'छावा' चित्रपट रिलीजआधीच वादात, लेझीम नृत्यावरुन वाद; संभाजीराजे छत्रपती म्हणाले 'सिनेमॅटिक लिबर्टीवर…'
छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंच्या लेझीम नृत्याला शिवप्रेमींनी विरोध केला आहे
Source link
छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंच्या लेझीम नृत्याला शिवप्रेमींनी विरोध केला आहे
Source link
Uddhav Thackeray Mumbai Rally: उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेत संबोधित करताना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मला सूड हवाय, वेळ येईल तेव्हा एकटे लढण्याचा निर्णय घेईन असं त्यांनी जाहीर केलं आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण स्वबळावर लढावं असं मत मांडलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नादी लागू नका असा इशारा दिला आहे. “जास्त आमच्या नादी लागू नका. जेवढे अंगावर याल तितके वळ घेऊन दिल्लीला जाल,” अशा शब्दांत त्यांनी अमित शाह यांना सुनावलं आहे.
“सगळ्यांचं मत आहे की एकटे लढा. तुमची तयारी झाली आहे याची खात्री पटल्यानंतर मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेईन. पण यावेळी मला सूड हवा आहे. जो महाराष्ट्राच्या पाठीत, कुशीवर वार करतो तो गद्दार आणि त्याचा वरदहस्त महाराष्ट्रात दिसता कामा नये. वेळ येईल तेव्हा एकटे लढण्याचा निर्णय घेईन,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
“घराघरात त्यांनी प्रचार केला की मी हिंदुत्व सोडले. बाबरी पाडली याबद्दल वाजपेयी,अडवाणींनी माफी मागितली होती. नवाज शरीफांच्या बर्थडेचा केक मोदी तुम्ही खायला गेला होता. अमित शाहांना आवाहन आहे की भाजपाच्या झेंड्यातील हिरवा काढा मग. भाजप आरएसएस फक्त काड्या लावते. दंगली पेटवून पळायचे, बाबरी पाडली पण आम्ही नाही त्यातले बोलले,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. मी हारणारा नाहीय. मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
“निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा आपण भेटत आहोत. हिंदूह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आपण षणमुखानंद हॉलमध्ये करणार होतो. पण दोन महिन्यांपूर्वी जो काही निकाल लागला तो मला पटला नाही. मधे अब्दाली म्हणजे अमित शाह इथे येऊन गेले. त्यांनी महाराष्ट्रातील हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे असं म्हटलं. अमित शाहजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
“अमित शाह यांचा समाचार घेतो. उद्या परत येणार आहेत. काल काय बोलले त्याचा आज आणि उद्या काय बोलतील त्याचा परवा समाचार घेणार. पण समाचार घेणार, मी नाही सोडत. मिठी मारु तर प्रेमाने मारु, पण पाठीत वार केल्यावर वाघनखं काढू. हा महाराष्ट्र आहे आणि ही महाराजांची शिकवण आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मी मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शंभूराजे नऊ वर्ष स्वराज्याचे छत्रपती म्हणून होते. या काळात संभाजी महाराजांचीही स्वतंत्र राजमुद्रा होती. पण अनेकांना राजमुद्रा आणि त्याचा अर्थ माहिती नाहीये? आज या निमित्ताने जाणून घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर संभाजी महाराज यांचा छत्रपती म्हणून राज्यभिषेक करण्यात आला. 1680 साली शिवरायांचे निधन झाले त्यानंतर एक 1681 साली त्यांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून ते राज्यकारभार पाहू लागले. पण नवीन राज्य चालवण्यासाठी नवी राजमुद्रा लागते. संभाजी महाराज यांनी नवी राजमुद्रा तयार केली. संस्कृत भाषेत राजमुद्रा असून पिंपळाच्या पानावर आहे. त्यावर 16 बुरुज आहेत.
”श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।
यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।”
राजमुद्रेचा मराठीत अर्थ असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे. आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल.
याच राजमुद्रेच्या आधारावर संभाजी महाराजांचा राज्यकारभार चालवला होता. तसंच, शिवाजी महाराजांनी जशी राज्यात स्वतंत्र नाणी पाडली त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनीदेखील राज्यभिषेकानंतर स्वतंत्र नाणी पाडली. शिवरायांनी आणलेल्या नाण्यांना शिवराई तर शंभूराजांनी पाडलेल्या नाण्यांना शंभुराई असे म्हटलं जातं.
शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे. 1646 मध्ये पहिल्यांदा या राजमुद्रेचा वापर करण्यात आला असं अभ्यासकांचे मत आहे. तसंच, 1680 पर्यंत या राजमुद्रेचा वापर केला जायचा.
”प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता॥
साहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥”
प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी आकाने प्रयत्न केले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी देखील केला आहे.
Source link
Shaktipeeth Expressway News In Marathi: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच (MERDC) ने नागपुर -गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे तयार करणार आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. यामुळं कनेक्टिव्हीटी वाढणार असून पर्यटन तर वाढेलच पण त्याचबरोबर देवस्थानांचे पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. तसंच, या महामार्गामुळं 18-20 तासांचा प्रवास 8-10 तासांवर येणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणार असून महाराष्ट्र-गोवाच्या सीमेवरील पत्रादेवी येथे संपतो. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी आणि सिंधुदुर्ग सह 12 जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे. जलद आणि अधिक सुविधा असलेल्या या मार्गामुळं प्रवासांचा प्रवास सोप्पा होण्यास मदत मिळणार आहे.
शक्तीपीठ महामार्गाचे प्रमुख उद्दिष्ट्य हे तीर्थस्थळांना जोडणं हे आहे. वर्धा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत असलेल्या महामार्गामुळं भाविकांना आणि पर्यटकांना प्रवास करणे अधिक सुकर होणार आहे. ज्यामुळं देवस्थानांच्या पर्यटनाला चालना मिळणार असून या क्षेत्राचा आर्थिक विकासदेखील होणार आहे.
नागपूर-गोवा महामार्गाचे नाव शक्तीपीठ ठेवण्यात आले आहे कारण हा महामार्ग राज्यातील तीन देवींच्या शक्तीपीठांना जोडतो. शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई, महाराष्ट्राची कुळस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तीपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा शक्तीपीठ माहामार्ग जोडला जाणार आहे.
नागपूर – वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 86,000 कोटी इतका येण्याची शक्यता आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वे 701 किमी लांबीचा आहे. तर, शक्तीपीठ एक्स्प्रेसवे एकूण 802 किलोमिटरचा हा प्रस्तावित रस्ता आहे. यासाठी 27 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. भारतातील सर्वाधीक लांबीचा महामार्गाच्या यादीत समाविष्ट होणार आहे.