क्रिकेट मॅच जीवावर बेतली; अमरावतीमध्ये भीषण घटनेत चौघांचा मृत्यू तर 10 जखमी

क्रिकेट मॅच जीवावर बेतली; अमरावतीमध्ये भीषण घटनेत चौघांचा मृत्यू तर 10 जखमी



Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



Source link

खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिरपेचात मानाचा तुरा, संसद रत्न पुरस्काराने गौरव!

खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिरपेचात मानाचा तुरा, संसद रत्न पुरस्काराने गौरव!


MP Shrikant Shinde Parliament Ratna Award: शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आलाय. श्रीकांत शिंदे यांना नुकताच 14 व्या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 17 व्या लोकसभेत बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून तेलंगणाच्या राज्यपाल तमिळीसई सौंदरराजन यांच्याहस्ते शिंदे यांचा गौरव करण्यात आला. 

महाराष्ट्र सदनात या पुरस्काराचे वितरण

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि ई मॅगझिन यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या संसद रत्न पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात या पुरस्काराचे वितरण तेंलगणाच्या राज्यपाल तमिळसई सौंदररोजन आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे हंसराज अहिर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश संजय किशन कौल, गृहराज्यमंत्री अजय मिश्रा, संसदरत्न पुरस्कार समितीच्या प्रियदर्शनी राहुल, के.श्रीनिवासन आदी उपस्थित होते. 

माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार संसद रत्न पुरस्काराची सुरूवात करण्यात आली आहे. संसद रत्न पुरस्कार हा त्याच खासदारांना प्रदान करण्यात येतो, ज्यांचे लोकसभेत उत्कृष्ट काम आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी हिरीरिने सहभाग घेणाऱ्या खासदारांना हा सन्मान प्राप्त होतो. 

डॉ.श्रीकांत शिंदे यांना संसदेतील त्यांच्या कामासाठी यंदाच्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2019-23 या कालावधीत डॉ.श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत 556 प्रश्न विचारले तर 67 चर्चांमध्ये सहभागी झाले. याशिवाय 12 प्रायव्हेट मेंबर बिल त्यांनी समोर आणले आहे. त्यांची ही कामगिरी लक्षात घेता केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखाली समितीने शिंदे यांची या पुरस्कारासाठी निवड केली. 

तर हा पुरस्कार प्रदान करताना तेलंगणाच्या राज्यमाल तमिळसई सौदंरराजन म्हणाल्या की, ‘मला जेव्हा या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं तेव्हा आश्चर्य वाटलं की सर्व खासदारांमध्ये माझं नक्की काय काम ? केवळ पॉवरफुल व्यक्ती म्हणून मी इथे आले नाहीये तर माझ्याकडे असणाऱ्या मतदानाचा पॉवरफुल हक्काच्या जोरावर मी आज या कार्यक्रमाला हजर राहिले आहे. हा खासदारांचा दुसरा महत्त्वाचा पुरस्कार आहे, कारण त्यांच्या जनतेने त्यांना आधीच निवडून देत त्यांना पुरस्कार दिला आहे. महिला राज्यपालाने वुमन रिझर्व्हेशन बिल पास केले आहे, याचा आनंद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसंच मतदानाबाबात अधिक जागरूकता करून त्याची टक्केवारी वाढविण्याचे कामही आपले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

‘हा सामान्य शिवसैनिकांचा सन्मान’

कल्याण लोकसभेतील सर्व जनतेचा विश्वास आज सार्थकी लागला. हा पुरस्कार माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचा आणि सामान्य शिवसैनिकांचा सन्मान करणार आहे. या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी आणखीन वाढली असून जनतेचा हा विश्वास, प्रेम आणि आपुलकी यामुळेच याठिकाणापर्यंत पोहचू शकलो आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात आणखीन जोमाने महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याचे विश्वास मी यानिमित्ताने व्यक्त करतो, असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

इतरही खासदारांचा सन्मान

यावर्षी महाराष्ट्रातील शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, बंगालचे खासदार सुकांत मुझुमदार, भाजप खासदार सुधीर गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या डॉ. अमोल कोल्हे आणि काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा यांना सन्मानित करण्यात आले.





Source link

Central Railway : गुरुवारपर्यंत 'या' रेल्वेमार्गावर मेगा ब्लॉक, पुण्यातील वेळापत्रकात बदल

Central Railway : गुरुवारपर्यंत 'या' रेल्वेमार्गावर मेगा ब्लॉक, पुण्यातील वेळापत्रकात बदल


पुढील
बातमी

‘असे भ्याड हल्ले…महाराष्ट्रात राजकीय संस्कृती…’ राणेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?





Source link

चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा

चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा


चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे समर्थक भिडले आहेत. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

उद्धव ठाकरेंची सिंधुदूर्ग जिल्ह्यात सभा पार पडली होती. या सभेत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली होती. निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देत आव्हानही दिलं होतं. गुहागरमध्ये येऊन मी जशास तसं उत्तर देईन असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज निलेश राणे यांची सभा आज आयोजित होती. या सभेला ते जात असतानाच हा राडा झाला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न आहे. तसंच वाहतूक विस्कळीत झाली असून तीदेखील सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

भास्कर जाधव यांनी या राड्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, “आज भाजपाचे सरचिटणीस निलेश राणे आज गुहागरमध्ये, माझ्या मतदारसंघात सभा घेण्यासाठी येत असल्याची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली होती. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात टीझर व्हायरल करुन लोकांना उचवण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या कार्यालयासमोर मोठे बॅनर लावत गुन्ह्याला माफी नाही, हिशोब चुकता करणार अशा आव्हानात्मक घोषणा देण्यात आल्या होत्या. पण कोणाच्याही झेंड्याला, बॅनरला हात लावायची नाही अशी चिपळूण जिल्ह्याची संस्कृती नाही”. 

पुढे ते म्हणाले की, “सभा गुहागरला असताना निलेश राणे मुंबईतून आले. त्यांनी दापोलीमार्ग फेरी बोटीने थेट गुहागरला जावं अशी अपेक्षा होती. पण ते जाणीवपूर्वक चिपळूणला आले. माझ्या घर, कार्यालयासमोर जाणीवपूर्वक आपला सत्कार करुन घेण्याचा प्लान केला. मी पोलिसांनी यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे ते विश्रांतीगृहावर गेले. पारनाक्यावर सत्कार करण्याचं ठरवलं होतं. ती जागाही जाणीवपूर्वक निवडली होती. पण 3.30 ते 5 वाजेपर्यंत रस्त्यावर बाहेर आलेच नाहीत. तसंच स्वागतासाठी लावण्यात आलेली क्रेन नाक्यावर होती. ती ऑफिसच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न केला. मी पोलिसांना क्रेन पुढे आणू नका अशी विनंती केली होती. गुहागरमध्ये माणसंच सभेला नसल्याने ते पोलीस पुढे जाऊ देत नाही कारण सांगून मागे फिरतील असं वाटलं. यानंतर मी सर्वांना घरी जाण्यास सांगितलं. पण त्याचवेळी त्यांनी सत्कार केला आणि फटाके बजावले. ते रस्त्यावरुन मुद्दामून चालत, नाच गाणी करत पुढे आले. हात दाखवत उचकावण्याचा प्रयत्न केला. पण मी शांत राहण्यास सांगितलं होतं.  त्याचवेळी पलीक़डून दगडफेक सुरु झाली. यानंतर येथूनही दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना मिरवणूक काढू द्यायला नको होती. त्यांनी परिस्थिती नीट हाताळायला हवी होती”.

पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली असून आमच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा वापर केला असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. कित्येक वर्षं राणे कुटुंब चिपळूणची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरु असून आज तो पूर्णत्वास नेला असाही आरोप त्यांनी केला. 





Source link

भाजप नेते माधव भंडारी यांना 12 वेळा उमेदवारी नाकारली; वडिलांसाठी मुलाची पोस्ट

भाजप नेते माधव भंडारी यांना 12 वेळा उमेदवारी नाकारली; वडिलांसाठी मुलाची पोस्ट


Madhav Bhandari  : काँग्रेसचे बडे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारी यांना 12 वेळा उमेदवारी नाकारली आहे.  माधव भंडारींच्या मुलानं X या सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे.

वडिलांसाठी मुलाची पोस्ट

जवळपास 12 वेळा माधव भंडारींचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत आलं. मात्र त्यांना कधीच उमेदवारी मिळाली नाही, अशा शब्दात मुलगा चिन्मय भंडारी यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झालीय. आपल्या वडिलांनी पक्षासाठी कशा खस्ता खाल्ल्या, निस्वार्थीपणे मेहनत घेतली, याचं चित्र चिन्मय यांनी पोस्टमधून मांडल आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

भाजपच्या तीनही उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अशोक चव्हाणांनी भाजपकडून राज्यसभेचा अर्ज भरलाय. तर मेधा कुलकर्णींनीही अर्ज दाखल केलाय. डॉ. अजित गोपछडेंनीही राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला. 

नारायण राणेंना  राज्यसभेत पाठवलं जाणार नाही

रायगड लोकसभा मतदारसंघावरुन भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमनेसामने आलेले असताना आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन भाजप-शिवसेना शिंदे गट आमनेसामने आलेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राज्यसभेत पाठवलं जाणार नाहीये, त्यामुळे राणेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केलेली असतानाच शिंदे गटानं मोठा दावा केलाय. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केलाय. विनायक राऊत या मतदारसंघातून दोन टर्म निवडून आलेत, विशेष म्हणजे दोन वेळा निलेश राणेंचा पराभव करुन राऊत निवडून आलेत. विनायक राऊत ठाकरे गटात असले तरी या मतदारसंघात शिंदे गटाची ताकद असल्याचं सांगत सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केलाय.

महायुतीच्या उमेदवारांचे राज्यसभेसाठीचे अर्ज दाखल

महायुतीच्या उमेदवारांनी राज्यसभेसाठीचे अर्ज दाखल केलेत. शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी अर्ज भरलाय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे गटाचे नेते उपस्थित होते. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेलांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तर काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंनीही अर्ज दाखल केलाय.  प्रफुल्ल पटेलांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे विरोधकांनी अजित पवार गटावर निशाणा साधलाय. अपात्रतेची टांगती तलवार असल्यामुळे पटेलांना पुन्हा संधी दिली अशी टीका राऊतांनी केलीय तर काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या, असं उत्तर अर्ज भरल्यावर प्रफुल्ल पटेलांनी दिलंय. 

 





Source link

हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला मोठा निर्णय

हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला मोठा निर्णय


Mhada Mill Worker Lottery : हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा  देमारा निर्णय म्हाडाने घेतला आहे.  मुंबईतील 58  बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत झालेल्या तसेच यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला 15 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

म्हाडाचा विभागीय घटक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी 14 सप्टेंबर 2023 पासून राबविण्यात येत असलेल्या या विशेष अभियानाअंतर्गत अद्यापी गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण 1, 8, 492 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 89, 648 अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र तसेच अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासन गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराविषयी अत्यंत संवेदनशील असून त्यांना हक्काचे घर मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचवण्याकरिता कटिबद्ध आहे. म्हणूनच या अभियानाचा लाभ अधिकाधिक गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना घेता यावा याकरिता सदरील मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी  मिलिंद बोरीकर यांनी आज दिली. 

यापूर्वी ऑफलाइन अथवा ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.    गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केले असल्याचा पुरावा दर्शविणारी कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने सादर करता यावीत याकरिता म्हाडाच्या मुंबईतील वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लब जवळील समाज मंदिर हॉल येथे तात्पुरते स्वरूपाचे मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी Mill workers eligibility हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले असून सदर ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. तसेच https://millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या 1, 50, 484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावी. सदर प्रक्रियेदरम्यान काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता 9711194191 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.

मंडळातर्फे सर्व संबंधित गिरणी कामगार व वारसांना आवाहन करण्यात येत आहे की, पात्रता निश्चितीकरिता मंडळाने विहित केलेल्या 13 पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी. यामध्ये गिरणी कामगारांचे ओळख पत्र , तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ एस आय सी  क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र , लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत. तसेच आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. सदरील अभियान कालबद्ध असल्याने अधिकाधिक गिरणी कामगार व वारसांनी या विशेष अभियानात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp