महाराष्ट्रातील 'या' बड्या बँकेत घोटाळा? कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, काय आहे नेमकं प्रकरण?
Maharashtra Drought : हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात घागरभर पाण्यासाठी करावी लागणारी कसरत शब्दात सांगता येणारी नाहीय. मराठवाड्यात 1837 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यावरून याची दाहकता लक्षात येईल. हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात गेले आहेत.
पाणीटंचाईप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. मात्र, पालकमंत्र्यांना याचं काही देणं घेणं आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. तीव्र पाणी टंचाईच्या छळा सोसणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री मात्र परदेशात कुटुंबांसोबत थंड व्हायला गेलेत. तर कुणी देवदर्शनाला. पाणीटंचाईवर मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरला बोलवलेल्या बैठकीला चक्क अनेक पालकमंत्र्यांनीच दांडी मारली. मुख्यमंत्री शिंदे मुंबईवरून संभाजीनगरला पोहोचले.. मात्र पाणीटंचाईचं गांभिर्य नसेलेले पालकमंत्र्यांनी मात्र बैठकीला दांडी मारली. बीडमध्ये माणसांसोबत जनावरांनाही पाणीटंचाईच्या छळा सोसाव्या लागताहेत.
बीड जिल्ह्यात 434 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. पालकमंत्री धनंजय मुंडे परदेशात आहेत. हिंगोलीमध्ये पाण्यासाठी लोकांची भटकंती, विहिरी तलावांनी तळ गाठलाय. जिल्ह्यातील अनेक गांवांमध्ये टँकर सुरू आहे. पालकमंत्री अब्दूल सत्तार परदेशात आहेत. जालना जिहल्यात सहा मध्यम प्रकल्प कोरडे पडलेत. शहरी आणि ग्रामीण भागात तीव्र पाणीसंकट आहे. जिल्ह्यात 495 टँकर सुरू आहेत. पालकमंत्री अतुल सावे देवदर्शनाला गेले आहेत.
परभणी – जिल्ह्यातील 8 प्रकल्प कोरडेठाक पडलेत.. अनेक प्रकल्प मृतसाठ्यात गेलेत. पालकमंत्री संजय बनसोडे देवदर्शनाला तिरुपतीला गेलेत. संभाजीनगर – मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. तब्बल 698 टँकरमधून पाणी पुरवठा केला जातोय. पालकमंत्री संदीपान भुमरेंची बैठकीला दांडी. पाणीटंचाईचं संकट गहिरे झाले आहे.
शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी स्थितीबाबत चिंता व्यक्त केलीये. त्यांनी राज्यातील 40 तालुक्यांत परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय…तर शरद पवारांनी राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा टोला लगावलाय. त्याचबरोबर सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसेल तर त्यांना जागं करण्याचे इतरही उपाय असल्याचं पवार म्हणालेत. तर, शरद पवार आणि विरोधी पक्ष नकारात्मक मानसिकतेत गेल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय…निवडणूक असूनही दुष्काळीभागात टँकरसह पाण्याचं व्यवस्थापन करण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण पवारांसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही.
राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती गंभीर बनत चाललीय.. धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने तळ गाठतेय.. घोटभर पाण्यासाठी राज्यातल्या जनता मैलोन मैल, उन्हातान्हातून पायपीट करतेय.. तर दुसरीकडे या जनतेचे पालकमंत्री म्हणवणारे परदेशात थंड कॉफीचे घोट रिचवतायत. विधानसभेला जेव्हा मतदान करायला जाल तेव्हा दुष्काळातले हे चटके नक्की लक्षात ठेवा..
Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon) राज्यातील आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले असले तरीही मान्सूनपूर्व (Pre monsoon rain) पाऊस, मधूनच दाटून येणारे ढग असं एकंदर वातावरण मात्र चकवा देऊन जात आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह वाढताना दिसत आहे. विदर्भात जिथं एकीकडे अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे त्याच विदर्भात दुसरीकडे तापमान चाळीशीपलिकडे जात असल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबईतही चित्र वेगळं नाही.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईच्या हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं इथं उकाडा अपेक्षेहून जास्त असल्याचं भासत आहे. शहरात तापमानाचा आकडा जास्त नसला तरीही त्या तापमानाचा दाह मात्र अधिक असल्यामुळं घामाच्या धारा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच शहराच्या काही भागांमध्ये असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळं अधिकच कोंडी होताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये शहरातील वातावणारत फारसे बदल अपेक्षित नाहीत. मात्र दिवस मावळतीला जात असताना ढगांची दाटी मात्र पावसाची चिन्हं दाखवून जाऊ शकते. असं असलं तरीही मुंबई आणि उपनगरावर, थोडक्यात महाराष्ट्रावर अद्याप मान्सूनची कृपा नाही ही वस्तूस्थिती. शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात हवामान कोरडं असेल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मात्र हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिण कोंकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी , उत्तर कोंकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/HUBTXfKzym
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 23, 2024
मागील 48 तासांपर्यंत मान्सूननं श्रीलंकेपर्यंतचा प्रदेश व्यापला असून, पुढं मात्र त्याची फारशी उत्तम प्रगती होऊ शकलेली नाही. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत त्यानं मालदिव, कोमोरिनचा काही भाग, आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापला होता. पण, बुधवारनंतर मात्र मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मंदावताना दिसला.
दरम्यान, पुढील 48 तासांमध्ये मान्सून किमान वेगानं बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग व्यापणार असून, निकोबार बेटासह श्रीलंकेच्याही बहुतांश भागांमध्ये प्रगतीशील वाटचाल करताना दिसेल. तिथं मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग काहीसा मंदावल्यामुळं भारतात आणि प्रामुख्यानं दक्षिण भारतासह महाराष्ट्रात उकाडा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Pune Porsche Accident Update : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक अपडेट आली आहे. अल्पवयीन मुलाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 50 वर्षीय हा कार चालक आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. प्रत्यक्ष अपघात (Pune Porsche Accident) घडला त्यावेळी हा चालक गाडीमध्ये होता. तर अप्लवयीन मुलानं 2 जणांना उडवलं होतं, ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता देशभरात या मुद्द्यावरून रान पेटलंय. अशातच आता पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांनी या प्रकरणावरून पोलीस यंत्रणा आणि नेत्यांन थेट इशारा दिलाय.
काय म्हणाले वसंत मोरे?
कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? असा सवाल वसंत मोरे यांनी विचारलाय. कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफ मध्ये लागेबांधे आहेत, भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील, असा इशारा वसंत मोरे यांनी दिलाय.
ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावं. सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावं. तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावं नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते, असा टोला वसंत मोरे यांनी लगावला. वरील भागांमध्ये नाईट लाईफसाठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का? असा खोचक सवाल देखील वसंत मोरे यांनी विचारला आहे.
दरम्यान, पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावं अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठं हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल, असं गंभीर इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.
कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते.
नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का ?
ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील pic.twitter.com/Vk4gcT73LK
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) May 23, 2024
अमरावतीत पीएम किसान योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. अमरावतीमधील शेतकऱ्यांचं अनुदान थेट काश्मिरमध्ये जमा होत असल्याचा प्रकार समोर आलाय.
Source link
Pune Porsche Accident News : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांवर अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण गाजल्यानंतर पोलिसांनी मुलाचे वडील विशाल अग्रवालला (Vishal Agrawal) अटक केली. या अपघातात निर्दोष तरुण-तरुणीचा बळी गेला. अपघातातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत तरुण-तरुणीच्या पालकांनी केलीय. पोर्शे कार अपघातातील मृत तरुणी ही मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) जबलपूरमध्ये राहाणारी होती. मृत मुलीचं नाव अश्विनी कोष्टा (Ashwini Kosta) असं होतं, अश्विनिला प्रेमाने तिच्या घरचे आशी बोलायचे. जबलपूरच्या ग्वारीघाट मुक्तीधाममध्ये अश्विनीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अश्विनी कोष्टा जबलपूरच्या साकार हिल्स कॉलनीत राहात होती, आणि कामानिमित्ताने ती पुणे मेम जॉनसन कंट्रोल्स कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती.
अश्विनीच्या आईने फोडला हंबरडा
अश्विनीच्या मृत्यूची बातमी ऐकताच तिच्या आईने हंबरडा फोडला. मुलीचं लग्न करुन तिची पाठवणी करण्याऐवजी तिचा मृतदेह उचलण्याची वेळ तिच्या आई-वडिलांवर आली. अश्विनीच्या अचानक जाण्याने ती राहात असलेल्या परिसरातही दु:खाचं वातावरण आहे. माझी मुलगी लाखात एक होती, तिची काय चूक होती, असा सवाल अश्विनी विचारतेय.
अश्विनी अभ्यासात हुशार
अश्विनी अभ्यासात हुशार होती आणि तीने खूप स्वप्न पाहिली होती. आयु्ष्यात खूप मोठं व्हायचं ध्येय तीने बाळगलं होतं. पण एका श्रीमंत मुलाच्या चुकीने अश्विनीचं स्वप्न अपूर्णच राहिलं. अश्विनीच्या आई-वडिलांनी दोषींवर कठोर कारावाई करावी अशी मागणी केली आहे.
अश्विनीला न्याय हवा
अश्विनीचा भाऊ आपल्या प्रिय बहिणीच्या मृत्यूने पुरता खचला आहे. अश्विनी फक्त 24 वर्षांची होती आणि जग सोडून जाण्याचं तिचं वय नव्हतं. माझ्या बहिणीला न्याय मिळायला हवां. दोषींना त्यांच्या चुकीची कठोर शिक्षा मिळायलाच हवी, जेणेकरुन भविष्यात इतरांच्या मुला-मुलींबरोबर असं होऊ नये अशी अपेक्षा तिच्या भावाने व्यक्त केली आहे.
अश्विनीच्या कुटुंबियाने न्यायाची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलाला कार देणारे त्याचे पालक आणि दारु देणाऱ्या पबवर कारवाई व्हावी अशी मागणीही तिच्या पालकांनी केलीय. वेगाने कार चालवणाऱ्यांवर, दारु पिऊन कार चालवण्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.
पबवर पालिकेची कारवाई
दरम्यान, या घटनेनंतर पुणे महापालिकेनं कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॉटर्स आणि ओरिल्ला पब वर कारवाई केलीये. बुलडोजर जेसीपीच्या साह्याने पब चे बांधकाम पाडण्यात आलं. कोरेगाव परिसरात असलेल्या बेकायदेशीर पब बांधकामावर ही कारवाी करण्यात आली