पुण्यात धावत्या कारवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे; Video Viral! संस्कृतिक शहराला काळीमा फासणारा प्रकार

पुण्यात धावत्या कारवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे; Video Viral! संस्कृतिक शहराला काळीमा फासणारा प्रकार


Pune Video Viral: पुणे शहरातील खराडी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. एका चारचाकी वाहनावर चालत्या स्थितीत तरुण-तरुणी चढून सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा प्रकार केवळ धोकादायकच नाही तर वाहतूक नियमांना जाहीरपणे हरताळ फासणारा असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार मुख्य रस्त्यावर घडला. गाडी सरळ मार्गाने जात असताना दोघंही वाहनाच्या वरती बसून रोमान्स करताना दिसत आहेत. दोघेही कारवर रात्रीच्यावेळी मस्त एकमेकांसोबत वेळ घालवत होते. त्यांची ही कृती रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांचं लक्ष विचलित करणारी होती. काही क्षणांचा हा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला.

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी

या प्रकारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला होता. पुण्यातील वाहतूक पोलीस विभागाने या प्रकरणाची दखल घेतली असून गाडीचा नंबर शोधून संबंधित तरुण-तरुणींचा शोध सुरू केला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार IPC आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अशा बेजबाबदार आणि धोकादायक वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. हे केवळ स्वतःच्या जीवाशी खेळणे नाही तर इतरांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण करणे आहे. अशा शब्दांत लोकांनी टीका केली आहे. काहींनी पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत वाहतूक नियम पाळण्याबाबत आणि सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या प्रकारांबाबत चर्चा रंगली आहे.

FAQ

हा प्रकार कधी आणि कुठे घडला?

हा प्रकार रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर घडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या व्हिडिओत काय दिसत आहे?

व्हिडिओत गाडी सरळ मार्गाने जात असताना दोघे वाहनाच्या वरती बसून रोमान्स करताना दिसत आहेत. जे इतर वाहनचालकांचं लक्ष विचलित करणारं होतं.

या घटनेमुळे काय परिणाम झाला?

या प्रकारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आणि अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला.





Source link

महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत खडखडाड, नाशिक पालिका कर्ज घेऊन साजरा करणार कुंभमेळा?

महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत खडखडाड, नाशिक पालिका कर्ज घेऊन साजरा करणार कुंभमेळा?


Nashik Kumbh Mela: नाशिकमध्ये 2027 सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची कामे गतीमान करण्यासाठी मनपाने तीनशे कोटींचे कर्ज काढण्याची तयारी केलीय. तर दुसऱ्या बाजूला सीएसआर निधीतून कामे करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. कुंभमेळ्यासाठी अवघी दोन वर्षे शिल्लक असताना शासकीय निधी अपुरा असल्याने स्थानिक प्रशासन अडचणीत आलय.

नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा आता 2027 मध्ये होणाराय. या कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधा आणि इतर नियोजनासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून किमान दहा हजार कोटी रुपयांची अपेक्षा विविध शासकीय खात्यांनी व्यक्त केली होती… मात्र सरकारनं केवळ दहा टक्के निधी दिल्याने आता कुंभमेळा आयुक्तांनी थेट सीएसआर निधी शोधण्याचे आदेश विविध विभागांना दिलेत. उद्योग, बँका आणि व्यावसायिक संस्थांकडून सहकार्य मागवण्यात आलंय. बहुतेक कामं सीएसआर अंतर्गत होतील… यादी दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश आयुक्त तथा सिंहस्थ प्रभारी करिष्मा नायर यांनी विभाग प्रमुखांना दिलेत

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 15 हजार कोटींचा आराखडा तयार आहे. पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव, मात्र अद्याप निधी नाही. त्यामुळे नाशिक मनपाची 300 कोटींचं कर्ज घेण्याची तयारी आहे. उर्वरित निधी सीएसआरमधून मिळवणार आहेत. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. 

कुंभमेळा म्हटलं की राज्य आणि केंद्र सरकारचा भरपूर निधी असं समीकरण असतं. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाड आहेत. तर अद्याप केंद्राचा निधी नाहीय. त्यामुळे नाशिक मनपा ऋण काढून सण साजरा करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

FAQ 

१. नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी नाशिक महानगरपालिका (मनपा) कोणती आर्थिक तयारी करत आहे?

नाशिक मनपाने कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांसाठी 300 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची तयारी केली आहे. तसेच, उर्वरित निधी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत उद्योग, बँका आणि व्यावसायिक संस्थांकडून मिळवण्याचा निर्णय घेतला आहे.

२. कुंभमेळ्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे आणि किती निधी मिळाला आहे?

कुंभमेळ्यासाठी 15,000 कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून किमान 10,000 कोटींची अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत केवळ 10% निधी मिळाला आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासन अडचणीत आहे.

३. निधीच्या कमतरतेमुळे कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?

कुंभमेळा आयुक्त करिष्मा नायर यांनी विविध विभागांना सीएसआर निधीतून कामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्योग आणि बँकांकडून सहकार्य मागवले असून, दोन दिवसांत यादी सादर करण्यास सांगितले आहे. तसेच, मनपा 300 कोटींचे कर्ज घेणार आहे.

४. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधी संदर्भात काय अडचणी आहेत?

राज्य सरकारच्या तिजोरीत आर्थिक अडचणी असल्याने आणि केंद्र सरकारकडून अद्याप पुरेसा निधी मिळाला नसल्याने नाशिक मनपाला कर्ज आणि सीएसआर निधीवर अवलंबून राहावे लागत आहे.

५. यावर राजकीय प्रतिक्रिया काय आहे?

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर टीका करत सांगितले की, कुंभमेळ्यासाठी नेहमी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठा निधी मिळतो, परंतु यावेळी निधीअभावी मनपा कर्ज काढून सण साजरा करत आहे, ज्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.





Source link

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक! अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा बंद राहणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक! अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा बंद राहणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक


Mumbai Megablock Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा बंद राहणार आहे. ब्लॉक कधी व कुठे आहे हे जाणून घेऊयात. पाहुयात संपूर्ण वेळापत्रक. 

मध्य रेल्वेवरील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर येथे पायाभूत कामानिमित्त शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. तर, रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल.

ब्लॉक कधी आणि कुठे?

– शनिवारी रात्री 12.10 ते रविवारी सकाळी 6.55 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ठाकुर्ली आणि कल्याण फलाट क्रमांक 1, 1अ, 2 आणि 3 दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, डोंबिवली-कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. 

– शनिवारी रात्री 1.15 ते पहाटे 4.15 वाजेपर्यंत अंबरनाथ-बदलापूर दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अंबरनाथ ते कर्जत स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल. शनिवारी रात्री उशिरापर्यंत 21 लोकल सेवा रद्द राहतील. रविवारी सकाळपर्यंत 27 लोकल रद्द केल्या जातील.

1) मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक कधी आहे?

मेगाब्लॉक शनिवारी (9 ऑगस्ट 2025) रात्री 12:10 वाजेपासून रविवारी (10 ऑगस्ट 2025) सकाळी 6:55 वाजेपर्यंत असेल. तसेच, अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रात्री 1:15 ते पहाटे 4:15 वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

२) ब्लॉक कोणत्या मार्गांवर आहे?  

ठाकुर्ली आणि कल्याण फलाट क्रमांक 1, 1अ, 2 आणि 3 दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर.  
डोंबिवली-कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर.  
अंबरनाथ-बदलापूर दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर.

3) कोणत्या लोकल सेवा बंद राहतील?

अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या सर्व लोकल सेवा ब्लॉक कालावधीत बंद राहतील. शनिवारी रात्री उशिरापर्यंत 21 लोकल आणि रविवारी सकाळपर्यंत 27 लोकल रद्द राहतील.





Source link

4 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत झाली खिळखिळी, इमारतीतील 16 कुटुंब भीतीच्या छायेखाली

4 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत झाली खिळखिळी, इमारतीतील 16 कुटुंब भीतीच्या छायेखाली



पैठण तालुक्यातील फारोळा गावची ही इमारत असून ही इमारत कोसळू नये म्हणून अशा प्रकारे या इमारतीच्या खांबांना जॅकचा आधार देण्यात आलाय.



Source link

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? रांगेत शेवटी बसवल्याने चर्चांना उधाण

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? रांगेत शेवटी बसवल्याने चर्चांना उधाण


Uddhav Thackeray India Alliance Meeting: उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. गुरुवारी रात्री त्यांनी राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी बोलावण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, मतदार यादीतील कथित गैरव्यवहारावर यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र या बैठकीतील फोटो समोर आले असून, यामध्ये उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याचं दिसत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही सहाव्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. 

राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीत अनेक घोटाळे झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अनेक बेकायदेशीर गोष्टी झाल्याचा दावा त्यांनी केला. यानंतर रात्री राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान राहुल गांधी यांनी मतदार घोटाळ्यावर प्रेजेंटेशन दिलं तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत शेवटच्या रांगेत बसले होते. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील एका पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री असतानाही त्यांना मागे कसं बसवू शकतो असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

इंडिया आघाडीतील महत्वाच्या नेत्यांपैकी उद्धव ठाकरे एक असतानाही त्यांना मागच्या रांगेत बसवल्याने अनेक अंदाज लावले जात आहेत. विशेष म्हणजे, कमल हसन यांना उद्धव ठाकरेंच्या पुढे स्थान देण्यात आलं होतं. कमल हसन यांच्याही मागे उद्धव ठाकरेंना बसवल्याने ते आता जास्त लाडके झाले आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत जागा कशी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

राज ठाकरेंशी जवळीक इंडियाला नापसंत?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यापासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची राज्यात चर्चा सुरु आहे. मुंबई महापालिका आणि त्यानंतर कदाचित विधानसभा निवडणुकीतही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढतील असे अंदाज बांधले जात आहे. तसं झाल्यास उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडतील असेही दावे केले जात आहेत. दरम्यान ठाकरे बंधूंची ही जवळीक इंडिया आघाडीच्या नाराजीचं कारण ठरतीये का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

उद्धव ठाकरे उशिरा पोहोचले?

उद्धव ठाकरे उशिरा पोहोचल्याने त्यांना मागच्या रांगेत बसवलं असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र असं असलं तरी महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या नेत्यासाठी जागा राखीव ठेवली नव्हती का? असा प्रश्न विचारला जात आहे. 

दरम्यान इंडिया आघाडीच्या या बैठकीत बिहारमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर आणि उपराष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार उभा करण्यावरही चर्चा झाली. तसंच राहुल गांधी 17 तारखेपासून बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत, जिथे ते या मुद्द्यांवर जनतेमध्ये जाऊन संवाद साधणार आहेत.





Source link

'राहुल गांधींची चिप चोरीला, हार्डडिस्क करप्ट,' CM देवेंद्र फडणवीसांनी सगळंच काढलं

'राहुल गांधींची चिप चोरीला, हार्डडिस्क करप्ट,' CM देवेंद्र फडणवीसांनी सगळंच काढलं


Devendra Fadnavis on Rahul Gandhi: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला असून, महाराष्ट्रात मतदार यादीत 40 लाख संशयास्पद मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांत वाढले नाहीत तितके मतदार गेल्या 5 वर्षात वाढले आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं असून त्यांची चिप चोरीला गेली आहे आणि हार्डडिस्क करप्ट झाली असल्याचं म्हटलं आहे. 

राहुल गांधींनी मतांची चोरी झाल्याचा आरोप केल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं सांगायचं तर मतांची चोरी ना महाराष्ट्रात, ना भारतात कुठे झाली आहे. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली आहे आणि त्यांची हार्डडिस्क करप्ट झाली आहे. म्हणून त्याच गोष्टी रोज बोलतात. रोज खोटं बोलतात, पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात”.

“मागच्या वेळी महाराष्ट्रात 75 लाख मतदार वाढल्याचं म्हणाले, आता म्हणाले महाराष्ट्रात 1 कोटी मतदार वाढले. दरवेळी काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आता आपली जमीन संपली असल्याचं समजलं आहे आणि पुढच्याही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही. बिहारमध्येही निवडून येणार नाहीत. म्हणून हे कव्हर फायरिंग आहे,” असा आरोप त्यांनी केला. 

“माझा एक प्रश्न आहे की, तुम्ही वारंवार मतदारयादीत गोंधळ आहे म्हणता. मग जर निवडणूक आयोगाने बिहारच्या यादीची व्यापक सुधारणा सुरु केली आहे तर त्याला विरोध का आहे? कित्येक वर्षी आम्ही व्यापक सुधारणेची मागणी करत आहोत. 2012 साली तर मी याचिका केली आहे. मग सुधारणा होणार कशी? आपल्या कायद्यात काय आहे? निवडणूक आयोगाने पुनरावलोकन करणं हेच महत्त्वाचं आहे. त्यालाही विरोध करायचा आणि मतदार यादी खराब असल्याचंही म्हणायचं. एका प्रकारे भारताच्या आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत, त्यावरुन लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, लोकशाही प्रक्रियांवरुन लोकांचा विश्वास उडाला पाहिजे आणि अराजक झालं पाहिजे अशी त्यांची मानसिकता दिसत आहे. कारण त्यांना पुढे पक्षाचं भविष्य दिसत नाही,” अशी टीका त्यांनी केली आहे. 

‘एकाच पत्त्यावर 46 मतदार’

संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अचानक मतदानाची संख्या वाढली. पोलिंग आणि ओपिनियम पोलमध्ये डाटा वेगळा दिसतोय मात्र निकाल वेगळाच आहे. वोटर लिस्टमध्ये एका पत्त्यावर 46 मतदार सापडले असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 

‘एक लाखांहून अधिक मतांची चोरी’

मतदार यादीत बोगस नावं जोडण्यात आली आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्यांनी कर्नाटकची मतदार यादी दाखवत दावा केला की, बंगळुरूमध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात मतांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली झाली. महादेवपुरा क्षेत्रात 6.5 लाख मतांमध्ये एक लाखाहून अधिक मतांची चोरी झाली आहे असंही त्यांनी सांगितलं. 

‘एका व्यक्तीची चार मतदार कार्ड’

एका व्यक्तीने चार वेगवेगळ्या ठिकाणाचे मतदार कार्ड बनवण्यात आले. एकच मतदार तीन राज्य कर्नाटक, महाराष्ट्र आणि यूपीमध्ये रजिस्टर करण्यात आले होते, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

 

FAQ

1) राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर कोणते आरोप केले आहेत?

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीत 40 लाख संशयास्पद मतदारांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की, गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात जोडलेल्या मतदारांची संख्या गेल्या पाच वर्षांतील वाढीपेक्षा जास्त आहे. तसेच, एकाच पत्त्यावर ४६ मतदार, एका व्यक्तीची चार मतदार कार्डे आणि एकच मतदार कर्नाटक, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात नोंदवले गेल्याचा आरोप केला.

2) राहुल गांधी यांनी मतांची चोरी झाल्याचा दावा कसा केला?

राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात ६.५ लाख मतांपैकी १ लाखाहून अधिक मतांची चोरी झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदानाची संख्या अचानक वाढली आणि पोलिंग व ओपिनियन पोलच्या डेटापेक्षा निकाल वेगळे आले.

3) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना काय उत्तर दिले?

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना खोडून काढताना म्हटले की, मतांची चोरी झालेली नाही. त्यांनी राहुल गांधींची “चिप चोरीला गेली आहे आणि हार्डडिस्क करप्ट झाली आहे” अशी टीका केली. तसेच, राहुल गांधी रोज खोटे बोलतात आणि सनसनी निर्माण करण्यासाठी वेगवेगळे आकडे देतात, असा आरोप केला.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp