राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाचे वारे, शरद पवारांचे संकेत; तर सुप्रियाताई पुन्हा अजितदादांसोबत जाणार?

राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाचे वारे, शरद पवारांचे संकेत; तर सुप्रियाताई पुन्हा अजितदादांसोबत जाणार?



पाकिस्तानात तिकडे भारताने जोरदार ड्रोन हल्ले सुरू केलेले असतानाच इकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलिनीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे या हवा देताहेत दस्तूर खुद्द शरद पवार. विश्वास बसत नाही ना मग. मग बघा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. 



Source link

गेला उन्हाळा आला पावसाळा? राज्याच्या 'या' भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

गेला उन्हाळा आला पावसाळा? राज्याच्या 'या' भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस


Maharashtra Weather News : अरबी समुद्रापासून थेट मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, दुसरीकडे तामिळनाडूनपासून थेट मनारच्या आखातापर्यंतही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यातील वाढलेल्या उकाड्यातूनही बाष्पीभवन प्रक्रियेला वेग आला असून, त्यातूनच राज्यात पावसाच्या सरींची जोरदार बरसात होत असल्याचं पाहायला मिळालं. 

हवामान विभागानं हे एकंदर चित्र पाहून वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये या परिस्थितीत फारशी सुधारणा होणार नसून राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही भागांमध्ये ऊन सावलीचा खेळही पाहायला मिळेल. राज्याच्या मध्य महाराष्ट्र भागासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला हवामान विभागानं वादळी पावसाच्या धर्तीवर यलो अलर्ट दिला आहे. 

एकंदरच ढगाळ वातावरण, पावसाची हजेरी यामुळं बहुतांश भागांमध्ये तापमानाच घट झाली असून, हा आकडा 40 अंशांहूनही कमी झाल्याचं स्पष्ट होत आहे. गुरुवारीही राज्यात कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

काही भागात जोरदार सरींची शक्यता अशा वेळी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला यंत्रणांनी दिला आहे. कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, या भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्यानं अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागात हलक्या सरींची बरसात अपेक्षित आहे. 

कधीपर्यंत टिकून राहणार हे पावसाळी वातावरण? 

राज्यात पुढचे पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून विदर्भ आणि मराठवाड्यावर याचा सर्वाधिक परिणाम होईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

अधिक वाचा : Operation Sindoor : भारताचा ‘सिक्रेट प्लान’ जगासमोर आणणारा हा माणूस आहे तरी कोण? म्हणे पाकिस्तानभोवतीचा गळफास आवळला जाणार… 

सह मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागात पावसाचा अंदाज आहे. तर हिंगोली, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगर इथं वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 





Source link

Operation Sindoor: पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठोकण्यासाठी वापरली हनुमान निती, काय आहे असं यात? जाणून घ्या

Operation Sindoor: पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठोकण्यासाठी वापरली हनुमान निती, काय आहे असं यात? जाणून घ्या


Hanuman Niti In Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरातून भारतीय सैन्याचं कौतुक केलं जातंय. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावर भाष्य केलंय. ऑपरेशन सिंदूर हे दहशतवाद्यांविरुद्ध भारताचे योग्य प्रत्युत्तर असल्याचे वर्णन त्यांनी केलंय. ऑपरेशन सिंदूरवेळी आपण हनुमान नितीचा अवलंब केल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. काय आहे हनुमान निती? जाणून घेऊया. 

ज्यांनी आमच्या निष्पापांना मारले, आम्ही त्यांना मारले’, हा भारताचा प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.हा हल्ला फक्त दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांपुरता मर्यादित होता. भारतीय सैन्याने अचूकता, दक्षता आणि मानवता दाखवली. यासाठी मी संपूर्ण सैन्याचे आणि पंतप्रधान मोदींचेही अभिनंदन करत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरची तुलना हनुमान नितीशी केली. हनुमानजींनी अशोक वाटिका येथे केलेल्या मोहिमेशी याचा संबंध जोडला. ज्याप्रमाणे हनुमानजींनी फक्त राक्षसी संरचना नष्ट केली, त्याचप्रमाणे भारताने दहशतवादाची रचना नष्ट केल्याचे ते म्हणाले. ते सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

‘आम्ही हनुमानजींच्या आदर्शांचे पालन केले आहे जे त्यांनी अशोक वाटिका नष्ट करताना पाळले होते. ‘जिन्ह मोही मारा तिन मोही मारे’ म्हणजेच आम्ही फक्त त्यांनाच मारले ज्यांनी आमच्या निष्पापांना मारले. पूर्वीप्रमाणेच यावेळीही आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे अड्डे उद्ध्वस्त करून योग्य प्रत्युत्तर दिले असल्याचे ते म्हणाले.

कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींकडून सैन्याचे कौतुक

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय सैन्याचे कौतुक केले. बैठकीच्या सुरुवातीला कॅबिनेट मंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ साठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. भारतीय सैन्याने तयारीनुसार आणि कोणतीही चूक न करता ही कारवाई केली. केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि संपूर्ण देश त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदींनी सैन्याचे कौतुक केले आणि हा एक अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले.

पंतप्रधान मोदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रात्रभर ‘ऑपरेशन सिंदूर’वर लक्ष ठेवून होते. ऑपरेशन योजनेनुसार पुढे जावे यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करी कमांडर्सशी सतत संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतीय लष्कर, हवाई दल आणि परराष्ट्र मंत्रालयाने ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल संयुक्त पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, हवाई दलाचे विंग कमांडर व्योमिका सिंग आणि भारतीय लष्कराचे कर्नल सोफिया कुरेशी सहभागी झाले होते. लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरील हल्ल्यांचे क्लिपही दाखवले.

ऑपरेशन सिंदूरची माहिती

या ऑपरेशनबद्दल कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली. त्या म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्यात आले. याअंतर्गत 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधा निर्माण होतेय. ज्या पाकिस्तान आणि पीओके दोन्हीमध्ये पसरलेल्या आहेत. पीओजेकेमधील पहिले लक्ष्य मुझफ्फराबादमधील सवाई नाला कॅम्प होते. जे नियंत्रण रेषेपासून 30 किमी अंतरावर आहे. हे लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण केंद्र होते. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सोनमर्ग, 24 ऑक्टोबर 2024 रोजी गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी येथून प्रशिक्षण घेतले होते.’

हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या, ‘हा हल्ला पहाटे 1.05 ते 1.30 च्या दरम्यान करण्यात आला.’ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ते यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले. नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी आणि कोणत्याही नागरिकांच्या जीवितहानी टाळण्यासाठी ही ठिकाणे निवडण्यात आली होती.’





Source link

Operation Sindoor : पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Operation Sindoor : पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया


Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आज म्हणजेच ७ मे रोजी दुपारी १:३० वाजता भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये जय हिंद! भारत माता की जय… या मोजक्या शब्दात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले, जय हिंद, न्याय झाला आहे. ही कारवाई सुरू करण्यापूर्वी, सैन्याने हल्ला करण्यास तयार, जिंकण्यासाठी प्रशिक्षित अशी पोस्ट केली होती.

संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट करून या हल्ल्याची माहिती दिली. पाकिस्तानविरुद्ध केलेल्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. “भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे, जे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अचूक आणि संयमी प्रत्युत्तर आहे, ज्यामध्ये एका नेपाळी नागरिकासह २६ लोकांचा मृत्यू झाला,” असे संरक्षण मंत्रालयाने पोस्ट केले.

९ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला

या कारवाईची माहिती देताना, संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, सीमापार दहशतवादी नियोजनाच्या मुळांना लक्ष्य करून, पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी पायाभूत सुविधांच्या ठिकाणी लक्ष केंद्रित हल्ले करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला झाला नाही. संरक्षण मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, ही कारवाई अनावश्यक चिथावणी टाळून गुन्हेगारांना जबाबदार धरण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाचे प्रतिबिंब आहे.





Source link

चार वर्षांचे अफेअर, लग्नाचे प्रपोजल, कुंडलीतील 'तो' योग अन् आत्महत्या; वसई हादरली

चार वर्षांचे अफेअर, लग्नाचे प्रपोजल, कुंडलीतील 'तो' योग अन् आत्महत्या; वसई हादरली


Vasai Crime News: वसईत 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीला आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी मुलाच्या कुटुंबीयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे आणि तू खालच्या जातीची आहेस, असे सांगून लग्नाला नकार दिल्याने तरुणी नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. पीडित तरुणी ही वसईत राहत असून महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तिचे आयुष राणा या तरुणासोबत मागील 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. या काळात लग्नाचे आमिष दाखवून आयुषने वारंवार तिच्याशी शरीरसंबंध ठेवले होते. मात्र नंतर तिला लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तो तिला टाळू लागला. 

तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे. तसेच तू खालच्या जातीची असल्याने माझ्या मुलाचे लग्न तुझ्याशी लावून देऊ शकत नाही, असे आयुषच्या वडिलांनी तरुणीला सांगितले. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या तरुणीने राहत्या घरी उंदीर मारायचे औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी वसई पोलिसांनी मुलीचा प्रियकर आणि त्याच्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. मात्र या प्रकारामुळं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

नवा व्यापार खेळताना मित्रांमध्ये भांडण, एकाची हत्या

नवा व्यापार ऑफलाईन गेम खेळताना दोन मित्रांमध्ये भांडण झालं. त्यानंतर जाब विचारायला गेलेल्या अल्पवयीन भावाचा यात नाहक बळी गेला. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी 19 सोहेब शेखला अटक करण्यात आलीये. 16 वर्षीय गणेश कुऱ्हाडेचा भाऊ कार्तिक आणि सोहेब हे एका मित्राच्या टेरेसवर खेळत होते. कॅरम खेळून झाल्यावर त्यांनी नवा व्यापार खेळायला सुरुवात केली. मात्र खेळता-खेळता वादाला तोंड फुटले, मग सोहेबने कार्तिकला मारहाण केली. त्यानंतर खेळ अर्धवट सोडून सगळे आपापल्या घरी परतले. कार्तिकने घरी येताच मोठा भाऊ गणेशला याबाबत सांगितले. गणेशने सोहेबकडे जात त्याला जाब विचारला. लहान असताना जाब कसा काय विचारला? या रागातून सोहेबने गणेशच्या पायात-पाय टाकून त्याला सिमेंटच्या रस्त्यावर जमिनीवर पाडले अन लाथांनी मारहाण ही केले. या घटनेत गणेशच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तातडीनं रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न ही झाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गणेशचा मृत्यू झाला होता. 





Source link

'फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर शिंदेंचा डोळा', राऊतांनी केलं सावध, शिंदेंवर साधला निशाणा

'फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर शिंदेंचा डोळा', राऊतांनी केलं सावध, शिंदेंवर साधला निशाणा


राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्री सन्मान सोहळ्यातील एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून संजय राऊतांनी जोरदार चिमटा काढला आहे. शिंदे सन्मान सोहळ्याला गेले नाही याचा अर्थ ते स्वत:ला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नसल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. यावेळी राऊतांनी फडणवीसांना शिंदेंपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. 

माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याला एकनाथ शिंदेंनी मारलेल्या दांडीवरुन सुरु झालेलं कवित्व संपण्याचं नाव घेत नाही. एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरुन अजितदादांनी नाराजी व्यक्त केली असताना संजय राऊतांनी या वादात आणखी तेल घालणारं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नसल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. एकनाथ शिंदे स्वतःला भावी मुख्यमंत्री समजत असल्यानं फडणवीसांनी त्यांच्यापासून सावध राहावं असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संजय राऊतांच्या या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. महायुतीचा सुखाचा संसार संजय राऊतांना पाहावत नसल्याचा टोला परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी लगावला आहे. महायुतीचा फेविकॉलचा जोड आहे तुटणार नाही असंही सांगायला सरनाईक विसरले नाहीत.

महायुतीत कोणतीही स्पर्धा नसल्याचं नेते सांगत असले तरी खुद्द एकनाथ शिंदेंनी आपण दरे गावात असलो की मुंबईतलं वातावरण तापतं असं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे मुंबईच्या तापमानाबाबत जे बोलले ते खरं असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. मुंबईचं तापमान वाढत असलं तरी शिंदेंनी वारंवार दरे गावात यावं असंही फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे हे शिंदेंनाच माहिती. पण संजय राऊत महायुतीत मिठाचा खडा कसा पडेल, महायुतीत विसंवाद कसा होईल याची दक्षता मात्र बाळगून असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं आहे. संजय राऊत काय बोलतात याची आपण दखल घेत नाही असं फडणवीस नेहमीच म्हणतात. यावेळीही राऊतांच्या इशा-याची दखल घेतली जाणार नाही याची मात्र खात्री बाळगता येणार नाही.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp