by Hansraj Agrawal | Feb 18, 2026 | Trending News
Bhigwan Kidnapping Case : 21 वर्षीय तरुणीचं लग्नापूर्वी अपहरण करण्यात आलं होतं. ही घटना इंदापूर येथील भिगवणमध्ये घडली आहे. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकारणाला धक्कादायक वळण मिळालं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 17, 2026 | Trending News
Muslim NBC Reservation: मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द करण्यात आलं आहे. आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून, त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा शासनादेश जारी झाला आहे. उच्च न्यायालयाने मुस्लीम आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुस्लीम आरक्षणाचा शासन निर्णय 12 वर्षांनी रद्द झाला आहे.
Add Zee News as a Preferred Source
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर, आगामी विधानसभा निवडणुकांकडे लक्ष ठेवून असलेल्या महाराष्ट्र सरकारने मराठा आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला होता. सरकारने सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठ्यांना 16 टक्के आणि मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण जाहीर केले होते. यामुळे राज्यातील एकूण आरक्षण 73 टक्के झाले होते.
राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिम समुदायासाठी 5 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता. कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
अध्यादेशात काय लिहिलं आहे?
सामाजिक शैक्षणिकदृष्ट्टया मागासलेल्या मुस्लिम गटासाठी विशेष मागास प्रवर्ग-अ अंतर्गत शासकीय व निमशासकीय सरळसेवा भरतीमध्ये व शैक्षणिक संस्थेतील प्रवेशासाठी 5 टक्के आरक्षण सामान्य प्रशासन विभागाच्या वाचा क्र 1 येथील अध्यादेशान्वये विहीत करण्यात आले होते. त्यानुसार, वाचा क्रं2 येथील अल्पसंख्यांक विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये सरळ सेवेच्या पदभरतीमध्ये विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) प्रवर्गासाठी 5 टक्के आरक्षण देण्यात आले होते.
अल्पसंख्याक विकास विभागाच्या वाचा क्र.2 येथील शासन निर्णयातील निदेशानुसार या विभागाकडून वाचा क्र.3 येथील शासन निर्णय व वाचा क्र 5 येथील शासन परिपत्रकान्वये विशेष मागास प्रवर्ग-अ मधील मुस्लिम समाजास नियमानुसार जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रे देण्याबाबतची कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.
सन 2014 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 14 विरोधात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र 2053/2014 श्री. संजित शुक्ला विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर संलग्न याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. प्रस्तुत प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि १४.११.२०१४ रोजीच्या आदेशान्वये सदर अध्यादेशातील कलम ४(१) मधील राज्याच्या वनयंत्रणाखालील लोकसेवांमधील सरळ सेवा प्रवेश नियुक्त्यांमधील ५% नियुक्त्या विशेष मागास प्रवर्ग-अ करता राखून ठेवण्याच्या तरतुदीस अंतरिम स्थगिती दिलेली आहे.
सामान्य प्रशासन विर्भागाच्या वाचा क्र. 1 येथील अध्यादेशाचे दिनांक 23.12.2014 पर्यंत कायद्यात रुपांतर न झाल्याने सदरहू अध्यादेश व्यपगत झाला आहे. त्यानुषंगाने निर्गमित केलेले शासन निर्णय/ परिपत्रक आपोआप रद्दबातल ठरतात.
त्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने वाचा क्र.6 येथील दि. 02.03.2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये अध्यादेशास अनुसरून निर्गमित केलेला वाचा क्र.4 येथील दि. .24.07.2014 रोजी शासन निर्णय रद्द केला आहे. सबब, उपरोक्त अध्यादेश व्यपगत झाल्याने या विभागाकडून निर्गमित केलेला शासन निर्णय/परिपत्रक रद्दबातल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 17, 2026 | Trending News
Harshvardhan Sapkal: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने वादाचा भडका उडाला आहे. सपकाळांविरोधात भाजपनं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करत वक्तव्याचा निषेध केला.यावेळी सपकाळांच्या प्रतिकात्मक फोटोला काळं फासत, जोडो मारत तीव्र निषेध केला. सोबतच सपकाळांनी शिवभक्तांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. टिपु सुलतान वक्तव्य प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.
Add Zee News as a Preferred Source
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त
हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत. शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त केली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, तर ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे ७० सेकंदांचे वक्तव्य होते. दुर्दैवाने, त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला हे आपण पुण्यात पाहिले आहे.
मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही,मी केलेली नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे त्यांच्या प्रतिमेच्या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये,जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये,हीच भूमिका मी मांडली होती.
प्रकरणी भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता. शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे, आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया, अपप्रचाराला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्य, सहिष्णुता आणि लोककल्याणाचा मार्ग स्वीकारून परस्पर आदर, ऐक्य आणि समन्वयाने महाराष्ट्र घडवूया ही नम्र विनंती. आणी पुढे भाजपाच्या विखारी, खोडसाळ अपप्रचाराविरुद्ध लढत राहू भाजपच्या विकृतीला व ट्रेड-दिल व जेफ़री एपस्टीन घोटाळा चव्हाट्यावर आणत राहू!
कठीण वज्रास भेदूं ऐसे
भले तरि देऊं कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ।
मायबापाहूनि बहु मायावंत ।
करूं घातपात शत्रूहूनि ॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें ।
विष तें बापुडें कडू किती ॥
Source link
by Hansraj Agrawal | Feb 16, 2026 | Trending News
MMRDA Budget Infrastructure Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा यंदा प्रथमच शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून मुंबई आणि परिसराच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी 48 हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास आज मान्यता देण्यात आली. एमएमआर परिसर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी आणि भविष्यातील पाणी नियोजनासाठी विशेष भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Add Zee News as a Preferred Source
7 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प
नऊ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्राधिकरणाने 17 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला असून शिलकी अर्थसंकल्प सादर करणारी ही देशातील महत्वाची संस्था असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील ७५ टक्के खर्च हा रस्ते, मेट्रो, उड्डाणपुल, बोगदे, बाह्यमार्ग यासारख्या विकासकामांवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एमएमआर क्षेत्रातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पोशीर’ आणि ‘शिलार’ या दोन्ही धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. एमएमआर क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 337 किमी मेट्रो जाळ्यासोबत पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राउंड रस्ते आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा राबवण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मेट्रो नेटवर्कसाठी 13 हजार 838 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो मार्ग 4, 6,5,2 ब आणि मार्ग 12 या प्रकल्पांना वेग देण्याचे त्यांनी सांगितले. एमएमआर क्षेत्रातील सर्व प्रमुख मनपांचा मिळून नीती आयोगाच्या मदतीने एक ‘बृहद आराखडा’ तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी सेवा तर ठाणे ECf मीरा-भाईंदर येथे बोट टॅक्सी
लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी सेवा तर ठाणे व मीरा-भाईंदर येथे बोट टॅक्सीचा प्रयोग केला जाणार आहे. मेट्रो-बस-जलवाहतूक यांची एकत्रित जोडणी करून प्रवास अधिक जलद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डबल डेकर फ्लायओव्हर, अंडरग्राउंड टनेलिंग प्रकल्प, कोस्टल रोड आणि भिवंडी-नाशिक मार्गावरील पर्यायी रस्ते उभारले जात आहेत. ट्रॅफिक ब्लॅकस्पॉट ओळखण्यासाठी स्वतंत्र अभ्यासही करण्यात येणार आहे. मुंबईतील एलफिन्स्टन पुलाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे आणि घोडबंदर रोडवरील रस्ता रुंदीकरणाचे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.
रमाबाई आंबेडकर नगर 17 हजार घरांच्या प्रकल्प
मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले असून एमएमआरडीएच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकर नगर येथील 17 हजार घरांच्या प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी एसआरएकडून नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मुंबईत १७ प्रकल्पांची यादी तयार असून ठाण्यात पाच इमारतींच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. रस्ते, मेट्रो, धरण यासोबतच एमएमारडीएच्या माध्यमातून चांगली घरे देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मेट्रो दुर्घटनेची गंभीर दखल
मुलुंडमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकल्पांचे सुरक्षा व स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘दक्षता पथके’ नेमून दररोज नियंत्रण आणि अधिकाऱ्यांनी क्षेत्र भेटी कराव्यात. हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 160 वी वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, विक्रमकुमार आदी अधिकारी उपस्थित होते.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 16, 2026 | Trending News
Abdul Sattar: छत्रपती संभाजीनगर शहरात एक धार्मिक स्थळावर एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रहिमाबाद भागातील नागेश्वर मंदिर हे शिवभक्तांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर येथे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येतात. मात्र, या दिवशी एका व्यक्तीच्या भेटीमुळे काही युवकांनी वाद उकरून काढला. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागेश्वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. सकाळीच त्यांनी हे दर्शन केले.सत्तार यांनी मंदिरात प्रवेश करून पूजा-अर्चना केली. यावेळी ते सामान्य भाविकांसारखे वागले. पण काही लोकांनी सत्तारांची ही कृती रुचली नाही. दर्शनानंतर लगेचच काही तरुणांनी सत्तार यांच्या या भेटीवर जोरदार आक्षेप घेतला. अशा व्यक्तीला मंदिरात येण्याची परवानगी देणे चुकीचे असल्याचे तरुणांनी म्हटले. त्यांनी मंदिराच्या पावित्र्यावर प्रश्न उपस्थित केले.
आक्षेपाचे मुख्य कारण काय?
‘अब्दुल सत्तार दररोज सकाळी नाश्त्यात मांसाहारी पदार्थ खातात आणि त्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत’, असे युवकांनी सांगितले. त्यामुळे ते अपवित्र असून महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी मंदिरात येणे अयोग्य असल्याचे तरुणांनी म्हटले. हे कारण धार्मिक नियम आणि वैयक्तिक सवयींशी संबंधित आहे, ज्यामुळे काही लोकांच्या मनात पूर्वग्रह दिसून येतो. असे आरोप करून युवकांनी सत्तार यांच्या जीवनशैलीवर टीका केली.
गोमुत्राने मंदिर शुद्धीकरण
या आक्षेपानंतर युवकांनी मंदिरात गोमूत्र फवारून ते शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विश्वास असा की, गोमूत्राने अपवित्रता दूर होते आणि मंदिर पुन्हा पवित्र होते. ही क्रिया पारंपरिक धार्मिक प्रथेनुसार केली गेली, परंतु ती वादग्रस्त ठरली. या घटनेने समाजात धार्मिक सहिष्णुतेच्या मुद्द्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे शांतता आणि समानतेची गरज अधोरेखित होते.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 15, 2026 | Trending News
Thane Coastal Road Project : मुंबई प्रमाणे ठाण्यातही कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील हा पहिला कोस्टल रोड आहे. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून हजारो वाहन चालकांची सुटका होणार आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबई, नाशिक सह थेट गुजरातला जाण्यासाठी पर्यायी मार्ग मिळणार आहे. 33,64,00,00,000 रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
Add Zee News as a Preferred Source
बाळकुंभ ते गायमुख दरम्यान 13.45 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी ठाणे कोस्टल रोडचे बांधकाम वेगाने सुरू आहे. 3,364 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम आठ महिन्यांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केले होते. आठ महिन्यांतच प्राधिकरणाने कोस्टल रोडच्या पायाभूत कामाचे 50 टक्के काम पूर्ण केले आहे. पायाभूत कामानंतर, खांबांवर पिलर कॅप्स आणि आय गर्डर्स बसवण्याचे काम सुरू झाले आहे.
देशातील पहिला ग्रीनफिल्ड रोड
एमएमआरडीएच्या मते, ठाणे कोस्टल रोड हा देशातील पहिला ग्रीनफिल्ड कोस्टल रोड प्रकल्प आहे. या प्रकल्पात पहिल्यांदाच मोनोपाइल फाउंडेशन, सिंगल पाइल आणि सिंगल पिलर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पर्यावरण संवर्धन आणि खारफुटी क्षेत्रांचे संरक्षण करण्यास प्राधान्य देऊन, रस्त्याचा मोठा भाग
उड्डाणपूल म्हणून विकसित केला जाईल.
मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा
या कोस्टल रोडवरील एका मार्गिकेवर फक्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी असणार आहे. कोस्टल रोडमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. गर्दीच्या वेळी घोडबंदर रोडवर वाहनांच्या लांब रांगा नेहमीच असतात. भिवंडी आणि कळवा येथून घोडबंदर रोडकडे जाणारे वाहनचालक बाळकुंभजवळ ट्रॅफिक जाममध्ये अडकतात. जर महामार्गावर वाहन बिघाड झाला किंवा अपघात झाला तर अनेक किलोमीटर लांब रांगा लागू शकतात. कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर, नाशिक, भिवंडी, गुजरात आणि मुंबई उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग मिळेल. बाळकुंभ येथून कोस्टल रोडवर थेट प्रवेश शक्य होईल.
कोस्टल रोड महत्वांच्या मार्गांशी जोडणार
एमएमआरडीएने कोस्टल रोडला प्रस्तावित गायमुख-फाउंटन हॉटेल टनेल प्रकल्पाशी जोडण्याची योजना आखली आहे. एकदा हे प्रकल्प जोडले गेले की, वाधवान बंदर, जेएनपीटी, दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना ठाण्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता कमी होईल. याव्यतिरिक्त, कोस्टल रोड ठाणे रिंग मेट्रो आणि साकेत-अमाणे एलिव्हेटेड कॉरिडॉरशी जोडण्याची योजना आहे.
Source link