ज्ञानेश्वर पतंगे झी 24 तास धाराशिव : नोकरीमध्ये बदली हा कामकाजाचा अविभाज्य भाग असतो. मात्र या बदलीचा काही जण विनाकारण बाऊ करतात. आणि मग बदली टाळण्यासाठी, तसंच आवडत्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी वाट्टेल ते मार्ग शोधले जातात. कहर म्हणजे पिढी घडवणारे शिक्षकही याला अपवाद नाहीत. शिक्षकांनीच बदली टाळण्यासाठी अक्षरशः गैरप्रकाराचे धडे गिरवल्याचं समोर आलंय. अशाच काही शिक्षकांनी चक्क बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन, सोईच्या ठिकाणी बदली करुन घेतल्याच धक्कादायक वास्तव पाहायला मिळालाय. शिक्षकांच्या या गैरप्रकारावर प्रकाशझोत टाकणारा ‘झी २४ तास’चा हा पंचनामा.
समाजाला आणि भावी पिढीला दिशा दाखवण्याचं काम शिक्षक करत असतो. त्यामुळंच नैतिकदृष्ट्या शिक्षकी पेक्षा सर्वोच्च समजला जातो. पण यात शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणारा एक बदली घोटाळा धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आलाय. आवडत्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी काही शिक्षकांनी चक्क बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार करुन आवडत्या ठिकाणी बदली मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. त्यामुळं दुर्गम ठिकाणच्या शाळेवर जाण्यासाठी कायम नाखूष असलेल्या शिक्षकांची अडचण आली. काही शिक्षकांनी यावर नामी तोडगा शोधलाय. या शिक्षकांनी कँन्सर आणि ह्रदयरोगासारख्या आजाराची बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र बनवली. काहींनी तर स्वतःला हातापायानं दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं. एकट्या धाराशिव जिल्ह्यात धडधाकट असलेल्या 100 जणांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिक्षकांनी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या गावात किंवा गावाजवळ बदली मिळवण्यासाठी केलेली धडपड शिक्षण विभागाच्याही लक्षात आली. त्यामुळं त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत काही धक्कादायक तथ्यं समोर आलीयेत. त्यानुसार 39 शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यात. तर 21 शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे आपली बदली करवून घेतल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. या प्रकरणाचा अंतिम अहवाल आल्यावर बोगसगिरी करणा-या मास्तरांवर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही उपशिक्षणाधिका-यांनी दिलेत.
समाजाला नैतिकतेचे धडे देणारे शिक्षक आवडत्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी दिव्यांग झाल्याचं सोंग करतायेत. नैतिकदृष्ट्या अधोगतीकडे गेलेले शिक्षक समाजाला कसे वाट दाखवणार असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय.
Sanjay Raut on Raj Thackeray: शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातून काही गौप्यस्फोट केले आहेत. या पुस्तकात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचाही उल्लेख केला आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंबद्दल आपल्या मनातील एक सल बोलून दाखवली आहे. तुरूंगात असताना राज ठाकरेंनी माझ्या घरी एक फोन तरी करायला हवा होता, असं ते म्हणाले आहेत. संजय राऊतांच्या या विधानावर आता राज ठाकरे काय बोलतात हे पाहावं लागणार आहे.
– राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांचे अनेक शिवसेना नेत्यांशी मैत्रीचे संबंध राहिले होते. परंतु त्यांनी बाळासाहेबांची साथ सोडून मनसेची स्थापना केल्यावर अनेकांसोबतचे मैत्रीचे संबंध दुरावले. राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबाबतीतही तेच घडले. एकाच पक्षात असताना मैत्री होती,परंतु नंतर राजकारणात दोघांनीही एकमेकांवर टिकेचे प्रहार केले. तरीही त्यांच्यातील जिव्हाळा कायम होता. त्यामुळंच संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून ती सल बोलून दाखवली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“माझ्यावर आणि कुटुंबीयावर ईडीची कारवाई सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चेष्टेत म्हणाले होते, ‘संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी!’ खरं तर राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी राज आणि माझ्यात नेहमीच एक जिव्हाळ्याचं नात कायम राहिलं आहे. आम्ही अनेक वर्ष जवळून काम केले. सुख-दुःख वाटलं. उलट या वेळी त्यांच्याकडून मला आधाराची गरज होती. मी तुरुंगात गेल्यावर माझ्या घरी किमान एकदा तरी ते फोन करून चौकशी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही,” असं संजय राऊत म्हणला आहेत.
‘ईडी अटकेच्या भीतीनं वायकर मातोश्रीवर रडले’
तुरूंगात जाण्याइतके माझ्यात बळ नाही. मला अटॅक येवून मी मरेन किंवा मला आत्महत्या तरी करावी लागेल असं हतबल होऊन रविंद्र वायकर बोलल्याचं संजय राऊतांनी आपल्या ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकात म्हटलं आहे. शिंदे गटाने दबाव टाकल्याने आणि भीतीने वायकर यांनी शिवसेना सोडल्याचा दावा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून केला आगे.
“वायकर शिंदे गटात गेले त्या क्षणीच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते. त्यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावरील हा दबाव होता. वायकर शिवसेनेच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदारांपैकी एक होते,” असं त्यांनी पुस्तकात म्हटलं आहे.
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अचानक वायकर यांना टार्गेट करायला सुरुवात केली. रवींद्र वायकर यांना ईडी अटक करणार, असा धुरळा किरीट सोमय्या यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबाची गाळण उडाली आणि त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडल्याचे पुस्तकात म्हटलं गेलं. या पुस्तकात ईडीचा गैरवापर करून वायकर यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले गेल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
भारत पाकमधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये जगभरातील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला. मात्र तुर्कीयेनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. भारत आणि तुर्कीये या देशात अनेक व्यापार होतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, आपल्या फळं बाजारात तुर्कीयेमधून सफरचंद येतात. भारताविरोधात पाकिस्तानला तुर्कीयेने साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सफरचंद व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीयेच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पाकिस्तानमधून या व्यापाऱ्यांनाच धमकीचे फोन येत आहेत.
युद्धाच्या रणांगणात सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानच्या आता कुरबु-या सुरू झाल्यात. पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या तुर्कियेच्या सफरचंदांवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. पुण्यातून सुरू झालेली ही बहिष्काराची मोहीम आता देशभरात पोहोचलीये. तुर्कीयेची सफरचंद बॅन करून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला होता. आता ज्या व्यापाऱ्यांनी तुर्कीयेच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकलाय त्यांना थेट पाकिस्तानातून धमकीचे फोन येत आहेत. पाकिस्तानच्या या पोकळ धमक्यांचा सफरचंद व्यापाऱ्यांनी निषेध केलाय.
विशेष म्हणजे झी न्यूजचं लाईव्ह सुरू असतानाच धमकीचा कॉल आल्यानं व्यापारी आणखी चिडले आणि त्यांनी तिथेच तुर्कीयेची सफरचंद रस्त्यावर फेकून दिली. इतकंच नाही तर पाकिस्तान-तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या.
दरम्यान, फळ व्यापारी सुयोग झेंडे यांनी या धमकी कॉलबाबत पुणे पोलिसात रितसर तक्रार दिलीय. तसंच यापुढे फक्त सफरचंदच नाहीतर इतर तुर्की पदार्थांवरही बहिष्कार घालण्याची घोषणा करून टाकलीय. तुर्कीत जेव्हा भूकंप झाला तेव्हा भारतानं सर्वात मोठी मदत पाठविली होती पण, तुर्कीयेनं आपले उपकार विसरून शत्रूला मदत करून पाठीत खंजीर खुपसला.
Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यात अनैतिक संबंधातून एका तरुणाचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे.लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो स्टेटसला ठेवल्याच्या रागातून मैत्रिणीनेच मित्राचा खून केला आहे. विल्होळीजवळ तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला ठेवल्याने कामगारनगर येथील इसम सूरज ऊर्फ पप्पू काशीनाथ घोरपडे याचा दोघा जणांनी खून केला आहे. नाशिकच्या विल्होळी शिवारात धारदार हत्याराने डोक्यावर प्रहार करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने मुख्य संशयित आरोपी शशिकांत ऊर्फ नाना रामदास गांगुर्डे यास ताब्यात घेतले असून त्याने साथीदाराच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे.
सातपूर भागातील कामगारनगर येथील रहिवासी असलेले सूरज यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो स्टेटसला शनिवारी ठेवले होते. यामुळे त्यांची मैत्रीण संशयित इंदू विजय साळवे (रा. संघर्षनगर) हिने त्यांना फोन करून त्रास दिला होता. यामुळे सूरज हे विल्होळी येथील तिच्या घरी विचारणा करण्यासाठी गेले असता, तिचा सख्खा भाऊ संशयित शशिकांत गांगुर्डे, नवीन सोनकांबळे, अजय रामदास कांबळे यांनी त्यांना मारहाण केली.
मित्रांसोबत पार्टी साठी गेला अन् खून झाला
मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शोध घेतला असता ओवाडी नाला ते दरेगाव हिल टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सदर तरुणाचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. सदर तरुणाच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आल्याने सदर तरुण कोणासोबत होता याचा तपास आता पोलिस घेत आहेत
Lawrence Bishnoi : महाराष्ट्रात चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित करणारी घडामोड नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक मध्ये भाजप आमदाराच्या विराट सभेत लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकले आहेत. याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
नाशिक मध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदू विराट सभेचे आयोजन केले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने ही सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी गोपीचंद पडाळकर यांचे भाषण सुरु असताना काही तरुणांनी लॉरेन्स बिश्नोईचे फोटो हातात धरुन ते झळकवले. हे फोटो झळकवारे तरुण कोण होतो? यांनी लॉरेन्स बिश्नोईचे फोटो का झळकवले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लॉरेन्स बिश्नोई हा मोठा गँंगस्टर आहे. नाशिकच्या सिडको परिसरात करण्यात आले होत सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कसबा पेठेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात कसबा पेठेतील फडके हौद चौकात साजरा करण्यात आला. यामध्ये संभाजी महाराज यांच्या 12 फूटी मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीमंत शिवशाही प्रतिष्ठान गणेश लोणारे प्रस्तुत ‘शिव पर्वती विवाह सोहळा’(जिवंत देखावा)या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. या भव्य, नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे, यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणालदादा मालुसरे, छत्रपती संभाजी महाराजांचे दुधभाऊ, विरधाराऊ माता गाडे पाटील यांचे वंशज सरनोबत अमितदादा गाडे पाटील, किल्ले रायगड निर्माता हिरोजी इंदलकर यांचे वंशज समीरजी इंदलकर, सरसेनापती विरबाजी पासलकर यांचे वंशज सरसेनापती अविनाशदादा पासलकर, सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील यांचे वंशज राजेंद्रदादा मोहिते पाटील,गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य विश्वस्त. श्रीमंत सचिनदादा भोसले पाटील, सरनौबत येसाजी कंक यांचे 14 वे वंशज रविंद्र श्रीपतराव कंक,पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज चित्रपटातील अभिनेते अनुप सिंग ठाकूर उपस्थित होते.
यावेळी आदित्य जयकुमार गोरे, बाळासाहेब दाभेकर,अमित कंक,सम्यक साबळे,संजय अग्रवाल,ज्योती सावर्डेकर,जयेश टाक,मा.नगरसेवक योगेश समेळ,विशाल धनवडे,पल्लवीताई जावळे, या मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान आखाडा, कसबा पेठ शिवकालीन मर्दानी खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी बोलताना आयोजक किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे म्हणाले, यंदा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे चौथे वर्ष आहे. जन्मोत्सव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील मंडळांनी धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरी केली पाहिजे.