मोसमी पावसाचं आगमन होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागात पावसान जोरदार हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज असून उद्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट तर उद्या रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवार 14 जूनपासून पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांना ऑरेंज, रेलड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहणे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह वादळे, ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहतील.
विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहणे आणि दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुण्याला झोडपलं
पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, पुणे येथे काही ठिकाणी ४०-६० किमी प्रतितास वेगाने गडगडाटी वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे. आज शुक्रवारीच पावसाने पुण्यात हजेरी लावली. पुण्यातील आयबी रेस्ट हाऊसमधे पावसाचं पाणी घुसलं होतं. पावसांच्या पाण्याची ड्रेनेज लाईन बंद झाल्याने आय बी गेस्टहाउस ला तळ्याचं स्वरूप आलं होतं. अनेक खोल्यांमधे ही पाणी घुसल होतं.