सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट 22 जानेवारीपासून बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या

सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट 22 जानेवारीपासून बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या



Karul Ghat Traffic: २२ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान करूळ घाट मार्ग बंद राहणार आहे. रस्ता नुतनीकरणासाठी घाट राहणार बंद



Source link

'फक्त अर्ज दाखल केला म्हणून काय..', उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

'फक्त अर्ज दाखल केला म्हणून काय..', उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. यानंतर अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत दाद मागितली आहे. तर दुसरीकडे मंगळवारी मुंबईत महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी निर्णयातील त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान या सर्व घडामोडी आणि आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

“काही नागरिक सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात जात असतील तर तो त्यांचा हक्क आहे. पण फक्त याचिका दाखल केली म्हणजे मी दिलेला निर्णय अयोग्य ठरत नाही. मी दिलेल्या निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात नियमबाह्य, घटनाबाह्य किंवा बेकायदेशीर काही असेल तर ते दाखवून द्यावं लागेल. त्यानंतर तो निर्णय रद्द होऊ शकतो,” असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. 

दरम्यान उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली तेव्हा राहुल नार्वेकर पक्षात होते हे सांगताना त्यांचे फोटो, व्हिडीओ ठाकरे गटाच्या नेत्यांकडून दाखवले जात आहेत. त्यावर ते म्हणाले की, “2018 मध्ये जे घटनेत बदल केले ती ग्राह्य धरावी की 1999 मध्ये निवडणूक आयोगाकडे दिली ती ग्राह्य धरावी हा प्रश्न आहे. माझे फोटो आणि व्हिडीओ दाखवण्यापेक्षा जर  त्यांनी घटना दुरुस्ती केली असती तर हा प्रसंग आला नसता”. 

पुढे ते म्हणाले की, “अरविंद सावंत 2018 चं पत्र दाखवत आहेत. ते माझ्याकडे सुनावणीदरम्यान रेकॉर्डवर होतं. त्या पत्रात संविधानाबाद्दल एकही शब्द नाही. ते पत्र केवळ शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका होऊन त्याचे निकाल निवडणूक आयोगाला कळवले होते. संविधानात बदल केल्याचा कोणताही उल्लेख त्यात नाही”. 

ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “पत्रकार परिषद घेत असतील तर हा त्यांचा विषय आहे. पण त्याने काही तथ्य बदलणार नाही. मी दिलेल्या निर्णयातील त्रुटी दाखवा, त्यानंतर पुढे बोलता येईल. पण निर्णयातील कोणतीही बाब चुकीची नाही असं सांगत फक्त टीका करणार असतील तर राज्यातील जनता सुज्ञ आहे”. 





Source link

शरद मोहोळ हत्येमागे 'मुळशी पॅटर्न', नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने मास्टरमाईंडला अटक

शरद मोहोळ हत्येमागे 'मुळशी पॅटर्न', नवी मुंबईतून फिल्मी स्टाईलने मास्टरमाईंडला अटक



Sharad Mohol Murder Case : पुण्यातील गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यात मास्टरमाईंडचाही समावेश आहे. सहा महिन्यापूर्वीच शरद मोहोळच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 



Source link

Nashik News : भोगीला चिमुकल्यावर ओढवली संक्रांत, पतंगाच्या मोहामुळे गमावला जीव, पाहा काय झालं?

Nashik News : भोगीला चिमुकल्यावर ओढवली संक्रांत, पतंगाच्या मोहामुळे गमावला जीव, पाहा काय झालं?


पुढील
बातमी

‘…म्हणून मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली’, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांचं समर्थकांना खुलं पत्र





Source link

'बाळासाहेब असते तर जोड्याने…'; पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

'बाळासाहेब असते तर जोड्याने…'; पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर


Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत घराणेशाहीवरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. तरुणांना राजकारणात येण्याचा सल्ला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या येण्याने घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येईल, असं म्हटलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली होती. आता या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर शिवसंकल्प अभियानांतर्गत आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. निवडणूक एकाबरोबर लढवायची आणि सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करायचे. म्हणजेच लग्न एकाबरोबर करायचे आणि संसार दुसऱ्याबरोबर करायचा हा घरंदाजपणा होतो का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

शिवसेनेमध्ये तुमचे काय योगदान आहे? 

“पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुक्ताफळे उधळली. घराणेशाहीबद्दल ते बोलले. हा थेट सर्वसामान्य लोकांचा, तुमचा आमचा अपमान आहे. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. पण हे मात्र घरगडी समजतात. तुच्छ, नोकर समजतात. म्हणून त्यांची ही गत झाली आहे. सर्व सोडून गेले आहेत. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्याच बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम त्यांनी केले. सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार मोडले. बाळासाहेब असते तर आता जोड्याने मारले असते. शिवसेनेमध्ये तुमचे काय योगदान आहे? आमच्यासारख्या फाटक्या लोकांनी रक्ताचे पाणी केले. शिवसेना वाढवली. आयत्या बिळावर नागोबा होण्याचे भाग्य तुम्हाला लाभले. बाळासाहेब म्हणायचे तुम्ही शिवसैनिक आहात म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे. पण हे म्हणतात, मी आहे म्हणून तुम्ही आहात. हे तुम्हाला मान्य आहे का?” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“अटल सेतूचं उद्घाटन केलं पण त्यामध्ये अटलजींचा फोटो कुठे होता? आता सुद्धा मला चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही. कोणाचीही मूर्ती लावतील. नाव अटल सेतू पण अटलजींची फोटोच नाही. त्यामुळे कृपा करा की त्या मंदिरात स्वःताची नव्हे तर प्रभू श्रीरामाची मूर्ती लावा. प्रभूरामचंद्र दशरथ राजाचे पूत्र होते. त्यावेळी सुद्धा त्यांना वनवास भोगावा लागला होता. कल्याण लोकसभा मतदारसंघात गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याबद्दल पंतप्रधान बोलले नाहीत. ती घराणेशाही चालते का? घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

शरद पवारांचीही टीका

“पंतप्रधान काल येऊन गेले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होती. मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली. त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाही बाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं, असं शरद पवार म्हणाले.





Source link

Pune Fire : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात लागली भीषण आग, 2 सिलेंडरचा स्फोट; फायर ब्रिगेडकडून शर्थीनं प्रयत्न!

Pune Fire : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात लागली भीषण आग, 2 सिलेंडरचा स्फोट; फायर ब्रिगेडकडून शर्थीनं प्रयत्न!


पुढील
बातमी

आमंत्रण नाही तरी अयोध्येला जाणार, पण…; शरद पवारांचं मोठं विधान, घराणेशाहीच्या टीकेलाही उत्तर





Source link

YouTube
Instagram
WhatsApp