by Hansraj Agrawal | Jan 31, 2025 | Trending News
बीडमधील बुट्ट्या गायकवाड खून प्रकरणाची 11 वर्षानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षाही बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरण गंभीर असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. गायकवाड यांच्या हत्येत भाजप आमदार सुरेश यांचा हात होता का? याचा तपास करणं गरजेचं असल्याचं सदावर्ते यांनी म्हंटलं आहे. सदावर्तेंनी काय आरोप केले आहेत, आणि बीड प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या धस यांनी काय उत्तर दिलं आहे ते जाणून घ्या.
बुट्ट्या गायकवाडच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण?
बुट्ट्याच्या हत्येची फाईल ओपन करण्याची मागणी
आष्टीतील हत्येची 11 वर्षानंतर पुन्हा चर्चा
बुट्ट्या गायकवाडची 11 वर्षापूर्वी म्हणजेच 2014 साली हत्या झाली होती. या हत्येचा मास्टरमाईंड कोण असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी उपस्थित केला आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर महादेव मुंडे, बापू आंधळेच्या हत्या कुणी केल्या असा सवाल भाजप नेते सुरेश धस यांनी उपस्थित केला होता.
सुरेश धसांनी परळीतल्या अनेक खुनांबाबत प्रश्न विचारला. एवढंच नव्हे तर पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रेवरही आरोप केले. भास्कर केंद्रे हे मटका व्यावसायिकाचे भागीदार असल्याचा आरोप केला. शिवाय त्यांचे 100 टिप्पर असल्याचाही आरोप सुरेश धसांनी केला.
स्वतः भास्कर केंद्रेंनी हे आरोप फेटाळले. भास्कर केंद्रेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये भास्कर केंद्रे असं नाव सांगणाऱ्यानं बुट्टेच्या हत्येमागं सुरेश धस असल्याचा आरोप केला. त्यावेळी तपास पथकात आपण होतो त्याच रागातून सुरेश धसांनी आरोप केल्याचा दावा करण्यात आला.
वकील गुणरत्न सदावर्तेही आता पुढे आलेत. त्यांनी बुट्ट्या गायकवाड हत्येची फाईल रिओपन करण्याची मागणी केली आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीतही बुट्ट्या गायकवाडबाबत सुरेश धसांना विचारण्यात आलं. यावर धसांनी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.
परळीच्या खुनांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तर आष्टीतल्या बुट्ट्याच्या खुनाचीही पुन्हा चौकशी कऱण्याची मागणी होत आहे. आष्टीचे आमदार सुरेश धस आहेत. बुट्ट्याच्या निमित्तानं सुरेश धसांचा इतिहास तर तपासून पाहिला जात नाही ना याची चर्चा सुरु झाली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 31, 2025 | Trending News
पुढील
बातमी
कल्याण- डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! अत्यंत वर्दळीचा ‘हा’ मार्ग 5 दिवस बंद, असे आहेत पर्यायी मार्ग
Source link
by Hansraj Agrawal | Jan 30, 2025 | Trending News
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दोन ओळींचा संवाद राज्यात चर्चेचा विषय झालाय. चंद्रकांतदादांच्या ज्या भावना आहेत त्या भावना भाजपमधील अनेक नेत्यांच्या असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 30, 2025 | Trending News
पुढील
बातमी
जनतेने सतर्क राहायचे म्हणजे काय? ‘गो गुलियन गो’ नारे लावायचे की..; ठाकरेंच्या सेनेचा सरकारवर हल्लाबोल
Source link
by Hansraj Agrawal | Jan 29, 2025 | Trending News
Nitesh Rane on Burkha Wearing Student: महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत पार पडणार आहे. परीक्षेला महिना शिल्लक असताना विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत आहेत. दरम्यान भाजप मंत्री नितेश राणे यांनी शालेय शिक्षण विभागाला पत्र लिहिलंय. यात दहावी-बारावीच्या परीक्षेत बुरखा घालून प्रवेश नाकारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेत विद्यार्थीनींना बुरखा घालून परिक्षा केंद्रात प्रवेश नको, अशी मागणी मस्त्य विकास मंत्री नितेश राणेंचे शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहून केली आहे. राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांच्या धर्तीवर हे पत्र लिहिण्यात आले आहे. कॉपीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करत ही मागणी करण्यात आली आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
दहावी, बारावी परीक्षेत बुरखा घातलेल्या विद्यार्थीनींना परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये असे नितेश राणे म्हणाले. माध्यमिक शाळेत उच्च माध्यमिक शाळेत परिक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता देण्याचं प्रमाणपत्र दिल्याचं परिपत्रक आहे. असं लांगुलचालन चालणार नाही अशी भूमिका मी शिक्षण मंत्र्यांकडे मांडल्याचे नितेश राणे म्हणाले. बुरखा घालून परीक्षेला बसल्याचे इतरही धोके आहेत. याचे धोके लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केल्याचे ते म्हणाले.
लांगुलचालन आम्हाला मान्य नाही. हा निर्णय 2024 सालचा आहे. हे निर्णय रद्द करण्यासाठी मागणी केली. परिक्षेसोबतच मतदानाच्या वेळीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत. नेमकी तीच विद्यार्थीनी परीक्षेला आहे का? हे देखील पाहावं लागेल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये, असे राणे यावेळी म्हणाले. नितेश राणेंच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्याला राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. विशिष्ठ धर्माचे लांगुलचालन होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. सरकारचा भाग म्हणून मी बोलतोय. असं परिपत्रक काढलं असेल तर ते तात्काळ रद्द करा, असे ते यावेळी म्हणाले.
दोन शिफ्टमध्ये परीक्षा
महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षेचा पहिला पेपर भाषा विषयाचा असेल तर सामाजिक विज्ञान विषयाचा पेपर शेवटचा असेल. दहावीची परीक्षा 2 शिफ्टमध्ये होणार आहेत. सकाळच्या शिफ्टची परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तर दुपारच्या शिफ्टची परीक्षा दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होईल. असे असले तरी काही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतल्या जातील, अशी माहिती महाराष्ट्र बोर्डाकडून देण्यात आली आहे.
हॉलतिकीट कसे डाउनलोड कराल?
दिलेल्या सूचनांचे पालन करून शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या वतीने हॉल तिकीट डाउनलोड करू शकते. यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जा. होमपेजवर उपलब्ध असलेल्या एसएससी हॉल तिकीट 2025 लिंकवर क्लिक करा आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स सबमिट करा. महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट 2025 स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती विद्यार्थ्यांना वितरीत करा.अधिकृत नोटिफिकेशननुसार, महाराष्ट्र बोर्ड एसएससी हॉल तिकीट 2025 मध्ये दुरुस्त्या करता येतील. विद्यार्थ्याचे नाव, आईचे लग्नापूर्वीचे नाव, जन्मतारीख किंवा जन्मस्थान यासारख्या काही क्षेत्रात चुका असतील तर तुम्ही बदल करू शकता. दुरुस्त्या करण्यासाठी, उमेदवारांना विहित शुल्क भरावे लागेल. विभागीय मंडळाच्या मंजुरीनंतर सुधारित महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट 2025 ‘सुधारणा प्रवेशपत्र’ लिंकद्वारे डाउनलोड करता येईल. विषय किंवा माध्यमात बदल करण्यासाठी शाळांना थेट विभागीय मंडळाशी संपर्क साधावा लागेल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 28, 2025 | Trending News
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस चौकीतून संशयित आरोपी फरार झाला आहे.
Source link