बारामतीत पुन्हा काका-पुतण्या संघर्ष, अजित पवारांविरोधात शरद पवारांची चाल? कोण आहेत युगेंद्र पवार?

बारामतीत पुन्हा काका-पुतण्या संघर्ष, अजित पवारांविरोधात शरद पवारांची चाल? कोण आहेत युगेंद्र पवार?



Pawar vs Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे पवार घराण्यातील लोकही राजकीयदृष्ट्या विभागल्या गेले. अजितदादा यांच्या बंडानंतर त्यांचे चिरंजीव पार्थ पवार त्यांच्यासोबत राहिले. तर शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि रोहित पवार राहिले. आता पवार घराण्यातील आणखी एक तरुण चेहरा शरद पवार यांच्या साथीला येणार आहे. 



Source link

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण; इथं आहे राज्यातील सर्वात मोठा वीज निर्मीती प्रकल्प

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण; इथं आहे राज्यातील सर्वात मोठा वीज निर्मीती प्रकल्प



कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाचा महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. 



Source link

कोणत्या ठिकाणी नोकरी देणार? नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांचा सवाल

कोणत्या ठिकाणी नोकरी देणार? नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांचा सवाल


पुढील
बातमी

‘मराठा आरक्षणाचा अहवाल एखाद्या कार्यकर्त्याने लिहिल्यासारखाच!’ गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल





Source link

Maharastra Politics : 'अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना…', जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!

Maharastra Politics : 'अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना…', जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!


Jitendra Awhad On Ajit Pawar : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) गटाला दिलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अजित पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी व्हीप बजावला जाऊ शकतो, ही बाब पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निदर्शनास आणून दिली गेली. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची याचिका तातडीनं सुनावणीसाठी घेण्याचं सुप्रीम कोर्टानं मान्य केलं होतं. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीमध्ये पुढील तीन आठवडे तेच नाव कायम राहणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आज सर्वोच्च न्यायालयाने भारतातील लोकशाही वाचली पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. ही आपणासाठी आश्वासक बाब आहे. अजित पवार यांच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात, शरद पवार यांना पक्ष आणि पक्षचिन्ह मिळू नये, अशी भूमिका मांडली. म्हणजेच शरद पवार नावाच्या सूर्याचा अस्त करावा, अशीच अजित पवार गटाची इच्छा त्यांच्या वकिलांनी वादविवादात पुढे आणली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने, “भारतात लोकशाही आहे अन् लोकशाहीत कोणत्याही माणसाला पक्ष आणि चिन्ह न देणं हे अयोग्यच आहे. तुमच्या लोकांनी पक्षात फूट पाडली. त्याचा १० व्या अनुसुचिशी सबंध आहे की नाही ? आपल्या देशाच्या सीमेपलीकडे असलेल्या पाकिस्तानात काय झालंय?, असा सवाल करीत भारतातील महाराष्ट्रातील राजकारणाची पाकिस्तानातील राजकारणाशी तुलना केली. 

म्हणजेच, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या वकिलांनी जे मुद्दे मांडले… त्यातून शरद पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळू न देता त्यांचा राजकीय अस्त करण्याचा अजित पवार यांचा कट उधळून लावला आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केलीये.

अपात्रतेच्या याचिका प्रलंबित असतानाच पक्षाबाबतचा निर्णय आलाच कसा? असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने आगामी सात दिवसात शरद पवार यांना चिन्ह देण्याचे आदेश दिले. तसेच, जे नाव आहे तेच नाव प्रक्रिया सुरू असेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश दिले. पण, यामध्ये एक बाब खटकली… शरद पवारांकडून पक्ष काढून घेतले, चिन्ह काढून घेतले.  सगळंच काढून घ्या.. आता कपडे काढून घ्यावे, इतके किळसवाणे राजकारण महाराष्ट्राचे करून ठेवले आहे. ज्यांनी दिले त्याच सगळेच काढून घ्यायचे हे कसलं राजकारण?, असं म्हणत आव्हाडांनी सडकून टीका केली आहे.





Source link

'मला जो संदेश द्यायचा होता तो दिलाय'; पोलिसांविषयीच्या 'त्या' वक्तव्यावर नितेश राणे ठाम

'मला जो संदेश द्यायचा होता तो दिलाय'; पोलिसांविषयीच्या 'त्या' वक्तव्यावर नितेश राणे ठाम


BJP MLA Nitesh Rane : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी रविवारी अकोला येथे पोलिसांविषयी वादग्रस्त विधान केले होते. हे पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही, असं नितेश राणेंनी म्हटलंय. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त बायकोलाच दाखवतील असंही नितेश राणे म्हटलं आहे. मात्र आता त्यानंतरही नितेश राणे त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी कुठेही चुकीचं बोललो नाही, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

“पोलीस माझं काय वाकड करू शकत नाही ह्याचा अर्थ मी हिंदूंची बाजू लावून धरतोय. जे माझ्यावर टीका करत आहेत त्यांना मी विचारेन मी हिंदूंची बाजू घेतोय हे चुकीचं आहे का? मी कुठेही चुकीचं बोललो नाही. जो संदेश मला द्यायचा होता तो मी दिलाय,” असे स्पष्टीकरण नितेश राणे यांनी दिलं.

नितेश राणे यांनी विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेवरही भाष्य केलं. “विजय वडेट्टीवार यांनी माझ्या भाषणावर आक्षेप घेतला. महाविकास आघाडीच्या काळात पोलीस वसुलीसाठी वापरले जायचे. महाविकास आघाडीच्या काळात पोलीस उद्धव ठाकरेंचे घरगडी म्हनून वापरले जायचे. येणाऱ्या काळात वडेट्टीवार आणि आमचे बॉस एकच असतील,” असे नितेश राणे यांनी म्हटलं. 

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?

“छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा..पोलिस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही. महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी की गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा?,” असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

नितेश राणेंचे वादग्रस्त विधान

“मला काही करु शकणार नाही. पोलिसांना माझे भाषण रेकॉर्ड करु दे. जास्तीत जास्त बायकोला दाखू शकणार आणि काही करु शकणार आहे. आमच्या राज्यात आमच्यावर काय करु शकाल. जागेवर राहायच आहे. राजरोस पद्धतीने पाहिजे तिथे तुमच्या इथे अतिक्रमण सुरु आहे,” असे नितेश राणे म्हणाले.





Source link

ओडिशा जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या चुकीमुळे नाशिकचे दोघेजण झाले मालामाल; बँकेत जमा झाले एक कोटी

ओडिशा जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या चुकीमुळे नाशिकचे दोघेजण झाले मालामाल; बँकेत जमा झाले एक कोटी



Nashik Crime News : ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला कॉपीराईट इन्फोटेक या संस्थेच्या खात्यावर एक कोटी रुपये ट्रान्स्फर करायचे होते ते नाशिकमधील दोघांच्या खात्यावर जमा झाले. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp