महाराष्ट्रात लवकरच 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; हजारो तरुणांना नोकरीची संधी
Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र (kunbi certificate) देऊन त्यांना ओबीसी (OBC) प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून लावून धरली आहे. मनोज जरांगे यांनी या मागणीसाठी दोनवेळा आमरण उपोषण देखील केलं आहे. मात्र सरकारने त्यांच्याकडे वेळ मागितला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला आहे. यावर आता मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
कुणबी प्रमाणपत्रासह मराठ्यांचा ओबीसीत समावेश झाल्यावर त्यांना आरक्षणाचा केवळ तीन ते साडेतीन टक्केच लाभ मिळणार आहे. त्याऐवजी मराठ्यांनी आर्थिक दुर्बल घटकांसाठीचं 10 टक्के आरक्षण घ्यावं, असा सल्ला ओबीसी नेत्यांनी जरांगे यांना दिला आहे. त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पिकत नाही ते वावर आम्हाला आणि स्वतःला चांगले ठेवता, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
“कायदा सांगतो की, मराठ्यांना मिळणारं आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार आहे. म्हणजेच मराठ्यांना 50 टक्के आरक्षण मिळेल. आता तुम्ही ईडब्ल्यूएसचा मुद्दा काढू नका. हवं तर ते आरक्षण तुम्ही घ्या आणि आम्हाला हे ओबीसी आरक्षण द्या. तुम्ही ते 10 टक्के आरक्षण घ्या आणि ओबीसी आरक्षण आम्हाला द्या. चांगलं वावर तुम्ही घेताय आणि डोंगराचं वावर आम्हाला देताय का? चांगलं काळं रान तुम्ही घेताय आणि ज्या वावरात औत चालत नाही ते आम्हाला देताय. आम्हाला वेडे समजता का? त्यापेक्षा वाटण्या करा आणि तुम्ही ईडब्ल्यूएस आरक्षण घ्या आणि आम्हाला ओबीसी आरक्षण द्या,” असा सल्ला मनोज जरांगेंनी दिलाय.
“मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी घरी जाणार नाही, तसेच दिवाळीदेखील साजरी करणार नाही. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी गेल्या काही दिवसांमध्ये आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना मी दिवाळी साजरी करू शकत नाही. मी दोन दिवस आंतरवाली सराटी या माझ्या गावी जाणार. ज्या-ज्या मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबियांना भेटणार. त्यानंतर महाराष्ट्राचा आशीर्वाद घेण्यासाठी बाहेर पडणार. मराठ्यांची एकजूट करण्यासाठी 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पुन्हा मराठवाडा आणि मुंबई असा दौरा करणार आहोत. आंदोलकांच्या गाठीभेटी घेणं सुरू करणार. या काळात साखळी आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय.
दीपावलीचा मंगलमय सण सुरक्षितपणे साजरा करावा. आगीसारख्या घटनेप्रसंगी मदतीसाठी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने केले आहे.
Source link
Ajit Pawar : पवार कुटुंबीयांची दिवाळी यंदा बारामती ऐवजी पुण्यात साजरी करण्यात आली. शरद पवार यांचे भाऊ प्रतापराव पवार यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय जमले होते. यानिमित्तानं अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली. या भेटीनंतर चर्चा रंगलेय ती अजित पवार यांनी केलेल्या एका विधानाची.
राष्ट्रवादीत सध्या राजकीय उलथापालथींना वेग आलाय. डेंग्यूमुळे अनेक दिवस घराबाहेर न पडलेले अजित पवार शुक्रवारी अचानक शरद पवारांना भेटले. पवार कुटुंबाच्या पुण्यातल्या दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान अजित पवार-शरद पवारांची भेट झाली. त्यानंतर अजित पवारांनी तातडीनं दिल्लीत जाऊन अमित शाहांचीही भेट घेतली. याचदरम्यान शरद पवारांचं एक विधान समोर आलंय, ज्यामुळे चर्चांना उधाण आलंय.. शरद पवारांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. वेळप्रसंगी संकाटालाही तोंड द्यावं लागतं असं विधान पवारांनी केलं..
दरम्यान, अजित पवार हे शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं मोठं विधान रवी राणांनी केले होते. राष्ट्रवादी कुणाची हा वाद निवडणूक आयोगासमोर आहे. त्यात शरद पवार-अजित पवार यांची भेट झाली आणि पवारांनी संकटांचा उल्लेख करत सूचक विधान केलं.
अजित पवारांसोबत कौटुंबिक कार्यक्रमात झालेली भेट, त्यानंतर अजित पवार-अमित शहांची भेट आणि शेवटी शरद पवारांनी केलेलं सूचक विधान यामुळे पवारांच्या विधानाचा नेमका अर्थ काय याची चर्चा सुरु झालीय.
अजित पवार दिल्लीला जाण्यापूर्वी आज दुपारी पुण्यात पवार कुटुंब एकत्र आलं. पुण्यात प्रतापराव पवारांच्या घरी पवार कुटुंबीयांची दिवाळी साजरी करण्यात आली. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे दिवाळीसाठी एकत्र आले होते. सध्याच्या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी काका-पुतणे पुन्हा एक होणार का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
काका-पुतण्याच्या या भेटीमुळं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी संध्याकाळी थेट राजधानी दिल्ली गाठली. विमानतळावरून ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या घरी गेले. तिथं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांनी अमित शाहांची भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी सुमारे दीड तास चर्चा झाल्याचं समजतंय. या भेटीत नेमकं काय घडलं, त्यावरुन चर्चांना उधाण आलंय.
Nagpur Crime : नागपुरात ग्राम पंचायत निवडणुकीत निवडणून आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्याची त्याच्याच ढाब्यावर हत्या करण्यात आली आहे. अपघातानांतर आरोपींनी ढाब्यावरील पैसे घेऊन पळ काढला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
Source link