महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात ‘सीट्रिपल आयटी’ सेंटर; राज्यात तिसरे मोठ्या IT पार्क उभारण्याआधी 1,15,00,00,000 रुपयांचे ट्रेनिंग सेंटर

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात ‘सीट्रिपल आयटी’ सेंटर; राज्यात तिसरे मोठ्या IT पार्क उभारण्याआधी 1,15,00,00,000 रुपयांचे ट्रेनिंग सेंटर


IT Park now the Ctriple IT center : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क मधील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्रात दोन नवीन आयटी पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक आयटी पार्क पुरंदर येथे तर दुसरे आयटी पार्क सातारा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. साताऱ्यात  राज्यात तिसरे मोठ्या IT पार्क उभारण्याआधी 1,15,00,00,000 रुपयांचे ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

साताऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲन्ड ट्रेनिंग सेंटर उखखखढ (‌‘सीट्रिपलआयटी‌’) स्थापन केले जामार आहे. या संदर्भातील प्रस्ताव टाटा टेक्नॉलॉजीजने राज्य सरकारकडे सादर केला आहे. हा प्रकल्प 115 कोटी रुपयांचा आहे. यासंदर्भात कंपनीने मुख्यमंत्री तसेच  उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून प्रकल्पाची माहिती दिली आहे. सातारा शहर लवकरच आयटी हब म्हणून उदयास येणार आहे. सातारा आयटी पार्क प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. लिंब खिंड नागेवाडी परिसरात हे नवे आयटी पार्क उभारले जाणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांन या IT पार्कच्या उभारणीसाठी  सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. 

साताऱ्यात IT पार्क उभारण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु असतानाच आयटी सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  टाटा टेक्नॉलॉजीजच्या सीआयआयआयटी प्रस्तावामुळे येथील आयटी पार्कला आणखी बळकटी येणार आहे. ‌‘टाटा टेक्नॉलॉजी‌’ कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र राज्य शासनाला पाठवले असून टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सातारा येथे लवकरत हे नवीन केंद्र उभारले जाणार आहे. 

या नव्या ‘सीट्रिपल आयटी’ सेंटरमुळे सातारा जिल्ह्यातील तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‌‘एआय‌’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल शिवेंद्रराजे यांनी दोघांचेही आभार मानले आहेत.
उद्योगक्षेत्रात तंत्रज्ञानाच्या जलद बदलामुळे कौशल्याधारित प्रशिक्षणाची गरज वाढली आहे.  सध्याची व्यावसायिक प्रशिक्षण प्रणाली स्पर्धात्मक उद्योगमानकांशी जुळत नसल्याचे टाटा टेक्नॉलॉजीजने नमूद केले आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, नवीन मॉडेल्स आणि उद्योग 4.0 कौशल्यांमुळे रोजगार संधी बदलत आहेत, परंतु विद्यमान शैक्षणिक पद्धती मागे पडत असल्याने कुशल मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सीआयआयआयटी सेंटरमुळे नवा बदलाव येणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजने कर्नाटक, तामिळनाडू, बिहार आणि आसाम या राज्यांत असे कौशल्यविकास केंद्र यशस्वीरीत्या उभारले आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली येथेही राज्य सरकारच्या सहकार्याने असेच प्रकल्प राबवले आहेत. आता साताऱ्यात उद्योग 4.0 कौशल्यांसाठीच्या प्रशिक्षणाची उणीव भरून काढण्यासाठी सीआयआयआयटी उभारण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे, प्रयोगशाळा, सुविधा उन्नतीकरण, अभ्यासक्रम पुनर्रचना व नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा समावेश होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यावर दरवर्षी सुमारे 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रस्तावित प्रकल्पाची एकूण रक्कम 115 कोटी असून, त्यातील 15 टक्के हिस्सा साताऱ्यातून उभारला जाईल. उर्वरित खर्च टाटा टेक्नॉलॉजीज व उद्योग भागीदार उचलणार असल्याचे या संदर्भातील पत्रात नमूद आहे.

 





Source link

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ? उदय सामंत यांचा खळबळजनक दावा, 'काही दिवसात…'

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ? उदय सामंत यांचा खळबळजनक दावा, 'काही दिवसात…'


Uday Samant Big Claim: महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसंदर्भात त्यांनी मोठा दावा केला आहे. जर हा दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 

Add Zee News as a Preferred Source

उदय सामंत यांचा दावा काय? 

नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. यादरम्यान एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आरोप-प्रत्युत्तर, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्याच उदय सामंत यांनी एक दावा केला आहे. 

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. काही दिवसातच सगळं काही समोर येईल असंही सूचक विधान त्यांनी केलं आहे. 

संजय शिरसाट यांनीही केला होता दावा

उदय सामंत यांच्याआधी शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही असाच एक दावा केला होता. उद्धव ठाकरेंचे 20 पैकी 12 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांना माध्यमांशी केला होता. आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार असल्याचा दावा केल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर देताना हे विधान केलं होतं. 

“उद्धव ठाकरेंचे 20 पैकी 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. मी रोज त्यांच्या संपर्कात आहे, माझं रोज त्यांच्याशी बोलणं होतं. ज्या दिवशी एकनाथ शिंदे झेंडा दाखवतील, ते सगळे आमच्या शिवसेनेत दाखल होतील,” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं होतं. 

सगळ्या आमदारांची नावं माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर त्यांची नावं जाहीरपणे सांगणार असंही त्यांनी म्हटलं होतं. हे सर्व आमदार उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळले असून, लवकरच आमच्या शिवसेनेत येणार आहेत असा दावा त्यांनी केला होता. 





Source link

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यातील आरोपी शिंदेंच्या शिवसेनेत?

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यातील आरोपी शिंदेंच्या शिवसेनेत?



 छत्रपती संभाजीनगर मध्ये आदर्श बँक घोटाळा चांगलाच गाजला होता अनेक गोरगरिबांचे पैसे तिथे अडकले त्यातीलच काही प्रमुख आरोपींचा नुकताच पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश झाला असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. 



Source link

तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी, 20 कोटींवरुन राडा… BJP आमदाराला कोणी दिली धमकी? नेमका वाद काय?

तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी, 20 कोटींवरुन राडा… BJP आमदाराला कोणी दिली धमकी? नेमका वाद काय?


BJP MLA Threat Calls For Questioning Tukaram Mundhe: भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना, त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद नसतानाही नियमबाह्य पद्धतीने एका कंत्राटदाराला 20 कोटी रुपयांचा वर्क ऑर्डर दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खोपडे हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून मुंढेंना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

Add Zee News as a Preferred Source

देवगिरी बंगल्यावर शिंदेंची भेट

नागपूर पूर्वचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएस अधिकारी तुकाराम मुंढेबाबत खळबळजनक दावा केल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंडेंविरोधात लक्षवेधी लावली होती. खोपडेंनी तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी केली आहे. कृष्णा खोपडे यांनी सोमवारी दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. देवगिरी बंगल्यावर त्यांनी ही भेट घेतली. मुंढे यांच्या समर्थकांकडून मराठवाड्यातून धमकी दिल्याचा कृष्णा खोपडे यांचा आरोप असून त्यांनी आपलं म्हणणं उपमुख्यमंत्र्‍यांसमोर मांडल्याचं समजतं. 

फोनवरुन धमक्या देण्यात आल्या

सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप करत लक्षवेधी मांडण्याची येण्याची भूमिका घेणारे आमदार कृष्णा खोपडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमकीचे फोन आल्याचा दावा केला आहे. मुंडेंच्या निलंबनाची मागणी का करत असल्याचा सवाल करत दोन जणांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याचा दावा खोपडे यांनी केला आहे. तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध लक्षवेधी लावू नका, तक्रार करू नका अशा धमक्या फोनवरुन देण्यात आल्याचा दावा खोपडेंनी केला आहे. या प्रकरणी खोपडे पोलिसात तक्रार करणार आहेत.  

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

फोनवरून धमकीप्रकरणी खोपडे यांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. तसेच बर्डी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केल्याचं त्यांनी सांगितले.

कठोर निर्णयांमुळे राजकारणींशी मुंढेंचा सतत संघर्ष

तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या छोट्या गावात झाला. ते शेतकरी कुटुंबातून आले असून, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून राजनीती शास्त्रात मास्टर्स पदवी घेतली आहे. मुंढे यांनी राजनीती शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. ऑगस्ट 2005 मध्ये ते आयएएस सेवेत रुजू झाले. त्यांच्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांना अनेक वेळा ट्रान्सफर मिळाल्या आहेत. 2025 पर्यंत त्यांना 23 वेळा ट्रान्सफर झाल्या आहेत, ज्यामुळे ते अशोक खेमका यांच्या सारखे चर्चेत राहिले आहेत. मुंढे यांना प्रामाणिकपणा आणि कठोर निर्णयांमुळे राजकारणी आणि सहकाऱ्यांशी संघर्ष होतो. त्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे ट्रान्सफर होतात, असे म्हटले जाते. 





Source link

महाराष्ट्राला हादरवणारी घटना! चौकशीसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, पोलीस ठाण्याच्या मागेच…

महाराष्ट्राला हादरवणारी घटना! चौकशीसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, पोलीस ठाण्याच्या मागेच…


Palghar Crime News: पालघर जिल्ह्यातील कासा येथे एक महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. जनतेचे रक्षकच भक्षक बनले आहेत. एका पोलीस हवलदाराने तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Zee News as a Preferred Source

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका तक्रारी अर्जाच्या चौकशीसंदर्भात कासा पोलीस ठाण्यात आली होती. तेव्हा याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शरद भोगाडे नावाच्या पोलीस हवलदाराने चौकशीच्या बहाण्याने पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या खोलीत नेले. त्याच ठिकाणी आरोपी पोलीस हवालदाराने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. महिलेने मोठे धाडस दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलीस हवालदार भोगाडे याच्यावर लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, पुढील तपासासाठी गुन्हा कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती माहिती मिळाली आहे. आरोपी हवालदार बुगडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारीची तातडीने जिल्हा मुख्यालयात बदली केली आहे. तसेच या प्रकरणी सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार

मालेगाव पाठोपाठ आता मनमाड शहरात ही अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी 64 वर्षीय बाबा भागवतला अटक करून त्याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या नराधमाने एका 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला शिवाय तो शहरातील एका भागात असलेली लॉन्ड्रीच्या दुकान प्रेस करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या लहान मुलांशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे डिवायएसपी बाजीराव महाजन यांनी सांगितले.

FAQ

  1. ही घटना पालघर जिल्ह्यात नेमकी कुठे घडली आहे?

ही घटना पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

2. आरोपी कोण आहे?

आरोपीचे नाव शरद भोगाडे आहे, जो कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस हवालदार आहे.

3. पीडित महिला पोलीस ठाण्यात कशासाठी आली होती?

पीडित महिला एका तक्रारी अर्जाच्या चौकशीसंदर्भात कासा पोलीस ठाण्यात आली होती.

4. आरोपीने महिलेवर कुठे लैंगिक अत्याचार केला?

आरोपी पोलीस हवालदाराने चौकशीच्या बहाण्याने पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या खोलीत महिलेवर लैंगिक अत्याचार केला.





Source link

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई; शीतल तेजवानीनंतर दुसऱ्या आरोपीला अटक; आता फक्त एक जण राहिला

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई; शीतल तेजवानीनंतर दुसऱ्या आरोपीला अटक; आता फक्त एक जण राहिला


Pune Koregaon Park Land Deal Parth Pawar:  झी 24 तासने समोर आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या तक्रारीनंतर बावधन पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीची विक्री करणा-या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि  सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर आता   दुय्यम निबंधक रवींद्र तारु याला अटक करण्यात आली आहे. आता तिसऱ्या व्यक्तीला अटक कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

Add Zee News as a Preferred Source

झी २४ तासनं उघड केलेला जमीन गैरव्यवहार प्रकरण मोठी अपडेट समोर आली आहे.  पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला बावधन पोलिसांनी  अटक केली आहे.  रवींद्र तारूला पौड कोर्टात हजर केले जाणार आहे. रवींद्र तारू याने गैरव्यवहार करत दस्त बनवून दिले होते.  या संदर्भात पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू यांच्या विरोधात मुद्रांक शुल्क बुडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीचा व्यवहार झाला आहे. 300 कोटींच्या व्यवहारासाठी अवघ्या 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याच्या गोंधळाबरोबरच इतरही अनेक आक्षेप घेतले जात आहे.  या प्रकरणात पार्थ पवार यांच्या विरोधात कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही.  झी 24 तासने बुधवारी रात्रीपासून ही बातमी लावून धरली होती. त्यानंतर काल सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर तातडीने तपासाची सूत्रे हलली आणि कारवाई सुरू झाला. रात्री मुद्रांक विभागाच्या तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

FAQ

1 पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण काय आहे?
पुणे शहरातील मुंढवा भागात राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनीबाबत अपहार केल्याप्रकरणी एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याप्रकरणी दिग्विजय अमरसिंह पाटील, शीतल तेजवानी, तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमेडिया कंपनीचाही यात समावेश आहे. बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. नायाब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती.

2  या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे?उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे ४० एकर जमिनीचा ३०० कोटी रुपयांचा व्यवहार केला असून, त्यासाठी अवघ्या ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा जमीन गैरव्यवहार उघडकीस आला, ज्याचा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी डायरेक्ट कनेक्शन आहे. हे नवे प्रकरण पुण्याच्या मुंढवा भागातील आहे.

3  या प्रकरणी कोणत्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे?या प्रकरणी दिग्विजय अमरसिंह पाटील (पार्थ पवार यांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार), शीतल तेजवानी (जागेची पॉवर ऑफ एटर्नी असलेली), निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले, रवींद्र तारू यांच्यासह एकूण ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगनमत करून शासनाचा ५ कोटी ८९ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडल्याबद्दल हा गुन्हा आहे.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp