Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी? अवघ्या 24 तासांत राजकीय समीकरणे बदलली

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी? अवघ्या 24 तासांत राजकीय समीकरणे बदलली


Big responsibility on Dhananjay Munde: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीमुळे सत्ताकेंद्र कुणाकडे जाणार, कोणती महत्त्वाची खाती कुणाला मिळणार, यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांकडे असलेली प्रभावी पदे आणि महत्त्वाची खाती पुढे कोण सांभाळणार, यावर चर्चा सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. काही काळापासून राजकीय पडद्याआड गेलेले माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बंद दाराआड चर्चेनंतर अवघ्या 24 तासांत मुंडेंच्या पुनरागमनाच्या चर्चेला जोर आला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Add Zee News as a Preferred Source

सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री? 

दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास संमती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासूत्रे पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत. पक्षात फूट पडू नये आणि संघटना एकसंध राहावी यासाठी नेतृत्व पवार कुटुंबातच असावे, अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पक्षप्रमुखपदासाठीही सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे.

अर्थ खाते कोणाकडे जाणार?

अजित पवारांकडे असलेली अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती कोणाकडे सोपवायची, यावर सध्या राजकीय पातळीवर मोठी रस्सीखेच सुरू आहे. विशेषतः अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावं, यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात झालेल्या बंद दाराआड चर्चेने राजकीय चर्चांना अधिक उधाण आणले आहे.

धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात पुनरागमनाची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, पुढे मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडे याना पुन्हा संधी देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरताना मुंडेंच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जात असल्याची चर्चा आहे.

मुंडेंचा राजीनामा कशामुळे झाला होता?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली होती. राजकीय दबाव वाढल्यानंतरत्यांनी राजीनामा दिलाही परंतु  प्रकृतीचे कारण पुढे करत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता मात्र राजकीय परिस्थिती बदलताना दिसत असून, त्यांच्या पुनरागमनाची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली होती.

पार्थ पवारांनाही संधी?

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, यावरही चर्चा रंगली आहे. या जागेसाठी पार्थ पवार यांचे नाव पुढे येत असून, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबाभोवती पुन्हा एकदा सत्ताकेंद्र तयार होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.





Source link

मोठी बातमी! सुनेत्रा पवार होणार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री, उद्या 5 वाजता पार पडणार शपथविधी

मोठी बातमी! सुनेत्रा पवार होणार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री, उद्या 5 वाजता पार पडणार शपथविधी


Sunetra Pawar Will take Oath as DCM tomorrow: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. उद्या म्हणजेच शनिवारी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या रुपात महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या तयारीसाठी स्वर्गीय अजित पवारांची प्रशासकीय टीम बारामतीहून मुंबईकडे रवाना झाली आहे. सुनेत्रा पवार सकाळी 8 वाजता बारामतीहून स्पेशल हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना होणार आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

शपथविधी होण्याआधी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक पार पडेल. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडेल.

‘मुख्यमंत्र्यांना कळवला जाणार निर्णय’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “उद्या दुपारी 2 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. सुनेत्रा पवारांशी आम्ही रात्री संवाद साधणार आहोत. पक्षाचे विधानसभा, विधानपरिषद सदस्य आणि खासदार उपस्थित राहतील. जो निर्णय घेऊ त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना कळवण्यात येईल. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाही हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे”. 

उद्या 5 वाजता सुनेत्रा पवार घेणार शपथ

उद्या म्हणजेच शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. यानंतर पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवडीचे पत्र दिले जाणार आहे. 

ही निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी कोणतीही जय्यत तयारी केली जाणार नसून, अत्यंत साधेपणाने तो पार पडेल अशी माहिती आहे. या शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल. 

छगन भुजबळांनीही दिली होती शपथविधीची कल्पना 

“दादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले त्यामुळे सर्वांची झोप उडाल्यासारखं झालं आहे. आता कोणाकडे तरी सर्व जबाबदारी देऊन पक्ष किंवा सरकार चालवावं तर लागणार आहे. विधीमंडळाच्या सदस्यांची उद्या बैठक बोलावली आहे. त्याच्यात विधिमंडळ पक्षनेतेपद जे अजित पवारांकडे होतं ते देण्यासंदर्भात निर्णय होईल. सुनेत्राताईंकडे पद द्यावं अशी अनेकांची मागणी आहे आणि ते चूक आहे असं वाटत नाही. पण निर्णय बैठकीत होईल,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

अजित पवार राष्ट्रवादीसंदर्भातील कामांवर आम्ही लक्ष देत आहोत सांगताना त्यांनी आपल्याला 14 बैठका झाल्याची काही कल्पना नसल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्रीपदाची जागा रिकामी आहे ती, सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून कशी भरता येईल याकडे लक्ष आहे. पक्ष ठरवेल त्याप्रमाणे निर्णय होईल. उद्या विधिमंडळ पक्षनेता ठरवला जाईल आणि कदाचित एकमत झालं आणि प्रक्रिया झाली तर उद्याच शपथविधीही होऊ शकतो”.





Source link

इशारा! महाराष्ट्रात एकाएकी दिल्लीसारखं हवामान? पहाटे अन् मावळतीच्या वेळी असं काय घडणार?

इशारा! महाराष्ट्रात एकाएकी दिल्लीसारखं हवामान? पहाटे अन् मावळतीच्या वेळी असं काय घडणार?


Maharashtra Weather News : देशातील हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच महाराष्ट्रसुद्धा यास अपवाद ठरलेला नाही. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असणारं अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं सत्र आता दूर सरलं असून काही जिल्ह्यांमध्ये तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. राज्यात हिवाळ्यानं अखेरच्या टप्प्यात प्रवेश केला असून, त्यामुळं हवेतील उष्मा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. असं असलं तरीही एक अनपेक्षित स्थिती राज्यातील हवामानात पाहायला मिळेल. 

Add Zee News as a Preferred Source

हिवाळा सरणार, पण मग नेमकं काय घडणार? 

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमीजास्त होत असला तरीही आता महाराष्ट्रावर मात्र या स्थितीचा फारसा परिणाम दिसून येत नाहीय. राज्यात पुढील काही दिवस पहाटेच्या वेळी आणि रात्री उशीरानं दुर्गम गावखेड्यांमध्ये धुक्याची स्थिती पाहायला मिळेल. घाटमाथ्यावरील परिसर, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भागसुद्धा इथं अपवाद ठरणार नाही. या धुक्याचा थेट दृश्यमानतेवर परिणाम होणार असल्यामुळं दिल्ली- हरियाणातील धुक्याच्या चादरीप्रमाणंच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातही ओढावताना दिसेल. 

किनारपट्टी भाग आणि मुंबईसाठी कोणता इशारा?

राज्यातील कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, मुंबई आणि नवी मुंबईत हवामान अंशत: दमट आणि कोरडं असेल. आकाश बहुतांशी निरभ्र असून कमाल सरासरी तापमान 30 अंशांदरम्यान आणि किमान तापमान 24 अंशांदरम्यान असेल. दरम्यानच्या काळात कुठंही पावसाचा इशारा मात्र नाही. 

पश्चिम महाराष्ट्रातही तापमानवाढीस सुरुवात झाली असून सातारा, सांगली, कोल्हापुरात आकाश काही भागांमध्ये अंशत: ढगाळ असेल, थंडीचा कडाका कमी झाला असला तरीही इथं हवेत गारठा मात्र कायम असेल. जिथं सरासरी कमाल तापमान 30 ते 32 अंश आणि किमान सरासरी तापमान 18 ते 20 अंशांदरम्यान असेल असा अंदाज आहे. 

कोणत्या राज्यांना बसणार पावसाचा तडाखा?

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतातील 8 राज्यांना भीषण थंडीचा इशारा असून, यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगढचा समावेश आहे. तर, 5 राज्यांना पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये राजस्थान, हिमाचलचा काही भाग, पंजाब, जम्मू काश्मीर आणि लडाखचा समावेश आहे. या पावसाच्या अंदाजातच ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून, त्यामुळं काही अडचणी उद्भवू शकतात, ज्या धर्तीवर सावधगिरी बाळगण्याच्या सूचना यंत्रणांनी केल्या आहेत. 





Source link

'काय गं प्रणिती..' अजित पवारांच्या आठवणी सांगताना प्रणिती शिंदेंना अश्रू अनावर!

'काय गं प्रणिती..' अजित पवारांच्या आठवणी सांगताना प्रणिती शिंदेंना अश्रू अनावर!


Praniti Shinde Emotional: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बारामती येथे लाखो जनसमुदाच्या साक्षीनं त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी सर्वांनाच आपले अश्रू अनावर झाले होते. सर्वांनी अजित पवारांना भावपूर्ण निरोप दिला. अजित दादांचं असं अकाली जाणं हे साऱ्यांसाठी धक्कादायक होतं. या धक्क्यातून अजूनही कोणी सावरु शकलं नाहीय.  अजित पवारांच्या आठवणी सांगताना काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे भावूक झालेल्या दिसल्या. त्यांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते. काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? जाणून घेऊया.  

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्राचे दादा आपल्यातून निघून गेलेत विश्वास बसत नाही. सकाळी अपघाताचे वृत्त आले. दादा त्यात नसावेत, अशी प्रार्थना सुरु होती. असतील तर सुखरुप असावेत असं सारख वाटत होतं पण अत्यंत धक्कादायक बातमी कानावर आली. अंगावर शहारा आला. मी त्यांच्यासाठी लहान बहीणीसारखी होती. आमच कौटुंबिक नातं होतं. 2 महिन्यापुर्वीच भाचीच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला गेलो होतो. माझ्या मतदार संघासाठी दादांनी खास निधी दिली होता. मी निवडून आली तेव्हा त्यांनी फोन करुन अभिनंदन केलं. काय गं प्रणिती… असं ते म्हणायचे. 

अजित पवार दिलखुलास जगत होते. जिल्हा परिषद निवडणुकीत मेहनत घेत होते. 9 ची मिटींग असेल तर 10 मिनिट आधी ते पोहोचायचे. हेक्टीक लाईफस्टाईल. बारामतीत त्यांचे विमान क्रॅश झाले. स्वत:च्या गावात विमान क्रॅश झालं. चॉपर समजू शकते पण विमान लॅंडींगवेळी क्रॅश होणं हे खूप धक्कादायक आहे. विमान ट्विन इंजिन असायला हवं असं आपण म्हणतो पण ते त्याबाबतीत दक्ष होते, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. 

मी पहिल्यांदा आमदार झाले. दादांनी मला पाहीलं, त्यांना अभिमान वाटला आणि ते आनंदी झाले. मुख्यमंत्री व्हायचं त्यांचं स्वप्न होतं. कधीकधी आम्ही मुख्यमत्रीऐवजी त्यांच्याकडे जास्तवेळा जायचो. बोलायचे. कामासाठी निधी द्यायचे.  बोरामणी एअरपोर्टसाठी 20 कोटी निधी देतो असं थेट सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा जीआर निघायचा. जे काही असेल ते दिलखुलास बोलायचे. विरोधी पक्षातील असले तरी त्यांचे काम करायचे. मोठी पोकळी निर्माण झालीय, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

अजित पवारांचा उत्तराधिकारी कोण?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झीरवाळ यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला निरोप दिल्यानंतर मैदानातून बाहेर पडताना उत्तराधिकाऱ्याबद्दल विधान केलं आहे. “अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात,” असं झीरवाळ यांनी म्हटलं आहे. “राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार या सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे,” असं नरहरी झीरवाळ म्हणाले आहेत. “आता तुतारी, घड्याळ वेगळं नाही, दोन्ही एकच,” असल्याचंही झीरवाळ म्हणालेत. “आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्याच आहेत आता इथुन पुढे एकत्रच असणार यात शंका नाही,” असंही झीरवाळ यांनी नमूद केलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार? 

दोन्ही राष्ट्रवादी विलीन होण्यासंदर्भात दोन्ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही. भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी अनेकांनी अजित पवारांसोबत जाण्याचा पर्याय निवडला होता. शरद पवार जर भाजपासोबत युतीसाठी तयार असतील तरच हे सर्व त्यांना साथ देतील अशी शक्यता आहे. अन्य़था ते शरद पवारांचं नेतृत्व स्विकारणार नाहीत. अनेक नेते, आमदारांची शरद पवारांसोबत जाऊन विरोधी पक्षात बसावं अशी इच्छा नाही अशी सूत्रांची माहिती आहे. पुढील काही दिवसात खासदार सुनेत्रा पवार यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. पण सुनेत्रा पवार यांच्याकडे संघटनात्मक किंवा राजकीय अनुभव नसल्याने ती अडचण ठरु शकते. मुलगा पार्थ आणि जय पवार यांच्याकडेही नेतृत्व सोपवण्याइतका अनुभव नाही.





Source link

दरवाजे आतून बंद, अनेक कर्मचारी गायब; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीदरम्यान VRS व्हेंचर्स कंपनीच्या कार्यालयात नेमकं काय घडलं?

दरवाजे आतून बंद, अनेक कर्मचारी गायब; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीदरम्यान VRS व्हेंचर्स कंपनीच्या कार्यालयात नेमकं काय घडलं?


Ajit Pawar Plane Crash News:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. विमान अपघातानंतर, विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने तपास सुरू केला आहे. हे विमान VSR कंपनी चालवत होती. AAIB चे अधिकारी दिल्लीतील VSR कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी कंपनीचे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सील केली. मिळालेल्या माहितीनुसार, AAIB चे तीन अधिकारी येथे पोहोचले होते. 

Add Zee News as a Preferred Source

दुर्घटनाग्रस्त विमान प्रकरणात तपासाचा वेग वाढला आहे. AAIB चे अधिकारी आज VRS व्हेंचर्स कंपनीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले.  कंपनीतील कोणाशीही संपर्क साधण्यात आला नाही. द इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, एएआयबीच्या अधिकाऱ्यांनी विमान चालवणाऱ्या खाजगी चार्टर कंपनी व्हीएसआर एव्हिएशनच्या महिपालपूर कार्यालयाला भेट दिली. अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयातून अचानक अनेक लोक बेपत्ता झाल्याचे वृत्त दिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या सकाळी पोहोचलेले लोकही बेपत्ता होते. 

व्हीएसआर कंपनीच्या कार्यालयात पोहोचलेल्या एएआयबी अधिकाऱ्यांनी कंपनीच्या गेटवर तैनात असलेल्या एका गेटकीपरची चौकशी केली. त्यांची ओळख पडताळण्यासाठी त्यांचे आधार कार्ड मागितले. एका अधिकाऱ्याने गेटकीपरला सांगितले की जर त्याने तपासात सहकार्य केले तर त्याला काहीही होणार नाही. तथापि, गेटकीपरने वारंवार बेपत्ता व्यक्तींबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे नाकारले. वृत्तानुसार, अधिकारी आज सकाळी 11:30 च्या सुमारास परिसरात पोहोचले. 

गेटकीपरची चौकशी केल्यानंतर अधिकारी आत गेल्याचे वृत्त आहे. असे वृत्त आहे की जेव्हा एएआयबीचे अधिकारी कार्यालयाच्या दाराशी पोहोचले तेव्हा त्यांना ते आतून बंद आढळले. त्यामुळे आत कोणीही नसताना दरवाजा आतून कसा बंद केला जाऊ शकतो असा प्रश्न निर्माण होतो. ऑफिसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अधिकारी काही वेळ तिथेच राहिले. मोठ्या संख्येने एएआयबी अधिकाऱ्यांनी ऑफिसमधील फायली सील केल्याचे वृत्त आहे. एएआयबीचे तीन अधिकारी उपस्थित होते. तथापि, कंपनीतील कोणीही पुन्हा संपर्क साधत नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी हुज्जत घातली. 

अपघाताबाबत एअरलाइन कंपनीचे निवेदन 

अजित पवार हे व्हीएसआर व्हेंचर्स विमानात होते. हे विमान अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर, एअरलाइन कंपनीने एक निवेदन जारी केले. व्हीएसआरने आपल्या निवेदनात म्हटले आहे की पायलट धावपट्टीवरून चुकला. पायलटला अंदाजे 16,000 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर सह-वैमानिकाला अंदाजे 1,500 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. विमानात कोणतीही तांत्रिक समस्या नव्हती. कंपनीने सांगितले की त्यांच्याकडे अजूनही सात विमाने सेवेत आहेत. ते कोणतेही विमान ग्राउंड करत नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) या प्रकरणाची चौकशी करत आहे.

 





Source link

अजित पवार गेले अन् त्यांची सावलीही… ठाण्यातील छोटसं गावही हळहळलं; मृतांमधील 'ती' व्यक्ती कोण?

अजित पवार गेले अन् त्यांची सावलीही… ठाण्यातील छोटसं गावही हळहळलं; मृतांमधील 'ती' व्यक्ती कोण?


Ajit Pawar Death In Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. 66 वर्षीय अजित पवारांसहीत विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये अजित पवारांसोबत सावलीसारखे फिरणारे त्यांचे बॉडीगार्ड विदीप दिलीप जाधव यांचाही समावेश आहे. जाधव यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. विटाव्याचे सुपुत्र असलेले विदीप हे मुंबई पोलीस दलातील सन 2009 बॅच पोलीस शिपाई होते. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ म्हणजेच पर्सनल सिक्युरीटी ऑफिसर म्हणून कर्तव्य बजावत असताना विमान अपघात मृत्यू झाला आहे.

Add Zee News as a Preferred Source

गावकरी हळहळले

ठाण्यातील कळवा येथे राहणारे अजित दादांचे विश्वासू बॉडीगार्ड विदीप हे सुद्धा अपघात झाला तेव्हा अजित पवारांसोबत विमानात होते. सावलीप्रमाणे अजित पवारांसोबत राहणारे विदीप यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.  कर्तव्यनिष्ठा, निष्ठा आणि शांत स्वभाव यांचं जिवंत उदाहरण असलेले विदिप जाधव यांच्या अकाली मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. विदिप ज्या विटावा गावातून येतात तेथील नागरिक हादरुन गेले आहेत. संपूर्ण गावासाठी विदिप यांचं असं आकस्मिक जाणं धक्का देणारं ठरलं आहे. त्यांच्या जाण्याने एक निष्ठावान जवान, एक कर्तव्यदक्ष योद्धा आणि एक उत्तम माणूस हरपला अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

या कठीण प्रसंगी जाधव कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना असं गावकऱ्यांनी जाधव कुटुंबाचं सांत्वन करताना म्हटलं आहे.

ते 5 जण कोण होते?

विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने कोणीही वाचू शकलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांसहीत एकूण 5 जण प्रवास करत होते. या सर्वांनी आपला जीव गमावला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये अजित पवारांसह, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे. अजित पवारांसह एकूण 2 कर्मचारी (1 पीएसओ आणि 1 अटेंडंट) आणि 2 क्रू (पीआयसी+एफओ) सदस्य होते.

तीन मृतदेह घटनास्थळी सापडले

पुणे पोलिस दलातील पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी बारामतीमधील विमान अपघाताची माहिती दिली. तीन मृतदेह घटनास्थळी सापडल्याची माहिती संदीप सिंह गिल यांनी दिली आहे. अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. अपघात स्थळी तीन मृतदेह सापडले असून तीनही मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp