उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती


Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील आठ जागांचा समावेश आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्या मतदानपेटीत बंद होईल. 

राज्यातील आठ मतदार संघ
विदर्भातल्या पाच मतदारसंघातल्या लढतीत सर्वांचं लक्ष लागलंय ते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उमेदवार असलेल्या अकोला मतदारसंघाकडे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत या मतदारसंघात होतेय.

अमरावती मतदारसंघाकडेही सर्वांचं लक्ष आहे. कारण आहे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि विद्यमान खासदार नवनीत राणांमुळे (Navneet Rana). भाजपच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणांसमोर बच्चू कडूंनी आव्हान उभं केलंय. तर आनंदराज आंबेडकरांमुळे अमरावतीची लढत चौरंगी होतेय. भाजपकडून नवनीत राणा रिंगणात आहेत. तर त्यांच्यासमोर काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याबरोबरच बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत.. आनंदराज आंबेडकर अपक्ष म्हणून लढत असून त्यांना वंचितने पाठिंबा दिलाय.. 

बुलढाणामध्ये दोन शिवसेनेमध्येच मुख्य लढत होतेय. मात्र रविकांत तुपकरांच्या उमेदवारीमुळे बुलढाण्यात चुरस वाढलीय. बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान आहे. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

वर्ध्यात भाजपचे रामदास तडस यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे यांच्यात सामना होणार आहे. तर कुणबी समाजातून आलेले आणि वंचितचे उमेदवार प्रा. राजेंद्र साळुंखे किती मते घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

तर यवतमाळ वाशिममध्ये शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुखांमध्ये लढत होतेय. मात्र बंजारा पाड्यावर प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. अनिल राठोड यांना वंचितने पाठिंबा दिलाय.. 

परभणीत मराठवाड्यातले प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्यामुळे चुरस वाढलीय. परभणीत ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे आहेत. शेतकरी वर्गात प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना वंचितने उमेदवारी दिलीय..

हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाच्या बाबुराम कदम कोहळीकर यांच्याविरोधात ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर रिंगणात आहेत. तर वंजारा समाजातले डॉ. बी.डी.चव्हाण यांना वंचितने उमेदवारी दिलीय. चव्हाण यांनी निवडणुकीत दीड लाखांच्या आसपास मतं घेतली होती.. 

नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. नांदेडमध्ये विद्यमान भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर आणि आणि कॉंग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत आहे. अशोक चव्हाणांनी काहीच महिन्यांआधी भाजपमध्ये प्रवेश करत कमळ हातात घेतलंय. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नांदेडमध्ये सभा घ्यावी लागली होती. यावरुनच नांदेडची लढत किती प्रतिष्ठेची आहे हे लक्षात येतंय..





Source link

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला


Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे.  दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणा-या मतदानात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. अमरावतीत नवनीत राणा, अकोल्यात प्रकाश आंबेडकर, परभणीत महादेव जानकर, नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर, बुलढाण्यात प्रतापराव जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Loksabha Constituency) भाजप उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) आणि कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यात थेट लढत होतेय. या मतदारसंघात बच्चू कडूंच्या (Bachchu Kadu) प्रहार पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत…. 

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडीत तिरंगी लढत होतेय. विद्यमान भाजप खासदार, माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे, कॉंग्रेस पक्षाचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) रिंगणात आहेत. 

परभणीमध्ये मविआचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे आहेत

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार भावना गवळींऐवजी राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आलंय. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे संजय देशमुख उभे आहेत.. 

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांच्यात लढत होतेय.

नांदेडमध्ये विद्यमान भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर आणि आणि कॉंग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत आहे. इथे भाजपसोबतच अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, विद्यमान खासदार प्रताप जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात थेट लढत होतेय…

हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात लढत आहे… 

या आठही लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावलाय. आता मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात कौल टाकतात, यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे..





Source link

पत्नी व लेक साखरझोपेत असताना केले कुऱ्हाडीने वार; अकोला दुहेरी हत्याकांडाने हादरले

पत्नी व लेक साखरझोपेत असताना केले कुऱ्हाडीने वार; अकोला दुहेरी हत्याकांडाने हादरले


Akola Double Murder Case: दुहेरी हत्याकांडाने अकोला शहर हादरले आहे. एकाच महिन्यातील दुहेरी हत्याकांडाची ही दुसरी घटना असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पतीने आपल्याच पत्नी आणि मुलीची कुऱ्हाडीने वार करत निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. (Crime News In Marathi)

रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या संतोषी माता मंदिराजवळ एका घरात पतीने आपल्या पत्नी व मुलीची कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर आई व मुलीचा अशारितीने मृत्यू झाल्याने परिसरातून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनीष म्हात्रे असं आरोपीचे नाव आहे. तर, रश्मी म्हात्रे व माही म्हात्रे असं मृतक मुलीचं व पत्नीचे नाव आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे त्याच्या पत्नीसोबत नेहमी वाद-विवाद सुरू असायचे. या रोजच्या वादाला वैतागून आरोपीने आज रागाच्या भरात पत्नी व मुलीवर कुऱ्हाडीने वार करुन त्यांची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी हे वेगळे राहत होते. पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्याने तिला मनवण्याचा अनेकदा प्रयत्न केला तो तिच्या माहेरीदेखील जायचा. परंतु पत्नी काही नांदायला जायची नाही. मंगळवारी म्हात्रे कुटुंबाकडे लग्न असल्यामुळं पत्नी मुलीसह अकोल्यात आली होती. तेव्हा आरोपीने तिला सासरी राहण्यासाठी सांगितलं होतं. मात्र तिने नकार दिला. 

पत्नीने पुन्हा सासरी नांदायला नकार दिल्याने आरोपी बिथरला. त्याच्या मनात राग खदखदत होता. 24 एप्रिलला पहाटे 5 वाजताच्या सुमारास दोघीही साखरझोपेत असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. यात त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या होत्या. दुर्दैवाने दोघींचाही मृत्यू झाला आहे. हत्येचा गुन्हा घडताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आरोपींना ताब्यात घेऊन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करत आहेत. 

दरम्यान, अकोल्यात एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दुहेरी हत्याकाडांची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरुणांची हत्या करण्यात आली होती. क्षुल्लक कराणावरुन तिघा आरोपींनी या दोघींची हत्या केली होती. धारदार शस्त्राने वार करत दोघांचाही खून करण्यात आला होता. पोलिसांनी 24 तासांच्या आत तीन आरोपींना अटक केली आहे. 





Source link

Loksabha : उत्तर पश्चिम मुंबईच महायुतीची खिचडी शिजेना, कोण देणार अमोल कीर्तिकरांना टक्कर? पाहा राजकीय गणित

Loksabha : उत्तर पश्चिम मुंबईच महायुतीची खिचडी शिजेना, कोण देणार अमोल कीर्तिकरांना टक्कर? पाहा राजकीय गणित



Mumbai North West Loksabha Election : मुंबई उत्तर पश्चिममध्ये महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तर दुसरीकडं खिचडी घोटाळ्याच्या आरोपामुळं शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार अडचणीत सापडलाय. काय आहेत इथली राजकीय गणितं?



Source link

'लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त…,' शालिनी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं; 'पाला पाचोळ्यासारखा उडत..'

'लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त…,' शालिनी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं; 'पाला पाचोळ्यासारखा उडत..'



LokSabha Election: मनसेने (MNS) संजय निरुपम (Sanjay Nirupal) यांच्यासह रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत जाहीरपणे विरोध दर्शवला आहे
 



Source link

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत; ‘मारूती’ची नावाची गाडीही कुणी घेत नाही

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत; ‘मारूती’ची नावाची गाडीही कुणी घेत नाही


लैलेश बारगजे, झी मिडिया, अहमदनगर : देशभरात हनुमानाचे लाखो भक्त आहेत. महाराष्ट्रात एक असे जाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत. इतकचं काय तर  ‘मारूती’ची नावाची  गाडीही कुणी घेत नाही.  अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर गाव असं आहे. जिथं हनुमानाच मंदिर नाही तर दैत्यमहाराजांचे मंदिर असून वर्षभर दैत्यांची पूजा अर्चा करून मनोभावे भक्ती गावकऱ्यांकडून होते. 

पोथी पुराना उल्लेख असल्याप्रमाणे, निंबादैत्य व हनुमंत दोघांत घनघोर असे गदा युद्ध होते. त्यात दोघही जखमी होतात. निंबादैत्य प्रभुरामाचा धावा करतो. त्यामुळे हनुमंत आश्चर्यचकीत होतो. प्रभूराम येतात आणि निंबादैत्याला बरे करतात आणि वर देतात. या गावात तुझेच नाव निघेल. तुझे मंदिरही बांधले जाईल.रामाने वर दिल्यानंतर निंबादैत्य सांगतात, तुम्ही तर हनुमंताला प्रत्येक गावात तुझे मंदिर होईल, असे सांगितले आहे. मग हे कसे. त्यावर प्रभू राम म्हणतात, गाव तुझेच. इथे हनुमंताचे मंदिर नसेल आणि त्याच्या नावाचा उल्लेखही निघणार नाही.

दैत्य नांदूर हे गाव रामायण काळातील ही प्रथा आजही पाळते आहे. इथला भूमिपूत्र अमेरिकेत असला तरी त्याच्या घरात निंबादैत्याचे छायाचित्र असतेच. घर,गाडीवर तर दुकानांची नावे श्री निंबादैत्य या नावाने गावामध्ये आहेत. दैत्य नांदूर गावातील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे मात्र शिक्षणाच्या प्रवाहात आल्यामुळे गावातील मोठ्या प्रमाणात नोकर वर्ग आहे हा नोकर वर्ग वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्य करत आहे व्यवसायाच्या निमित्ताने ही ग्रामस्थ गावाबाहेर पडले आहेत मात्र ते ग्रामस्थ जिथे राहतात तिथे आपल्या गावाची कथा पाळताना पाहायला मिळतात अगदी दुसऱ्या शहरात राहत असले तरी हनुमानाची पूजा करणे टाळतात याबरोबरच गावाकडे निंबादैत्याच्या यात्रा उत्सवाला न चुकता हजेरी लावतात

पडावा आणि पाडव्याचा दुसरा दिवस असे दोन दिवस यात्रा भरवली जाते.पाडव्याचा यात्रेचा मुख्य दिवस असतो. ऑर्केस्ट्रा कुस्त्या,तमाशा, छबिना, गंगेचे पाणी आणलेली कावडी, अभिषेक महाआरती अशी विविध कार्यक्रम पार पडतात. गेली पंधरा वर्षांपासून श्री. निंबादैत्य महाराज देवस्थान सार्वजनिक ट्रस्टची स्थापना केली असून त्यामाध्यमातून विकासाची कामे येथे सुरु आहे.लवकरच मंदिर जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात येणार आहे.पंधरा दिवसातून एकदा दर शनिवारी दैत्य महाराजांची महाआरती होऊन अन्नदानाची महा पंगत गावासाठी व आलेल्या भाविकासांठीचा उपक्रम राबवण्यात येतो.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp