PF अकाऊंटमध्ये पैसे असो वा नसो…, मृत्यूनंतर तुमच्या परिवाराला मिळेल 'इतकी' मोठी रक्कम!

PF अकाऊंटमध्ये पैसे असो वा नसो…, मृत्यूनंतर तुमच्या परिवाराला मिळेल 'इतकी' मोठी रक्कम!


EPFO Rules: केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेतील कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना (EDLI) च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संगठित क्षेत्रातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपले EPFO खाते सक्रिय ठेवणे आणि त्याची माहिती अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे. या नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

आता कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किमान 50,000 रुपयांचा विमा मिळेल. मग कर्मचाऱ्याच्या PF खात्यात पैसे असो वा नसो. नोकरीत 60 दिवसांचा खंड पडला तरीही सातत्य मानले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. 

नवीन नियम काय सांगतात?

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने EDLI योजनेत बदल करताना महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यापूर्वी EDLI योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याच्या PF खात्यात किमान 50,000 रुपये असणे आवश्यक होते. आता हा नियम शिथिल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे नसले तरी त्याच्या कुटुंबाला 50,000 रुपये विम्याची रक्कम मिळेल. तसेच जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग 12 महिने नोकरी केली असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल. नव्या नियमांनुसार, जर एखादा कर्मचारी एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीला लागला आणि दोन नोकऱ्यांमधील अंतर 60 दिवसांपेक्षा कमी असेल, तर त्याला सातत्यपूर्ण सेवेचा लाभ मिळेल. याचा अर्थ, दोन नोकऱ्यांमधील कमी कालावधीचा खंड असला तरीही कर्मचारी EDLI योजनेच्या विम्याच्या लाभासाठी पात्र ठरेल.

जर कर्मचाऱ्याचा मृत्यू त्याच्या शेवटच्या पगारातून PF कपात झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत झाला, तर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल. ज्यांनी नोकरी सोडल्यानंतर काही काळातच मृत्यू झाला, त्या कर्मचाऱ्यांसाठी हा बदल महत्त्वाचा आहे.  

EDLI योजना म्हणजे काय?

कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना (EDLI) ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) अंतर्गत चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश संगठित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या कायदेशीर वारसांना एकरकमी आर्थिक मदत दिली जाते. विशेष बाब म्हणजे, या योजनेसाठी कर्मचाऱ्याला स्वतःच्या खिशातून कोणतेही योगदान द्यावे लागत नाही. विम्याचा हप्ता पूर्णपणे नियोक्त्याकडून भरला जातो. 

कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कसा होईल फायदा?

या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी, ज्यांच्या PF खात्यात जास्त शिल्लक नसते, त्यांना या योजनेचा लाभ मिळणे सोपे झाले आहे. तसेच, नोकरीत खंड पडल्यास किंवा नोकरी बदलल्यानंतरही विम्याचा लाभ मिळेल, यामुळे कर्मचाऱ्यांना लवचिकता मिळेल. याशिवाय, शेवटच्या पगारानंतर 6 महिन्यांपर्यंत विम्याचा लाभ मिळण्याची तरतूद ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते.





Source link

Raj Thackeray Mira Road Rally: हिंदी, फडणवीस, 56 इंच छाती अन् कानाखाली…; राज ठाकरेंच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे

Raj Thackeray Mira Road Rally: हिंदी, फडणवीस, 56 इंच छाती अन् कानाखाली…; राज ठाकरेंच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे


Raj Thackeray Mira Road Rally: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मिरा रोडमध्ये सभा घेत पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा मांडला आहे. मिरा रोडमध्ये व्यापाऱ्याला झालेली मारहाण, त्यानंतर त्यांच्या मोर्चाला मनसेने दिलेलं उत्तर यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मिरा रोडमध्ये येत असल्याने सर्वांचं लक्ष होतं. राज ठाकरेंनी राज्य सरकारलाही हिंदी सक्तीचा प्रयत्न करु नये अन्यथा परिमाण भोगावे लागतील असाही इशारा दिला आहे. 15 मुद्द्यांमध्ये राज ठाकरेंनी भाषणात काय सांगितलं आहे हे समजून घ्या. 

1) त्या दिवशी मिठाईवाल्याच्या बाबतीत जो प्रसंग घडला तो साधा होता. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला म्हणून महाराष्ट्र सैनिक आनंद साजरा करत होते, तर एक आगाऊ मिठाईवाला म्हणाला की इथे तर हिंदीच चालणार, हे ऐकल्यावर महाराष्ट्र सैनिकांनी जे करायचं ते केलं. आता कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच… 

त्या अमराठी मिठाईवाल्याने आगाऊपणा केला म्हणून त्याच्या कानाखाली बसली. मग त्यावर इथल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला,मोर्चा काढला. मोर्च्या काढणाऱ्या  कानाखाली मारली होती का ? अजून नाही मारली आहे.. कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तुम्ही हे सगळं करणार… तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत… किती काळ दुकानं बंद करून राहणार आहात ? शेवटी आम्ही काही घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रात राहताय शांतपणे रहा, मराठी शिका, आमचं काही भांडण नाहीये तुमच्याशी. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार…. 

2) राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करणारच असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून दाखवावा, मी त्यांना सांगतो की तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू.  सरकारला हिंदी सक्तीची करून आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी करावी. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीची सक्ती सोडून हिंदीच्या सक्तीसाठी प्रयत्न करतोय ? कोण दबाव आणत आहे तुमच्यावर? 

3) संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रचंड लढा लढला गेला, मुंबईला वेगळे करण्याचा डाव होता तो कोणाचा होता? तर तो काही गुजराती नेते, गुजराती व्यापाऱ्यांचा होता. आचार्य अत्रे यांनी एका पुस्तकात म्हटले आहे की वल्लभभाई पटेल ह्यांनी महाराष्ट्राला मुंबई देण्यास प्रथम विरोध केला. आम्ही देशाचे लोहपुरुष म्हणून तुमच्याकडे आदराने पाहत होतो. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात ? पुढे मोरारजी देसाईंनी गोळीबार करून मराठी माणसांना ठार मारलं होतं. गेली अनेक वर्ष यांचा मुंबईवर डोळा आहे. हे चाचपडून बघत आहेत तुम्हाला… हिंदी भाषा आणून बघायची, मराठी माणूस पेटतोय का बघायचं आणि तो शांत बसला तरी हिंदीची सक्ती करायची. हिंदी भाषा सक्ती ही पहिली पायरी आहे, त्यावर मराठी माणूस शांत बसला तर मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला जोडायची हा खरा डाव आहे. त्यामुळे राज्यातील मराठी माणसांनी सावध राहण्याची गरज आहे. हा डाव अगदी आधीपासूनचा आहे, पूर्वी तो उघडउघड होता, आता थोडा लपूनछपून प्रयत्न केला जातो.

4) जगातील एक मोठं सत्य आहे. तुमची भाषा मेली आणि तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्हाला कोणीही विचारणार नाही… तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे, तुमची जमीन टिकवणं महत्वाचं आहे. 

5) फक्त मुंबईत काही झालं तर हिंदी चॅनल्स अजेंडा चालवतात. ही कसली हिंदी चॅनेल्स. ही तर सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहेत. थोड्या वेळाने सुरु करतील, ‘राज ठाकरेने उगला जहर’… फक्त मुंबईत आणि महाराष्ट्रात काही झालं की कोणाच्यातरी सांगण्यावरून किंवा स्वतःच्या मनातील रागातून ही लोकं पेटून उठतात. २०१८ साली २० हजार बिहारी लोकांना गुजरात मधून हाकलून लावले, तेव्हा बातम्या नाही झाल्या. ज्याने हाकलले तो आज भाजप मध्ये आमदार आहे. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा बिहारी लोकांना हाकलले, एकही बातमी झाली नाही. इथे महाराष्ट्रात एका मिठाईवाल्याच्या कानाखाली बसली तर देशभर बातम्या?

6) मराठी भाषेला अडीच तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. हिंदीला २०० वर्षांचाच. अभिजात भाषेचा दर्जा मिळायला साधारण १४०० वर्षे लागतात. म्हणजे हिंदीला हा दर्जा मिळायला अजून १२०० वर्षे आहेत, ती भाषा आमच्या मुलांनी सक्तीने का शिकायची?

7) हिंदी ही कुणाचीही मातृभाषा नाही.  उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधील अनेक मातृभाषांसह २५० भाषा हिंदीने मारल्या. अगदी हनुमान चालिसासुद्धा अवधी भाषेत आहे, हिंदी नव्हे. तिथल्या लोकांना उलट ही गोष्ट सगळ्यात आधी समजायला हवी.

8) भाषा कोणतीही वाईट नसते, पण ती भाषा सक्तीने लादणे खपवून घेणार नाही. आमच्यावर लादणार असाल तर आम्ही नाही बोलणार. लहान मुलांवर तर नाहीच लादू देणार.

9)  हिंदुत्वाच्या आडून तुम्ही मराठी संपवायला येणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार नाही.हे हिंदवी स्वराज्य व्हावे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य होते, हिंदूवी नव्हे, हिंदवी. या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे राज्य केलेला हा महाराष्ट्र आहे.  इथे आमच्यावर बाहेरच्यांनी येऊन राज्य नाही करायचं. मराठी माणूस या ठिकाणचा मालक आहे.

11) इथे व्यवसायाला आलेल्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे, माज करू नये, आम्ही तुमच्याशी मराठीतच बोलू.  मराठी माणसाला स्वतःहून काही करायची गरज नाही, कुणाच्या अंगावर जायची गरज नाही पण समोरचा कुणी माज घेऊन आला तर ठेचायचाच.

12) भाजपचा खासदार दुबे म्हणाला मराठी माणसांना आम्ही आपटून मारणार. त्याच्यावर केस नाही झाली, कुठेही हिंदी चॅनल्सवर बातम्या नाही झाल्या. त्याने मुंबईत येऊन दाखवावे, मग कळेल कोण कुणाला कसा मारतो. इकडे ये तुला इथल्या समुद्रात डुबे डुबे कर मारेंगे…. 

13) इतर राज्यात तिथले सरकार स्थानिकांच्या मागे असते, आपल्याकडे तसे होत नाही; पण सरकारने एक लक्षात ठेवावे, तुमची सत्ता विधानभवनात असेल आमची रस्त्यावर सत्ता आहे. मराठी माणसाने बिनधास्त छाती बाहेर काढून चालावे, छातीठोकपणे चालावे, महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे. परत कुणी वेडावाकडा वागल्यास आमचा हात आणि समोरच्याचा हात याची युती होणारच.

13) अनेक पत्रकार म्हणतात, स्क्रिप्ट फडणवीसांची आहे. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना सगळ्यांच्या दबावाला बळी पडून २ शासन निर्णय मागे घ्यावे लागले.  स्क्रिप्ट असती तर फडणवीसांचा असा अपमान लिहला असता का? स्क्रिप्ट वगैरे काही नाही हे फक्त तुमच्या मनात विष कालवण्याचे प्रयत्न आहेत.

14) माझी कोणाशीही मैत्री असो की शत्रुत्व. मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र या विषयात राज ठाकरे कुणाशीही तडजोड करणार नाही. तुम्हीही करू नका… 

15) मराठी माणसाला माझं सांगणं आहे, प्रत्येक ठिकाणी समोरच्याशी मराठीत बोला, समोरच्याला मराठीत बोलायला भाग पाडा आणि सदैव सतर्क राहा.





Source link

'2-3 लोकांना कानाखाली…'महाराष्ट्रातील मराठी-हिंदी वादात रेणुका शहाणेंची उडी!

'2-3 लोकांना कानाखाली…'महाराष्ट्रातील मराठी-हिंदी वादात रेणुका शहाणेंची उडी!


Renuka Shahane: महाराष्ट्रातील मराठी-हिंदी वाद हा अलीकडील काळात चर्चेचा विषय ठरलाय. हा वाद प्रामुख्याने भाषिक अस्मिता, स्थानिक संस्कृती आणि राजकीय हितसंबंधांभोवती केंद्रित आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रीभाषा धोरण लागू करण्याच्या निर्णयापासून सुरू झाला. ज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रस्ताव होता. याला स्थानिक मराठी भाषिकांनी विरोध केला. यातून अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या आणि वाद निर्माण झाले. दरम्यान आता या वादत अभिनेत्री रेणूका शहाणेनी उडी घेतलीय. काय म्हणाल्या रेणूका शहाणे? सविस्तर जाणून घेऊया. 

हिंदी-मराठी भाषेच्या वादावर मत

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी सुरू झालेला हिंदी आणि मराठी भाषेचा वाद आता अधिकच तीव्र होत चाललाय. याच मुद्द्यावरुन जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि 2 ठाकरे बंधुंना एकत्र आणलं असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. अनेक सेलिब्रिटींनीही या वादावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांचेही नाव त्यात समाविष्ट झाले आहे. रेणुका यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झालाय आणि त्यांनी हिंदी व्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टीतही खूप काम केलंय. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेची राज्यभरात चर्चा आहे. रेणुका शहाणे यांनी स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित केलंय. हिंसाचारापेक्षा सुसंवाद असावा असे रेणूका शहाणे म्हणाल्या. अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे पती आणि सुप्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनीही हिंदी-मराठी भाषेच्या वादावर आपले मत मांडले होते.

‘अशी लोक मला आवडत नाहीत’

हिंदी-मराठी भाषेतील वादावर रेणुका शहाणे यांनी ही प्रतिक्रिया दिली. पूजा चौधरीच्या पॉडकास्टमध्ये त्या हिंदी-मराठी भाषेच्या वादावर बोलत होत्या. ‘जर तुम्ही खूप काळापासून एखाद्या ठिकाणी राहत असाल, तर स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृती समजून घेणे आणि इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तिचा आदर करणे ही चांगली गोष्ट आहे. ते फक्त बोलण्याबद्दल नाही तर तिचा आदर करणे अपेक्षित आहे. ज्यांना स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृतीबद्दल सहानुभूती नाही, अशी लोक मला आवडत नसल्याचे रेणूका शहाणे म्हणाल्या. 

 ‘यामुळे भाषेचा फायदा होणार नाही’

‘दोन किंवा तीन जणांना कानाखाली मारल्याने कोणाचाही फायदा होत नाही’, असे यावेळी रेणुका म्हणाल्या. ‘मला हिंसाचार अजिबात आवडत नाही. लोक त्याबद्दल असंस्कृत होतात हे मला आवडत नाही. जिथे मराठी बोलली जात नाही अशा ठिकाणी जाऊन फक्त 2-3 लोकांना कानाखाली मारणे… यामुळे भाषेचा फायदा होणार नाही’, असेही त्या पुढे म्हणाल्या. 

हिंदी-मराठी भाषेच्या वादावर आशुतोष राणा काय म्हणाले?

रेणुका शहाणे यांचे पती आशुतोष राणा यांनीही अलीकडेच हिंदी-मराठी भाषेच्या वादावर भाष्य केले होते. ‘भाषा हा संवादाचा विषय आहे असे मला वाटते. तो कधीही वादाचा विषय नसतो. भारत हा इतका परिपक्व आणि अद्भुत देश आहे, जिथे त्याने सर्वकाही स्वीकारले आहे आणि संवादावर विश्वास ठेवला आहे. भारत कधीही वादावर विश्वास ठेवत नाही’, असे आशुतोष राणा एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यानंतर काही दिवसातच रेणूका शहाणेंची प्रतिक्रिया आलीय.





Source link

मौलाना आझाद कर्ज योजनेत अर्जदारांची फसवणूक; कर्ज मंजूर झालं, मग पैसे गेला कुठे?

मौलाना आझाद कर्ज योजनेत अर्जदारांची फसवणूक; कर्ज मंजूर झालं, मग पैसे गेला कुठे?


मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ बेरोजगार मुस्लिम तरुणांना कर्ज देते. व्यवसायासाठी त्यांना आर्थिक मदत करतं. मात्र शासनाच्या या महामंडळाच्या माध्यमातून अनेक युवकांची आर्थिक फसवणूक झाल्याचं पुढं आलंय.   

मौलाना आझाद कर्ज योजनेत अर्जदारांची फसवणूक 
कर्ज मंजूर झालं, पैसे मात्र मिळालेच नाहीत  
सातबारावर बोजा चढवल्याने जमीनही विकता येईना

राज्य सरकार पुरस्कृत मौलाना आझाद कर्ज योजनेतील अर्जदारांची फसवणूक झालीय. संभाजीनगरच्या  सिल्लोडमधील अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची भावना आहे. कर्जाचा अर्ज मंजूर होऊन 8 महिने झाले तरी त्यांना अद्याप कर्ज मिळाले नाहीत. मात्र कर्ज मंजूर होताच संबंधित अर्जदारांच्या सातबारावर बोजाही चढवला गेलाय. त्यामुळे या तरुणांना मालमत्ताही विकता येत नाही.

मौलाना आझाद कर्ज योजना काय? 
मौलाना आजाद कर्ज योजना ही सरकार पुरस्कृत 
अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची योजना 
शिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं 
अर्जदारांना 50 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्जाची सुविधा 
कर्जाची परतफेड 5 वर्षांच्या कालवधीत 20 हप्त्यामध्ये करण्याची सोय
6 टक्के व्याजदाराने कर्ज
आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर बँकेककडून कर्ज 

सिल्लोडमधील अलीम शेख आणि अकबर शेख यांनी मौलाना आझाद कर्ज योजनेत अर्ज केला होता. अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाने कागदपत्रांची पडताळणी करत तो मंजूरही केला. मात्र आता या प्रक्रियेला 8 महिने झाले तरी तरुणांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे कर्जासाठी तारण ठेवलेल्या जमिनीच्या सातबारावर बोजाही चढवण्यात आला. त्यामुळे तरुणाची कर्जही मिळेना अन् दुसरीकडूनही कर्ज घेता येईना अशी अवस्था झालीय. 

दरम्यान सिल्लोडमधील ही उदाहरणं प्रातिनिधीक स्वरुपाची आहेत. राज्यात अशी आणखी काही प्रकरणं असण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक विकासासाठी असलेलं महामंडळच आपल्या होतकरू तरुणांची अशी हेळसांड करणार असेल तर त्यांनी कुठं जायचं? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. 





Source link

पुणे भाजपचा कारभारी कोण? हा का ठरतोय महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न; शर्यतीत नेमकी कोणाची नावं?

पुणे भाजपचा कारभारी कोण? हा का ठरतोय महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न; शर्यतीत नेमकी कोणाची नावं?


-चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे

पुणे शहराच्या राजकारणात ‘कारभारी’ हा शब्द तसा शरद पवारांनी 2009 साली रूढ केलेला. तोही कलमाडींना हटवण्यासाठी! पण सध्या याच कारभारी शब्दाची सर्वाधिक रंगलीय ते पुणे भाजपात…!!! कारण गिरीष बापट गेल्यापासून स्थानिक भाजप नेत्यांमध्ये पुणे भाजपचा कारभारी होण्यासाठी चांगलीच स्पर्धा लागलीये. पाहुयात पुणे भाजपचा कारभारी आहे तरी कोण? या विषयावर झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट..

पुणे मनपाच्या निवडणुका होणार असल्याचं जाहिर झाल्यापासून भाजपचे दुसऱ्या फळीतले सगळे नेते, मंञी या अशा स्वतंत्र आढावा बैठका लावताहेत. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी नेमकी कोणत्या नेत्याकडे फिल्डिंग लावायची हेच इच्छुक मेंबर्संना कळना झालंय. बरं हे कमी काय? म्हणून दस्तुरखुद्द सीएमसाहेबांचे आठवड्यातून एक दोन पुणे दौरे हे ठरलेलेच असतात म्हणूनच बापटाच्या पश्चात पुणे भाजपचा कारभारी कोण हा भाबडा प्रश्न अनेकांना सतावतोय. अगदी पञकारही त्याचं उत्तर ठामपणे देऊ शकत नाहीत कारण पालिकेच्या तिकिट वाटपाचे अधिकार हे आपल्याकडेच असावेत यासाठी चंद्रकांत पाटील, मुरली मोहोळ, माधुरी मिसाळ असे सगळेच आपआपल्या परीने मोर्चेबांधणी करताना दिसतात अशातच खासदार मुरली मोहोळ यांनी कोथरूड सोडून थेट मध्यवर्ती शहरात आपलं जनसंपर्क कार्यालय थाटल्याने पुणे भाजपचा कारभारी कोण? या चर्चेला जरा अधिकच जोर चढलाय…

कॅमेऱ्यावर बोलणं टाळलं

पुणे भाजपचा कारभारी कोण? हा प्रश्न आम्ही सर्व इच्छूक नेत्यांना विचारण्याच प्रयत्न केला पण सगळ्यांनी उगीच नसता वाद नको म्हणून कॅमेऱ्यावर बोलणं टाळलं म्हणूनच मग आम्ही थेट तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता कम पदाधिकारी पुनीत जोशीला बोलतं केलं असता त्यांनी भारतीय जनता पार्टी हीच पुण्याची कारभारी असं मार्मिक उत्तर दिलं.

स्पर्धा आणखी थोडी तीव्र

खरंतर स्वर्गीय खासदार गिरीष बापट हयात असतानाच तत्कालीन पालकमंञी चंद्रकांत पाटलांनी पुणे भाजपचा कारभार हाती घेतला होता पण लोकसभेत निवडून येताच मुरली मोहोळ थेट केंद्रात राज्य मंञी बनल्याने त्यांना पुणे भाजपचा कारभारी बनण्याची भाजपातली स्पर्धा आणखी थोडी तीव्र बनल्याचं बघायला मिळतंय. त्यातूनच शहरातील छोट्या मोठ्या प्रोग्राम साठीही थेट मुख्यमंञ्यांना पाचारण केलं जातं आणि ते देखील आवर्जून येतात बरं. यातच सर्वकाही आलं.

कौतुक मिश्रित जुगलबंदी

मुरली मोहोळ महापौरचे थेट केंद्रीय मंञी बनल्याने पुणे शहराचं कारभारीपद ही आता आपल्यालाच मिळावं, यासाठी ते विशेष प्रयत्न करताना दिसतात पण चंद्रकांत दादा आणि माधुरी मिसाळ हे दोन राज्यातले मंञी आपणही इथे सिनिअर आहोत बरं. हे सातत्याने दाखवून देत असतात. त्यातूनच मग गेल्या शनिवारच्या पक्ष मेळाव्यातच अण्णा दादात रंगलेली कौतुक मिश्रित जुगलबंदी अगदी सीएमसमोरच रंगल्याचं बघायला मिळालं.

…मग ते फडणवीस कसले?

2017 साली पुणे मनपात भाजपची एकहाती सत्ता आली होती आणि यंदाही तसेच निकाल लागतील, अशी आशा भाजप नेत्यांना हे कदाचीत म्हणूनच ही पुणे भाजपातली ही कारभारी पदाची स्पर्धा तीव्र झाली असावी, पण फडणवीस तळ लागून देतील मग ते फडणवीस कसले? बघुयात पुणे मनपात भाजपची तिकीटं वाटताना नेमका कोणाला अप्पर हँड मिळतोय ते.





Source link

सुपर कनेक्टिव्हीटी असणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार चौथी मुंबई; भारतातील 9 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट कनेक्ट होणार

सुपर कनेक्टिव्हीटी असणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार चौथी मुंबई; भारतातील 9 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट कनेक्ट होणार


Fourth Mumbai In Maharashtra : महाराष्ट्र हे प्रचंड वेगाने विकसीत होत आहे. महाराष्ट्रात नवीन शहर देखील विकसीत केली जात आहेत.  मुंबई आणि नवी मुंबई या शहरावर येणार ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी मुंबई (Third Mumbai)  उभारली जात आहे. तर, दुसरीकडे चौथ्या मुंबईचे देखील प्लानिंग सुरु आहे. चौथी मुंबई हे सुपर कनेक्टिव्हीटी असणारे महाराष्ट्रातील एकमेव शहर ठरणार आहे. देशातील 8 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट चौथ्या मुंबईला कनेक्ट होणार आहेत. 

महाराष्ट्रात चौथी मुंबई निर्माण करण्याचा प्लान तयार केला जात आहे. चौथी मुंबई हे  मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हीटी असणारे शहर ठरणार आहे. पालघर जिल्ह्यात प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्प उभारला जात आहे. या परिसरात चौथी मुंबई उभारण्याची योजना आहे.  महाराष्ट्रातील वाढवण बंदर हा मोदी सरकारचा ड्कीम प्रोजेक्ट आहे. समुद्रकिनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे अजस्त्र कंटेनर येथे सहज येवू शकतात. जवळपास 298 मिलियन टन क्षमतेचं हे देशातील 13 व्या क्रमांकाचं बंदर असेल.या बंदरातून कोळसा, सिमेंट, केमिकल आणि तेल यांची वाहतूक करता येईल. वाढवण बंदर पूर्णपणे विकसित झालेल्यानंतर जगातील टॉप 10 कंटेनर पोर्ट देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार. वाढवण बंदर हा प्रकल्प जवळपास 76 हजार कोटी रुपयांचा आहे. 

वाढवण बंदर संपूर्ण देशासाठी गेमचेंजर ठरणार आहे.  या वाढवण बंदराचे काम पूर्ण होई पर्यंत पालघरमध्ये मुंबईजवळील तिसरे विमानतळ तसेत रस्ते उभारले जाणार आहेत. वाढवण बंदराजवळच चौथी मुंबई उभारण्याचा प्लान आहे.   वसई, विरारपासून पुढे पालघरकडे चौथी मुंबई निर्माण केली जाणार आहे. मुंबईतील कोस्टल रोड पालघरच्या वाढवण बंदरापर्यंत नेला जाणार आहे.  देशातील 8 मोठे प्रोजेक्ट चौथ्या मुंबईला डायरेक्ट कनेक्ट होणार आहेत.  दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, बोईसर बुलेट ट्रेन स्टेशन, विरार बुलेट ट्रेन स्टेशन, वाढवण खोल सागरी बंदर, वाढवण विमानतळ, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, उत्तन-विरार-पालघर सी लिंक, इगतपुरी-वाळवण द्रुतगती मार्ग आणि विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर हे चौथ्या मुंबईला जोडले जाणार आहेत.  देशातील 8 मोठे प्रोजेक्ट डायरेक्ट कनेक्ट होणार आहेत. 

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp