाजीनगर – मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. तब्बल 698 टँकरमधून पाणी पुरवठा केला जातोय. पालकमंत्री संदीपान भुमरेंची बैठकीला दांडी. पाणीटंचाईचं संकट गहिरे झाले आहे.
शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी स्थितीबाबत चिंता व्यक्त केलीये. त्यांनी राज्यातील 40 तालुक्यांत परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय…तर शरद पवारांनी राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा टोला लगावलाय. त्याचबरोबर सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसेल तर त्यांना जागं करण्याचे इतरही उपाय असल्याचं पवार म्हणालेत. तर, शरद पवार आणि विरोधी पक्ष नकारात्मक मानसिकतेत गेल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय…निवडणूक असूनही दुष्काळीभागात टँकरसह पाण्याचं व्यवस्थापन करण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण पवारांसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही.
राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती गंभीर बनत चाललीय.. धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने तळ गाठतेय.. घोटभर पाण्यासाठी राज्यातल्या जनता मैलोन मैल, उन्हातान्हातून पायपीट करतेय.. तर दुसरीकडे या जनतेचे पालकमंत्री म्हणवणारे परदेशात थंड कॉफीचे घोट रिचवतायत. विधानसभेला जेव्हा मतदान करायला जाल तेव्हा दुष्काळातले हे चटके नक्की लक्षात ठेवा..
Source link
by Hansraj Agrawal | May 24, 2024 | Trending News
Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon) राज्यातील आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले असले तरीही मान्सूनपूर्व (Pre monsoon rain) पाऊस, मधूनच दाटून येणारे ढग असं एकंदर वातावरण मात्र चकवा देऊन जात आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह वाढताना दिसत आहे. विदर्भात जिथं एकीकडे अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे त्याच विदर्भात दुसरीकडे तापमान चाळीशीपलिकडे जात असल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबईतही चित्र वेगळं नाही.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईच्या हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं इथं उकाडा अपेक्षेहून जास्त असल्याचं भासत आहे. शहरात तापमानाचा आकडा जास्त नसला तरीही त्या तापमानाचा दाह मात्र अधिक असल्यामुळं घामाच्या धारा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच शहराच्या काही भागांमध्ये असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळं अधिकच कोंडी होताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये शहरातील वातावणारत फारसे बदल अपेक्षित नाहीत. मात्र दिवस मावळतीला जात असताना ढगांची दाटी मात्र पावसाची चिन्हं दाखवून जाऊ शकते. असं असलं तरीही मुंबई आणि उपनगरावर, थोडक्यात महाराष्ट्रावर अद्याप मान्सूनची कृपा नाही ही वस्तूस्थिती. शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात हवामान कोरडं असेल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मात्र हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कुठे राहिला मान्सून?
मागील 48 तासांपर्यंत मान्सूननं श्रीलंकेपर्यंतचा प्रदेश व्यापला असून, पुढं मात्र त्याची फारशी उत्तम प्रगती होऊ शकलेली नाही. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत त्यानं मालदिव, कोमोरिनचा काही भाग, आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापला होता. पण, बुधवारनंतर मात्र मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मंदावताना दिसला.
दरम्यान, पुढील 48 तासांमध्ये मान्सून किमान वेगानं बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग व्यापणार असून, निकोबार बेटासह श्रीलंकेच्याही बहुतांश भागांमध्ये प्रगतीशील वाटचाल करताना दिसेल. तिथं मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग काहीसा मंदावल्यामुळं भारतात आणि प्रामुख्यानं दक्षिण भारतासह महाराष्ट्रात उकाडा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Source link