पुण्यात घडली भयानक घटना; कुत्रीवर लैंगिक अत्याचार; CCTV फुटेजमध्ये दे दिसले ते पाहून पोलिसही हादरले

पुण्यात घडली भयानक घटना; कुत्रीवर लैंगिक अत्याचार; CCTV फुटेजमध्ये दे दिसले ते पाहून पोलिसही हादरले


Pune Crime News :  पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.  एका विकृत व्यक्तीने चक्क कुत्र्यावरच अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या नराधमाचे सर्व भयानक कृत्य CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी विकृताला अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

पुण्याच्या हडसपर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. हलीमुद्दीन शेख असे आरोपीचे नाव आहे.  मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. सध्या तो हडपसरमधील हांडेवाडी परिसरात राहतो. तो एका व्यक्तीकडे काम करत होता आणि तिथेच राहत होता. घराचा मालक कामानिमित्ताने बाहेर गेला होता. यावेळी मालकाचा पाळीव कुत्रा आणि   हलीमुद्दीन शेख असे असे दोघेच घरी होते. 

संबंधित कुत्र्याचे मालक घरी परतल्यानंतर कुत्र्याच्या वागणुकीमध्ये अचानक बदल जाणवू लागला. यामुळे मालकाला शंका आली. त्यानंतर त्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याला धक्काच बसला. हलीमुद्दीन शेख हा कुत्रीसह अमानवी कृत्य करत असल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसून आले. मालकाने तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून CCTV फुटेज पाहिले असता पोलिसही हादरले.  CCTV फुटेजमध्ये   हलीमुद्दीन शेख हा कुत्रीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी काळेपडळ पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मानवी दातांना शस्त्र मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे चावा घेतल्यानंतर दखलपात्र गुन्हा नोंदवता येणार नाहीयं… तर  मानवी दातांनी चावणं,  यापुढे अदखलपात्र गुन्हा ठरणार आहे.
व्यवसायाने वकील असणाऱ्या तानाजी सोलनकर आणि माया सोलनकर यांच्यात मालमत्तेचा वाद होता. यावरून त्यांच्यात भांडण झाले. माया यांनी आरोप केला की, वकील सोलनकर यांनी माया आणि तिचा भाऊ लक्ष्मण यांच्या हाताला चावा घेतला आणि त्यामुळे त्यांना दुखापत झाली.. या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले…





Source link

5 वर्षात विमा कंपन्यांना 50 हजार कोटींचा नफा, सरकार शेतकऱ्यांसाठी आतातरी प्रामाणिक प्रयत्न करेल?

5 वर्षात विमा कंपन्यांना 50 हजार कोटींचा नफा, सरकार शेतकऱ्यांसाठी आतातरी प्रामाणिक प्रयत्न करेल?


Farmers Compensation: आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी बातमी समोर आलीय. एकीकडे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळाली नाहीय. मागच्या काही वर्षात पिक विम्याची नीट नुकसान भरपाई मिळालनी नाहीय. मा मात्र या पिकविमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांना जास्त झालाय. तोही इतका की विमा कंपन्या करोडपती झाल्यात.

आपल्याकडे जनहिताच्या अनेक योजना या जनतेऐवजी धनदांडग्यांना अधिक धनवान करणाऱ्या ठरल्यात. तसाच प्रकार आता पीक विमा योजनेच्या बाबतीत घडलाय. कारण मागच्या काही वर्षात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत घट झालीय. मात्र त्याचवेळी मागच्या 5 वर्षात पीक विमा कंपन्यांना मात्र तब्बल 50 हजार कोटींचा नफा झालाय. एकट्या महाराष्ट्रातून तब्बल साडेदहा हजार कोटींचा नफा पीक विमा कंपन्यांनी कमावलाय.  

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 2019 ते 2024 या 5 वर्षांत एकूण 17 पीक विमा कंपन्यांना 1 लाख 54 हजार 543 कोटी रुपयांचा एकत्रित विमा हप्ता मिळाला. या 5 वर्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 1 लाख 5 हजार कोटी रुपयांची मदत मिळाली. म्हणजेच उरलेली 49 हजार 704 कोटी रुपयांचा नफा विमा कंपन्यांनी कमावलाय.

फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास शेतकरी बेहाल, विमा कंपन्या मालामाल अशी स्थिती आहे. राज्यात 2016-17 पासून पीकविमा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. 2016 ते 2024 या 8 वर्षांत विमा कंपन्यांना 43 हजार 201 कोटींचा हप्ता मिळाला. यात शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं दिलेली एकूण रक्कम आहे.विमा कंपन्यांकडून शेतक-यांना 32 हजार 610 कोटी रुपये भरपाई, विमा कंपन्यांनी शेतीच्या नुकसान भरपाईपोटी शेतक-यांना 32 हजार 610 कोटी रुपये दिले. म्हणजेच 8 वर्षात विमा कंपन्यांना 10 हजार 591 कोटींचा नफा झाला.

यावरुन आता विरोधकांनी विमा कंपन्या आणि सरकारवर टीकेची झोड उठवलीय. दरम्यान विमा कंपन्यांना मनमानी कारभार करु देणार नाही, मुख्यमंत्री विमा कंपन्यांवर लक्ष ठेवून आहेत इतकंच सावध उत्तर भाजपकडून देण्यात आलंय.

नैसर्गिक आपत्तीनं पिचलेल्या शेतकऱ्यांना पिकविम्याच्या काडीचा आधार मिळावा यासाठी पिकविमा योजना सुरु झाली. मात्र शेतकरी आणि सरकारकडून हप्त्यांची काडीकाडी जमा करुन नफ्याची मोळी आपल्याच पाठीवर टाकून पीक विमा कंपन्या गलेलठ्ठ झाल्यात. तेव्हा अशा पीकविमा कंपन्यांच्या पारदर्शक कारभारासाठी आणि पिचलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार किमान आतातरी प्रामाणिक प्रयत्न करेल ही अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.





Source link

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कांदळवनांची कत्तल; नुकसानभरपाईसाठी थेट चंद्रपुरात वृक्ष लागवड

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कांदळवनांची कत्तल; नुकसानभरपाईसाठी थेट चंद्रपुरात वृक्ष लागवड


Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोडचा पहिला टप्पा दक्षिण मुंबईत सुरु झाला आणि शहराच्या रस्ते मार्गानं सुरू असणाऱ्या प्रवासामध्ये एक नवा टप्पा सर करण्यात आला. मात्र आहा याच कोस्टल रोच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भातील एका वृत्तानं सर्वांच्याच चिंतेत भर टाकली आहे. 

मुंबईतील कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कांदळवनातील 9 हजार झाडं तोडली जाणार आहेत. त्याच्या बदल्यात पर्यावरणाची झालेली हानी चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करून भरून काढण्याचा अजब मार्ग पत्करण्यात आला आहे. कोस्टल रोड प्रकल्पामुळे वर्सोवा ते भाईंदर दरम्यानच्या भागातील कांदळवने बाधित होणार आहेत. त्याची नुकसानभरपाई म्हणून चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळील परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपुरात वृक्षारोपण करण्याचा प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, ज्यामुळं या निर्णयानं सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या असून पर्यावरणस्नेही संस्थांनी या निर्णयाचा विरोध केल्याचं पाहायाला मिळत आहे. 

विकासाच्या नावावर सध्याच्या घडीला समुद्रकिनारी भागात असणाऱ्या कांदळवनांची होणारी आणि झालेली हानी चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करून भरून काढण्याचा अजब मार्ग पत्करण्यात आल्यानं सध्या हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. 

दरम्यान या कांदळवनांच्या अभावी होणारी हानी आणि त्यांचे दुष्परिणाम चंद्रपूरमध्ये झाडे लावून भरून कशी निघणार असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी वर्सोवा ते भाईंदर दरम्यानच्या विस्तारासाठी वर्सोवा ते भाईंदर या भागात असणाऱ्या कांदळवनतोडीवर पर्यायी मार्ग शोधत चंद्रपूरातील या प्रस्तावित वृक्षलागवडीला केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी देत भरपाई म्हणून वनीकरण करण्याची अटही घालण्यात आली. पण, इथं भौगोलिक क्षेत्रानुसार आणि हवामानानुसार वनांची रचना, वनस्पतीची विविधता आणि त्यांचे गुणधर्म या गोष्टी मात्र विचाराता न घेतल्या गेल्याचंच स्पष्ट होत आहे. 

सदर निर्णयानंतर कांदळवनाच्या तोडीमुळं त्याचा पर्यावरणावर आणि मच्छीमार समाजाच्या उपजीविकेवर थेट परिणाम होणार असून, प्रत्यक्षात त्याची भरपाई कांदळवनं नसलेल्या ठिकाणी करून काय साध्य होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.





Source link

शरद पवार कालही दैवत होते आणि आजही दैवत, अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या, काका-पुतण्यामध्ये चाललंय काय?

शरद पवार कालही दैवत होते आणि आजही दैवत, अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या, काका-पुतण्यामध्ये चाललंय काय?



राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामध्ये मोठं राजकीय वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं 
 



Source link

'पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत…', चिठ्ठी लिहून आजोबांची आत्महत्या; 2 घटना अन् 4 मृत्यू

'पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत…', चिठ्ठी लिहून आजोबांची आत्महत्या; 2 घटना अन् 4 मृत्यू


Crime News Husband Killed Wife: नाशिक आणि बार्शीमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जोडीदारानेच आपल्या पत्नीला संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये पतीने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केली आहे. या घटनाचा सविस्तर तपशील समोर आला असून नाशिकमधील मयत दांपत्य निवृत्त शिक्षक आहेत. तर बार्शीमधील पतीने घरासमोरील बदामाच्या झाडाला लटकून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नेमकं घडलं काय आणि सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊयात…

किरकोळ कारणावरुन पती-पत्नीमध्ये वाद

बार्शीमध्ये किरकोळ वादातून पतीने पत्नीचा खून केला आणि त्यानंतर पतीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना शेलगाव आरमध्ये घडली आहे. मयत पतीचं नाव वसंत पवार असं असून त्याच्या पत्नीचं नाव आयनाबाई उर्फ सोनाबाई पवार असं आहे. वसंत पवारला दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नीसोबत किरकोळ भांडण विकोपाला जायचे.

पत्नीचा जागीच मृत्यू तर वडीलांचा हात फ्रॅक्चर अन् त्यानंतर…

मंगळवारी रात्री दारू पिऊन आल्यानंतर वसंतने पत्नी सोनाबाई आणि वडील अंबादास यांना किरकोळ कारणावरून लाकडी दंडुक्याने मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये सोनाबाईला डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागल्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तर वसंतचे वडील अंबादास यांचा हात या मारहाणीमध्ये फॅक्चर झाला. वसंत पवारने सकाळी घरासमोरील बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. वैराग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

78 वर्षीय माजी मुख्यध्यापकाने पत्नीला संपवलं

नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीची गळा दाबून हत्या केली. पत्नीला मारल्यानंतर पतीने स्वतः गळफास घेतला. पत्नीची हत्या करुन स्वत: आत्महत्या करणाऱ्या पतीचं नाव मुरलीधर जोशी असं असून ते 78 वर्षांचे होते. तर मयत पत्नीचं नाव लता जोशी असं आहे. हे दोघेही निवृत्त शिक्षक होते. दोन्ही मुले मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. या अपार्टमेंटमध्ये मुरलीधर आणि लता हे दोघेच राहत होते. लता जोशी यांना 2017 पासून मेंदू विकाराचा त्रास होता. त्या एकदा व्हेंटिलेटरवरही होत्या. दीर्घ आजारपणाला हे दांपत्य कंटाळले होते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

चिठ्ठीत लिहिलेली ‘ती’ 2 वाक्यं

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुरलीधर जोशी यांनी, “पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत जात आहे,” असं लिहिलेलं आढळून आलं. “आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही”, असंही चिठ्ठीत लिहिल्याचं आढळून आलं. 





Source link

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. घैसासांचा हलगर्जीपणा? डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार?

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. घैसासांचा हलगर्जीपणा? डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार?


तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय. आता तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉ सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातील दोन्ही चौकशी अहवालांमध्ये डॉ. घैसास दोषी आढळल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय. तनिषा भिसे मृत्यू मृत्यू प्रकरणी मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसासांविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन अहवाल सादर करण्यात आलेत. या दोन्ही अहवालात डॉ. घैसास हे दोषी आढळून आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीये. त्यामुळे येत्या दोन दिवसांत डॉ. घैसास यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील संबंधीत डॉक्टर आणि व्यवस्थापन तनिषा भिसे यांच्या मृत्यूला कारणीभूत आहे.. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप आणदार अणित गोरखे यांनी केलीय.

तर तनिशा भिसेंचा मृत्यू नाही तर ती हत्याच असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी सुळे यांनी केलीय.

या प्रकरणात आरोप करण्यात आलेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आधीच राजीनामा दिलाय. मात्र त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागलीय. आता चौकशी अहवालातही ते दोषी असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय. त्यामुळे डॉ. घैसास आणि मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाच्या अडचणी वाढण्याची शक्यताय.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. पेशंटसमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आल्याचं चाकणकर यांनी सांगितलं. रुग्ण तब्बल साडेपाच तास रुग्णालयात होती. यावेळी रक्तस्त्राव सुरु असतानाही उपचार करण्यात आले नाहीत असं चाकणकरांनी म्हटलंय. याप्रकरणी शासकीय अहवालानंतर आणखी दोन अहवाल येणार आहेत. या तिन्ही अहवालानंतर कारवाई करणार असल्याचं चाकणकरांनी सांगितलं. या प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाचा हलगर्जीपणा असल्याचंही चाकणकरांनी नमूद केलंय.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp