मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले 'थोडी कळ सोसा…'

मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले 'थोडी कळ सोसा…'


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच 15 वर्षं फोन करणारे आता मात्र फोन करुन विचारपूस करत आहेत. पण विचारपूस केली तरी भावूक होऊ नका असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यात युवा मिशन 2024 महामेळाव्यात अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतही महत्वाचं विधान केलं. 

या महामेळाव्यात धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्धार बोलून दाखवला. तरुण पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्यास सांगितलं. पण अजित पवारांनी आपल्या भाषणातून सर्वांचे कान टोचले. जरा दमानं घ्या, थोडी कळ सोसा असा सल्ला अजित पवारांनी दिला. सारखं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करु नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करु असं आवाहन त्यांनी केलं. 

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2004 ला आली. मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही याच्या खोलात मी जात नाही. आर आर पाटील, छगन भुजबळ तेव्हा होते, मला त्यावेळी अपेक्षाही नव्हती. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता. पण जरा दमानं घ्या, थोडी कळ सोसा. सारखं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करु नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करु. संघटना नाही तिथपर्यंत पोहोचवू,” असं अजित पवार म्हणाले. 

“आमच्या तरुणपणातील राजकारण वेगळं होतं. यापुढे त्यात अमूलाग्र बदल होत जातील. सोशल मीडियाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. आपण फार जागरुक राहण्याची गरज नाही. कारण नसताना कोणी बदनाम केलं तर तिथेच खंडन केलं पाहिजे. हा काय म्हणेल, कोणाचा निरोप येईल, अध्यक्ष कळवतील याची वाट पाहू नका. तरुणांनो राजकारणात काम करत असताना तत्परता उपजतच असली पाहिजे. एखादी घटना घडली तर त्या संदर्भातील प्रतिक्रियेसाठी निरोपाची वाट पाहू नका. पण असं करता त्यातून पक्षाची बदनामी होणार नाही, भावना दुखावल्या जाणार नाहीत, कोणाला त्रास होणार नाही, कायदा हातात घेतला जाणार नाही, संविधानाचा आदर राखला जाईल याची काळजी घ्या,” असं

“भाजपासह का गेलो हे सारखं उकरुन काढायचं नाही. आपल्याला विकासावर, तरुण शक्तीवर लक्ष द्यायचं आहे. दोन महिन्यांनी लोकसभा निवडणूक आहे. महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपला युवक कमी पडता कामा नये. विधानसभा निवडणुकीत एखाद्या तरुणात स्पार्के असेल, काम करण्याची चिकाटी असेल, तसंत जाती-धर्मांना आदर देत काम करत असेल त्यांचा विचार करु शकतो,” असं अजित पवार म्हणाले. 

“आज 50-52 आमदार पाठिंबा देतात याचाच अर्थ त्यांच्या मनात खदखदत होतंय. त्यांचे विचार, भूमिका होती पण वरिष्ठ समजून घेत नव्हते. समजून घेत असल्याचं दाखवत होते, पण निर्णय घेत नव्हते. त्याकरिता नाईलाजास्तव हा निर्णय घेतला. पण त्यातून अवमान करण्याची, कमीपणा दाखवण्याची भूमिका नव्हती,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. 

“नरेंद्र मोदींना पर्याय नाही. तिसऱ्यांदा आपल्याला त्यांना पंतप्रधानपदी बसवायचं आहे. त्यांच्याकडे व्हिजन आहे. 18 तास ते काम करतात. त्यांनी अनेक विमानतळं, राष्ट्रीय महामार्ग, पूल, बंदरं उभी केली आहेत. पाण्याचे प्रश्न सुटत आहेत, 2 कोटी लोकांना घऱं, 80 कोची जनतेला मोफत अन्धान्य देण्याचा कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. परकीय गुंतवणुसीाठी भक्कम स्थान निर्माण केलं आहे हे नाकारत येत नाही. त्याचा फायदा आपल्या देशाला, महाराष्ट्राला करुन घ्यायचा आहे,” असंही त्यांनी सांगितलं. 





Source link

अजितदादा म्हणतात 'आमचा कार्यकर्ता नव्हता', प्रशांत जगतापांनी केली पोलखोल, थेट 'तो' Video दाखवला

अजितदादा म्हणतात 'आमचा कार्यकर्ता नव्हता', प्रशांत जगतापांनी केली पोलखोल, थेट 'तो' Video दाखवला


Prashant Jagtap On Ajit Pawar : पुण्यात आयोजित केलेल्या निर्भय बनो कार्यक्रमासाठी (Pune News) पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे (Attack On Nikhil Wagle Car) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. विशेष म्हणजे पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना देखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने संताप व्यक्त केला जातोय. भाजपने हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्याने पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. अशातच आता पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेत. तसेच आपला कोणताही कार्यकर्ता आपल्या नसल्याचं स्पष्टीकरण देखील दिलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी व्हिडीओ शेअर करत अजित पवारांची पोलखोल केलीये.

काय म्हणाले प्रशांत जगताप?

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभरजी चौधरी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात अजितदादा पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी सामील होते याचा हा पुरावा, असं म्हणत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय.

पाहा Video

भाजपसह महायुतीमधील तिन्ही पक्षांनी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला चालू केला, त्यावेळी साक्षीदार म्हणून मी तिथे उपस्थित होतो. आम्हालाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. मी 27 वर्षांपासून पुण्यात राजकीय कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे. मी जबाबदारीने सांगू इच्छितो की, काल निखिल वागळे सरांचा मर्डरच करण्याचा या सर्व लोकांचा प्रयत्न होता, असा घणाघाती आरोप यांनी प्रशांत जगताप केला आहे.

जवळपास 100 एक विटा त्या लोकांकडे होत्या, सातत्याने गाडीत विटा मारल्या जात होत्या. पोलिसांनी तत्परता दाखवली असती, तर कालचा हा भयानक प्रकार घडला नसता. मला पोलिसांना दोष द्यायचा नाही ,परंतु या महायुती सरकारचे किती ऐकले पाहिजे हे पोलिसांनी ठरवावे. अजित दादांना गुंडगिरी पसंत नव्हती, पण कालचा हल्ला दादांच्या पक्षातील वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता सागरे यांनीच केला याबाबत मी कोर्टात साक्षी द्यायला देखील तयार आहे, असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी या प्रकरणात 10 आरोपींना अटक केली आहे. पर्वती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेले कार्यकर्ते हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे. 

वागळे हल्ल्यातील 10 आरोपींची नावे 

दीपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, राघवेंद्र मानकर, स्वप्नील नाईक, प्रतिक देसरडा, दुष्यंत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर, राहुल पायगुडे.





Source link

महाराष्ट्रातल्या 'या' बँकेने अचानक वाढवले व्याजदर! ग्राहकांना फटका; तुमचंही खातं इथं आहे का?

महाराष्ट्रातल्या 'या' बँकेने अचानक वाढवले व्याजदर! ग्राहकांना फटका; तुमचंही खातं इथं आहे का?



This Bank In Maharashtra Hikes Loan Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग सहाव्यांदा व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या बँकेने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.



Source link

Pune News : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली!

Pune News : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली!


Pune Crime News : पुण्यातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत “लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा” या विषयावर शनिवारी सायंकाळी कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, प्रसिद्ध वकिल असीम सरोदे यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. मात्र, या कार्यक्रमावेळी मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. निखिल वागळे हाय हाय आणि जय श्रीरामच्या घोषणा देत निखिल वागळे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांचा हा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून निखिल वागळे यांना होत असलेला विरोध पाहता कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशातच ज्याची भीती होती, तेच घडल्याचं पहायला मिळालंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निखिल वागळे यांच्याविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचे नेते सुनिल देवधर यांनी फिर्याद दिली होती. वागळेंनी सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारी पोस्ट जाणिवपूर्वक प्रसारित करुन त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याकरीता बदनामी करुन अवहेलना केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातल्याचं पहायला मिळतंय.

निखिल वागळे यांची निर्भय सभा होऊ देणार नाही, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला होता. काय वाट्टेल ते झालं तरी सभा होणार. सध्या आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गराड्यात आहोत..पण येणार म्हंजे येणार, असं निखिल वागळे यांनी पोस्ट केलं होतं. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांना जोरदार विरोध केला.

पालकमंत्री अजित पवार म्हणाले…

अतिशय दुर्देवी घटना घडली. महायुतीचं सरकार अशी घटना खपवून घेणार नाही. हा शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मी सीपींशी बोलतो अन् पुढील सुचना देणार आहे. मी महाराष्ट्राची परंपरा नाही, ही आपली संस्कृती नाही, अशी अजित पवार म्हणाले आहेत.

निखिल वागळे म्हणतात…

आजवर माझ्यावर 7 वेळा हल्ले झाले. मरण माझ्या डोळ्यासमोर होतं. मी सर्व हल्लेखोरांना माफ केलंय. जिवंत आहोत तोपर्यंत संघर्ष करणार. मी अहिंसावादी माणूस आहे. मला मारलं तरी हजारो वागळे तयार होतील. शरद पवारांवर एवढी टीका होते पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता आजवर पाहिला नाही, असं म्हणत वागळे यांनी भाजपला टोले लगावले आहेत. हल्ले करणारे माफिया लोक आहेत, असं म्हणत त्यांनी टीका देखील केलीये.





Source link

'तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला…'; पत्नीचा धक्कादायक खुलासा

'तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला…'; पत्नीचा धक्कादायक खुलासा


Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. या हत्याकांडामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेलं असताना आता या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासामध्ये नवीन माहिती समोर येत असतानाच मॉरिसच्या पत्नीने खळबळजनक दावा केला आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त

दहिसरमध्ये घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस गुरुवारी रात्रीच मॉरिसच्या ऑफिसमध्ये दाखल झाले. हे ऑफिस सील करण्यात आलं असून घोसाळकर आणि मॉरिसची लोकप्रियता पाहता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांनी वेगवेगळ्या तुकड्या करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला. दरम्यान पोलिसांच्या एका टीमनं मॉरिसच्या पत्नीची चौकशी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झालेल्या मॉरिसच्या पत्नीनं पोलिसांकडे धक्कादायक खुलासा केला आहे.

मॉरिसच्या पत्नीनं काय सांगितलं?

पोलिसांनी मॉरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या जबाबामध्ये मॉरिशच्या पत्नीने पोलिसांकडे धक्कादायक खुलासा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉरिशच्या मनात घोसाळकर यांच्याविरुद्ध तीव्र संताप होता, अशी माहिती मॉरिशच्या पत्नीने दिली आहे. “अशा परिस्थितीमध्ये जवळपास साडेचार महिने मॉरिस हा बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात राहून आला होता. जामीनावर तुरुंगातून सुटून घरी आल्यानंतर मॉरिस सारखा, ‘मी अभिषेक घोसाळकरला सोडणार नाही. मारून टाकणार!’ असं बोलायचा,” अशी माहितीही मॉरिसच्या पत्नीने दिल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच मॉरिस आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

नक्की वाचा >> मृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, ‘आता 5 वाजता…’

मॉरिसच्या निकटवर्तीयाला अटक

मयत आरोपी मॉरिसचा स्वीय सहाय्यक मेहुल पारीखला रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्यावेळी मेहुल पारीख घटनास्थळी उपस्थित होता. फेसबुक लाईव्ह सुरु असताना कॅमेराच्या मागे मागे मेहुलचं उपस्थित होता. मेहुल हा मॉरिसच्या अगदी जवळचा साथीदार असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे या हत्येचा कट रचण्यात त्याचीही काही भूमिका होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.

नक्की वाचा >> तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार

ते पिस्तुल कोणाचं?

मॉरिसने घोसाळकरांवर ज्या पिस्तुलमधून गोळीबार केला ते त्याच्या मालकीचं नव्हतं. मॉरिसला पोलिसांनी शस्त्र परवानाचा दिलेला नव्हता अशी माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता मॉरिसचा बॉडीगार्ड शर्मा यांच्या नावाने परवाना जारी केलेलं पिस्तुल मॉरिसने वापरल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी शर्माला अटक केली आहे.





Source link

मौजमजा करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी लढवली अनोखी शक्कल, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मौजमजा करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी लढवली अनोखी शक्कल, पोलिसांनी घेतलं ताब्यात


मौजमजा करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी अनोखी शक्कल लढवली आहे. घरची सर्वसाधारण परिस्थिती पण मौजमजा करण्याची हौस पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी सोनसाखळी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी लाल रंगाच्या मोपेडवरुन दोन व्यक्ती सोनसाखळी चोरी करत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणातील संशयित सिडको परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

यानंतर पोलिसांनी दोन महाविद्यालयीन मुलांना ताब्यात घेतले. या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी शहरातील आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी तीन असे एकूण सहा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने त्यांनी सोनसाखळी चोरी करण्यास सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात महिलेचे मंगळसूत्र चोरले. त्यातून त्यांना चांगला पैसा मिळाला. सहज पैसे मिळत असल्याने त्या दोन महाविद्यालयीन मुलांनी सोनसाखळी चोरी करण्यास सुरुवात केली. 

ते दोघेही संध्याकाळी निर्जन रस्त्यावर महिलांना हेरुन सोनसाखळी चोरी करत असे. यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी चांगले कपडे, महागडे मोबाईल खरेदी केले. त्याबरोबरच मौजमजा सुद्धा केली, अशी माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. त्यांच्याकडून 6 सोनसाखळी गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल, त्यात वापरलेली मोपेड आणि मोटार सायकल असा एकूण 6 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

कोण आहेत हे अल्पवयीन?

सोनसाखळी प्रकरणातील हे दोन महाविद्यालयीन तरुण अल्पवयीन आहेत. ते दोघेही नाशिकच्या सिडको परिसरात वास्तव्यास आहेत. ते नाशिकच्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्या दोघांची परिस्थिती सर्वसाधारण आहे. त्या दोघांनाही मौजमजा करण्याची हौस आणि महागडे मोबाईल वापरण्याची हौस असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp