लेका शेतकऱ्याचा नाद करायचा नाही! पाहा हौसेपोटी बळीराजानं हेलिकॉप्टरमधून काढली मुलाच्या लग्नाची वरात

लेका शेतकऱ्याचा नाद करायचा नाही! पाहा हौसेपोटी बळीराजानं हेलिकॉप्टरमधून काढली मुलाच्या लग्नाची वरात


Wedding Video : लग्नाची वरात… हेलिकॉप्टरनं आली दारात…ग्रँड स्वागतानं नववधू भारावली. पंचक्रोशीत या एकाच लग्नाची चर्चा… 


Updated: Apr 19, 2025, 09:26 AM IST

Dharashiv farmers son wedding barat in helicopter video goes viral watch





Source link

'लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा',आश्वासनांचं भूत आता महायुतीच्या मानगुटीवर?

'लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा',आश्वासनांचं भूत आता महायुतीच्या मानगुटीवर?


Farmer Loan Waiver: लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा असा टोला खासदार अमोल कोल्हेंनी लगावला.. त्यानंतर कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधकांनी पुन्हा महायुती सरकारला घेरलंय. 

महायुतीचं सरकार सत्तेत येऊन 5 महिने उलटून गेलेत. मात्र महायुतीनं जाहीरनाम्यात दिलेलं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन अजून पूर्णत्वास गेलेलं नाही. उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवारांपासून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी कर्जमाफीचा निर्णय लांबणार असल्याचीच वक्तव्य आजवर केलीयत. आता पुन्हा एकदा याच कर्जमाफीच्या मुद्दयावरुन विरोधकांनी महायुती सरकारला घेरलंय. लाडक्या बहिणींची तर काळजी घ्या मात्र लाडक्या दाजींना दिलेलं कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करा असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लगावलाय. 

दुसरीकडे नाशकात झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीही महायुतीला त्यांच्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांची आठवण करुन दिली. महायुतीनं जाहीरनाम्यात थापा मारल्याचा आरोपच ठाकरेंनी केला. मागच्या सरकारमध्ये महायुतीसोबत असलेले बच्चू कडूंचे महायुतीसोबतचे संबंध कडू झाले आणि ते महायुतीतून बाहेर पडले. मात्र आता त्याच बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 28 तारखेला आंदोलनाची हाक दिलीय आणि महायुतीला शिंगावर घेतलंय. 

नाशिक जिल्ह्यातच शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं शासन विरोधी जोरदार आंदोलन करत विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्याची होळी केली. सरकारला त्यांच्याच आश्वासनांची आठवण करुन देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. 

लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफीसारख्या आश्वासनांच्या जोरावर महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र सरकारी तिजोरीत खडखडाट असल्यानं कर्जमाफीवरुन सरकार टोलवाटोलवी करतंय. तर शेतकऱ्यांनाही कर्जमाफीसाठी न थांबता हप्ते बरा असं स्वत: अर्थमंत्री अजित पवार सांगताहेत. त्यामुळं ज्या आश्वासनांच्या जोरावर सत्तेत आले त्या आश्वासनांचं भूत आता महायुतीच्या मानगुटीवर बसलंय. आणि ते भूत सध्या विरोधकांच्या तोंडून प्रश्न विचारून महायुतीच्या विक्रमाला बेजार करु लागलंय.





Source link

Maharashtra Weather News : मुंबई जणू एक भट्टी, राज्यावर सूर्याचा कोप; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Maharashtra Weather News : मुंबई जणू एक भट्टी, राज्यावर सूर्याचा कोप; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काय परिस्थिती?


Maharashtra Weather News : कमाल तापमानात सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळं महाराष्ट्रावर सूर्य कोपल्याचंच मत सामान्यांनी बनवलं आहे. राज्याच्या विदर्भ आणि उत्तर भागासह मरावाड्यातही कुठे पारा चाळीशीपार किंवा कुठे पारा चाळीशीचा आकडा गाठताना दिसत आहे. परिस्थिती इतकी भयंकर आहे, की राज्यातील गिरीस्थानांवरही तीव्र सूर्यकिरणांचा मारा होत असल्या कारणानं नागरिकांची होरपळ सुरू आहे. 

एप्रिल महिन्याचा शेवट खुणावत असताना वाढलेल्या या होरपळीतून आता नेमका दिलासा कधी मिळणार याचीच प्रतीक्षा अनेकांना लागली आहे. पण, हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज पाहता इतक्यात दिलासा मिळणार नसल्याचच स्पष्ट होत आहे. पुढील 24 तासांसाठी राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

सध्या हिमालयात नव्यानं पश्चिमी झंझावात सक्रिय असून, राजयस्थानच्या वायव्य भागापासून आणि समुद्रसपाटीपासून 1.5 किमी अंतरावरील उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. परिणामी मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटक, केरळ, तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्यामुळं पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होण्याची चिन्हं आहेत. राज्यात सध्यातही मुसळधार पावसाचा इशारा नसून, आकाश मात्र ढगाळ राहील असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेसोबतच दमट वारे अडचणी वाढवणार असून, कोकण आणि मुंबई शहर उपनगरांमध्येही हे दमट हवामान अडचणी वाढवणार आहे. हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळं उष्मा आणखी जाणवत त्यामुळंही अडचणी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. मुंबई शहरात तापमानाचा आकडा 34 ते 37 अंशांदरम्यान असलं तरीही इथं आर्द्रतेमुळं उष्ण वारे अधिकच तीव्रतेनं शहराची भट्टी करताना दिसत आहेत. त्यामुळं पुढील 48 तासांमध्ये नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. 





Source link

MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता 'या' तारखांना होणार मुख्य परीक्षा

MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता 'या' तारखांना होणार मुख्य परीक्षा


No match is being played.

Apr 16, 2025 | Match 32

Indian Premier League, 2025

RR

(20 ov) 188/5

VS

DC

188/4(20 ov)

Delhi Capitals tied with Rajasthan Royals (Delhi Capitals win Super Over by 2 wickets)
Full Scorecard →

Apr 15, 2025 | Match 31

Indian Premier League, 2025

KKR

(15.3 ov) 111

VS

PBKS

95(15.1 ov)

Punjab Kings beat Kolkata Knight Riders by 16 runs
Full Scorecard →

Apr 14, 2025 | Match 30

Indian Premier League, 2025

CSK

(20 ov) 166/7

VS

LSG

168/5(19.3 ov)

Chennai Super Kings beat Lucknow Super Giants by 5 wickets
Full Scorecard →





Source link

भुसावळमध्ये कुत्र्यांची दहशत, वर्षभरात 4 हजार 477 नागरिकांना कुत्र्यांचा चावा

भुसावळमध्ये कुत्र्यांची दहशत, वर्षभरात 4 हजार 477 नागरिकांना कुत्र्यांचा चावा


वाल्मिक जोशी (प्रतिनिधी) भुसावळ : भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पाहायला मिळतेय. भटक्या कुत्र्यांमुळे भुसावळकरांची घाबरगुंडी उडाली आहे. कधी कुणाला कुठे भटका कुत्रा चावा घेईल याचा काही नेम नाहीये. कारण वर्षभरात भुसावळमध्ये तब्बल 4 हजार 477 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. म्हणजे दिवसाला 12 ते 13 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. 

जळगावच्या भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पाहायला मिळतेय. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना अक्षरक्षा जीव मुठीत घेऊन वावरावं लागतंय.. याचं कारण म्हणजे शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना. शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रमुख रस्ते आणि सर्वच भागांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्या धुमाकूळ घालतायत. भुसावळमध्ये वर्षभरात तब्बल 4 हजार 477 जणांना भटक्या कुत्र्यांने चावा घेतला आहे. त्यामुळे भुसावळमध्ये दिवसाला 12 ते 13 नागरिकांना भटके कुत्रे चावा घेताहेत.  भटक्या कुत्र्यांचा शहरात एवढा धुमाकुळ सुरू असताना नगर परिषद प्रशासन काय करतंय हा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र नगर परिषद प्रशासनाचं या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाकडे लक्ष नाही आहे.

हेही वाचा : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसह चार हॉस्पिटलही संशयाच्या भोवऱ्यात; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट

 

भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत : 

भुसावळमधील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत असून दिवसाला सरासरी 12 ते 13 जणांवर कुत्र्यांचा हल्ला होतो. लहान मुलांना चावा घेतल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या त्रासाकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असून मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण दोन महिन्यांपासून रखडलंय. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी 30 लाखांचा निधी मंजूर असून निर्बिजीकरणाचं ठेकेदाराला दिलेलं काम तांत्रिक अडचणीमुळे रखडलं आहे. 

आतापर्यंत वर्षभरात भटक्या कुत्र्यांनी साडे चार हजार नागरिकांना चावा घेतलाय. मात्र पालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाहीय. सांगलीत संभाजी भिडे यांनी कुत्र्याने चावा घेतल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. आणि भटक्या कुत्र्यांची धरपकड सुरू करण्यात आलीय. तसंच भुसावळ पालिकाही कोण्या मोठ्या नामांकीत व्यक्तीला कुत्र्याने चावा घेतल्यावरच याकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न भुसावळकर विचारत आहेत. 





Source link

औरंगजेबाच्या कबरीसाठी आता थेट संयुक्त राष्ट्रांना पत्र, मुघलांचा वंशज म्हणतो 'भारताने 1972 मध्ये….'

औरंगजेबाच्या कबरीसाठी आता थेट संयुक्त राष्ट्रांना पत्र, मुघलांचा वंशज म्हणतो 'भारताने 1972 मध्ये….'



औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) हटवण्यावरुन नागपुरात हिंसाचार (Nagpur Violence) झाल्याच्या एका महिन्यानंतर हे पत्र लिहिण्यात आलं आहे. 
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp