कर्जत येथे सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर समोर, उच्चशिक्षित तरुण अन् मुंबई – कोइंबतूर एक्सप्रेस….

कर्जत येथे सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर समोर, उच्चशिक्षित तरुण अन् मुंबई – कोइंबतूर एक्सप्रेस….


Karjat Crime News: कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी रेल्वे स्टेशनजवळ 16 एप्रिल रोजी एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वे ट्रॅकजवळ आढळलेल्या गुलाबी रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटवणे अत्यंत अवघड असतानाही केवळ सुटकेसच्या आधारावर नेरळ आणि कर्जत पोलिसांनी तपास सुरू ठेवत अखेर खूनाच्या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे. धनलक्ष्मी एराप्पा रेड्डी ऊर्फ बिंदू (वय 34) रापताडू, आंध्रप्रदेश असे मृत तरुणीचे नाव असून आरोपी हे उच्चशिक्षित असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

या तपासामध्ये रायगड पोलिसांच्या विशेष तुकड्या तपास करीत असताना नेरळ पोलिसांना एक धागा सापडला. नेरळ पोलिसांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून बेंगळुरू येथून दोन आरोपींना अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी मुंबईहून दक्षिण भारतात जाणाऱ्या मेल गाड्यांचे सीसीटीव्ही फूटेज बारकाईने तपासले. या तपासात लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघालेल्या मुंबई – कोइंबतूर एक्सप्रेसमध्ये (ता.१५) एक संशयित जोडपं गुलाबी बॅग घेऊन जाताना दिसले. त्यांनी कोणत्या डब्यात प्रवास केला याची शहानिशा करत बेंगळुरू स्थानकावर बॅग नसलेल्या अवस्थेतील त्याच जोडप्याचे दृश्य पोलिसांच्या हाती लागले होते. 

बुकिंग तिकीटावरील फोन नंबर आणि लोकेशनच्या आधारे नेरळ पोलिसांनी बेंगळुरूयेथील एका लॉजवर धाड टाकून आरोपी व्हि. विजयकुमार व्यंकटेश (26) चित्तूर, आंध्रप्रदेश आणि टी यशस्विनी राजा वय 24 तिरुपती, आंध्रप्रदेश या दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपींना 16 मेपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुटकेसमधील मृतदेह कोणाचा हे प्रकरण उलगडलं आहे.

दोघा आरोपींनीच धनलक्ष्मी ऊर्फ बिंदू या तरुणीचा खून करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून रेल्वे ट्रॅकजवळ टाकल्याचे उघड झाले. हे तिघंही मूळचे आंध्रप्रदेशातील असून, सध्या मुंबई आणि बेंगळुरू येथे नोकरीच्या शोधात होते. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामागे काय उद्देश होता, खून पूर्वनियोजित होता का, हे पोलिस तपासातून पुढे येणार आहे.





Source link

IMD Weather Update : येत्या 4-5 दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून यल्लो अलर्ट

IMD Weather Update : येत्या 4-5 दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून यल्लो अलर्ट


उन्हाळ्यात महाराष्ट्रात मुसळधार पावासाने हजेरी लावली असून राज्यभरात गारठा पडला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळत आहे. शुक्रवारी दुपारी 3 ते 4.30 पर्यंत पावसाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात हजेरी लावले. शहराचा पारा 32 अंशापर्यंत खाली उतरला असून अनेक ठिकाणी गारठा पडला आहे. 

मनमाड शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून उन्हाचा तडाखा वाढलेला असताना रात्री 8 वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाने हजेरी लावल्याने रात्री उशीरा पर्यंत भाजी विक्रेत्यांचे आणि नागरिकांचे हाल झाले आहेत. 

अचानक जोरदार पाऊस झाल्याने हवेत गारवा वाढला आहे. हवेत गारवा निर्मान झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जोरदार वारा पाऊस यामुळे शहरातील काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. 

तसेच नाशिक शहरात जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून तेथेही अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जोरदार पाऊस आल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे होणार नुकसान झाले आहे. हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस यल्लो अलर्ट दिला आहे. 

देशभरात पाच चक्रीवादळे निर्माण झाल्यानंतर, भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळांचा इशारा जारी केला आहे. ११ मे पर्यंत मध्य आणि वायव्य भारतात पाऊस, वादळ आणि विजांचा अंदाज आहे.

पुढील काही दिवसांत राज्य अस्थिर हवामानासाठी सज्ज होत असताना, भारतीय हवामान विभागाने (IMD) तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, पुढील दोन दिवसांत मुंबईत पाऊस आणि गडगडाटी वादळे होतील, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.

दिल्लीमध्ये गुरुवारी होणाऱ्या पावसासाठी आयएमडीने पिवळा इशारा जारी केला आहे, ज्यामध्ये वीज आणि गडगडाटी वादळे येण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत, देशाच्या मध्य आणि वायव्य भागात पाऊस आणि गडगडाटी वादळे सुरू राहतील, तर पूर्व भारतात गुरुवारी नवीन उष्णतेची लाट सुरू होऊ शकते असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

या आठवड्यात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि उत्तराखंडमध्ये वादळ आणि जोरदार वाऱ्यांसह व्यापक पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. ११ मे पर्यंत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.





Source link

सुट्टी असो वा आणखी काही, समुद्रकिनारी जाणं टाळा; नौदलाकडून नागरिकांसह मच्छिमारांना स्पष्ट इशारा

सुट्टी असो वा आणखी काही, समुद्रकिनारी जाणं टाळा; नौदलाकडून नागरिकांसह मच्छिमारांना स्पष्ट इशारा


India Pakistan War : भारत आणि पाकिस्तामध्ये पेटलेला संघर्ष दर दिवसागणिक आणखी धुमसताना दिसत असतानाच आता या दोन्ही देशांमध्ये पडणारी ठिणगी वण्व्याचं रुप धारण करणार याच भीतीनं अनेकांना धडकी भरली आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागातील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कडाडून निषेध करत भारतानं ऑपरेशन सिंधूची हाक देत पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उध्वस्त केले. 

भारताच्या या कारवाईवर आता पाकिस्ताननंही प्रत्युत्तर देत प्रतिहल्ला सुरू केला. मात्र पाकिस्तानचे सर्व हल्ले आले त्याच वेगानं भारती. सैन्यदलानं प्रचंड ताकदीनं परतवून लावले. पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारतानं उध्वस्त केले, तर या देशाची एअर डिफेन्स सिस्टीमसुद्धा नष्ट करण्यात आली. इतकं होऊनही पाकिस्तानच्या कुरापती थांबत नसून आता 26/11 प्रमाणं सागरी मार्गानं घुसखोरी करण्याचा डाव साधण्याचा प्रयत्न पाकिस्तान करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांमार्फत मिळत आहे. 

26/11 प्रमाणे समुद्रातून घुसखोरीचा धोका; मच्छिमारांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना

पाककडून घुसखोरीसाठी सागरी मार्गाची निवड केली जाण्याचा धोका असतानाच नुकतीच भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची महत्त्वाची बैठक पार पडली. नौदल ठिकाणं, संवेदनशील ठिकाणी मच्छिमारांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना. नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास ‘शूट टू किल’च्या सूचना जारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं समुद्रकिनाऱ्यांनजीक न जाण्याचा इशारासुद्धा जारी करण्यात आला असून, लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार आहे. शिवाय सध्या पकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या काही बोटी ताब्यात घेतल्या असून मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची सूत्रांची माहिती. 26/11 प्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नेव्हीकडून अलर्ट जारी केला आहे. 

कोकणातही सावधगिरी 

फक्त मुंबईच नव्हे, कोकण आणि देशातील इतरही महत्त्वाच्या किनाऱ्यांच्या बाबतीत सध्या सतर्कता बाळगली जात आहे. कोकणात किनारी भागात संरक्षण दलाच्या हालचाली वाढल्या असून इथं कडेकोट बंदोबस्त ठेवम्यात आला आहे. शिवाय कोणत्याही संशयित बोटी किंवा हालचाली दिसल्यास पोलिसांना याची तातडीनं माहिती द्यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. 





Source link

राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाचे वारे, शरद पवारांचे संकेत; तर सुप्रियाताई पुन्हा अजितदादांसोबत जाणार?

राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाचे वारे, शरद पवारांचे संकेत; तर सुप्रियाताई पुन्हा अजितदादांसोबत जाणार?



पाकिस्तानात तिकडे भारताने जोरदार ड्रोन हल्ले सुरू केलेले असतानाच इकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलिनीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे या हवा देताहेत दस्तूर खुद्द शरद पवार. विश्वास बसत नाही ना मग. मग बघा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. 



Source link

गेला उन्हाळा आला पावसाळा? राज्याच्या 'या' भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

गेला उन्हाळा आला पावसाळा? राज्याच्या 'या' भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस


Maharashtra Weather News : अरबी समुद्रापासून थेट मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, दुसरीकडे तामिळनाडूनपासून थेट मनारच्या आखातापर्यंतही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यातील वाढलेल्या उकाड्यातूनही बाष्पीभवन प्रक्रियेला वेग आला असून, त्यातूनच राज्यात पावसाच्या सरींची जोरदार बरसात होत असल्याचं पाहायला मिळालं. 

हवामान विभागानं हे एकंदर चित्र पाहून वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये या परिस्थितीत फारशी सुधारणा होणार नसून राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही भागांमध्ये ऊन सावलीचा खेळही पाहायला मिळेल. राज्याच्या मध्य महाराष्ट्र भागासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला हवामान विभागानं वादळी पावसाच्या धर्तीवर यलो अलर्ट दिला आहे. 

एकंदरच ढगाळ वातावरण, पावसाची हजेरी यामुळं बहुतांश भागांमध्ये तापमानाच घट झाली असून, हा आकडा 40 अंशांहूनही कमी झाल्याचं स्पष्ट होत आहे. गुरुवारीही राज्यात कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

काही भागात जोरदार सरींची शक्यता अशा वेळी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला यंत्रणांनी दिला आहे. कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, या भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्यानं अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागात हलक्या सरींची बरसात अपेक्षित आहे. 

कधीपर्यंत टिकून राहणार हे पावसाळी वातावरण? 

राज्यात पुढचे पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून विदर्भ आणि मराठवाड्यावर याचा सर्वाधिक परिणाम होईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

अधिक वाचा : Operation Sindoor : भारताचा ‘सिक्रेट प्लान’ जगासमोर आणणारा हा माणूस आहे तरी कोण? म्हणे पाकिस्तानभोवतीचा गळफास आवळला जाणार… 

सह मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागात पावसाचा अंदाज आहे. तर हिंगोली, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगर इथं वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 





Source link

Operation Sindoor: पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठोकण्यासाठी वापरली हनुमान निती, काय आहे असं यात? जाणून घ्या

Operation Sindoor: पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठोकण्यासाठी वापरली हनुमान निती, काय आहे असं यात? जाणून घ्या


Hanuman Niti In Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरातून भारतीय सैन्याचं कौतुक केलं जातंय. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावर भाष्य केलंय. ऑपरेशन सिंदूर हे दहशतवाद्यांविरुद्ध भारताचे योग्य प्रत्युत्तर असल्याचे वर्णन त्यांनी केलंय. ऑपरेशन सिंदूरवेळी आपण हनुमान नितीचा अवलंब केल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. काय आहे हनुमान निती? जाणून घेऊया. 

ज्यांनी आमच्या निष्पापांना मारले, आम्ही त्यांना मारले’, हा भारताचा प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.हा हल्ला फक्त दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांपुरता मर्यादित होता. भारतीय सैन्याने अचूकता, दक्षता आणि मानवता दाखवली. यासाठी मी संपूर्ण सैन्याचे आणि पंतप्रधान मोदींचेही अभिनंदन करत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरची तुलना हनुमान नितीशी केली. हनुमानजींनी अशोक वाटिका येथे केलेल्या मोहिमेशी याचा संबंध जोडला. ज्याप्रमाणे हनुमानजींनी फक्त राक्षसी संरचना नष्ट केली, त्याचप्रमाणे भारताने दहशतवादाची रचना नष्ट केल्याचे ते म्हणाले. ते सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

‘आम्ही हनुमानजींच्या आदर्शांचे पालन केले आहे जे त्यांनी अशोक वाटिका नष्ट करताना पाळले होते. ‘जिन्ह मोही मारा तिन मोही मारे’ म्हणजेच आम्ही फक्त त्यांनाच मारले ज्यांनी आमच्या निष्पापांना मारले. पूर्वीप्रमाणेच यावेळीही आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे अड्डे उद्ध्वस्त करून योग्य प्रत्युत्तर दिले असल्याचे ते म्हणाले.

कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींकडून सैन्याचे कौतुक

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय सैन्याचे कौतुक केले. बैठकीच्या सुरुवातीला कॅबिनेट मंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ साठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. भारतीय सैन्याने तयारीनुसार आणि कोणतीही चूक न करता ही कारवाई केली. केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि संपूर्ण देश त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदींनी सैन्याचे कौतुक केले आणि हा एक अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले.

पंतप्रधान मोदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रात्रभर ‘ऑपरेशन सिंदूर’वर लक्ष ठेवून होते. ऑपरेशन योजनेनुसार पुढे जावे यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करी कमांडर्सशी सतत संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतीय लष्कर, हवाई दल आणि परराष्ट्र मंत्रालयाने ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल संयुक्त पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, हवाई दलाचे विंग कमांडर व्योमिका सिंग आणि भारतीय लष्कराचे कर्नल सोफिया कुरेशी सहभागी झाले होते. लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरील हल्ल्यांचे क्लिपही दाखवले.

ऑपरेशन सिंदूरची माहिती

या ऑपरेशनबद्दल कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली. त्या म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्यात आले. याअंतर्गत 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधा निर्माण होतेय. ज्या पाकिस्तान आणि पीओके दोन्हीमध्ये पसरलेल्या आहेत. पीओजेकेमधील पहिले लक्ष्य मुझफ्फराबादमधील सवाई नाला कॅम्प होते. जे नियंत्रण रेषेपासून 30 किमी अंतरावर आहे. हे लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण केंद्र होते. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सोनमर्ग, 24 ऑक्टोबर 2024 रोजी गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी येथून प्रशिक्षण घेतले होते.’

हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या, ‘हा हल्ला पहाटे 1.05 ते 1.30 च्या दरम्यान करण्यात आला.’ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ते यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले. नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी आणि कोणत्याही नागरिकांच्या जीवितहानी टाळण्यासाठी ही ठिकाणे निवडण्यात आली होती.’





Source link

YouTube
Instagram
WhatsApp