अशोक खरात आणि नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणाचा संबंध? HR निदा खानच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले…

अशोक खरात आणि नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणाचा संबंध? HR निदा खानच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले…


Nashik BPO Employee Conversion Case: नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे आणि सर्व संशयित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्याती तपासणी केली जात आहे. तपास यंत्रणांना या खात्यांना बाहेरुन फंडिंग मिळत होतं असा संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आतापर्यंत 7 पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. कंपनीची HR निदा खान अद्याप फरार आहे. दरम्यान निदा खानच्या कुटुंबाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

‘खरात प्रकरण दाबण्यासाठी मुलीला फसवलं’

निदा खानच्या वडिलांनी ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना आपल्या मुलीवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. आपल्या मुलीवर खोटे आरोप करण्यात आले असून, दुसरं प्रकरण दाबण्यासाठी हे करण्यात आलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांना दावा केला की, “निदाचा तक्रारदारांशी थेट संपर्क नव्हता. सगळं खोटं असून, भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण दाबण्यासाठी आमच्या मुलीला फसवलं जात आहे”.

‘निदा खान HR नाही’

निदाच्या काका आणि आईने दावा केला आहे की, “आम्ही गरीब आहोत आणि आम्हाला बदनाम केलं जात आहे. आमची मुलगी एचआर नाही, फक्त 15 -16 हजार कमावते”. 

कुटुंबाने पुढे म्हटलं की, त्यांच्या मुलीने कधीही कोणावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला नाही. तसंच इतर धर्माच्या देवी-देवतांसदर्भात आक्षेपार्ह भाष्य केलं नाही. कुटुंबाच्या दाव्यानुसार, निदा खान भिवंडीत आपल्या सासरी असून, ती गर्भवती आहे. या प्रकरणाला राजकीय रंग दिला जात असून, विनाकारण त्यांच्या मुलीला लक्ष्य केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व वादामुळे कुटुंबाला मानसिक त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

एसआयटी पथक मुंब्र्यात दाखल

दरम्यान नाशिकमधील विशेष तपास पथक पोलीस ठाण्यात दाखल झालं आहे. मुख्य आरोपी निदा खानच्या शोधाकरता नाशिक  SIT पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. ठाण्यातील मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये ते पोहोचले आहेत. मुख्य आरोपी निदा खान मुंब्र्यात असल्याची माहिती  आहे. पथक निदा खानच्या नातेवाईकाला घेवून मुंब्र्यात दाखल झाली आहे. 

खान संबंधीत कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर काम करत होती. तिने अनेक प्रकरणं बाहेर येऊ दिली नाही तसंच अटक आरोपी निदा खानच्या इशारावर काम करायचे असं तपासात समोर आलं आहे. 

महिला पोलीस अधिकाऱ्यांनी अंडरकव्हर म्हणून केलं काम

सहा महिला अधिकाऱ्यांनी कंपनीत रुजू झाल्यानंतर आरोपींवर लक्ष ठेवलं होतं. मीटिंग आणि कामाच्या ठिकाणी त्याच्या वागणुकीवर त्या बारकाईने लक्ष ठेवून होत्या. यादर्यान त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात होत्या. कामावरुन सुटल्यानंतर संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांना दिली जात होती. 

 





Source link

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय; उच्च न्यायालयातील वकिलांकडून महाराष्ट्र सरकारला नोटीस

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय; उच्च न्यायालयातील वकिलांकडून महाराष्ट्र सरकारला नोटीस


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

'स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांचे Video…', राज्यपालांना पाठवलेलं स्फोटक पत्र जसंच्या तसं; वाचून बसेल धक्का

'स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांचे Video…', राज्यपालांना पाठवलेलं स्फोटक पत्र जसंच्या तसं; वाचून बसेल धक्का


Shocking Letter To Governor of Maharashtra: स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे आणि व्हिडिओ जाहीर करा! अशी धक्कादायक मागणी माजी मंत्री सुबोध सावजी (Subodh Saoji) यांनी केली आहे. सुबोध सावजी यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना यासंदर्भात एक पत्र पाठवलं असून या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्रीपद भूषवलेले बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर-लोणार मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले सुबोध सावजी अडचणीत आले आहेत.

Add Zee News as a Preferred Source

पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेले सुबोध सावजी सध्या स्वतंत्रपणे माजी मंत्री म्हणून सक्रिय असून त्यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. मात्र आता त्यांनी मर्यादा ओलांडणारी मागणी करणारं पत्र 16 एप्रिल रोजी राज्यपालांना पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी नेमकं काय म्हटलंय? पत्राचा विषय काय आहे? जाणून घेऊयात… 

विषय : राज्यामध्ये स्वतःहून बलात्कार करुन घेणाऱ्या महिलांवा पोलीस केसेस दाखल करुन यांची नावे, फोटो असल्यास व्हिडीओ चित्रीकरण शासनाने समाजासमोर आणावीत

महोदय,

बलात्कार दोन प्रकारचे आहेत. एक जबरदस्ती केलेला बलात्कार, दुसरा महिलेने स्वत:हून करवून घेतलेला बलात्कार. जबरदस्ती केलेला बलात्कार यामध्ये महिलांची नावं गुतिप राहिलीच पाहिजेत. हे सामाजाकरीता चांगले आहे. 

ज्या महिलांनी स्वार्थाकरीता, पैसे कमविण्याकरीता बलात्कार करवून घेतले अशा व्याभिचारी महिला समाजाला कलंक आहेत.

अशा महिलांना समाजासमोर आणणे हे माझे व राज्यातील जनतेचे स्पष्ट मत आङे. अशा महिला जनतेसमोर उघड झाल्यास इतर महिला अशा वागणार नाहीत. स्वार्थाकरीता, पैशाकरीता बलात्कार करवून घेण्याचे प्रकार कमी होतील. भोंदू बाबा, संत, महात्वे, महाठग, आर्थिक लाभाच्या नादी लागून अनेक महिला निरनिराळ्या ठिकाणी जावून बलात्कार करवून घेतात. य बलात्कारीत महिलांची नावे जाहीर करायचे नाही, असा शासन निर्णय़ आहे. 

या शासन निर्णयाने अनेक महाठग व महिलांना दुष्कर्म करण्याकरीता पैश्यांच्या अमिषाने जागा भाड्याने देणे यामध्ये समाजातील अनेक गैरवर्तन करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. 

सध्य परिस्थितीत राज्यात नाशिक व इतर भागात महाठग अशोक खरात याच्यासारख्याच्याच सानिध्यात श्रीमंत, सुक्षीशित, राजकारणी महिला येवून यांनी स्वत:वर बलात्कार करवून घेतले. 

बलात्कार करुवून घेणाऱ्या महिलांची नाव उघड करायवची नाही, त्यांचे व्हिडीओ व्हायरल करावयाचे नाही असा शासन निर्णय आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. ज्या महिला स्वत:हून बलात्कार करवून घेण्यास गेल्या त्यामुळे समाजामध्ये अनैतिकतेचे वातावरण होत आहे. महिला स्वत:हून बलात्कार करवून घेण्यास गेल्यामुळे भोंदू बाबा, संत, महात्मे बलात्कार करणाऱ्यांस मोठ्या प्रमाणात शासकीय निर्णयाचा आश्रय मिळतो. 

माजी राज्यातील जनतेसह आपण अशी विनंती आहे की ज्या महिला स्वत:हून निरनिराळ्या प्रकारे बलात्कार करवून घेतात त्यांची नावं, फोटो असल्यास व्हिडीओ चित्रीकरण हे सर्व शासनाने जाहीर करावे. 

आपण याबाबत शासन निर्देशीत करावे हिच अपेक्षा. कार्यवाही कळवावी.

या प्रकरणावरुन शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंबरोबरच समाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनीही नाराजी व्यक्त केली आहे.





Source link

पुण्यात 15 टक्के तर मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू होणार? अल-निनोचा महाराष्ट्रातील मोठ्या शहरांना पहिला मोठा फटका!

पुण्यात 15 टक्के तर मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू होणार? अल-निनोचा महाराष्ट्रातील मोठ्या शहरांना पहिला मोठा फटका!


El Nino effect on Monsoon 2026 : अल-निनोचा महाराष्ट्रातील मोठ्या शहरांना पहिला मोठा फटका बसला आहे. पुण्यात 15 टक्के तर मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू होणार आहे.  पुण्यात उन्हामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे.  31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पाणीकपात करावी लगाणार आहे.  मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू होण्याची शक्यता आहे.  अल-निनोच्या फटक्यामुळे पाणीकपातीची टांगती तलवार कायम आहे. 

Add Zee News as a Preferred Source

1 मेपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागु होणार

अल नीनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असून, मुंबईत 1 मेपासून 10 टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पालिका प्रशासनाकडून 10 टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.  सात धरणांत सध्या 33.60 टक्के पाणीसाठा आहे.  ७ जुलैपर्यंत पुरेल इतका साठा आहे.  वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन वाढून पाणीसाठ्यात घट होऊ शकते.  पाणीपुरवठ्याची स्थिती चिंताजनक आहे.  मोडक सागर, तानसा, भातसा, वैतरणा आदी 7 धरणांतून दररोज 4,100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.  वर्षभरासाठी 14.47 लाख दशलक्ष लिटर आवश्यक पाणीसाठा लागतो.  मान्सून उशिरा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत नियोजन करण्याची गरज आहे. 

धरणातील पाणीसाठा – 15 एप्रिल 2026
– भातसा : २,३५,४३९ दशलक्ष लिटर (सर्वाधिक)
– मध्य वैतरणा : ६९,१०६
– अप्पर वैतरणा : ७७,०४५
– तानसा : ४०,८१७
– मोडक सागर : ४५,३४०
– विहार : १५,३५३
– तुळशी : ३,२७४
तीन वर्षांची तुलना (टक्के)
२०२६ : ३३.६०%
२०२५ : ३०.२४%
२०२४ : २४.५४%

राज्य सरकारच्या सूचनेनुसार यंदा जुलैऐवजी ऑगस्टपर्यंत पाणी नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. 1  मेपासून कपात लागू केल्यासच मुंबईकरांना अखंडित पाणीपुरवठा राखता येईल, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे .

पुणे शहरात 15 टक्के पाणी कपात?

हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवल्याने, तसेच खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा 31 ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह एमआयडीसीला दरमहा 15 टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पुणेकरांना आता उन्हाळ्याच्या तीव्र झळांसोबतच पाणीटंचाईचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अल-निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे मॉन्सून कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेनुसार, भविष्यात अवर्षणप्रवण परिस्थिती निर्माण झाल्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत.

पुण्यात कुठल्या धरणात किती पाणीसाठा

खडकवासला: ४३ टक्के
पानशेत: ५६ टक्के
वरसगाव: ४६ टक्के
टेमघर: ११.८८ टक्के
एकूण पाणीसाठा: ४५ टक्के
गेल्या वर्षी पाणीसाठा (आजच्या तारखेला): ४१ टक्के





Source link

खरात प्रकरणी पहिल्यांदाच शरद पवारांच्या 'या' नेत्याचं आलं नाव; अंजली दमानियाही आश्चर्यचकित; म्हणाल्या 'मला अपेक्षा नव्हती'

खरात प्रकरणी पहिल्यांदाच शरद पवारांच्या 'या' नेत्याचं आलं नाव; अंजली दमानियाही आश्चर्यचकित; म्हणाल्या 'मला अपेक्षा नव्हती'


Anjali Damania PC on Ashok Kharat: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातला मोठं करण्यामागे अधिकारी, राजकारणी होते असं सांगत यादीच वाचून दाखवली आहे. यावेळी त्यांनी रुपाली चाकणकर आणि त्यांचं सर्व कुटुंबीय अशोक खरातच्या संपर्कात होता असा खुलासा केला आहे. अशोक खरातशी फोनवरुन सर्वाधिक संपर्क साधणाऱ्यांमध्ये रुपाली चाकणकर दुसऱ्या क्रमांकावर असून एक कॅाल तर 22 मिनिटांचा आहे असाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी एका नेत्याचं नाव समोर आल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचं सांगितलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

खरातला मोठे करणारे राजकारणी, अधिकारी

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, “अशोक खरातला मोठे करणारे राजकारणी, अधिकारी होते. त्यांच्या दिमतील सगळे होते. त्यातील काही राजकारण्यांची नावे माझ्याकडे आली आहेत. काही राजकारणी संधीसाधूपणा, किंवा साध्य करण्यास गेले असतील”. 

यादीच वाचून दाखवली

यावेळी अंजली दमानिया यांनी यादीच वाचून दाखवली ज्यामध्ये, नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, त्यांचे पीए मंगेश देशपांडे, सिन्ररमधून निवडणुकीला उभे राहिलेले उदय सांगळे, विधानपरिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, भुसे यांचे पीए रामदास खेडकर,  विखे पाटलांचे ओएसडी खताडे, सुनील तटकरे यांचा उल्लेख होता. दीपक केसरकर यांनी 19 कॉल केले होते असं त्यांनी सांगितलं. 

‘जयंत पाटीलही अशोक खरातकडे गेले होते’

राष्ट्रवादीचे जयंत पाटीलही अशोक खरातकडे गेले होते असाही दावा त्यांनी केला आहे. त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा नव्हती अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. त्या म्हणाल्या की, “जयंत पाटीलही अशोक खरातकडे गेले होते. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे नाव वाचून दु:ख झालं. त्यांना अशा बाबाकडे भविष्य विचारण्यासाठी कोण घेऊन गेलं माहिती नाही. मला ती व्यक्ती आतापर्यंत चांगली वाटायची”.  

रूपाली चाकणकर यांनी 177 कॅाल केले

चाकणकांनी फेसबुक पोस्ट केली असून, मीडिया ट्रायल सुरु असल्याचा दावा केला आहे. धनंजय मुंडेंप्रमाणे मीडियातून गायब आहेत असं त्या म्हणाल्या. “चाकणकर कुटुंबियांतील सर्वांनी फोनवरुन खरातशी संपर्क साधला होता. रुपाली चाकणकर, मुलगा सोहम, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल, संकेत या सर्वांचे कॉल यादीत सापडलले आहेत. 1 एप्रिल ते 17 मार्चच्या कॉल डेटानुसार, रूपाली चाकणकर यांनी 177 कॅाल केले. त्यातल इनकमिंग 119 व आऊटगोंईंग 58 आहेत. 17 मार्चला अशोक खरातचा फोन बंद होईपर्यंत बोलत होत्या. एक कॅाल तर 22 मिनिटांचा आहे. नेमक्या कसल्या गप्पा मारत होत्या?,” अशी विचारणा अंजली दमानियांनी केली आहे. 

तिसऱ्या नंबरवर दिपक लोंढे

“टॅाप दहा फोन नंबर ज्यांनी सर्वात जास्त वेळ खरातशी बोलले त्यात त्याची मुलगी तृप्ती पहिल्या नंबरवर व दुसऱ्या नंबरवर रूपाली चाकणकर आहेत. त्या 33 हजार 727 सेकंद बोलल्या.  जर काही काम नव्हतं, संस्थेचं काम करत होता तर तुम्ही तर टॉपच्या दुसऱ्या क्रमांकावर कशा? 30 सेकंदाचे कॉल समजू शकले असते. नंतर तिसऱ्या नंबरवर दिपक लोंढे, मग पत्नी कल्पना आहे. दिपक लोंढे केसरकरांचे जवळचे आहेत. ज्यांचे 189 कॅाल आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली. 





Source link

आखातातील युद्धाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला फटका! स्मारकाचं काम रखडण्याची शक्यता

आखातातील युद्धाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला फटका! स्मारकाचं काम रखडण्याची शक्यता


 अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचा फटका आता थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला बसलाय, युद्धामुळे तांबे आणि एलपीजीची टंचाई निर्माण झाली असून किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे. या महागाईचा फटका इंदू मिलमध्ये साकारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला बसत आहे. त्यामुळे हा प्रकल्प आणखी वर्षभर रखडण्याची शक्यता आहे असे सांगितले जात आहे, दरम्यान युद्ध आणि स्मारकाचा संबंध काय? असा सवाल करत संजय राऊतांनी सरकारला केला आहे. तर याला प्रत्युतर देत मविआच्या काळामध्ये विटही रचण्यात आली नव्हती विटही रचण्यात आली नव्हती असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आखातातील युद्धाचा स्मारकाला फटका

इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकावरून सुप्रिया सुळेंनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्ष फोडायला वेळ आहे, मात्र बाबासाहेबांच्या स्मारकासाठी वेळ नसल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका जोरदार टीका केली आहे. आखाती युद्धामुळे तांबे आणि एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे, याचा फटका आता ‘दादर’च्या ‘इंदू मिल’मध्ये साकारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आतंरराष्ट्रीय स्मारकाला बसतोय. तांबे आणि एलपीजीच्या टंचाई आणि दरवाढीमुळे हा प्रकल्प आणखी वर्षभर रखडण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा – ‘जय भीम’ शब्द कसा तयार झाला? भारतात पहिल्यांदा जय भीम अशी घोषणा कोणी, कधी आणि कुठे केली?

स्मारकाचं काम पूर्ण होईल – साटम

विरोधकांनी स्मारकावरून सरकारवर केलेल्या टीकेनंतर अमित साटम यांनी उत्तर दिलं आहे. भाजप नेते अमित साटम यांनी दोन वर्षात इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण होईल असं सांगितल आहे. तर दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवू नका असं विधान सुजात आंबेडकर यांनी केलं. त्याऐवजी रिसर्च सेंटर उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

मागील अनेक वर्षांपासून इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम सुरू आहे. मात्र, आता आखातातील युद्धाचा स्मारकाच्या कामावर परिणाम झाला आहे असे सांगितले जात आहे. धातू ओतकामात एलपी वापरला
जातो. आखाती युद्धामुळे तांबे आणि एलपीजीची देशात टंचाई असून दोन्हींचे दरही वाढले, त्यामुळे स्मारकाचं काम रखडण्याची शक्यता आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp