'रवींद्र चव्हाण रोज उठून रिक्षातल्या दाढीवाल्याची…', सामनातून एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका

'रवींद्र चव्हाण रोज उठून रिक्षातल्या दाढीवाल्याची…', सामनातून एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका


Samana On Eknath Shinde: राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सारेकाही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. भाजप-शिवसेनेत एकमेकांचे नेते,कार्यकर्ते घेण्याची रस्सीखेच सुरु आहे. रविंद्र चव्हाण आक्रमक भूमिकेत दिसतायत. या पार्श्वभूमी शिवसेना यूबीटी पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आलीय. 

Add Zee News as a Preferred Source

शिंदे गटाचा मोदी-शाहांवरचा भ्रम

शिंदे गटाला वाटतं की मोदी-शाह सत्तेत असल्यामुळे त्यांचा कोणी केसही वाकडा करणार नाही. पण भाजप आणि मोदी-शाह कोणाचेच नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी मोदी-शाहांना प्रचंड मदत केली, तरी भाजप त्यांचे झाले नाही. मग शिंदे कोण लागले? कोकणात शिंदेंचे आमदार नीलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला. भाजपचे लोक शिंदेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. शिंदे फक्त “युतीचा धर्म पाळा” म्हणून हतबलपणे बोलत आहेत. दोन नंबरच्या लोकांची बडबड कुणी गांभीर्याने घेत नाही, असे अग्रलेखात म्हटलंय. 

महायुतीची अस्थिर तीन चाकी रिक्षा

महाराष्ट्रात महायुती ही तीन पायांची राजकीय व्यवस्था आहे. आधी महाविकास आघाडी सरकारला ‘तीन चाकी रिक्षा’ म्हणून टीका करणाऱ्यांच्या नशिबी असंच सरकार आलंय. ही रिक्षा भरकटली आहे आणि कधीही खड्ड्यात पडू शकते. नगरपालिका निवडणुकांमुळे युतीतच हाणामाऱ्या आणि कुरघोड्या सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रोज शिंदेंना टोमणे मारतात. शिंदे सत्ता आणि ED सारख्या भीतीमुळे चुप बसले आहेत, असेही सामनातून म्हटलंय.

दोन नंबरची किंमत

चव्हाण म्हणतात, “दोन नंबर असं काही नसतं, त्याला किंमत नाही. देवाभाऊ (फडणवीस) सबकुछ!” 2 डिसेंबरनंतर युतीचा निकाल लागेल. शिंदे आणि फडणवीस गप्प आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटातच स्पर्धा आहे. राज्यात अनेक समस्या असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त या निवडणुकांसाठी रान उठवत आहेत. 5-6 हेलिकॉप्टर आणि खासगी विमानांचा प्रचारासाठी वापर होतोय – हे पहिल्यांदाच, अशी टीका करण्यात आलीय. 

निवडणुकांत पैशाचा खेळ आणि भ्रष्टाचार

निवडणुकांत सत्ता आणि पैशाचा खेळ सुरू आहे. मतदारांना १०-१५ हजार रुपये देऊन खरेदी केली जातेय. जो जास्त पैसा देईल, त्याच्या पक्षाचा दुपट्टा गळ्यात अडकवून ‘झिंदाबाद’ म्हणतात. शिंदे गटाच्या ‘गुलाबो गँग’चा नेता म्हणतो, “आमच्याकडे नगरविकास खाते आहे, पैसाच पैसा आहे. १ तारखेला मतदारांना लक्ष्मीदर्शन होईल.” पण या पैशांमुळे जनतेचं भविष्य आणि महाराष्ट्राची इभ्रत विकली जातेय. फडणवीस म्हणतात, “आमच्याकडे नीती, नियती आणि निधी भरपूर आहे.” सत्तेचे विकेंद्रीकरण संपतंय, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आलीय. 

भविष्यात शिंदे गटाची अवस्था

नगरपालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्रात बरेच काही घडेल. चव्हाणांनी शिंदेंवर ‘सुपारी’ कातरायला घेतली आहे. शिंदे गटाची फडणवीस-चव्हाणांनी कोंडी केल्याचे आरोप सामनातून करण्यता आलीय. शिंदे अमित शहांचे राजकीय आश्रित आहेत, त्यांच्याकडे स्वाभिमान किंवा संघर्ष करण्याचं बळ नाही. ते फेकलेल्या तुकड्यांवर जगतात, अशा भाषेतही टीका करण्यात आलीय. शिंदे गटाचे शहाजी पाटील म्हणतात, “आमच्या नशिबी भाजपची गुलामीच आहे.” पुढे भाजप शिंदे गटाचे किमान 35 आमदार गिळून ढेकर देईल. शिंदे गटाचा निर्माता भाजपच आहे, आणि आता ते त्यांचेच शत्रू असल्याचे सामनातून म्हटलंय.

 

FAQ 

१. प्रश्न: सामना अग्रलेखात शिंदे गटाला “दोन नंबर” का म्हणतात आणि त्याची किंमत काय आहे?

उत्तर: कारण २०२२ मध्ये शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेला (एक नंबर) पाठीत खंजीर खुपसून भाजपबरोबर सत्ता घेतली, म्हणून त्यांना “दोन नंबर” म्हणतात. अग्रलेख म्हणतो, “दोन नंबरला खरेच काहीच किंमत नसते.” भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तर जाहीर म्हणतात, “दोन नंबर असं काही नसतं, देवाभाऊ (फडणवीस) सबकुछ!” म्हणजे शिंदे गटाची भाजपला गरज संपली की त्यांना बाजूला केलं जाईल.

२. प्रश्न: सध्या महायुतीत कशी चालली आहे? “तीन चाकी रिक्षा” म्हणजे काय?

उत्तर: महायुती ही भाजप-शिंदे सेना-अजित पवार गट अशी तीन पक्षांची सत्ता आहे. आधी भाजप महाविकास आघाडीला “तीन चाकी रिक्षा” म्हणून चिडवायचा. आता त्यांच्याच नशिबी असंच सरकार आलंय. अग्रलेख म्हणतो, ही रिक्षा आता भरकटली आहे, नगरपालिका निवडणुकांमुळे आतूनच हाणामाऱ्या सुरू आहेत आणि कधीही खड्ड्यात पडू शकते.

३. प्रश्न: नगरपालिका निवडणुकांनंतर शिंदे गटाचं काय होईल?

उत्तर: अग्रलेखाचा दावा आहे की, या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात खूप काही घडेल. भाजपने शिंदे गटाची पुरती कोंडी केली आहे. रवींद्र चव्हाणांनी तर “सुपारी” घेतली आहे. शिंदे गट हा भाजपने तयार केलेला आहे, पण आता भाजप त्यांचे किमान ३५ आमदार गिळून टाकेल आणि ढेकर देईल. शिंदे गटाचे शहाजी पाटील म्हणतात, “आमच्या नशिबी भाजपची गुलामीच आली आहे.” म्हणजे शिंदे गटाला मोदी-शाह आपले वाटतात हा फक्त भ्रम आहे, भाजप कोणाचाच नाही!





Source link

मुंबई-ठाण्यात शिवसेनाच मोठा भाऊ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

मुंबई-ठाण्यात शिवसेनाच मोठा भाऊ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा


Eknath Shinde : मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलाय. महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार आहे. पण ज्यांचे माजी नगरसेवक जास्त असतील तेवढ्या जागा त्या त्या पक्षाला मिळाल्याच पाहिजेत अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. दरम्यान त्यांनी केलेल्या दाव्यानंतर आता भाजपनंही त्यांची भूमिका मांडलीय.

Add Zee News as a Preferred Source

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमधून मोठा दावा केलाय. मुंबई आणि ठाण्यात एकनाथ शिंदेंनी भाजपपेक्षा जास्त जागांची मागणी केलीय. मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेकडे जास्त माजी नगरसेवक असल्यानं एकनाथ शिंदेंनी मुंबईत 120 जागांवर अप्रत्यक्ष दावा केलाय. त्यामुळे जागावाटपावरूनही शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या जागांप्रमाणे एकनाथ शिंदेंची मुंबई आणि ठाण्यात जादा जागांची मागणी आहे. दरम्यान त्यांच्या दाव्यानंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, एकनाथ शिंदेंनी टू द पॉईंट मुलाखतीमधून केलेल्या जागांची मागणीनंतर वक्त वक्त की बात हैं असं म्हणत नितेश राणेंनी सूचक विधान केलंय.

झी 24 तासच्या टू द पॉईंटमधून एकनाथ शिंदेंनी मुंबई आणि ठाण्यात जास्त जागांची मागणी केलीय. पुढच्या महिन्यात पालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीचं बिगुल वाजण्याधीच भाजप- शिवसेनेत वादाचं बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झालीय. 

हेही वाचा : ‘बटेंगे तो कटेंगे’वरून राणा विरूद्ध कडू, नगर परिषदेच्या निवडणुकीत कोण कोणावर पडणार भारी? जाणून घ्या!

 

FAQ : 

मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार आहे का?
शिवसेना-भाजपची युती होणार असल्याचे सांगितले जात आहे, पण जागावाटपावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपचे माजी नगरसेवक किती आहेत?
भाजपचे सध्या 85 माजी नगरसेवक आहेत.

एकनाथ शिंदेंनी काय दावा केला आहे?
एकनाथ शिंदेंनी दावा केला आहे की शिवसेनाच मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीत मोठा भाऊ आहे.





Source link

एकही मंत्री सोबत आला नाही, एकनाथ शिंदे एकटेच बैठकीला का गेले? स्वत: केला खुलासा

एकही मंत्री सोबत आला नाही, एकनाथ शिंदे एकटेच बैठकीला का गेले? स्वत: केला खुलासा



मागील काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व मंत्र्यांनी दांडी मारली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच या बैठकीला गेले होते.



Source link

'आमचा पालकमंत्री एवढा खादाड की 67 लाखांचा….' कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी

'आमचा पालकमंत्री एवढा खादाड की 67 लाखांचा….' कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी


Karale Mastar On Pankaj Bhoyar: कराळे मास्तर आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि तुफान भाषणासाठी ओळखले जातात. यावेळी भंडारा येथे झालेल्या सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर निशाणा साधला. यावेळी कराळे मास्तरांनी पंकज भोयार यांना ‘खादाड’ म्हणून हिणवले. काय म्हणाले कराळे मास्तर? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

आमच्या पालकमंत्री साहेबांनी 67 लाख रुपयांचा एकच लाइट लावला. हा कसला खर्च? मोदींच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या सभेत ग्राउंडवर मुरुम टाकण्याचे आदेश होते, पण ट्रक अडवले. पाण्याच्या कॅन 20-30 रुपयांच्या ऐवजी 150 रुपयांच्या खरेदी केले. 35 हजार खुर्च्या होत्या, प्रत्येक खुर्चीचे 500 रुपयांप्रमाणे भाडे लावले. हे सगळे पैसे कुठे जातात? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

स्मार्ट मीटर योजनेला विरोध

मास्तरांनी स्मार्ट मीटरला खेळणारी योजना म्हटले. मीटरमध्ये सिम कार्ड आहे, रिचार्ज संपले की लाइट कट. जसे मोबाइल बंद पडते. मी स्वतः घरी लावू दिले नाही, फोडून टाकले. एवढेच नव्हे तर प्रत्येक गरीबाच्या घरी जाऊन सांगितले. मीटर रीडर बेरोजगार होतील, कारण डायरेक्ट एमएसईबीला युनिट कळेल. हे मीटर कधीही लाइन कापू शकते, अंधारात राहाल, असा इशारादेखील कराळे मास्तरांनी दिला. 

गटार लाइन आणि अमृत योजनेची पोलखोल

अमृत गटार लाइनसाठी 130 कोटींची योजना, पण 800-900 कोटीचे रस्ते खोदले. नवीन रस्ते फोडले, पण काम पूर्ण नाही. मेन रोड उंच, खालचे रोड खाली; इंजिनियरला समजले नाही. ६ इंच पाइप टाकला मग पाणी कसे जाईल? असा प्रश्न विचारत योजना पाच वर्षांपूर्वी सुरू केली पण अजून चालू नाही. यात सगळा भ्रष्टाचार असल्याचे ते म्हणाले. 

रोड आणि ड्रेनेजमधील भ्रष्टाचार

पालकमंत्र्यांच्या आमदार काळात ड्रेनेज पाइपलाइन टाकली, एक फुट रस्ता भरला, सिमेंट लेयर लावला आणि तो रस्ता सहा महिन्यात उकरला. यानंतर काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा नाही. सर्वांनी पैसे खाल्ले. दोनदा रस्ता खराब झाला आणि दुरुस्त केला. सिमेंट रोडवर डांबर प्लास्टर मारलेले जगात कधी पाहिले आहे? पण विधानसभा निवडणुकीत हे झाल्याचे मास्तर म्हणाले. 

जागरुक राहण्याचे आवाहन

“काँग्रेसकडून नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक उमेदवार उभे केले. हे सरकार गटार लाइनवर भर देते पण भ्रष्टाचार करतात, असे कराळे मास्तर म्हणाले. ज्यातून खाता येत नाही अशा योजना हे चालू करणार नाहीत. जागोजागी भ्रष्टाचार आहे पण आपण हे थांबवू. त्यामुळे लोकांनी जागरुक राहा, असे आवाहन मास्तरांनी केले.

FAQ

प्रश्न: कराळे मास्तरांनी पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर कोणत्या मोठ्या खर्चाबाबत टीका केली?

उत्तर: त्यांनी ६७ लाख रुपयांचा एकच लाईट लावल्याचा आरोप केला. तसेच नरेंद्र मोदींच्या लोकसभा सभेत २०-३० रुपयांच्या पाण्याच्या कॅनऐवजी १५० रुपयांच्या कॅन, ३५ हजार खुर्च्यांचे प्रत्येकी ५०० रुपये भाडे आणि मुरुमचे ट्रक अडवल्याचा गंभीर आरोप केला.

प्रश्न: स्मार्ट मीटर योजनेबाबत कराळे मास्तरांनी लोकांना काय इशारा दिला?

उत्तर: स्मार्ट मीटरमध्ये सिम कार्ड असून रिचार्ज संपले की अर्ध्या रात्रीही लाईट कट होईल, असा दावा त्यांनी केला. स्वतः घरी मीटर लावू दिले नाही, फोडून टाकले आणि गावातील प्रत्येक गरीबाच्या घरी जाऊन मीटर लावू नये असा विरोध केला. “मीटर रीडर बेरोजगार होतील, कधीही लाईट कट होईल” असे त्यांनी सांगितले.

प्रश्न: अमृत गटार लाइन आणि रस्ते फोडण्यात किती भ्रष्टाचार झाल्याचे कराळे मास्तर म्हणाले?

उत्तर: १३० कोटींच्या योजनेसाठी ८००-९०० कोटींचे रस्ते खोदले, नवे-जुने रस्ते फोडले, मेन रोड उंच आणि खालचे रोड खोल असतानाही काम केले, ६ इंच पाईप टाकली पण पाणी जाणे अशक्य, पाच वर्षांपासून काम अपूर्ण, सिमेंट रोडवर डांबर प्लास्टर मारले, दोनदा रस्ते उकरले तरी ठेकेदारांवर कारवाई नाही, असा प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले.





Source link

नवी मुंबईत 4,500,00,00,000 रुपयांचा महाघोटाळा! शिवसनेचा मोठा नेता अडचणीत; चौकशीचे आदेश

नवी मुंबईत 4,500,00,00,000 रुपयांचा महाघोटाळा! शिवसनेचा मोठा नेता अडचणीत; चौकशीचे आदेश



नवी मुंबईतील सिडकोच्या कथित जमीन घोटाळ्याची चौकशी होणार आहे. सरकारने त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली आहे. यामुळे सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाटांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे. तर, दुसरीकडे विरोधकांनी या चौकशी समितीवरच आक्षेप घेतलाय. समितीतील काही अधिकारीच दोषी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
 



Source link

नवी मुंबईतील लॉटरीशिवाय रेडी-टू-मूव्ह फ्लॅट खरेदी करण्याची सुवर्ण संधी, 2,50,000 रुपये सरकार भरणार, बाकीचे पैसै तुम्ही भरायचे… सर्वात मोठा हाऊसिंग प्रोजेक्ट!

नवी मुंबईतील लॉटरीशिवाय रेडी-टू-मूव्ह फ्लॅट खरेदी करण्याची सुवर्ण संधी, 2,50,000 रुपये सरकार भरणार, बाकीचे पैसै तुम्ही भरायचे… सर्वात मोठा हाऊसिंग प्रोजेक्ट!


Navi Mumbai CIDCO House Lottery: नवी मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदाच, महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ लिमिटेड (सिडको) ने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि कमी उत्पन्न गटातील (LIG) खरेदीदारांसाठी एक विशेष गृहनिर्माण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, 4,508 तयार घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकली जातील. कोणतीही लॉटरी होणार नाही. खरेदीदारांना त्यांच्या पसंतीचा फ्लॅट निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. 

Add Zee News as a Preferred Source

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत EWS श्रेणीतील खरेदीदारांना 2.50 लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. हे फ्लॅट नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली यासारख्या प्रमुख भागात आहेत.  थेट महामार्ग, विमानतळ आणि मेट्रो स्टेशनशी जोडलेले आहेत. या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी 22 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली आणि 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहील.

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’

सिडकोच्या या नवीन गृहनिर्माण योजनेत लॉटरी प्रणाली काढून टाकण्यात आली आहे, ज्यामुळे खरेदीदारांना त्यांच्या पसंतीचा फ्लॅट थेट निवडण्याची संधी मिळणार आहे. ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर काम करेल, म्हणजेच लवकर अर्ज करणाऱ्यांना फ्लॅट मिळण्याची शक्यता जास्त असेल. एकूण 4508  फ्लॅटपैकी 1,115 फ्लॅट पीएमएवाय अंतर्गत ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी आहेत, तर उर्वरित 3,363 फ्लॅट एलआयजी श्रेणीतील खरेदीदारांसाठी उपलब्ध आहेत.

या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 2.50 लाख रुपयांचे अनुदान  प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत EWS श्रेणीतील खरेदीदारांना मिळणार आहे. या अनुदानामुळे घराच्या मालकीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करणे सोपे होईल. सिडकोने हे सुनिश्चित केले आहे की हे फ्लॅट्स अशा ठिकाणी आहेत जिथे उत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत.

नवी मुंबईतील ज्या प्रमुख भागात हे फ्लॅट आहेत त्यामध्ये तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली यांचा समावेश आहे. ही सर्व गृहसंकुल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो स्टेशन, लोकल ट्रेन आणि प्रमुख महामार्गांशी थेट जोडलेली आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, सर्व 4,508 घरे स्थलांतरित होण्यासाठी तयार आहेत. याचा अर्थ खरेदीदार ताबडतोब ताबा घेऊ शकतात आणि बांधकाम पूर्ण होण्याची वाट पाहण्याची गरज नाही.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp