by Hansraj Agrawal | Feb 5, 2024 | Trending News
आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गायकवाड यांचे सर्व आरोप फेटाळाले आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 4, 2024 | Trending News
Vasai Crime News : एका घरात तीन जणांचे मृतदेह आढळल्याने वसईत खळबळ उडाली आहे. हे तीनही मृतदेस संशयास्पद अवस्थेत सापडले आहेत. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत.
वसई पश्चिमेच्या उमेळमान येथील आशा सदन सोसायटीत राहणाऱ्या तीन जणांचा रहस्यमय मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत तिघेजण हे उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात राहणारे असून, ते वसई परिसरात फुल विक्रीचा व्यवसाय करायचे. त्यांच्या घरातून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारील नागरिकांना संशय आला आणि त्यांनी याची माहिती माणिकपूर पोलिसांना दिली, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून बंद घराचा दरवाजा तोडला असता त्यांना तीन जणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.
मोहम्मद अझहम, राजू आणि चुटकाउ बाबू अशी या मयत इसमांची नावे आहेत. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून त्याचे गूढ अजून समजू शकलेले नाही पोलिसांनी केलेल्या तपासणीत सर्व मृतदेह दोन दिवसांपूर्वी मयत झाल्याचे समजत आहे. पोलिसांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक
नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर परिसरात पूर्ववैमस्यातून धारदार शस्त्राने खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात तुळींज पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. रिझवान शेख उर्फ सोनू व जंटेकम शेख अशी या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपिंनी पूर्ववयमस्यातून त्यांच्या ओळखीचा सलीम शेख याला प्रगतीनगर परिसरात कोयत्याने व सुऱ्याने हल्ला केला, यावेळी आरोपिंचा सलीम शेख याला संपविण्याचा डाव होता, मात्र सलीम या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याचा जीव वाचला आहे, तुळींज पोलिसांना याबाबतचीं तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या हल्लेखोरांना सापळा रचून अटक केली आहे.
ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तीन जणांचा मृत्यू झालाय. गोंडपीपरी तालुक्यातून जाणाऱ्या अहेरी-चंद्रपूर मार्गावरील आक्सापूरजवळ ही दुर्दैवी घटना घडली. मृतक तिघेही गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा तालुक्यात असलेल्या कालीनगर येथील रहिवासी आहेत. अमृत सरकार (32), शैलेंद्र रॉय (63) आणि मनोज सरदार (43) अशी मृतांची नावं आहेत. दुपारी हे तिघेही २ दुचाकीने चंद्रपूरकडे निघाले होते. आक्सापूर येथील मंदिराजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. खनिज घेऊन धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करत धावणाऱ्या वाहनांविरोधात सामान्य नागरिकात मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 4, 2024 | Trending News
Jitendra Awhad: राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री अणि राष्ट्रवादी कॉँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांना विरोधी गटाकडून अनेकदा धमकी येत असते. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आव्हाडांच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समोर आले. यानंतर एकच खळबळ उडाली. काय घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात एक फोन आला. या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. फोन करणाऱ्याने आपले नाव सांगितले नाही. रात्री अचानक आलेल्या या फोनबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली. बॉम्ब असल्याच्या निनावी फोन मुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली. त
ही घटना गांभीर्याने घेत बॉम्ब शोधक विभागाने तपासणी केली. पण या तपासणीत काहीही निष्पन्न झाले नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशा आशयाचे ट्विटदेखील त्यांनी केल होतं. दरम्यान फोन कॉल आल्याप्रमाणे काहीही निष्पन्न झाले नसल्याची माहिती वर्तक नगर पोलिसांनी दिली.
जितेंद्र आव्हाड आणि कुटुंबियांना विनाकारण त्रास देण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा करत असल्याचे मत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. दरम्यान पोलीस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत.
आव्हाडांचे सूचक ट्वीट
2 फेब्रुवारी रोजी जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट मुंबई पोलीस, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले होते. यामध्ये ते आपल्याला मारण्याचे प्लानिंग सुरु असल्याचे सांगत होते. यावेळी त्यांनी फोटोदेखील दाखवला.या फोटोमध्ये दिसत असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक गृहस्थ व्हिडिओ काॅलवर कुणाशी तरी बोलत होते, असे त्यांनी ट्वीटमध्ये दर्शविले आहे. मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती, असे त्यांनी सांगितले. त्यांची चर्चा एका पत्रकाराने ऐकली अन् माझ्यासोबत असणाऱ्या पोलीस आणि मुलांना सांगून सावध केले. मात्र, तेवढ्यात तो हातून निसटून हाॅटेल ट्रायडंटमध्ये 19 व्या मजल्यावर कुठे तरी गेला. ही बाब नंतर माझ्या कानावर घालण्यात आली. माझ्यासोबत असलेल्या मुलांनी त्याचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. पण तो त्यांच्या हाती लागला नाही, असेही त्यांनी सांगितले होते. या ट्विटच्या बरोबर 2 दिवसांनंतर बॉम्बचा फोन आल्याने यंत्रणा सजग होती.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 3, 2024 | Trending News
Sharad Pawar: सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी केले आहे. प्रताप पवार यांनी लिहिलेल्या ‘अनुभवे आले’ या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. याठिकाणी माझं वय 85 सांगितलं गेलं. मी प्रत्यक्षात 84 वर्षांचा आहे. माझं वय विनाकारण एक वर्षाने वाढवण्यात आलं, अशी फटकेबाजी करत पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मला सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान मिळालं, असे विधान शरद पवारांनी केलंय. आत्तापर्यंत 2 आत्मचरित्रे प्रकाशित झाली. काम करत असताना येणारे अनुभव त्यात आहेत. असे अनुभव येत राहिले तर पुढची आवृत्ती येवू शकते, असे ते म्हणाले.
मी कॉलेज मध्ये शिकत असताना नेता नावाचं साप्ताहिक काढलं. त्याचा दुसरा अंक निघू शकला नाही. बाळासाहेब यांच्यासोबत एक मासिक काढलं. पण त्याचा दुसरा अंक निघाला नाही, असेही ते म्हणाले. मला व्यवहार कमी कळतो. मी अध्यात्मिकतेचा विचार कधी करत नाही, असेही पुढे ते म्हणाले.
नानाजी देशमुख यांनी मध्यप्रदेशमध्ये खूप चांगलं काम उभे केलं. त्यांचे माझे विचार भिन्न होते. पण त्यांचं काम आदर्श घेण्यासारखं होतं. अशा अनेक लोकांचा संबंध आला. संकटाच्या काळात आपलं कर्तव्य काय हे जाणणारे लोक महाराष्ट्रात आहेत. सरकारचे पाठबळ असो वा नसो ते आणि त्यांच्या संस्था काम करत असतात. प्रशासनावर किंवा राज्यकर्त्यांवर सामाजिक संस्थांचा दवाब किंवा प्रभाव असत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार हे कुटुंब प्रमुख आहेत. मी आजारी पडलो तर सर्वात आधी धावून येणारे पवार साहेब आहेत, असे प्रताप पवार यावेळी म्हणाले. पवारांची प्रत्येक घटकावर घारी सारखी नजर असते. आमच्या आईने घालून दिलेल्या संस्कारामुळे ही विण घट्ट असल्याचे प्रताप पवार यावेळी म्हणाले.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 3, 2024 | Trending News
Garlic Price Hike News in Marathi : प्रत्येक स्वयंपाकघरात लसूण हा पदार्थ सहजतेने सापडतो. मुळात लसणाचा हा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जात असल्याने जेवणात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण लसणाचे हेच महत्त्व कालांतराने कमी होताना दिसत आहे. कारण कांद्यानंतर लसणाच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. त्यामुळे स्वयंपाकगृहातून लसणाचे फोडणी गायब झाली आहे. परिणामी शेतरकऱ्यांना लसून हसवतोय तर कांदा रडवतोय अशी अवस्था झाली आहे.
गेल्या कितेक महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत असताना दिसून येत आहे. उत्पादनाअभावी बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात सतत वाढ सुरु आहे. आता लसणाची किंमत 80 ते 100 रुपये किलो असून लसून घाऊक बाजारात 200 ते 350 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाची किंमत 400 रुपयांच्या घरात गेला आहे. नेहमी 80 ते 100 रु. प्रतिकिलो असणारा लसणाचा भाव हा 100 रुपये किलोंपासून वाढत आता 400 रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
लसनाचे दर का वाढले?
यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. लसूण पिकासाठी पाणी जास्त प्रमाणात लागते. मात्र यंदा पाण्याची कमतरता असून लसूण पिकण्याचा कालावधी चार महिन्यांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लसून लागवडीकडे शेतकरी कमी वळले होते. यावेळी लागवडीसाठी लसणाचे बेण्याचे दर जास्त होते. परिणामी शेतकऱ्यांनी लसून लागवडीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. नवीन लसूण बाजारात येण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागू शकतो. बाजारात लसणाची आवक नसल्याने किरकोळ बाजारात हायब्रीड लसणाचा भाव 200 ते 300 रुपये किलो, तर गावरान लसणाचा दर 400 रुपये किलोवर पोहोचला आहे.
चव वाढवणारा लसूण हा भाजीतून गायब झाल्यामुळे भाजी बेचव झाली आहे. लसणाच्या दरात वाढ झाल्याने खारीक, खोबरा, काजू, बदाम किंवा सुका मेवा यांच्या दराची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे लसूण खाण्याऐवजी सुकामेवाच खावा की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मध्यंतरीच्या काळात कांद्याने सर्वसामान्यांना आसमान दाखवले होते. आता त्यापेक्षा अधिक परिस्थिती लसणाची झाली आहे. जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थात वापरल्या जाणाऱ्या लसणाच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट टाईट झाले आहे.
दर कपातीसाठी आणखी चार महिने
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून घाऊक बाजारात लसूण उपलब्ध आहे. यावर्षी पीक यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच हा नवीन लसून बाजारात पाहायला मिळत आहे, मात्र लसणाचे दर कमी होण्यास आणखी तीन ते चार महिने लागतील, असे व्यापारी सांगत आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 2, 2024 | Trending News
Kharghar Liquor Free Zone: मुंबई लगतच्या या एका शहरात दारूविक्री बंद आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले ना. पण हे खरं आहे. नवी मुंबईतील खारघर शहर हे असं एकमेव शहर आहे इथे शंभर टक्के दारुविक्री बंद आहे. गावकऱ्यांनी संघर्ष करत व लढा देत इथे दारुबंदी करुन दाखवली आहे. आज खारघर शहरात लोकवस्ती व आधुनिक सुविधा वाढत आहेत. खरघर एक अत्याधुनिक शहर म्हणून नावारुपाला येत आहे. तरीही या शहरात एकही वाइनशॉप किंवा बार दिसणार नाही. यामागे गावकऱ्यांच्या संघर्षाची कथा आहे.
खारघरमध्ये एकही वाइन शॉप किंवा बार नाहीये. इतकंच काय तर मोठ्या मोठ्या हॉटेलमध्येही दारू मिळत नाही. हे सर्व शक्य झाले ते गावकऱ्यांच्या लढ्यामुळं. सुरुवातीला खारघरमध्ये दोन बार होते मात्र, तेही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं बंद झाले. त्यामुळं आता खारघरमध्ये शंभरटक्के दारुविक्री बंद आहे.
2002 च्या आधी खारघरमध्ये ग्रामपंचायत होती. त्यावेळी या ग्रामपंचायतीत व परिसरातील इतर गावे ओवे, कोपरा, बेलपाडा, मुर्बी या गावात दारूची दुकाने नव्हती. हळहळू लोकवस्ती वाढू लागली. त्यानंतर खारघर ग्रामपंचायतीने 2005 साली संपूर्ण खारघर गाव आणि कॉलनीमध्ये दारुबंदी करण्यात यावी असा ठराव पारित केला होता. या ठरावाच्या आधारे आजही शहरात दारूबंदी आहे.
2016 साली पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यापूर्वी पनवेलमध्ये नगरपरिषदच होती. त्यानंतर 29 ग्रामपंचायतीचा पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आला. यात खारघर ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. अनेकदा खारघरमध्ये दारुविक्रीचा परवाना देत दारुची दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांनी त्याविरोधात लढा देत ही दुकानेही बंद केली.
दरम्यान, अनेकदा खारघरमध्ये दारुविक्री सुरू करण्यात यावी म्हणून प्रयत्न केले गेले. दारुबंदीसाठी येथे मतदान प्रक्रिया राबवली जाते. महापालिकेला खारघरमध्ये दारुबंदी करायची झाल्यास त्या प्रभागात उभी बाटली आणि आडवी बाटली अशा पद्धतीने हे मतदान प्रक्रिया राबवली जाते. 50 टक्क्यांपेक्षा मते आडवी बाटलीच्या बाजूने असेल तर दारुमुक्त म्हणून घोषित केले जाते.
गेल्या काही वर्षात खारघरची लोकसंख्या व अधुनिकीकरण झालं आहे. खारघर एक शहर म्हणून नावारुपाला आलं आहे. असे असतानाही या शहरातील नागरिकांनी व गावकऱ्यांनी दारुबंदीचा हा लढा यशस्वी करुन दाखवला आहे.
Source link