by Hansraj Agrawal | Mar 22, 2024 | Trending News
Maharashtra Weather News : हवामान विभागाकडून मिळालेल्या इशाऱ्यानुसारच राज्यात सद्यस्थिती पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी भागामध्ये असणाऱ्या अनेक भागांमध्ये हवेतील आर्द्रतेमुळं तापमान सातत्यानं वाढत चाललं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांतही अशीच परिस्थिती कायम राहणार असून, राज्यातील तापमान 2 ते 4 अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, अवकाळीचं सावट मात्र काही अंशी निवळल्याचंही चित्र आहे.
गुरुवारी सोलापुरात राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. इथं तापमानाचा आकडा 39 अंशांवर पोहोचला होता. यामध्ये येत्या 48 तासांत 2 ते 4 अंशांची वाढ अपेक्षित असल्यामुळं राज्यात उन्हाचा दाह अडचणी निर्माण करण्याचं चित्र आहे. दरम्यान, विदर्भाच्या पश्चिमेला सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, त्यातच केरळपासून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तिथं झारखंडपासून मेघालयपर्यंतसुद्धा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं या सर्व परिस्थितीचे थेट परिणाम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील ढगाळ वातावरणावर दिसून येत आहेत.
IMD नं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशाच्या काही भागांमध्ये 26 मार्चपर्यंत ढगांच्या गडगडाटासह वीजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी असेल. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या अतीव उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसासह हिमवृष्टीचा इशारा भारतील हवामानशास्त्र विभागानं दिला आहे.
रायलसीमा, केरळ, माहे, सौराष्ट्र आणि कच्छ येथे पुढील चार दिवस तर, तामिळनाडू, पुदूच्चेरी आणि करईकल येथे पुढील दोन दिवस दमट वातावरण त्रास वाढवणार आहे. देशाच्या पूर्वोत्तर भागात येणाऱ्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघलय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, उप हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीम येथे 21 ते 26 मार्चदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर आणि उत्तर पूर्वेला सुरु असणाऱ्या हवामानाच्या या स्थितीमुळं आता महाराष्ट्रातही सातत्यानं तापमानात बदल अपेक्षित आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 21, 2024 | Trending News
Eknath Shinde on Sanjay Raut: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला असून हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रातील जनता निवडणुकीतून उत्तर देत मोदींच्या अमपानाचा सूड घेईल असा विश्वासही व्यक्त केली आहे. पक्षाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्याने त्यांनी संताप केला. “हे दुर्देव आहे. देशभक्त आणि राष्ट्रभक्त असणाऱ्या मोदींनी देशाला नवा आयाम, उंची दिली. बाळासाहेबांचं राम मंदिर बांधण्याचं, जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्याचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. अशा आदरणीय पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं देशाचा अपमान, देशद्रोह आहे. त्यांची निंदा करावी तेवढी कमी आहे. कारण त्यांनी औरंगजेबी वृत्ती त्यांनी दाखवली आहे. औरंगजेबाने भावांना, वडिलांनाही सोडलं नव्हतं. पण यांना महाराष्ट्रातील जनता निवडणुकीतून उत्तर देत सूड घेईल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
संजय राऊत काय म्हणाले आहेत?
“या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. जे महाराष्ट्रावर आज चाल करून येत आहेत ते, गुजरातचे राज्यकर्ते मोदी अथवा शाह असतील. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तिथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येतेय आणि शिवसेनेच्या विरोधात, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यापुढे मोदी नव्हे तर औरंगजेब म्हणा असंही ते म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंनाही प्रत्युत्तर
अमित शाह यांनी मणिपूरमध्ये शेपूट घातली अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, “देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्र्यांनी मोदींच्या नेतृत्वात 370 कलम हटवलं. त्यांनी स्वप्न खरं करुन दाखवलं. त्यांना शेपूट घालणं म्हणणं ही मर्दुमकी नाही. हे फोटोग्राफर असून त्यांना शेपूट असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते. वेळप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीत जाऊन लोटांगण घालणारे, नोटीस आल्यावर शेपूट घालणारे आहेत. सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी यांनी सगळं सोडलं होतं”.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 20, 2024 | Trending News
BMC Tax Collection : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीकामी मोठ्या मालमत्ताधारकांकडे पाठपुरावा सुरू केला असून त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. चालू आर्थिक वर्ष २०२३ – २४ मध्ये मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्यात करनिर्धारण व संकलन विभागाला यश आले. करदात्या नागरिकांनी ३१ मार्च २०२४ पूर्वी कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबई महानगरपालिकेचा करनिर्धारण व संकलन विभाग गत वर्षभरापासून सातत्याने कर वसुलीकामी पाठपुरावा करत आहे. आर्थिक वर्ष २०२३ – २०२४ ची सुधारित कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर विविध प्रसार माध्यमांचा व समाज माध्यमांचा वापर करत नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मालमत्ता कर न भरलेल्यांची यादी जाहीर करून मालमत्ताधारकांना नोटीस देणे, थकबाकीदारांना टेलिकॉलिंग, एसएमएस करणे आदींवर भर दिला जात आहे.
करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीतकमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मालमत्ता कर कसा वसूल केला जाऊ शकतो, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे नागरिकांचे मालमत्ता कर भरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे. आर्थिक वर्षातील उर्वरित ११ दिवसांत अधिकाधिक कर वसूल करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
मालमत्ताकर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. मालमत्ताधारकांनी सुद्धा मालमत्ता कर भरण्यासाठी स्वतःहून पुढे यावे. थकबाकीदारांनी आपला थकीत मालमत्ता कर तसेच मालमत्ताधारकांनी आपला नियमित कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे
मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजीची विभागनिहाय मालमत्ताकर वसुली
१) ए विभाग – ५ कोटी ३९ लाख रूपये
२) बी विभाग – ६७ लाख ३७ हजार रूपये
३) सी विभाग – १ कोटी ६९ लाख रूपये
४) डी विभाग – ६ कोटी ९२ लाख
५) ई विभाग – १ कोटी ६३ लाख रूपये
६) एफ दक्षिण विभाग – ५३ लाख ७२ हजार रूपये
७) एफ उत्तर विभाग – ७९ लाख ९६ हजार रूपये
८) जी दक्षिण विभाग – ४ कोटी ४४ लाख रूपये
९) जी उत्तर विभाग – ३ कोटी ३१ लाख रूपये
१०) एच पूर्व विभाग – ५ कोटी ७२ लाख रूपये
११) एच पश्चिम विभाग – ५ कोटी ९० लाख रूपये
१२) के पूर्व विभाग – ७ कोटी ७२ लाख रूपये
१३) के पश्चिम विभाग – ५ कोटी ७३ लाख रूपये
१४) पी दक्षिण विभाग – २ कोटी ७८ लाख रूपये
१५) पी उत्तर विभाग – ३ कोटी १७ लाख रूपये
१६) आर दक्षिण विभाग – १ कोटी ७४ लाख रूपये
१७) आर मध्य विभाग – २ कोटी ५१ लाख रूपये
१८) आर उत्तर विभाग – १ कोटी ८६ लाख रूपये
१९) एल विभाग – २ कोटी २१ लाख रूपये
२०) एम पूर्व विभाग – ५८ लाख ९१ हजार रूपये
२१) एम पश्चिम विभाग – २ कोटी ४६ हजार रूपये
२२) एन विभाग – १ कोटी २६ लाख रूपये
२३) एस विभाग – २९ कोटी ३ लाख ४८ हजार रूपये
२४) टी विभाग – २ कोटी ३७ लाख ६४ हजार रूपये
Source link
by Hansraj Agrawal | Mar 20, 2024 | Trending News
Maharashtra Weather News Today: मार्च महिना आता सरत आला आहे. एप्रिल महिना सुरू होण्याच्या आधीच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर काही भागान उकाडा वाढला आहे. मुंबईतही उन्हाचा पारा चढला आहे. गुरुवारपर्यंत मुंबईत उन्हाचा ताप आणखी चढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 38 अंशापर्यंत उन्हाचा पारा चढू शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटलं आहे. (Maharashtra Weather Update)
मुंबईत मंगळवारी कमाल तापमान अवघ्या 24 तासांत 2.2 अंशानी वाढले होते. कोकणातील दमट आणि उष्ण हवामानामुळं आधिक उकाडा जाणवू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत कुलाबा येथे 32.2 तर, सांताक्रुझ येथे 34.2 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद मंगळवारी झाली होती. सोमवारपेक्षा मंगळवारी कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे.
कोकण विभागात येत्या दोन ते तीन दिवसांत काही प्रमाणात दमट हवा असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात समुद्रावरुन येणारे वारे उशिराने वाहतात. त्यामुळं हवेत दीर्घकाळ उष्णता राहते. 20 मार्च ते 22 मार्च या काळात कोकण विभागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर, राज्यातील इतर भागात कमाल तापमान 3 ते 4 अंशांनी वाढू शकेल. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होऊ शकेल. ही अवस्था एप्रिल ते मेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटांची शक्यताही मराठवाडा आणि विदर्भात वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची तीव्रता इतर राज्यातील भागांपेक्षा अधिक असू शकते. तर, कोकणात त्या तुलनेने उष्णतेची तीव्रता कमी असू शकते. एकीकडे उष्णतेचा पारा चढत असताना काही ठिकाणी अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मार्च ते मेपर्यंत अवकाळी पाऊस होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अल निनोच्या प्रभावामुळं ही परिस्थिती उद्भवू शकते.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी विदर्भात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यावरही पावसाळी ढगांचं सावट असेल.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 19, 2024 | Trending News
Rohit Pawar advised Raj Thackeray : अजित पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांनीही अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. बारामतीत भावनिक वातारण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अजितदादांचा परिवार हा सबंध बारामतीकर आहे. आज श्रीनिवास पवार बोलत आहेत ते यापूर्वी काही का बोलले नाही? असा सवाल अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) अमोल मिटकरींची लायकी काढली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
अमोल मिटकरी यांनी असा आरोप केलाय की, श्रीनिवास पाटील यांना पुत्र प्रेमाचा मोह झालाय. यावर रोहित पवार यांनी उत्तर देत अमोल मिटकरी यांची लायकी काढली. ज्यांनी श्रीनिवास काकांच्या विरोधात वक्तव्य केलं त्या व्यक्तीची नेमकी काय लायकी आहे, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे अमोल मिटकरीवर बोलून मी वेळ वाया घालवणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. जी भूमिका श्रीनिवास काकांनी मांडली ती भूमिका सामान्य जनतेची आहे. आपल्या काकाला सोडून जाणे हे योग्य नसल्याचे सर्वांना वाटते. त्यामुळे साहेबांच्या विचाराने चालणारे पवार कुटुंब आहे म्हणून आम्ही पवार साहेब सोबत आहोत. अजितदादांनी स्वतः निर्णय घेत स्वतःला पवार कुटुंबापासून वेगळे केले आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीला येत्या लोकसभा निवडणूक 30 पेक्षा अधिक जागा मिळतील. कमीत कमी 30 जास्तीत जास्त 40 असा जागा महविकास आघाडीला मिळतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना देखील सल्ला दिलाय. 2019 ला राज ठाकरेंनी जी भाषणे केली होती ती शेतकऱ्यांच्या बाजूने युवकांच्या बाजूने होती. बेरोजगारीचा प्रश्न हा 2019 चा जेवढा अडचणीचा होता, त्यापेक्षा 2024 मध्ये हा प्रश्न अडचणीचा झालाय. त्यावेळी ते भाजपच्या विरोधात आणि युवा पिढीच्या बाजूने बोलले होते त्यामुळे युवकांनी बाजूने भूमिका घेत राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधात लढावं. मराठी अस्मिता जपण्याचा काम हे राज ठाकरेंनी केला आहे त्यामुळे स्वाभिमानी माणूस हा भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही हा विश्वास माझ्यासारख्याला आहे, असंही रोहित पवार म्हणतात.
राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेत्यांची चर्चा करून महाविकास आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतल्यास हा सर्वसामान्य जनतेला पटू शकतो असं मला वाटतं. दिल्लीला जाणे हेच मुळात आम्हाला पटत नाही, लोकांच्या मनात त्यांच्याविषयी वेगळी भावना तयार होते. लोक खुश नाहीत, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त यांना देखील भूमिका आवडेली नाही, असं म्हणत रोहित पवारांनी राज ठाकरेंना भाजपसोबत न जाण्याचा सल्ला दिलाय.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 19, 2024 | Trending News
पुण्यातील एका शेतकऱ्याने अत्यंत धक्कादायक प्रयोग केला आहेय या शेतकऱ्याने खसखसच्या पिकाखाली अफूची लागवड केली आहे.
Source link