लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणार

लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणार


पुढील
बातमी

Maharastra Politics : ‘अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे…’, अंजली दमानिया यांची मागणी





Source link

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी


विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गावातल्या मंदिराच्या पारावर गावकरी जमले असून ही एका समाजाची बैठक आहे. या बैठकीत दुसऱ्या समाजावर बहिष्कार (Boycott) घालण्याचं आवाहन केलं जातंय.

बैठकीत काय ठरलं? 
या बैठकीत काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले. यात दुसऱ्या समाजाच्या दुकानात जायचं नाही. दुसऱ्या समाजाच्या महाराजाला कीर्तनाला बोलवायचं नाही. त्यांच्या चहाच्या टपरीवर, बिअर बार, हॉटेल, मेडिकलमध्ये जायचं नाही. जो कुणी या नियमाचं उल्लंघन करेल, त्याला 5 हजार रुपये दंड ठोठावला जाईल, अशी घोषणा लाऊडस्पीकरवरून करण्यात येत होती

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जोरदार आंदोलन केलं. त्यामुळं सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतरच गावागावात दोन समाजांमध्ये दुहीचं बीज पेरलं गेल्याची चर्चा सुरू आहे. या व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी झी 24 तासची टीम मुंडेवाडी गावात पोहोचली.  

तर एका समाजाच्या बहिष्कारामुळं दुसऱ्या समाजाच्या व्यवहारावर कसा परिणाम झाला, याचीही माहिती झी २४ तासनं नांदूर फाटा परिसरातून जाऊन घेतली. त्या समाजाने आमच्यावर बहिष्कार घातल्याने आमच्या वैयक्तिक जीवनावर काही परिणाम झाला नाही, पण उद्योगांवर परिणाम होऊ नये, असं एका दुकानदाराने सांगितलं. तर आधी आमचा व्यवसाय चांगला चालायचा पण या ताणतणावामुळे परिणाम झाल्याचं दुसऱ्या दुकानदारानेही मान्य केलं. 

दरम्यान, मुंडेवाडीतल्या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर स्वतः गावात पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. कोणीतरी उत्साहाच्या भरात त्या बैठकीत बोललं, पण त्याला गावकऱ्यांनी एकमताने मान्यता दिलेली नाही. दोन्ही समाजात सुरळीत व्यवहार सुरु असल्याचं बीडच्या पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.

गावागावात निर्माण झालेली ही सामाजिक दुही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणारी नाही. जातीपातीच्या संघर्षातून हाती काहीच लागणार नाही. उलट गावागावात जातीय सलोखा नांदावा, यासाठी सगळ्यांनी एकोप्यानं राहण्याची गरज आहे.





Source link

5 नव्हे तर आता दीड तासांत पोहोचणार अलिबागमध्ये, पावसाळ्यानंतर सुरू होतंय प्रकल्पाचे काम

5 नव्हे तर आता दीड तासांत पोहोचणार अलिबागमध्ये, पावसाळ्यानंतर सुरू होतंय प्रकल्पाचे काम


Virar Alibaug Mulitmodal Corridor: मान्सूननंतर विरार-अलिबाग कॉरिडोरचे बांधराम सुरू होण्याची शक्यता आहे. 126 किमी लांबीच्या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी 7 कंपन्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विभाग मंडळाने मंजुरी दिली आहे. आता केवळ निविदा वाटपाची औपचारिक प्रक्रिया उरली आहे. MSRDC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत टेंडर अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पासाठी 14 कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात 11 पॅकेज तयार करण्यासाठी 14 कंपन्यांनी 33 टेंडर भरण्यात आले आहेत. मात्र, त्यातील 7 कंपन्यांनीच टेंडर पास करण्यात आले आहेत.

126 किमी लांबीच्या कॉरिडोरचे बांधकाम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 98 किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यात 28 किलोमीटर लांबीचा मार्ग बनवण्यात येणार आहे. 98 किमीचा मार्ग 11 पॅकेजमध्ये तयार होणार आहे. आर्थिक बोलीमध्ये पहिल्या टप्प्यात चार कंपन्यांना प्रत्येकी दोन पॅकेजेससाठी तर तीन कंपन्यांना प्रत्येकी एका पॅकेजसाठी निवडण्यात आले आहे. वडघर ते पनवेल हा ९.१२ किमी लांबीचा रस्ता तयार करण्यात मेघा इंजिनीअरिंगने स्वारस्य दाखवले आहे. त्यात 1.8 किमी लांबीच्या बोगद्याचाही समावेश असेल. हा कॉरिडॉर पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून जाणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी सुमारे 18,431.15 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

एमएमआरमध्ये वाहतुककोंडीची समस्या हा प्रश्न आ वासून उभा आहे. अशा स्थितीत हा मार्ग तयार झाल्यानंतर वाहतुकीची समस्या कमी होऊन नागरिकांचा प्रवास जलदगतीने पूर्ण करता येणार आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, पनवेल-जेएनपीटी आणि अटल सेतू हे अलिबाग-विरार प्रकल्पाला जोडले जातील. या प्रकल्पामुळं विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या दीड ते दोन तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या विरारहून अलिबागला जाण्यासाठी ४ ते ५ तास लागतात. मात्र, या महामार्गामुळं हे अंतर कमी होणार आहे. 

विरार-अलिबाग कॉरिडोरचा पहिला डीपीआर 2016मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, भूसंपादनामुळं या प्रकल्पास विलंब झाला त्यामुळं हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. मागील वर्षापर्यंत हा प्रकल्प MMRDA कडे होता. मात्र, भूसंपादनाचे काम रखडल्यामुळं हा प्रकल्प MSRDCकडे सोपवण्यात आला. MSRDCने मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाने प्रकल्पासाठी खूप कमी वेळात भूसंपादनाचे काम पूर्ण केले होते. त्यामुळंच सरकारने 126 किमी लांबीच्या महामार्गाचे काम MSRDCकडे सोपवले आहे. 





Source link

महाराष्ट्रातलं जगावेगळ पर्यटन स्थळ; जिथे समुद्र नाही तरीही इथं फिरताना येतो चौपाटीवर फिरल्याचा फिल

महाराष्ट्रातलं जगावेगळ पर्यटन स्थळ; जिथे समुद्र नाही तरीही इथं फिरताना येतो चौपाटीवर फिरल्याचा फिल



Rankala Talav :  तांबडा पाढंरा रस्सा आणि रंकाळा तलाव म्हंटल की  कोल्हापुरचे नाव तोंडात येते. रंकाळा तलाव हा कोल्हापुरची चौपाटी म्हणून ओळखला जातो. 
 



Source link

पुणे- वाढत्या तापमानामुळे मूतखड्यांच्या प्रकराणांमध्ये वाढ; काय आहेत लक्षणं जाणून घ्या

पुणे- वाढत्या तापमानामुळे मूतखड्यांच्या प्रकराणांमध्ये वाढ; काय आहेत लक्षणं जाणून घ्या



उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. या दिवसांमध्ये मूत्रमार्गाचे संक्रमण आणि मूतखड्याचे विकार होतात. पाठीत किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, मळमळ आणि लघवीतून रक्त येणे, वारंवार लघवी येणे ही काही सामान्य लक्षणे आहेत जी मूतखड्यामुळे संबंधीत व्यक्तींमध्ये आढळतात. पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड राहिल्याने ही स्थिती टाळता येते. अशावेळी दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.



Source link

सावधान! मसाला ठरू शकतो जीवघेणा; भिवंडीत बनावट मसाला विक्रेत्यांना बेड्या

सावधान! मसाला ठरू शकतो जीवघेणा; भिवंडीत बनावट मसाला विक्रेत्यांना बेड्या



मसाले खरेदी करताना आता अत्यंत खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण, २ नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट मसाले विक्रीचा प्रकार भिवंडीत उघड झालाय. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्यात. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp