by Hansraj Agrawal | Mar 22, 2025 | Trending News
Jaykumar Gore Extortion Case: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणात संबंधित संशयित महिलेला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या महिलेला सातारा जिल्हा न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने 1 कोटीची खंडणी स्वीकारताना या महिलेला अटक केली होती.
पोलिसांनी काय मुद्दा मांडला?
पोलिसांनी कोठडी मागताना मांडलेले तीन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठाकरे. यापैकी पहिला मुद्दा ठरला तो या अटक करण्यात आलेल्या माहिलेसोबत इतर कोणी आहे का याचा तपास करायचा असल्याचं सांगण्यात आलं. सहभागी व्यक्तींचा शोध सुरु असल्याने या महिलेची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद पोलिसांकडून करण्यात आला. या प्रकरणात आणखी कोण सामील आहे, याचा तपास करायचा आहे, असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं.
या दोन कारणांसाठीही मागितली कोठडी
पोलिसांनी आपला दुसरा मुद्दा मांडताना आवाजाची पडताळणी करायची असल्याचं सांगितलं. संबंधित महिलेच्या आवाजाचे नमुने तज्ज्ञांकडून घेऊन तपासायचे असल्याने पोलीस कोठडीची गरज असल्याचं न्यायालया सांगण्यात आलं. तसेच तिसरं कारण सांगताना पोलिसांनी, महिलेच्या सह्यांचे नमुने एक्सपर्टकडून तपासायचे असल्याने पोलीस कोठडीची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं. ही मागणी मंजूर करत आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महिलेला अडकवण्यात आल्याचा आरोप
मात्र संशयित महिला आरोपीचे वकील नितीन गोडसे यांनी महिलेवर केलेले आरोप फेटाळले आहेत. जाणूनबुजून या महिलेला अडकवण्यासाठी हे सगळं केलं गेले आहे. या महिलेचे आधीचे वकील यांनीच या महिलेला फसवले आहे आणि या महिलेने कुठेही पैशांना हात लावलेला नाही, असं नितीन गोडसे म्हणाले.
व्हिडीओत पैसे मोजताना दिसली महिला
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेनं खंडणीचं हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर एक कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक केली. ही महिला एक कोटी रुपयांची मोजदाद करताना समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक कोटी रूपये घेताना या महिलेला रक्कमेसहीत रंगे हात अटक करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं.
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यालाही अटक
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात संबंधित महिलेसह अनिल सुभेदार यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. दहिवडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, अनिल सुभेदार यांना दहिवडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील तपास कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 21, 2025 | Trending News
Maharashtra CBSE Pattern: राज्यातील सीबीएसईचा पॅटर्न वादात सापडला आहे. नव्या पॅटर्ननुसार राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम 30 टक्के तर सीबीएसईचा अभ्यासक्रम 70 टक्के असणार आहे. दरम्यान यानंतर विरोधकांनी काही सवाल केले आहेत.
तसंच शिक्षक आणि पालकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे.
आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी ही घोषणा केलीय. दरम्यान यासाठी शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं देखील दादा भुसे यांनी सांगितलं.. मात्र, सीबीएसईची घोषणा करताना अगोदर सर्व व्यवस्था करणं गरजेचं असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. दादा भूसे यांनी केलेल्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाडांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सीबीएसई पॅटर्नमुळे मराठी मातीचा इतिहास पुसला जात असेल तर या पॅटर्नची गरज काय असा सवाल त्यांनी केला. दरम्यान या सीबीएसई पॅटर्नमुळे मराठी आणि इतिहासासोबत कोणतीही तडजोड केली नसल्याचं आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी म्हटलंय. सीबीएसई पॅटर्नची घोषणा केल्यानंतर शिक्षक आणि पालक देखील संभ्रमात पडले आहेत. अचानक करण्यात आलेला बदल विद्यार्थ्यांना झेपणार का? तसंच शिक्षकांच्या प्रशिक्षणाचं काय? असे अनेक प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येताय.
शालेय शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या सीबीएसई पॅटर्नच्या घोषणेनंतर विरोधकांनी सवाल उपस्थित केले आहेत. एवढंच नव्हे तर शिक्षक आणि पालकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झालाय. तसंच 30 टक्के राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात इतिहासाला कितपत न्याय मिळणार? असा देखील प्रश्न उपस्थित होतांना दिसतोय.
दरवर्षी एकेक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जाणार
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 70 टक्के – 30% फॉर्म्युला राबवला जाणार आहे. यामध्ये 70 टक्के सीबीएससी तर 30 टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे. भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली.सीबीएससी अभ्याक्रमातील इतिहास विषयात राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील 30% मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावर्षी पहिली इयत्तेला सीबीएससी अभ्यासक्रम असेल त्यानंतर दरवर्षी एकेक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके छापण्याची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाची असणार आहे. 1 जूनला शाळा सुरू झाल्यानंतर लगेच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
शाळांचे वर्षभराचे वेळापत्रक यंदा कोलमडण्याची भीती
शाळांचे वर्षभराचे वेळापत्रक यंदा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शिक्षण विभागाकडून अचानक पहिल्या इयत्तेपासून नवव्या इयत्तेपर्यंतची वार्षिक परीक्षा एप्रिलअखेरीस घेण्याची सूचना जारी केली. मात्र या सुचनेमुळे शैक्षणिक वर्तुळात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच व्हाव्यात, अशी शिक्षकांसह पालकांची मागणी आहे. त्यातच आता मुंबईतील शाळांमधील मुख्याध्यापकांसमोर या निर्णयामुळे नवा प्रश्न निर्माण झाला आहे. आताच्या नव्या सुचनेप्रमाणे परीक्षा संपवून नवीन शैक्षणिक वर्षातील दहावीचा अभ्यासक्रम कधी सुरू करायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडलाय.अनेक शाळांमध्ये इयत्ता दहावीचे वर्ग एप्रिल महिन्यातच घेण्यास सुरु होतात. सामान्यप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी दहावीच्या मुलांचे वर्ग सुरु होतात. याच काळात दहावीच्या मुलांचा बराचसा अभ्यासक्रमही पूर्ण करतात. मात्र आता नव्या सुचनेनुसार वार्षिक परीक्षाच 22 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून त्यामुळे दहावीच्या या वर्गांचे नियोजन आता करता येणार नाही, अशी खंत शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 21, 2025 | Trending News
Vasai Crime News: वसईत राहणार्या एका तरुणाने कार्बनमोनोक्साईड सिलेंडर मधील वायू प्राशन करून विचित्र पध्दतीने आत्महत्या केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 20, 2025 | Trending News
Chinese Loan Apps: तुम्ही जर मोबाईलवरून तातडीने कर्ज घेत असाल तर सावधान. त्वरीत कर्ज देणाऱ्या चीनी ॲप्समुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. चीनमधील काही सायबर भामटे हे ॲप्स चालवत आहेत. हे सायबर गुन्हेगार ग्राहकांना झटपट कर्ज देण्याचे आमिष दाखवतात. त्यानंतर ग्राहकांकडून ॲप्स सुरु ठेवण्याची परवानगी मिळवून फोनमधील माहिती चोरतात. त्याचा नागरिकांना मोठा फटका बसतो आहे.
चीनी ॲप्सच्या फसवेगिरीने भारतामधील अनेक राज्यातील नागरिकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. दक्षिणेतील राज्यात काही कुटुंबांच्या आत्महत्येमागे कर्ज वसूलीसाठीची पिळवणूक समोर आली आहे. काही चीनी ॲप्सने केंद्र सरकारच्या कडक पावलामुळे आता त्यांचे धोरण बदलवले आहे. ते ग्राहकांना त्वरीत कर्ज देण्याचे आमिष दाखवत आहे. एकदा सावज जाळ्यात ओढले की, त्याची मोबाईलमधील माहिती चोरण्यात येते. त्याआधारे त्याची फसवणूक करण्यात येते.
कर्ज देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक
सध्या अशा अनेक ॲप्सचे जाळे ऑनलाईन विणण्यात आले आहे. हे फसवणूक करणारे ॲप्स बेकायदेशीररित्या काम करत आहेत. ते सर्वसामान्यांना, गरजूंना कर्जाचे आमिष दाखवत आहेत. कर्ज देण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करण्याचा उद्योग या चीनी भामट्यांनी सुरु केला आहे. राज्यात पुणे मुंबईसह अनेक मोठ्या शहरात नागरिक या अॅप्सच्या जाळ्यात अडकत चालले आहेत.
कर्जाच्या नावाखाली लोकांची फसवणूक
ज्यांना तात्काळ एक छोटी रक्कम हवी असते, ते या सायबर भामट्यांचे सर्वात सोप्या पद्धतीने जाळ्यात अडकतात. म्हणजे 5 ते 25 हजार रुपयांपर्यंचे कर्ज हवे असणाऱ्यांना नागरिकांना ते लक्ष करतात. असा ग्राहक टप्प्यात आल्यावर त्याला स्वस्त कर्जाचे आमिष दाखविण्यात येते. त्याच्याकडून ॲप्स चालविण्यासाठीची परवानगी घेण्यात येते. त्यानंतर युझर्सची खासगी माहिती चोरण्यात येते. त्याचे फोटो, त्याचे कॉन्टैक्ट्स, इतर माहिती चोरण्यात येते. त्याआधारे युझर्सला ब्लॅकमेल करण्यात येते. बदनामी करण्याची धमकी देत पैसे उकळण्यात येतात. तर काही जण बँकेचा तपशील चोरुन फसवणूक करतात.
सध्या 30 ते 35 ऑनलाइन अॅप आहे अशी माहिती समोर आली आहे.त्यामुळे कर्ज घेताना काळजी घेण्याची गरज आहे असा अहवाल पुणे सायबर सुरक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.मेट्रो सारख्या शहरात अशा घटना दररोज वाढत चालल्या आहेत. झटपट कर्जची हमी म्हणजे जिवाला धोका हा मूलमंत्र प्रत्येकानी लक्षात ठेवला पाहिजे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 20, 2025 | Trending News
No match is being played.
Mar 19, 2025 | Match 2
Canada in Namibia, 5 T20I Series, 2025
Mar 18, 2025 | 2nd T20
Pakistan in New Zealand, 5 T20I Series, 2025
|
PAK
(15 ov) 135/9
|
VS |
NZ
137/5(13.1 ov)
|
| New Zealand beat Pakistan by 5 wickets |
| Full Scorecard → |
Mar 17, 2025 | Final
Malaysia T20I Tri-Series, 2025
|
HK
(20 ov) 126/5
|
VS |
BRN
129/2(16.4 ov)
|
| Bahrain beat Hong Kong, China by 8 wickets |
| Full Scorecard → |
Source link
by Hansraj Agrawal | Mar 19, 2025 | Trending News
Nagpur Violence: नागपूर हिंसाचारामागे फहीम खान मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. फहीम खानचं जमावाला भडकवलंय अशी तक्रार देखील पोलिसात करण्यात आली होती. दरम्यान यानंतर पोलिसांनी फहीम खानला अटक केली असून त्याला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नागपूरच्या हिंसाचारात पोलीस, तसंच अनेक कुटुंबाना लक्ष्य करण्यात आलं होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 46 जणांना अटक केली. तसंच या हिंसाचारामागच्या सूत्रधारांना सोडण्यात येणार नसल्याचा इशारा प्रवीण दरेकरांनी दिला.
एवढंच नव्हे नागपूरचा हिंसाचार घडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोपही प्रवीण दरेकरांनी केला आहे. तर नागपूरची घटना ही पूर्वनियोजित नव्हती असं पोलिसांनी सांगितल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे..
नागपूरच्या घटनेवरुन राज्यात चांगलंच राजकीय वातावरण तापलंय.. मात्र, दुसरीकडे हिंसाचारानंतर नागपुरात शांतता पाहायला मिळतेय. तसंच या सर्व घटनेची सखोल चौकशी सुरु असून आरोपींवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाआहे.
कोण आहे फहीम खान?
फहीम खान हा 38 वर्षाचा असून त्याचं
दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे
फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे.
फहीम खानचं हिंसाचारासाठी जमावाला प्रवृत्त
करत असल्याची सूत्रांची माहिती
पोलीस हिंदू असल्यानं आपल्याला मदत करत
नसल्याचं सांगत जमावाला भडकवत होता
गेल्या विधानसभा निवडणूक फहीम खानने निवडणूक देखील लढवली होती. मात्र, त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, नागपूर हिंसाचारामागे मास्टरमाइंड असल्याशिवाय अशी घटना होऊ शकत नाही, असा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला होता. यात कोणीतरी मास्टरमाइंड आहे. त्याचा शोध पोलिसांनी घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी VHPनं केली. सर्व दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याची मागणीही त्यांनी केली. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली.
Source link