by Hansraj Agrawal | Feb 14, 2024 | Trending News
Mysterious Lonar Crater Lake: कधीच न ऐकलेल्या आणि पाहिलेल्या गोष्टींकडे लोक आकर्षित होतात. उत्सुकता म्हणून अशाच रहस्यमयी ठिकाणांचा शोध घेत असतात. यासाठी परदेश दौरे सुद्धा करतात. तुम्हालाही अशा रहस्यमयी ठिकाणांची आवड असेल तर महाष्ट्राबाहेर जाण्याची गरज नाही. एक नव्हे तर कित्येक ठिकाण येथे सापडतील. त्यापैकीच एक म्हणजे, लोणार सरोवर!
भारतातील महाराष्ट्रात असलेले लोणार सरोवर हे पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. लोणार सरोवर म्हणजे पृथ्वी आणि अंतराळाला जोडणारा चमत्कारच आहे. बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर हे एक अद्वितीय आणि रहस्यमय नैसर्गिक आश्चर्य आहे. 50,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे अग्निजन्य खडकात निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचे हे जगातील एकमेव सरोवर आहे.
उल्कापातामुळे तयार झाले लोणार सरोवर
लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झाले आहे. लोणार सरोवर हे 47000 हजार वर्ष जुनं असल्याचा संशोधकांचा दावा आहे. एक महाकाया उल्का दख्खनच्या पठारावर धडकली. त्याठिकाणी 1.8 किलोमीटर व्यासाचा आणि 150 मीटर खोल असा प्रचंड खड्डा तयार झाला. या सरोवराला पौराणिक महत्व देकील आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये जे. ई. अलेक्झांडर यानं या सरोवराची नोंद केली आहे. त्याचबरोबर आईने अकबरी, पद्मपुराण आणि स्कंदपुराणातही या विवराचा उल्लेख आढळतो.
खाऱ्या पाण्याचे सरोवर
लोणार हे उल्कापातापासून तयार झालेलं सरोवर आहे. चंद्रावरील मातीचं या खाऱ्या पाण्याच्या गुणधर्माशी जवळचं नातं असल्याचं, जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. या सरोवराचा विविध अंगांनी अभ्यास करण्यासाठी जगाच्या कोनाकोपऱ्यातून इथे संशोधक नेहमी येतात. लोणार सरोवर परिसरात सातत्याने भूगर्भीय, पुरातत्त्व, पर्यावरण आणि आंतराळिकदृष्ट्या संशोधन केले जाते. लोणार सरोवर परिसरात अनेक प्रकारचे दुर्मीळ खडक, खनिज, काचमनी, पाण्यावर तरंगणारे दगड सापडतात. लोणार सरोवराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील क्षारांचे प्रमाण, आम्लारी गुणधर्म म्हणजेच सरोवराच्या पाण्याची पीएच लेव्हल इतकी जास्त असूनही याच्या बाजूला घेतलेल्या छोट्याशा खड्ड्यात मात्र गोड पाणी मिळते. या पाण्यात कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही परंतु यात विविध प्रकारचे जिवाणू, विषाणू, हरितनील शेवाळ आहेत NASA च्या वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उलगडता आलेले नाही. येथे एक सासू सूनेची विहीर म्हणून ही ओळखली जाणारी पुरातन विहीर देखील आहे. या विहिरीचं अर्धं पाणी गोडं आणि अर्धं पाणी खारं असतं. संपूर्ण तलावात मिठासारखं खारं पाणी मात्र या विहीरीत अर्धं पाणी गोड असल्यानं हा एक निसर्गाचा चमत्कार समजला जातो.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 14, 2024 | Trending News
Gold Silver Price on 14 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोने चांदीच्या दरवाढीच्या मागे अनेक कारणं सांगितले जात आहे. अनेक देश सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असतात. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वर्षभरात वाढली होती. ग्रामीण भागातील महिला तर आजही सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहताच. म्हणूनच दर गुरुपुष्यामृत योगावर एक ग्रॅम का होईना सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. शहरी भागात महिलांना छंद म्हणून सोने खरेदी करतात. तर दुसरीकडे सरकारी कर्मचारी तर सोन्याकडे गुंतवणुकीचे मोठे साधन म्हणून पाहतात.
2023 जूनपासून सोन्याचे दरात वाढ
सोन्याच्या दरात मे महिन्यात 55 हजारांवरून 60 हजारांची उसळी झाल्याची पाहायला मिळाली. तर जून महिन्यात 60 हजारांपर्यंत सोने गेले. नोव्हेंबरपर्यंत सोने 69 ते 60 हजारच्या घरात होते. तर नोव्हेंबरच्या दिवाळीच्या पर्वात सोने 61 हजारांवर उसळी घेतली. डिसेंबर 2023 पर्यंत सोन्याचे दर वाढतच राहिले. सध्या सोन्याचा दर 63 हजार रुपये प्रति तोळा आहे. वर्षभरात सोन्याने ग्राहकांना प्रति तोळ्यामागे 8 हजार 200 रुपयांचा नफा मिळवून दिला.
चांदी वर्षभरातून दोनवेळा उच्चांकी गाठली
चांदीची किंमत केवळ 69 हजार रुपये होती. तर मार्च 2023 मध्ये 72 हजार रुपयांवर पोहचली. मे महिन्याच चांदील पहिला उच्चांक दर 77 हजार रुपये प्रति किलो मिळाला. त्यानंतर चांदीचे दर कमी होत ऑक्टोबरमध्ये 71 हजारांपर्यंत खाली आला. डिसेंबरमध्ये पुन्हा ७८ हजारांचा उच्चांक गाठला गेला. सध्या चांदीचा दर 75 हजारांपर्यंत पोहोचले आहे.
तुमच्या शहरातील सोने चांदीचे आजचे दर
आज (14 फेब्रुवारी) 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 61,590 रुपये आहे. तर सराफा बाजारात चांदी 69,910 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 56,357 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 56,357 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,480 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 56,357 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 61,480 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,357 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 61,480 रुपये आहे.
सोन्या चांदीचे वाढते दर पाहता सोन्यातील गुंतवणूकही वाढली आहे. अडचणीच्या काळात सोने मोडून चांगला परतावाही मिळतो. जानेवारी 2023 मध्ये सोने 55 हजार 300 रुपये प्रति तोळा झाले असते. डिसेंबर 2023 अखेर सोन्याचा दर 63 हजार 200 झाला. ग्राहकांना प्रति तोळामध्ये 8,200 रुपये एकूण नफा झाला आहे. जानेवारी 2023 पर्यंत चांदी 69 हजार रुपये प्रतिकिलो झाली होती. तर डिसेंबरअखेर 75 हजारांवर पोहचला. सहा हाजारांचा नफा ग्राहकांना वर्षभरापूर्वी घेतलेल्या चांदीतून झाला आहे. जवळपास जानेवारी 2023 मध्ये सुवर्ण नगरीमध्ये सोन्याने 55 हजारांची खरेदी करून 58 हजार 500 चा विक्रमी टप्पा गाठला होता. त्यामुळे सोन्याच्या खरेदीवर ग्राहकांनी थांबा आणि बघा अशी भूमिका घेतली.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 13, 2024 | Trending News
9 वी ते 12 पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक असणार आहे, यामुळे आता शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावीच लागणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 13, 2024 | Trending News
Ashok Chavan Resign : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांनंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, भाजप अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावरुन विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांच्या भाजपात जाण्यावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
“काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब. आता आमच्यापुढे पेच आहे की पंतप्रधान मोदी देशाला काय तोंड दाखवतील? कारगिल युद्धाच्या शहिदांच्या भूखंडांवर अशोक चव्हाण यांनी कशा प्रकारे घोटाळा केला आणि शहिदांचा अपमान केला हे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. भाजपने याविरोधात आंदोलन केले होते. आज त्या शहिदांच्या अपमानाचे काय झालं? अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन अपमान धुवून काढला का? सगळ्याच पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजप जगातल्या राजकारणात नवा आदर्श निर्माण करत आहे. भाजपने काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा बदलायला हवी. त्यांनी काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे. भाजप काँग्रेससोबत अशा प्रकारे युती करत आहे. भाजप देशाचे राजकारण ज्या पद्धतीने नासवत आहे. अशाप्रकारे 400 पार उडी मारता येईल असे भाजपला वाटत असेल तर ते 200 पारही जाणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“देवेंद्र फडणवीसांनी वारंवार आदर्श घोटाळा कसा झाला हे समजावून सांगितले. त्याच्या व्हिडीओ क्लिप उपलब्ध आहेत. त्यांनी स्वतःच्या क्लिप भाजप कार्यालयात पाहाव्यात. मोदी काय बोलले होते तेही ऐकावं आणि मग शांतपणे विचार करावा की कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा. आदर्श घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे लोक. नरेंद्र मोदींना भविष्यात देशामध्ये तोंड लपवून फिरावं लागेल. त्यांनी ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला त्यांनी मोदींनी भाजपमध्ये आणून पवित्र केले हे दुर्दैव आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.
भाजपा पक्ष फोडण्याचे काम करत आहे – विजय वडेट्टीवार
“अशोक चव्हाण हेच त्यांच्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करू शकतील. मात्र, मधल्या काळात त्यांच्यामागे अनेक चौकशींचा फेरा लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती. परंतु ती चौकशी नेमकी कशाची होती, हे काही कळले नाही. त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय आपल्यासाठी धक्कादायक आहे. पण, ज्या पद्धतीने भाजपा पक्ष फोडण्याचे आणि इतर पक्षांचे नेते पळवण्याचे काम करत आहे, या प्रकाराला जनता कंटाळलेली आहे. मतदारराजा या फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागला असून येत्या निवडणुकीत अशा प्रवृत्तींना नक्कीच धडा शिकवेल,” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 12, 2024 | Trending News
Praniti Shinde : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा राज्याच्या राजकारमात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसपक्षात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
भाजपने EDची भीती दाखवली, ब्लॅकमेलिंग केलं. त्यामुळेच अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला असा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. दबावतंत्र ही भाजपची रणनीती आहे, मात्र अफवांना बळी पडू नका आम्ही काँग्रेस सोडणार नाही, असंही प्रणिती शिंदेंनी स्पष्ट केलं.
भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. काँग्रेससाठी ही दुर्दैव गोष्ट आहे. अशोक चव्हाण हे भारदस्त नेता होते. पण, हे भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
आमच्या राजीनाम्या बाबत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या अफवा आहेत. अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते. त्यांच्या पत्नी आमदार होत्या त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आहे. त्यांच्यात असलेलं स्ट्रेस लेव्हल आणि ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळलं गेलं ते मी रेकॉर्डवर आणू शकतं नाही. पण अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
अजून ही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना त्रास देणे सुरूच आहे. हे असलं राजकारण देशात पहिल्यांदाच होत आहे. माझ्या बाबतीत केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्याकडे कोणत्याही संस्था नाही त्यामुळे ईडीची भीती ते दाखवू शकत नाहीत. पण, एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत त्यानुसार मला भाजपचे विचार पटत नाहीत असं स्पष्ट मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
इतर कोणत्याही आमदाराने राजीनामा दिलेला नाही
इतर कोणत्याही आमदाराने राजीनामा दिलेला नाही. पक्ष नेतृत्व सर्वांच्या संपर्कात आहे. काँग्रेस पक्ष अजूनही भक्कम आहे. भाजप केवळ आम्ही अन्स्टेबल आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या नेत्यांवरती प्रेशर आणून भाजपकडून सायकॉलॉजिकल गेम खेळला जात आहे. काँग्रेस हा विचार भाजप कधीही संपवू शकणार नाही. आम्हाला कल्पना आहे की आमचा केवळ एक शत्रू आहे ते म्हणजे भाजप. त्यासाठी महाविकास आघाडीत असलेले सर्व समविचारी पक्ष हे शेवटपर्यंत राहतील असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 12, 2024 | Trending News
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमधून आता थंडीनं काढता पाय घेतला असून, ही थंडी दूर सरून आता राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे.
Source link