कोट्यावधींचा झोल… सरकारी प्रोजेक्ट जाहीर होण्याआधीच जमीन खरेदी; खरातला टीप कोणी दिली?

कोट्यावधींचा झोल… सरकारी प्रोजेक्ट जाहीर होण्याआधीच जमीन खरेदी; खरातला टीप कोणी दिली?



Ashok Kharat Land Scams: अशोक खरातविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे 8 आणि आर्थिक तसेच जमिनीची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे नोंदवलेले असतानाच एसआयटीच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.



Source link

Explained : भारतातील 9 राज्य जिथे महिला सर्वाधिक रिचवतात दारु, महाराष्ट्राचा क्रमांक किती?

Explained : भारतातील 9 राज्य जिथे महिला सर्वाधिक रिचवतात दारु, महाराष्ट्राचा क्रमांक किती?


फक्त पुरुषच मद्याचे सेवन करायचे तो काळ गेला. आता महिला देखील पुरुषांसोबत अगदी त्यांच्याप्रमाणेच मद्याचे सेवन करतात. भारतातील 8 अशी राज्ये जेथे महिला सर्वाधिक प्रमाणात दारु रिचवतात. एवढंच नव्हे तर भारतीय लोक प्रामुख्याने मद्याकडे आकर्षिक होतात. मग त्यामध्ये अगदी Gen X, मिलेनियल्सते Gen Z पर्यंत सगळ्या स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. भारताच्या 8 राज्यांमध्ये स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत सर्वाधिक दारु पितात असं सर्वेक्षणात आढळले आहे. महिलांचा मद्य प्राशनाकडे असलेल्या ओढीची अनेक कारणे आहेत. म्हणजे यामध्ये आदिवासी परंपरा ते अगदी बदलती जीवनशैली, वाढता ताण एवढंच नव्हे तर शहरीकरण, वाढती आर्थिक स्वातंत्र्य या सगळ्याचा समावेश आहे. 

Add Zee News as a Preferred Source

महिलांकडे आतापर्यंत सोज्वळ, मनमिळावू, घर सांभाळणारी अशा दृष्टीकोनातून पाहिलं आहे. हळूहळू महिला पुरुषांप्रमाणे घराबाहेर पडल्या यानंतर पुरुषांची मक्तेदारी असलेल्या किंवा पुरुषांचा ओढा असलेल्या मद्य प्राशन करण्याकडे त्यांचा कल वाढला. भारतातील कोणत्या राज्यात याचे प्रमाण वाढले ते पाहूया. 

अरुणाचल प्रदेश

ज्या राज्यात मद्यपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे, ते राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश. या राज्यातील 24.2% महिला मद्यपान करतात. अरुणाचल प्रदेशमध्ये मद्यपानाची संस्कृतीच आहे. जसे की, पाहुण्यांना ‘अपोंग’ म्हणजे तांदळापासून बनवलेली बिअरसारखे पेय दिले जाते. म्हणजे या राज्यात आदराने दारु दिली जाते. 

सिक्कीम 

सिक्कीममध्ये मद्यपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त असून हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. सिक्कीममधील १६.२% महिला मद्यपान करतात आणि हे राज्य स्वतःच घरगुती मद्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. येथील सर्वात प्रसिद्ध पेय म्हणजे ‘छांग’ (Chhaang)—एक प्रकारचे आंबवलेले बाजरीचे मद्य. छांग हे पारंपरिकरीत्या घरीच तयार केले जाते आणि सण-उत्सव, सामाजिक कार्यक्रमात याचे सेवन केले जाते.

आसाम 

2025 च्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये 7.3 टक्के महिला मद्याचे सेवन करतात. राज्यातील आदिवासी समुदायांमध्ये मद्यनिर्मिती आणि मद्यपानाची दीर्घकालीन परंपरा आहे. येथे ‘व्हिस्की’ हे सर्वात प्रसिद्ध मद्य आहे. या वाढीव प्रमाणावर सांस्कृतिक प्रथांचा, विशेषतः आसाममधील आदिवासी समुदायांमधील प्रथांचा प्रभाव आहे.

तेलंगणा

तेलंगणामधील 6.7% महिलांना मद्यपान करायला आवडते. यामुळे या यादीत तेलंगणाचा क्रमांक चौथा लागतो. येथे शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये मद्यपानाचे प्रमाण अधिक आहे आणि व्हिस्की व बिअर हे सर्वाधिक पसंतीचे पर्याय आहेत.

झारखंड

झारखंडमध्ये 6.1% महिला मद्यपान करतात. ‘जर्नल ऑफ आदिवासी अँड इंडिजिनस स्टडीज’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, ही बाब प्रामुख्याने उपेक्षित आदिवासी भागांमध्ये दिसून येते. कामाची संधी फार नसल्यामुळे लोक मद्यव्यसनाकडे, आणि विशेषतः महिला मद्यविक्रीकडे वळतात. 

अंदमान-निकोबार 

अंदमान आणि निकोबार हे आयलंड आहे. या ठिकाणी 5 टक्के महिला मद्यप्राशन करतात. हांडिया, तो़ी आणि जंगली हे तेथील स्थानिक आणि पारंपरिक पेय आहे.

छत्तीसगड 

छत्तीसगडमध्ये 4.9 टक्के महिला दारुचं सेवन करतात. व्हिस्की, वोडका यांना महिलांची मोठ्या प्रमाणात पसंती आहे. येथे महिलांची पसंती दारु पिण्याकडे असल्यामुळे याचं प्रमाण वाढलं आहे. 

महाराष्ट्र

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात केवळ 0.2 टक्के महिला दारु पितात. शहरी भागातील महिलांचे प्रमाण हे 0.3 टक्के आहे तर ग्रामीण भागात हे प्रमाण अल्प आहे. मात्र धुळे जिल्ह्यात दारु पिणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 38.2 टक्के आहे. धुळे हा एक आदिवासीबहुल जिल्हा आहे. अनेक आदिवासी समुदायांमध्ये स्थानिकरीत्या तयार केलेली ‘महुवा’ किंवा ‘ताडी’ यांसारखी पेये सांस्कृतिक परंपरांचा भाग मानली जातात. सण, उत्सव किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये महिलांनी मद्यपान करणे हे तिथे सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह मानले जाते.

महिलांनी मद्यप्राशन केल्यामुळे त्यांच्या शरीरावर सर्वाधिक प्रमाणात परिणाम जाणवतो. आरोग्याच्या दृष्टीकोनातून जास्त नुकसान होत असल्याच संशोधनात दिसून आले आहे. महिलांच्या शरीरावर काय होतो परिणाम?

 शारीरिक परिणामांची कारणे
अल्कोहोल डिहायड्रोजनेज (ADH) ची कमतरता: महिलांच्या शरीरात मद्य पचवण्यासाठी आवश्यक असलेले ADH नावाचे एन्झाईम पुरुषांच्या तुलनेत कमी असते. यामुळे दारू शरीरात लवकर शोषली जाते आणि रक्तप्रवाहात जास्त काळ राहते.
पाण्याचे प्रमाण: महिलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी आणि चरबीचे (Fat) प्रमाण जास्त असते. अल्कोहोल पाण्यात विरघळते, त्यामुळे महिलांच्या शरीरात ते अधिक एकवटलेले (Concentrated) राहते. NIH ने दिलेल्या माहितीनुसार

 प्रमुख आरोग्य समस्या
यकृताचे आजार (Liver Diseases): महिलांमध्ये यकृताची जळजळ (Hepatitis) आणि सिरोसिस होण्याचा धोका पुरुषांच्या तुलनेत कमी कालावधीत आणि कमी प्रमाणात मद्यपान करूनही जास्त असतो.
कर्करोगाचा धोका: नियमित मद्यपानामुळे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. तसेच तोंड, घसा आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोकाही संभवतो.
हृदयविकार: अति मद्यपानामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता महिलांमध्ये अधिक असते.
मेंदूवर परिणाम: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये दारूमुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान वेगाने होते, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. pmc  ने दिलेल्या माहितीनुसार

 प्रजनन क्षमता आणि मासिक पाळी
प्रजनन समस्या: दारूमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडून वंध्यत्व (Infertility) येण्याची शक्यता असते.
मासिक पाळी: मद्यपानामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते किंवा पाळीदरम्यान अधिक त्रास होऊ शकतो.
गर्भावस्था: गरोदरपणात मद्यपान केल्यास गर्भातील बाळाच्या विकासावर गंभीर परिणाम होऊन ‘फेटल अल्कोहोल सिंड्रोम’ सारखे आजार होऊ शकतात.





Source link

सातारा जिल्हा परिषद वाद प्रकरणी मोठी कारवाई! पोलिस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; सरकारने दिला आदेश

सातारा जिल्हा परिषद वाद प्रकरणी मोठी कारवाई! पोलिस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; सरकारने दिला आदेश


Satara SP Tushar Doshi: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या वाद प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तुषार दोशी यांनी पुढील आदेश येईपर्यंत सक्तीचा रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या वेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. या निवडीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. यावरुनही मोठा वाद झाला होता. तुषार दोशी यांच्या निलंबनानंतर त्यांचा कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर पाहणार आहेत.

Add Zee News as a Preferred Source

नेमका वाद काय होता?

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्य फुटले होतो. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अपहरणाच्या गुन्ह्यात त्यांना ताब्यात घेण्यात आलं. यामुळे त्यांना मतदानही करता आलं नाही. 

निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमध्ये झटापट झाली होती. पोलिसांनी यावेळी अरेरावी केल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी केला होता. विधानपरिषदेत याचे पडसाद उमटले आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह 100 पोलिसांचं निलंबन करण्याची मागणी करण्यात आली. शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोपही करण्यात आला. 

शंभूराज देसाई यांनी आरोप केला की, “मतदानाला सभागृहात गेल्यानंतर पोलिसांनी माझ्या हाताला धऱरुन इतर सदस्यांसह फरफटत नेलं. 100 पोलीस साध्या वेशाच चौथ्या माळ्यावर होते. आम्ही मंत्री, आमदार आहोत. तरी पोलिसांनी इतका मुजोरपणा केला. माझ्या शर्टवर रक्त सांडलं. पोलिसांनी आमच्या सदस्यांना पळवत नेलं”. यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधिक्षकांच्या निलंबनाची मागणी केली. 

निलंबनाच्या आदेशानंतर झाला होता वाद

.जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेऊन जाताना मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. या दरम्यान झालेल्या गोंधळानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सातारा पोलिस प्रमुख तुषार दोशी आणि त्याचा काही अधिकाऱ्यांना निलंबित कराव अशी मागणी केली होती. या मागणी नंतर सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांना निलंबित करावे असे निर्देश दिले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची चौकशी केली जाईल असं सांगितले होते.या घटनाक्रमानंतर पोलिस अधीक्षक दोशी दोन दिवसांनंतर पोलिस मुख्यालयात हजर झाले होते. 

शिवसेनेच्या आक्रमक दबावामुळे अखेर उपसभापती नीलम गोर्हे यांचा सातारा पोलिस अधिक्षक निलंबन निर्णय सभापती राम शिंदे यांनी राखून ठेवला होता.  अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार विधान परिषदेत आक्रमक झाले. त्यामुळे सभागृह स्थगित करावं लागलं होतं त्यानंतर सभापती राम शिंदे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांसह बैठक झाली. या बैठकीतही शिवसेनेने आक्रमक पवित्रा कायम ठेवत  निलंबनाच्या निर्णयावर ठाम भूमीका घेतली. त्यामुळे भाजपला शिवसेनेच्या आक्रमक दबावामुळे अखेर उपसभापती निलम गोर्हे यांनी घेतलेला निर्णय राखून ठेववा लागला होता.  आता यापुढे उपसभापती निलम गोर्हे यांनी घेतलेला निर्णयावर कायदेतज्ञ अभ्यास करून निर्णय घेतील असा सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली होती. 





Source link

'केसरकरांच्या आणि खरातच्या बाजूला उभा असणारा 'तो' व्यक्ती कोण?', फोटो दाखवत सुषमा अंधारेंकडून गौप्य स्फोट

'केसरकरांच्या आणि खरातच्या बाजूला उभा असणारा 'तो' व्यक्ती कोण?', फोटो दाखवत सुषमा अंधारेंकडून गौप्य स्फोट


Sushma Andhare On Deepak Kesarkar: अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारे यांनी आधी रुपाली चाकणकर आणि आता दीपक केसरकर यांच्यावर निषाणा साधला आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट मध्ये केसरकरांनी भोंदू बाबा खरातशी त्यांचे कॉन्टॅक्ट असल्याचे उघड केले. त्यानंतर सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर एकापाठोपाठ एक टिकांचे बॉम्ब फोडायला सुरूवात केली. त्यांनी केसरकरांचे खरात सोबतचे जुने फोटो दाखवत टीकास्त्र सोडले. यावर त्यांना प्रत्युत्तरही देण्यात आले. मात्र, आता नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अंधारे यांनी केसरकरांवर पुन्हा एकदा टिकेचा बाण सोडला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सुषमा अंधारे यांचे केसरकरांना आवाहन

दरम्यान, झी 24 तासच्या टू द पॉईंटमध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी अशोक खरात प्रकरणात आणखी 39 नेत्यांची नावे असल्याचे उघड केले. यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी केसरकरांना थेट आव्हान केले आहे. त्या म्हणाल्या, ‘केसरकर स्वतः मान्य करतात की ते खरातच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांना मंत्रिपदावरून हटविले म्हणजे ते शिंदेंचे विश्वासपात्र नाहीत. केसरकर यांना आव्हान आहे की, त्या 39 जणांची सगळ्यांची नावे उघड कराच.’ 

केसरकरांच्या बाजूला प्रत्येक वेळी फोटोत दिसणारा हा व्यक्ती कोण?

यानंतर अंधारे यांनी दीपक केसरकर यांचे खरातसोबतचे काही फोटो दाखवत त्यांच्याव्यतिरिक्त दिसणाऱ्या फोटोमध्ये असणाऱ्या एका व्यक्तिबाबत संशय व्यक्त केला. ‘खरातच्या बाजूला, केसरकरांच्या बाजूला प्रत्येक वेळी फोटोत दिसणारा हा व्यक्ती कोण? ही व्यक्ती सतत का दिसतेय? अतूल सावे यांच्या सोबत पण दिसतोय, हा त्यांचा डावा माणूस आहे का?’ असं म्हणत त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यांनी या व्यक्तिबद्दल काही माहितीही सांगितली. खरात, केसरकर आणि सावे यांच्यासह फोटोमध्ये दिसणाऱ्या या व्यक्तिचे नाव आवारे असून तो जगदंब पतसंस्थेचा चेअरमन आहे. तसेच त्यांनी या व्यक्तीची पोलीस चौकशी करण्याची मागणी केली. 

 

आवारे आणि केसरकरांचा काय संबंध आहे?

तसेच दीपक केसरकर यांनी खरात प्रकरणात त्यांचे नाव जोडल्यानंतर, हे त्यांच्या विरोधात कटकारस्थान केले जाते आहे असे म्हटले. मात्र, यावरही सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘केसरकराचं हे वक्तव्य बालिश आणि हास्यस्पद आहे. केसरकर एमआयडीसीच्या इथे काय करत होते? केसरकर, खरात, चाकणकर सतत एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत काय दिसायचे? आर्थिक हितसंबंधांबाबत केसरकरांनी उत्तरे द्यायला हवीत. केसरकरांनी मान्य केले ते खरातकडे जात होते. जगदंब पतसंस्थेत काळा पैसा सफेद होत होता. आवारे आणि केसरकरांचा काय संबंध आहे? कांगावा करणं बंद करा आणि नेमक्या प्रश्नांची उत्तरे द्या असे आवाहान त्यांनी केसरकरांना केले आहे. सुषमा अंधारेंच्या या प्रश्नांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. आता याची उत्तरे दीपक केसरकर कशी देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





Source link

कॅप्टन अशोक खरातसोबत ओळख कशी झाली? दीपक केसरकर यांनी स्पष्टपणे सगळचं सागितले

कॅप्टन अशोक खरातसोबत ओळख कशी झाली? दीपक केसरकर यांनी स्पष्टपणे सगळचं सागितले



खरात कुटुंबाच्या काळजीच्या विधानावरून केसरकरांनी घूमजाव केले आहे. भावना दुखावल्या असतील तर शब्द मागे घेतो. टू द पॉईंट मुलाखतीत केसरकरांनी यू-टर्न घेतला आहे. 



Source link

2 वर्षांची चिमुरडी, लैंगिक अत्याचार अन् बीड पुन्हा हादरलं, चुलत्यानेच केलं लाजिरवाणं कृत्य, असं फुटलं बिंग?

2 वर्षांची चिमुरडी, लैंगिक अत्याचार अन् बीड पुन्हा हादरलं, चुलत्यानेच केलं लाजिरवाणं कृत्य, असं फुटलं बिंग?


Beed Crime News: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना सध्या राज्यभर चर्चेत आली आहे. एका लहानग्या मुलीच्या मृत्यूमागील कारण सुरुवातीला साधा अपघात असल्याचे वाटत होते, मात्र तपासाच्या पुढील टप्प्यात समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक ठरली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात संशयित व्यक्ती ही मुलीच्या जवळच्या नात्यातील असल्याने या घटनेने माणुसकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Add Zee News as a Preferred Source

संशयास्पद मृत्यूतून उघड झाला धक्कादायक प्रकार

17 मार्च 2026 रोजी अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात 2 वर्षांच्या चिमुरडीचा घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचे गृहित धरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करताना डॉक्टरांना वेगळेच संकेत मिळाले.

शवविच्छेदन अहवालात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने सुरू केला. पोलिस निरीक्षक ‘मुरलीधर खोकले’ यांनी वरिष्ठ अधिकारी ‘नवनीत कांवत’, ‘चेतना तिडके’ आणि ‘ऋषिकेश शिंदे’ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची दिशा बदलली.

संशयिताच्या वागण्यामुळे पोलिस सतर्क

तपासादरम्यान पोलिसांनी गावातील अनेक लोकांची चौकशी केली. त्यावेळी पीडितेचा 15 वर्षांचा चुलत भाऊ गेल्या काही दिवसांपासून विचित्र वागत असल्याची माहिती समोर आली. तो सतत रडत होता आणि नीट जेवतही नव्हता, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.

पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. या कबुलीजबाबानंतर संपूर्ण प्रकरण स्पष्ट झाले आणि तपासाला निर्णायक वळण मिळाले.

आमिष दाखवून केला अत्याचार

चौकशीत आरोपीने सांगितले की, घटनेच्या काही दिवस आधी त्याने चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून दुचाकीवर बसवले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून तिच्यावर अत्याचार केला. यापूर्वी देखील त्याने एकदा असाच प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे.

ही बाब समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. या घटनेने पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा: Solapur Crime : कुजलेल्या अवस्थेत सापडला जिम ट्रेनरचा मृतदेह, वस्तूंवरली पटली ओळख; 14 दिवसांपासून होता बेपत्ता

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 64(1) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक ‘मुरलीधर खोकले’ यांनी सरकारतर्फे फिर्यादी म्हणून भूमिका बजावली आहे.

पुढील तपास पिंक स्क्वाडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ‘संतोष जाधवर’ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून, या घटनेमागील इतर बाबींचाही शोध घेतला जात आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp