'भटकती आत्मा' वरून वार-पलटवार, महाराष्ट्राच्या राजकारणात चाललय काय?

'भटकती आत्मा' वरून वार-पलटवार, महाराष्ट्राच्या राजकारणात चाललय काय?



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना उद्देशून ‘भटकती आत्मा’ असा टोला लगावला. तर पवारांनीही त्यावरून मोदींना चांगलंच सुनावलंय… भटकती आत्मावरून महाराष्ट्राच्या राजकारणात कसे वार-पलटवार सुरू झालेत, याबद्दल जाणून घेऊया. 



Source link

'निर्लज्ज', 'डोके फिरलं', 'स्वकर्तृत्व शून्य' म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, '4 जूननंतर..'

'निर्लज्ज', 'डोके फिरलं', 'स्वकर्तृत्व शून्य' म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, '4 जूननंतर..'


Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: “उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकतर नैराश्याने ग्रासले आहे किंवा दारुण पराभवाच्या भीतीने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचा नवा डावही त्यांच्यावरच उलटला आहे व त्यामुळे अजित पवार हे मतदारांना उघड उघड धमक्या देऊ लागले आहेत,” असं म्हणत ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. “पवारांच्या पत्नी सुनेत्रा या बारामती लोकसभा मतदारसंघात पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळे पतिदेव अजित पवार यांनी हैदोस घातल्याचे चित्र दिसते. बायकोला मते दिली नाहीत तर इंदापूरला पाणी मिळणार नाही, अशी धमकी त्यांनी तेथील शेतकऱ्यांना दिली आहे. बारामतीतील उद्योजक, लहान व्यापारी यांना अजित पवारांनी धमकावले की, ‘‘जास्त उड्या माराल तर याद राखा. नाक दाबून तोंड कसे उघडायचे ते आपल्याला चांगले समजते.’’ पवार हे उघडपणे या धमक्या देत असताना राज्याचा व देशाचा निवडणूक आयोग भाजपची धुणीभांडी करीत बसला आहे काय?” असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

अजित पवारांचे वैफल्य शिगेला

“पुन्हा अजित पवार हे एवढ्यावरच कसे थांबतील! त्यांचे कार्य गगनाला गवसणी घालणारे आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील स्टोन क्रशर, वाळू, रेती व्यापारी, छोटे बिल्डर यांना बोलावून या महाशयांनी दम भरला, ‘‘तुमच्या गावात माझ्या बायकोला मताधिक्य मिळाले नाही तर याद राखा. तुमचे उद्योगधंदे बंद करीन.’’ पवार यांनी शासकीय यंत्रणा हाताशी धरून यापैकी अनेक उद्योजकांना नोटिसा मारून कोट्यवधींचा दंड आकारला. त्यामुळे हे उद्योग बंद पडले. ‘‘दंड कमी करून घ्यायचा असेल तर माझ्या बायकोचे काम करा. नाहीतर तुम्ही भिका मागा,’’ असे निर्लज्ज वर्तन अजित पवार करीत आहेत ते त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच. मते द्या, नाहीतर घरातील चुली विझविण्यापर्यंत अजित पवारांचे वैफल्य शिगेला पोहोचले आहे,” असा टोला ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला आहे.

डोके फिरल्याचे लक्षण

“बारामतीकरांनी आता निर्भय बनून ही झुंडशाही मोडून काढायला हवी. महाराष्ट्रात ऍड. असिम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी व पत्रकार निखिल वागळे हे ‘निर्भय बनो’ आंदोलनाचा एल्गार करीत आहेत. बारामतीकरांना धीर देण्याचे काम या तिघांनी प्रत्यक्ष बारामतीत जाऊन केले पाहिजे. मोदी हे देशात हुकूमशाहीचा झेंडा फडकविण्याच्या तयारीत आहेत व अजित पवारांसारखे लोक या कामी त्यांच्या हाती लागले आहेत,” असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. “अजित पवारांनी जनाची नाही, निदान मनाची लाज बाळगायला हवी. ज्या पित्यासमान काकांनी त्यांना राजकारणात इतके मोठे केले व ‘मोदी मोदी’ करण्यालायक बनवले त्या काकांच्या संदर्भात त्यांची वक्तव्ये म्हणजे डोके फिरल्याचे लक्षण आहे,” असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

पाण्याविना तडफडणारा मासा

“अजित पवार यांचे राजकारणातील स्वकर्तृत्व शून्य आहे हे त्यांना 4 जूनच्या निकालानंतर कळेल. आपणच महाराष्ट्राचे विकास पुरुष आहोत. बारामतीसह सर्व राज्याचा विकास फक्त ‘मी’ म्हणजे ‘मीच’ केला. शरद पवार वगैरे सर्व झूठ असल्याचे ते बोलत आहेत; पण जरंडेश्वर कारखाना, शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा व त्यांच्या बरोबरच्या डरपोक सहकाऱ्यांचे कोट्यवधींचे घोटाळे म्हणजेच विकास काय? हा प्रश्न जनतेने त्यांना विचारायला हवा. अजित पवार हे एक नंबरचे भ्रष्ट व घोटाळेबाज असून त्यांची जागा तुरुंगात असल्याची डरकाळी फडणवीस, मोदी वगैरे जाणकारांनी फोडली होती. त्यामुळे तुरुंगवारी वाचविण्यासाठी अजित पवार हे मोदी-फडणवीस भजन मंडळात सामील झाले हे सत्य आहे. यापुढे अजित पवारांना कोणी ‘दादा’ वगैरे शब्दांच्या उपाध्या लावू नयेत. ते दादा वगैरे नसून डरपोक, पळपुटे आहेत. डरपोक लोकच धमक्या देऊन मस्तवालपणा दाखवतात. अजित पवार तेच करीत आहेत. सत्ता व सरकारी संरक्षण नसेल तर अजित पवारांसारख्या लोकांची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी होईल,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

मोदींच्या ‘भ्रष्टाचारमुक्त भारता’च्या घोषणा ढोंग

“विरोधी पक्षनेता असलेला माणूस पलटी मारतो व सरकारात घुसतो हे लोकशाहीसाठी भयंकर कृत्य आहे. अजित पवार म्हणतात, ‘‘कुणाला किती निधी द्यायचा हे माझ्याच हातात आहे. त्यामुळे विकासासाठी भरपूर निधी हवा असेल तर माझ्याच बायकोला मते द्या. मी वाढपी आहे. कुणाला किती वाढायचे ते माझ्या हातात आहे, म्हणून सगळ्यांनी वाढप्याच्या पक्षात यावे.’’ अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून या धमक्या देत असतील तर निवडणूक आयोगाने त्यांच्या हकालपट्टीच्या सूचना द्यायला हव्यात. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जाब विचारायला हवा. उपमुख्यमंत्रीपदावरील माणूस एका गुंडासारखे वर्तन करतोय व फडणवीस नावाचा गृहमंत्री त्या गुंडाच्या पाळण्यास झोके देत अंगाई गीत म्हणतोय. महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची ही अवस्था आहे. भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवून अजित पवारांसारखे शंभर लोक भाजपच्या आश्रयाला गेले आहेत आणि भाजपचे नेते मोदी हे ‘भ्रष्टाचारमुक्त भारता’च्या घोषणा करीत आहेत, हे ढोंग आहे,” असंही ठाकरे गटाने म्हटलंय.

राजकारणातून नेस्तनाबूत

“निवडणुका निष्पक्ष व मोकळ्या वातावरणात होतील असे निवडणूक आयोग सांगतो, पण राज्यात अजित पवारांसारखे लोक उपमुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून मतदारांना धमक्या देत आहेत. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात ‘वडस’ वाढल्याचे हे लक्षण आहे. बारामतीचा हा करामती पुतण्या 4 जूननंतर राजकारणातून नेस्तनाबूत झालेला दिसेल. त्यांचा व मिंधे गटाचा एकही खासदार निवडून येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बारामतीत अजित पवारांची बायको दारुणपणे पराभूत होत आहे. अजित पवार व एकनाथ मिंधे यांचे पक्ष देवेंद्र फडणवीस चालवीत आहेत. 4 जूननंतर हे पक्ष नागपुरात झाडलोट करताना दिसतील. तूर्त अजित पवारांच्या धमक्यांना भीक न घालता मतदारांनी निर्भयपणे पुढे जायला हवे. महाराष्ट्राचा इतिहास लढणाऱ्यांचा आहे!” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.



Source link

कॉंग्रेस नेत्यांची मुंबईत गुप्त बैठक! वर्षा गायकवाडांचं टेन्शन वाढणार? उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच…'

कॉंग्रेस नेत्यांची मुंबईत गुप्त बैठक! वर्षा गायकवाडांचं टेन्शन वाढणार? उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच…'



Loksabha Varsha Gaikwads: उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यात लढत होणार आहे. 



Source link

माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशारा

माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशारा


Devendra Fadnavis : माझ्याशी विश्वासघात केला तर त्याचा सत्यानाश होतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अकलूजच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. माझा इतिहास तपासा, ईश्वरच त्यांचा सत्यानाश करतो असं म्हणत  देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील, उत्तम जानकर यांच्यासह विरोधकांना इशारा दिला आहे.

विजयसिंह मोहिते पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी उपकाराची जाणीव करुन दिली. मोहिते पाटलांचं राजकारण पवारांनी संपुष्टात आणलं तेव्हा भाजपनं त्यांना पाठिंबा दिल्याचं फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या निर्णयावर, फडणवीसांनी सोलापुरात प्रतिक्रिया दिली. 

माढा लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक पाहायला मिळालाय. काँग्रेस नेते धवलसिंह मोहिते पाटलांचा भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा मिळवण्यात फडणवीसांना यश आलंय. धवलसिंह हे विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आहेत. त्यांच्या रुपात फडणवीसांनी आणखी एक पुतण्या गळाला लावला आहे. तसंच माढा निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील संघर्ष निर्माण करण्यातही त्यांना यश आलंय. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा कुठे होणार याबाबत आम्ही लवकरच जाहीर करू, असं देवेंद्र फडणवीसांनी सोलापुरात सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं नेतृत्व करावं यासाठी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी सभा घेणार का याबाबत उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर, फडणवीसांनी ही माहिती दिली. 

देशात दारूबंदी करण्यासाठी मोदींकडे मागणी करणार असल्याचं वक्तव्य लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केलय. तसेच लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारताची घोषणा करणारे नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान असल्याचा दावाही त्यांनी केला. बार्शीतील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. 

2017 सालीच भाजपसोबत जाण्याचं ठरलं होतं. अजित पवारांचा दौंडच्या सभेमध्ये गौप्यस्फोट केला. एका उद्योगपतीच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि आमच्या बैठका व्हायच्या. काँग्रेससोबतही बोलणी सुरू होती. खरगे आणि शरद पवारांमध्ये खटके उडाले आणि सकाळचा शपथ विधी झाला. अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीबाबत स्पष्टच सांगितलं.

 





Source link

'…नाहीतर माझ्या घराची पायरी चढू नका' अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

'…नाहीतर माझ्या घराची पायरी चढू नका' अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम


जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती:  उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी राज्यात चर्चेत असतात. ते भाषणादरम्यान मध्येच बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेजवरुन चिमटे काढताना दिसतात. अनेकदा बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून भलतीच विधाने निघतात. पण काही चुकीचे शब्द वापरले गेल्यास ते तात्काळ माफीदेखील मागताना दिसतात. दरम्यान अजित पवारांचे एक विधान सध्या सोशल मीडियात व्हायरल होतंय. यामध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांना सज्जड दम देताना दिसतायत. 

इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील वक्तव्य अजूनही अजित दादांना चांगलेच बोचते आहे. आजही त्यांनी शिर्सुफळ येथील सभेत बोलताना याचा उल्लेख केला. काही वर्षांपूर्वी माझ्या तोंडून चुकून ते धरणातील वाक्य गेले आणि त्याचा फार मोठा फटका मला बसला असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितलेय..

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.. या सभेत पवार बोलत होते..

अजित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली तर पुन्हा माझ्या घरची पायरी चढायचं नाही. काहीजण माझी सभा झाली रे झाली की, समोरच्या पार्टीकडे जातात. बिनविरोध पदे मी दिली आणि प्रचार मात्र त्यांचा करत आहेत, असे अजित पवार म्हणाले. 

आपले विधान आणखी स्पष्ट करण्यासाठी अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं..कुंकू लावायचा असेल तर एकाचेच लावा. माझे तरी लावा नाहीतर त्यांचे तरी लावा. हा काय चाटाळपणा लावलाय. हे झाकून राहत नाही. मला कळते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतसुद्धा मला कळले होते. पण जुने पुराने उकळून काढायचे नाही, असे मी ठरवल्याचे अजित पवार म्हणाले. 

ते वाक्य वापरताना अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा संदर्भ घेतला आणि ते म्हणाले की उद्या कदाचित ते बोलतील अजितदादा दम द्यायला लागलेत पण मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतोय. अशा स्वरूपात अप्रत्यक्षरीत्या रोहित पवार यांना त्यांनी टोला मारलाय.

पण हे बोलतानाच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेते  देशमुख यांच्या उपोषणाचा संदर्भ घेऊन जे वाक्य वापरले होते आणि त्यातून त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.. त्याचा संदर्भ पुन्हा एकदा घेतला.. आणि त्यांनी सांगितले की, मी माझ्या मेंदूला सातत्याने सांगत असतो की आपल्याला शब्द जपून वापरायचे आहेत, असे ते यावेळी म्हणाले. 





Source link

मुख्यमंत्री कधी होणार? कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नाला खुद्द अजित पवारांनीच दिलं उत्तर

मुख्यमंत्री कधी होणार? कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नाला खुद्द अजित पवारांनीच दिलं उत्तर



Ajit Pawar On Maharashtra CM Post:  अजित दादा मुख्यमंत्री कधी होणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला असतो. याचे उत्तर खुद्द अजित पवारांनी दिले आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp