अनिल कपूरचा 'नायक' चित्रपट पाहून मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं का? CM एकनाथ शिंदे म्हणाले 'तो चित्रपट….'

अनिल कपूरचा 'नायक' चित्रपट पाहून मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं का? CM एकनाथ शिंदे म्हणाले 'तो चित्रपट….'


Eknath Shinde on Film Nayak: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अभिनेता मनिष पॉल (Manish Paul) याच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली. यादरम्यान मनिष पॉलने एकनाथ शिंदे यांना अनेक प्रश्न विचारले. लहानपणी असणाऱ्या इच्छा तसंच मुंबई खड्डेमुक्त होणार का? अशा मुद्द्यांवर मनिष पॉलने एकनाथ शिंदेंचं मत जाणून घेतलं. तसंच यावेळी मनिष पॉलने एकनाथ शिंदेंसह अनिल कपूरचा (Anil Kapoor) चित्रपट ‘नायक’संबंधीही (Nayak) चर्चा केली. या चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री दाखवण्यात आला आहे. 

एकनाथ शिंदे यांना त्यांच्या लहानपणीची स्वप्नं तसंच नायक चित्रपट पाहून मुख्यमंत्री होण्याची इच्छा झाली का? अशी विचारणा करण्यात आली. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की. “चित्रपट हा चित्रपट असतो, सत्यात असं काही होत नसतं, त्यामुळे असं काही नाही”. यावेळी एकनाथ शिंदे यांनी चित्रपटात अनिल कपूर ज्याप्रकारे फटाफट निर्णय घेऊन सर्व समस्या सोडवतो ते आवडलं असल्याचं म्हटलं. 

“मी शाखाप्रमुख पदापासून माझी राजकीय आणि सामाजिक कारकिर्द सुरु केली. तेव्हापासून मी फार मेहनत घेत आहे. जे काम मी स्विकारतो किंवा करण्याचा विचार करतो, ते काम होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतो. मी पूर्ण आत्मसमर्पण देऊन काम करत असतो. त्यात श्रद्धाही असते. त्यामुळे मी हे काम कधी होईल, मला माहिती आहे, हे पद हवं आहे असा विचार केला नाही. मी काम करत गेलो आणि जनतेची सेवा करणं मला आधीपासून आवडतं. माझे गुरु आनंद दिघे यांच्यासह मी काम केलं असून, जनता आणि त्यांची सेवा याची मला आवड आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

मनिष पॉल याने एकनाथ शिंदे यांचं कौतुक करत तुम्हीही नायक चित्रपटाप्रमाणे रस्त्यावर उतरुन काम करता असं म्हटलं. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतरच रस्त्यावर उतरुन कामांची पाहणी करत आहे असं नाही. पण जमिनीवर जी स्थिती आहे ती तिथे गेल्यावरच कळते. ऑफिसमध्ये बसून तुम्हाला सत्यस्थिती समजत नाही. मी तळागाळातून वर आलो आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. खाली जमिनीवर उतरुन काम करणं मला आवडतं. कार्यालयात बसून तुम्ही फक्त माहिती घेऊ शकता. तिथे गेल्यानंतर माहिती घेऊन लगेच कारवाई करता येते. लोकांनाही नैतिक आधार मिळतो. मी समस्या संपवत असल्याने लोकांनाही बरं वाटतं”. 

“पाऊस सुरु होण्यापूर्वी नाल्यांची सफाई होते. आम्ही जिथे पाणी साचतं त्या जागांची माहिती घेतली. यानंतर आयुक्तांना एक योजना आखण्यास सांगितलं. जिथे पाणी साचणार नाही तेथील अधिकाऱ्याचा सन्मान करण्याचं ठरवलं. पण जर साचलं तर कारवाई केली जाईल असंही सांगितलं,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. 





Source link

महायुतीतील गोंधळ, महाविकासआघाडीत बंडखोरांची डोकेदुखी; नाशिक, दिंडोरीत फटका कुणाला? फायदा कुणाला?

महायुतीतील गोंधळ, महाविकासआघाडीत बंडखोरांची डोकेदुखी; नाशिक, दिंडोरीत फटका कुणाला? फायदा कुणाला?



नाशिकच्या उमेदवारीवरुन महायुतीत गोंधळ उडाल्याचं चित्र आहे तर दिंडोरीत मविआत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. 



Source link

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंगचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंगचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल


MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच सोबतच पार्किंगही विकत घेतात. मात्र तरीही पार्किंगवरुन होणारे वाद कायम आहेत. या वाद-विवादावर  महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण (महारेरा)ने मोठे पाऊल उचलले आहे. य

बिल्डरने यापुढे करारनाम्यात पार्किंगबाबत संपूर्ण तपशील देणे बंधनकारक आसणार आहे. महारेराने अलीकडेच हे नियम बंधनकारक केले आहेत. पार्किंग स्पेसची विक्री करत असतानाच बिल्डरला लिखित स्वरुपात पार्किंगची माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये पार्किंगच्या जागेचा तिथला क्रमांक, पार्किंगचा आकार, उंची, रुंदी, पार्किंगचे इमारतीतील ठिकाण, या सगळ्याचा उल्लेख असणे बंधनकारक असणार आहे. सदनिका नोंदणीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या वाटप पत्रात आणि विक्री करारांमध्येच पार्किंगचा तपशील असलेले जोडपत्र देणे बंधनकारक असणार आहे. 

महरेराच्या नियमांनुसार, बिल्डर ओपन पार्किंग स्पेसची विक्री करु शकत नाही. तसंच, पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यावरुन वाद-विवाद होणार नाहीत यासाठी रेराने ओपन पार्किंग स्पेसमध्ये मार्किंग करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सोसायटीच्या कोणत्या भागात किती गाड्या पार्क होणार, याची माहिती बिल्डरने देणे आवश्यक आहे. डिसेंबर 2022मध्ये रेराने तीन नियम बनवले होते. ज्यात कोणत्याही बदल करायचा असेल तर बिल्डरला महारेराची परवानगी घ्यावी लागणार आहे. आता यात पार्किंगसंदर्भातील चौथा नियमही जोडण्यात आला आहे. 

पार्किंग स्पेसबाबत आत्तापर्यंत कोणतेही नियम नव्हते. त्यामुळं अनेकदा बिल्डर बिल्डिंगच्या बीमजवळची जागा पार्किंग म्हणून विक्री करत होते. मात्र, या बीममुळं व अपुऱ्या जागेमुळं कार पार्क करण्यास अडचणी येत होत्या. अशा अनेक तक्रारी महारेराकडे आल्या होत्या. त्यावरुन वादही झाले होते. ओपन पार्किंगमध्येही कार पार्क करण्यावरुन वाद-विवाद होत होते. त्यामुळं महारेराने हे पाऊल उचलले आहे. भविष्यात अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून नवे परिपत्रक जारी केले आहे. 

महारेराने या पूर्वी 30 जुलै 2021 रोजी परिपत्रक जारी करत पार्किंगच्या अनुषंगाने सूचना जारी केल्या होत्या. यात खुला पार्किंग एरिया (Open Parking Area) हा चटई क्षेत्रात मोजला जात नसल्यामुळं विकासक त्यासाठी पैसे आकारु शकत नाही. त्याशिवाय गॅरेज, अच्छादित पार्किंग याबाबतही परिपत्रकात स्पष्टपणे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही बिल्डरांकडून याविषयी खबरदारी घेतली जात नसल्याने अखेर महारेराला पुन्हा एकदा परिपत्रक काढावे लागले. 





Source link

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती


Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील आठ जागांचा समावेश आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्या मतदानपेटीत बंद होईल. 

राज्यातील आठ मतदार संघ
विदर्भातल्या पाच मतदारसंघातल्या लढतीत सर्वांचं लक्ष लागलंय ते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उमेदवार असलेल्या अकोला मतदारसंघाकडे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत या मतदारसंघात होतेय.

अमरावती मतदारसंघाकडेही सर्वांचं लक्ष आहे. कारण आहे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि विद्यमान खासदार नवनीत राणांमुळे (Navneet Rana). भाजपच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणांसमोर बच्चू कडूंनी आव्हान उभं केलंय. तर आनंदराज आंबेडकरांमुळे अमरावतीची लढत चौरंगी होतेय. भाजपकडून नवनीत राणा रिंगणात आहेत. तर त्यांच्यासमोर काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याबरोबरच बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत.. आनंदराज आंबेडकर अपक्ष म्हणून लढत असून त्यांना वंचितने पाठिंबा दिलाय.. 

बुलढाणामध्ये दोन शिवसेनेमध्येच मुख्य लढत होतेय. मात्र रविकांत तुपकरांच्या उमेदवारीमुळे बुलढाण्यात चुरस वाढलीय. बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान आहे. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

वर्ध्यात भाजपचे रामदास तडस यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे यांच्यात सामना होणार आहे. तर कुणबी समाजातून आलेले आणि वंचितचे उमेदवार प्रा. राजेंद्र साळुंखे किती मते घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

तर यवतमाळ वाशिममध्ये शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुखांमध्ये लढत होतेय. मात्र बंजारा पाड्यावर प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. अनिल राठोड यांना वंचितने पाठिंबा दिलाय.. 

परभणीत मराठवाड्यातले प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्यामुळे चुरस वाढलीय. परभणीत ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे आहेत. शेतकरी वर्गात प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना वंचितने उमेदवारी दिलीय..

हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाच्या बाबुराम कदम कोहळीकर यांच्याविरोधात ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर रिंगणात आहेत. तर वंजारा समाजातले डॉ. बी.डी.चव्हाण यांना वंचितने उमेदवारी दिलीय. चव्हाण यांनी निवडणुकीत दीड लाखांच्या आसपास मतं घेतली होती.. 

नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. नांदेडमध्ये विद्यमान भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर आणि आणि कॉंग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत आहे. अशोक चव्हाणांनी काहीच महिन्यांआधी भाजपमध्ये प्रवेश करत कमळ हातात घेतलंय. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नांदेडमध्ये सभा घ्यावी लागली होती. यावरुनच नांदेडची लढत किती प्रतिष्ठेची आहे हे लक्षात येतंय..





Source link

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला


Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे.  दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणा-या मतदानात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. अमरावतीत नवनीत राणा, अकोल्यात प्रकाश आंबेडकर, परभणीत महादेव जानकर, नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर, बुलढाण्यात प्रतापराव जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Loksabha Constituency) भाजप उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) आणि कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यात थेट लढत होतेय. या मतदारसंघात बच्चू कडूंच्या (Bachchu Kadu) प्रहार पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत…. 

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडीत तिरंगी लढत होतेय. विद्यमान भाजप खासदार, माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे, कॉंग्रेस पक्षाचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) रिंगणात आहेत. 

परभणीमध्ये मविआचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे आहेत

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार भावना गवळींऐवजी राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आलंय. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे संजय देशमुख उभे आहेत.. 

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांच्यात लढत होतेय.

नांदेडमध्ये विद्यमान भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर आणि आणि कॉंग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत आहे. इथे भाजपसोबतच अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, विद्यमान खासदार प्रताप जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात थेट लढत होतेय…

हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात लढत आहे… 

या आठही लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावलाय. आता मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात कौल टाकतात, यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे..





Source link

पत्नी व लेक साखरझोपेत असताना केले कुऱ्हाडीने वार; अकोला दुहेरी हत्याकांडाने हादरले

पत्नी व लेक साखरझोपेत असताना केले कुऱ्हाडीने वार; अकोला दुहेरी हत्याकांडाने हादरले


Akola Double Murder Case: दुहेरी हत्याकांडाने अकोला शहर हादरले आहे. एकाच महिन्यातील दुहेरी हत्याकांडाची ही दुसरी घटना असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पतीने आपल्याच पत्नी आणि मुलीची कुऱ्हाडीने वार करत निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. (Crime News In Marathi)

रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या संतोषी माता मंदिराजवळ एका घरात पतीने आपल्या पत्नी व मुलीची कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर आई व मुलीचा अशारितीने मृत्यू झाल्याने परिसरातून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनीष म्हात्रे असं आरोपीचे नाव आहे. तर, रश्मी म्हात्रे व माही म्हात्रे असं मृतक मुलीचं व पत्नीचे नाव आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे त्याच्या पत्नीसोबत नेहमी वाद-विवाद सुरू असायचे. या रोजच्या वादाला वैतागून आरोपीने आज रागाच्या भरात पत्नी व मुलीवर कुऱ्हाडीने वार करुन त्यांची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी हे वेगळे राहत होते. पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्याने तिला मनवण्याचा अनेकदा प्रयत्न केला तो तिच्या माहेरीदेखील जायचा. परंतु पत्नी काही नांदायला जायची नाही. मंगळवारी म्हात्रे कुटुंबाकडे लग्न असल्यामुळं पत्नी मुलीसह अकोल्यात आली होती. तेव्हा आरोपीने तिला सासरी राहण्यासाठी सांगितलं होतं. मात्र तिने नकार दिला. 

पत्नीने पुन्हा सासरी नांदायला नकार दिल्याने आरोपी बिथरला. त्याच्या मनात राग खदखदत होता. 24 एप्रिलला पहाटे 5 वाजताच्या सुमारास दोघीही साखरझोपेत असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. यात त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या होत्या. दुर्दैवाने दोघींचाही मृत्यू झाला आहे. हत्येचा गुन्हा घडताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आरोपींना ताब्यात घेऊन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करत आहेत. 

दरम्यान, अकोल्यात एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दुहेरी हत्याकाडांची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरुणांची हत्या करण्यात आली होती. क्षुल्लक कराणावरुन तिघा आरोपींनी या दोघींची हत्या केली होती. धारदार शस्त्राने वार करत दोघांचाही खून करण्यात आला होता. पोलिसांनी 24 तासांच्या आत तीन आरोपींना अटक केली आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp