'तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील' म्हणत मित्रमैत्रिणी चिडवायचे, मुंबईत तरुणीने स्वत:ला संपवलं; सुसाईड नोटमध्ये श्रद्धा वालकरचा उल्लेख

'तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील' म्हणत मित्रमैत्रिणी चिडवायचे, मुंबईत तरुणीने स्वत:ला संपवलं; सुसाईड नोटमध्ये श्रद्धा वालकरचा उल्लेख


24 Year Old Woman End Her Life In Mumbai: मुंबईमधील नामांकित वस्तीमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील अँटॉप हिल भागात राहणाऱ्या एका तरुणीने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून घेतल्याची घटना घडली आहे. मयत तरुणीचं नाव स्तुती सोनावणे असं असून या प्रकरणामध्ये हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. या तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

सहा पानांची सुसाईड नोट

24 वर्षीय स्तुती नवी मुंबईतल्या एका डेंटल मेडिकल कॉलेजमध्ये एमडीएसचं शिक्षण घेत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना स्तुतीच्या आत्महत्येसंदर्भात फोनवरुन माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीन घटनास्थळी धाव घेतली असला तिने ओढणीने गळफास लावून स्वत:ला संपवल्याचं घटनास्थळावरील परिस्थितीवरुन स्पष्ट झालं. या ठिकाणी पोलिसांना सहा पानांची सुसाईड नोटही मिळाली. या सुसाईड नोटमध्ये स्तुतीने तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केला आहेत. प्रियकराचं नाव फजल मोहम्मद खान असल्याचं तिने चिठ्ठीत नमूद केलं आहे. फजल माझा छळ करायचा आणि माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायचा असं तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख

सुसाईड नोटमध्ये स्तुतीने, बॉयफ्रेंड फझल मोहम्मद खान हा नेहमी माझ्यावर गंभीर आरोप करायचा. चारित्र्यावर संशय घ्यायचा, असं म्हटलं आहे. स्तुतीने एकदा तिला प्रियकराने श्रद्धा वालकर प्रकरणाचा संदर्भ देत धमकावल्याचंही म्हटलं आहे. 18 मे 2022 रोजी श्रद्धा वालकरची तिच्या प्रियकराने निर्घृणपणे हत्या केली होती. या प्रकरणामुळे सगळा देश हादरला होता. श्रद्धाची हत्या तिचा प्रियकर आफताब पूनावालाने केली होती. तिच्या मृतदेहाचे तुकडे त्याने घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. तो मृदेहाचा एक एक तुकडा फेकून देत पुरावा नष्ट करत होता. श्रद्धाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे पोलिसांना फ्रिजमध्ये मिळाले होते. याच प्रकरणाचा उल्लेखही स्तुतीने सुसाईड नोटमध्ये करत आपलंही असं होईल अशी चेष्टा आपले मित्र-मैत्रिणीही मस्करीत म्हणायचे असा उल्लेख चिठ्ठीत असल्याचं वृत्त ‘द ट्रेब्यून’ने दिलं आहे.

आरोपी अटकेत

पोलिसांनी या प्रकरणात फझल मोहम्मद खान या 31 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. सोमवारी, 9 मार्चला स्तुतीने आत्महत्या केली. फझल मोहम्मद आणि स्तुती यांची ओळख एका डेटिंग अॅपवरुन झाली होती. मागच्या एक वर्षापासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. पण फझल तिला कायम त्रास देत होता आणि तिच्यावर संशय घेत होता, या प्रकरणात आता त्याची चौकशी सुरु आहे. अँटॉप हिल पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे बॉयफ्रेंडची भूमिका नेमकी काय होती त्याचा तपास सुरु केला आहे. तसंच तिच्या कुटुंबाशी आणि मित्र परिवाराशी चौकशी करणं आणि त्यांचे जबाब नोंदवणं ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील’

स्तुती तिच्या आई वडिलांसह अँटॉप हिल भागात राहायची. 9 मार्चला सकाळी 11 वाजेपर्यंत स्तुती तिच्या खोलीतून बाहेर पडली नाही. अर्धा दिवस उलटून गेला तरी मुलगी बाहेर का येत नाही या विचाराने घरच्यांनी आधी दार ठोठवलं पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडण्यात आला तेव्हा स्तुतीने गळफास लावून घेतल्याचं समोर आलं. तिला तातडीने सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. स्तुतीने असंही लिहून ठेवलं आहे की तिच्या बॉयफ्रेंडकडून तिला जो त्रास दिला जात होता आणि छळ केला जात होता ते सगळे प्रकार तिच्या मित्र-मैत्रिणींना माहीत होते. ते तिला ‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील’ असं चिडवायचे. आता अशाप्रकारे चिवडण्यामागे फझलने खरोखर तिला अशी काही धमकी दिली होती का याबद्दलचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी स्तुतीच्या मित्रमैत्रीणींचीही चौकशी सुरु केली आहे.





Source link

शिवी देणार त्याला 500 रुपये दंड, अहिल्यानगरच्या कोळगावचा ठराव; कचरा फेकणाऱ्याला भरावे लागणार 100 रुपये

शिवी देणार त्याला 500 रुपये दंड, अहिल्यानगरच्या कोळगावचा ठराव; कचरा फेकणाऱ्याला भरावे लागणार 100 रुपये



Ahilyanagar Kolegaon: अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोळगाव ग्रामपंचायतीनं शिवीबंदीचा ठराव केलाय. गावात आईबहिणीवरुन शिवी देणा-याला 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. गावात सामाजिक सौहार्दाचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी हा शिवीबंदीचा ठराव घेण्यात आलाय.
 



Source link

दुपारी भट्टी! मुंबई- ठाण्यात पारा चाळीशीवर; विदर्भ- मराठवाड्यातही होरपळ, 24 तासांत कोकणात वेगळंच हवामान संकट

दुपारी भट्टी! मुंबई- ठाण्यात पारा चाळीशीवर; विदर्भ- मराठवाड्यातही होरपळ, 24 तासांत कोकणात वेगळंच हवामान संकट


Maharashtra Weather News : विदर्भापासून कोकण आणि मराठवाड्यापासून अगदी मुंबईपर्यंत राज्यात उष्ण वारे वाहण्यास सुरुवात झाली असून हा दाह सूर्य मावळतीला गेल्यानंतरही कमी होताना दिसत नाहीये. वाऱ्यांमध्ये उष्मा सायंकाळी आणि अगदी रात्रीसुद्धा जाणवत असल्यानं यंदाचा उकाडा नेमका किती तीव्र आहे याचीच प्रचिती येत आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पूर्वेकडून कोकणाकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महामुंबईसह लगतच्या परिसरात उष्णतेची लाट आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सोमवारप्रमाणंच मंगळवारीही महामुंबईला उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार असून, या लाटेचा विपरित परिणाम म्हणजे मुंबईचा पारा 38 ते 39 अंशांदरम्यान आणि ठाण्यात हाच आकडा 41 अंशांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कमाल तापमानात झालेली ही लक्षणीय वाढ पाहता मे महिन्याच्या विचारानंही अनेकांनाच घाम फुटत आहे. मुंबई शहरात कमाल तापमानातील वाढीमुळे सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असून, दुपारची वेळ मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह कोकणासाठीसुद्धा भट्टीइतकी उष्णता देऊन जात आहे. 

पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान? 

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार राजस्थानसह गुजरात प्रदेशात निर्माण झालेल्या अँटीसायक्लोनचा परिणाम म्हणून सध्या उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेनं वाहत आहेत. परिणामी पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे कोकणात तापमान अधिक आहे. 

 

तिथं ठाणे, पालघर भागातही मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढला आहे. पारा 41 अंशांवर पोहोचला होता. गेल्या दहा दिवसांत शहरातील तापमानात मोठी वाढ होऊन तापमान ही वाढ 10 अंशांची असल्यानं पुढील 24 तासांमध्ये अर्थात 10 मार्च रोजी अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

मुंबई- 39.0
अकोला- 40.0
सांगली- 38.2
पुणे- 37.7
सोलापूर- 39.4
कोल्हापूर- 37.1

उष्ण दिवस वाढणार 

यंदाच्या वर्षी मार्च ते मे महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील आणि उष्ण दिवसांची संख्या वाढेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून या दरम्यान उष्माघाताचा धोका अधिक बळावताना दिसत आहे. ज्यामुळं उन्हाळ्यात शक्यतो जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असल्याचा इसारा देण्यात येत आहे. याशिवाय हलके, सुती कपडे वापरण्याचा सल्ला दिला जात असून, घराबाहेर पडताना गॉगल्स, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी यांसारख्या पेयांचे सेवन करावे असा सल्ला आरोग्य यंत्रणांनी दिला आहे. 

 





Source link

Uber, Rapido App वर महाराष्ट्र सरकारची मोठी कारवाई; परवाना रद्द, गुन्हे दाखल, बाईक बुक करता येणार नाही

Uber, Rapido App वर महाराष्ट्र सरकारची मोठी कारवाई; परवाना रद्द, गुन्हे दाखल, बाईक बुक करता येणार नाही



महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी मोठी कारवाई केली आहे.  बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांचा तात्पुरता परवाना रद्द करण्यात आला आहे.  यामुळे आता बाईक बुक करता येाणार नाही.
 



Source link

पुण्यातील पहिल्या डबल डेकर उड्डाणपुलाचे लोकापर्ण! वाहतूक कोंडी फुटणार

पुण्यातील पहिल्या डबल डेकर उड्डाणपुलाचे लोकापर्ण! वाहतूक कोंडी फुटणार


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

'मी उद्या रायगडावर जातोय,' राज ठाकरेंची घोषणा! मनसैनिकांना म्हणाले, 'मार्केट, शाळा, मंदिरं, कॉलेज…'

'मी उद्या रायगडावर जातोय,' राज ठाकरेंची घोषणा! मनसैनिकांना म्हणाले, 'मार्केट, शाळा, मंदिरं, कॉलेज…'


Raj Thackeray Appeal To MNS Workers: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व मनसैनिकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. राज ठाकरेंनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमधून हे आवाहन केलं असून आपण उद्या म्हणजेच 9 मार्च 2026 रोजी पक्षाचा 20 वा वर्धापनदिन असल्याने रायगडावर जाऊन सदस्य नोंदणीला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं आहे. राज यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात अगदी जसंच्या तसं…

Add Zee News as a Preferred Source

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, 
सस्नेह जय महाराष्ट्र,

आपल्या पक्षाचा उद्या, 9 मार्च 2026 ला 20 वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी 10 मार्च 2026 पासून सुरु होत आहे. उद्या 9 मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण ‘शिवराज्याभिषेकाचा’ साक्षीदार देखील हा किल्लाच. अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत. 

आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या. 

सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला 10 मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॉलेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत ! येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलसं करत ही सभासद नोंदणी करा. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा ! तसे आदेश मी त्यांना दिले आहेत ! 

प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल ! त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा. 

तुम्हाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा…

बाकी १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच , आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलच! 
स्वतःची तसेच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या !

धन्यवाद ! 

आपला नम्र 
राज ठाकरे

आता उद्या राज ठाकरेंसोबत रायगडावर कोणकोणते नेते सोबत जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp