सत्तास्थापनेसाठी नवी समीकरणं? इस्लाम पार्टीची, शिवसेना, एमआयएमला साद, हिंदुत्ववादी शिवसेना इस्लाम पार्टीला पाठिंबा देणार?

सत्तास्थापनेसाठी नवी समीकरणं? इस्लाम पार्टीची, शिवसेना, एमआयएमला साद, हिंदुत्ववादी शिवसेना इस्लाम पार्टीला पाठिंबा देणार?



महापालिकांचे निकाल लागताच आता सत्तास्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आलाय. मालेगावात इस्लाम पार्टीनं सर्वाधिक जागा जिंकून सर्वांना धक्का दिलाय.. 35 जागा जिंकलेल्या इस्लाम पार्टीला बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे.



Source link

'आम्हाला कोणत्याही पक्षाची…', एकनाथ शिंदेंकडून मुंबईच्या महापौर पदासंदर्भात मोठं विधान, 'आम्ही BJP ला…'

'आम्हाला कोणत्याही पक्षाची…', एकनाथ शिंदेंकडून मुंबईच्या महापौर पदासंदर्भात मोठं विधान, 'आम्ही BJP ला…'


Ekanth Shinde on Mayor of Mumbai: मुंबई महापालिकेचा निकाल लागल्यानंतर आता, मुंबईचा महापौर कोण होणार? याचे सर्वांना वेध लागले आहेत. महापौरपदासाठी भाजपा उद्धव ठाकरेंसोबत पडद्यामागून चर्चा करत असल्याचे दावे केले जात आहेत. एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी भाजपा मुंबईत रणनिती आखत असल्याची चर्चा आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपा मुंबई महानगरपालिकेत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले असून  मुंबईत महायुतीचा महापौर होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असंही त्यांनी सांगितले. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबईमध्ये महानगर निवडणूकध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, आणि शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देत मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना – भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असंही ते म्हणाले. 

यासोबतच ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजप हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसून मुंबईत शिवसेना भाजप रिपाइं महायुतीचा महापौर होईल असे त्यांनी सांगितलं.

“आम्ही बहुमताचा आदर करणार असून, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मुंबईत सध्या अफवा, अपप्रचार सुरु असून त्याला मी उत्तर देताना इतकंच सांगतो की, महायुतीला बहुमत दिलं असून महायुतीच महापौर होईल. ठाणे, कल्याण डोंबिंवली, उल्हासनगर तसंच राज्यातील इतर शहरात जिथे एकत्र लढलो आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढलो. काही महापालिका सोडल्या तर महायुतीची एकत्र सत्ता स्थापन करणार आहोत. लोकांनी विकासाला स्विकारलं आहे. भावनिक मुद्द्यांनाही लोकांनाही नाकारलं आहे. त्यामुळे मुंबईकरांचा आदर करण्याचं काम महायुती करणार आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

“विरोधकच चर्चा पसरवत आहेत. हारल्यानंतरही टांग उपर अशी स्थिती आहे. खोट्या अफवा पसरवणं, आरोप करणं हेच त्यांचं काम आहे. आम्हाला कोणत्याही पक्षाची आवश्यकता नाही. शिवसेना आणि भाजपा अनेक ठिकाणी बहुमतात आहोत. त्यामुळे नगरसेवक पळण्याची गरज नाही. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल,” असं त्यांना ठामपणे सांगितलं आहे. 

“बार्गेनिंग करणं, महापौरपदाबद्दल कोणताही वाद, संभ्रम नाही. मुख्यमंत्री आता दावोसला आहेत, आल्यावर चर्चा होईल. चर्चेनंतर समन्वयाने निर्णय घेतला जाईल. आम्ही कोणताही दावा केलेला नाही. सत्ता आणि खुर्ची नाही तर विकास हेच आमचं ध्येय आहे. मुंबईला काय देणार, मुंबईचा विकास कसा करणार हे ध्येय आहे. सर्व अफवा आहेत त्याकडे लक्ष दिलं जाऊ नये,” असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 

“नवीन नगरसेवक निवडून आले, त्यांचं वर्कशॉप झालं. कसं काम करायचं, आदर्श वॉर्ड यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. उद्या गट स्थापन झाल्यानंतर आपल्या वॉर्डात जातील. आमच्या नगरसेवकरांवर अविश्वास दाखवण्याची गरज नाही. उलट जे अफवा पसरवत आहेत त्यांनी आपल्या नगरसेवकांची चिंता करावी,” असा टोला त्यांनी लगावला आहे. 





Source link

पुण्यातून साताऱ्याला जाताना 'S' आकाराचे वळण असलेला डेंजर घाट लागणार नाही! 45 मिनिटांचा धोकादायक प्रवास फक्त 10 मिनिटांत

पुण्यातून साताऱ्याला जाताना 'S' आकाराचे वळण असलेला डेंजर घाट लागणार नाही! 45 मिनिटांचा धोकादायक प्रवास फक्त 10 मिनिटांत



पुणे ते सातारा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. पुण्यातून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाट लागणार नाही. नवी बोगदा बांधण्यात आला आहे. यामुळे 45 मिनिटांचा धोकादायक प्रवास फक्त 10 मिनिटांत होणार आहे. 



Source link

'अजित पवार, भाजप, शिंदेंकडे मोठ्या प्रमाणात हरामाचा पैसा; त्याचा खळखळाट असा घडला की, सगळ्यांचीच वस्त्रं…'

'अजित पवार, भाजप, शिंदेंकडे मोठ्या प्रमाणात हरामाचा पैसा; त्याचा खळखळाट असा घडला की, सगळ्यांचीच वस्त्रं…'


Maharashtra Politics Crrupt Money: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सत्तेतील तिन्ही पक्षांकडे हरामाचा पैसा असल्याचा टोला लगावला आहे. ‘सामना’मधील ‘रोखठोक’ या सदरामधून राऊत यांनी हा टोला लगावला आहे. “महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपचे पुरते वस्त्रहरण केले. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या व लुटमारीच्या फाईल्स आपल्याकडे आहेत हा बॉम्ब टाकून त्यांनी खळबळ उडवली,” असं राऊत म्हणालेत.

Add Zee News as a Preferred Source

1999 मध्ये 100 कोटी म्हणजे आजचे दोनेक हजार कोटी

“भाजपने त्यांचे सरकार (1999) असताना 100 कोटींचा सिंचन घोटाळा केला व हे 100 कोटी ‘पार्टी फंड’ म्हणून वळवले. या व्यवहारात 10 कोटी लाच म्हणून अधिकाऱ्यांना दिले. पुरंदर जलसिंचन योजनेत हा घोटाळा झाला. योजनेची किंमत 330 कोटींपर्यंत वाढवली. ही वाढवलेली किंमत होती. 100 कोटी रुपये वाढवून फाईल तयार केली. 1999 मध्ये 100 कोटी म्हणजे आजचे दोनेक हजार कोटी. भाजपने सिंचन घोटाळा करून हे पैसे घेतले व अजित पवार यांनी भाजपचा सिंचन घोटाळा उघड केला. ही फाईल आपल्या ताब्यात असल्याचा स्फोट अजित पवार यांनी आता केला. गणेश नाईक यांच्या शब्दांत सांगायचे तर हा हरामाचा पैसा आहे,” असं राऊत म्हणालेत.

पंतप्रधान मोदींचा व मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुखवटा फाडला

“अजित पवार, भाजप आणि शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात हरामाचा पैसा आहे. हरामाच्या पैशांवर हे तिघे एकमेकांवर हल्ले करीत आहेत. तरीही तिघे एकाच सरकारमध्ये नांदत आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला व मुख्यमंत्र्यांनी प्रतिहल्ला केला. “भाजपने माझ्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, पण आज मी त्यांच्या सरकारमध्ये आहे!” असे सांगून अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचा व मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुखवटा फाडला. शिंदे यांचा 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार आपण कसा रोखला, हे मुख्यमंत्री फडणवीस खुलेपणाने सांगतात,” असा टोमणा राऊतांनी लगावला आहे.

खरे राजकारण पुढेच घडणार

“भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेला निवडणूक आयोग म्हणून ही महानगरपालिका निवडणूक लक्षात राहील. त्या चिखलात त्यांनी मुंबईलाही बुडवले. हरामाच्या पैशांचा खळखळाट असा घडला की, सगळ्यांचीच वस्त्रं वाहून गेली. मराठी माणूस, मुंबईच्या रक्षणासाठी ‘ठाकरे बंधूं’नी झुंज दिली. हा अस्मितेच्या लढय़ाचा इतिहास नव्याने लिहिला जाईल. महापालिका निवडणुका संपल्या, निकाल लागले. खरे राजकारण पुढेच घडणार आहे,” असं सूचक विधान राऊतांनी केलं आहे.





Source link

पुण्यातील कॉलेज आणि शाळांना 19 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर; कार्यालयांना देखील शक्य असेल तर सुटी देण्याच्या सूचना

पुण्यातील कॉलेज आणि शाळांना 19 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर; कार्यालयांना देखील शक्य असेल तर सुटी देण्याच्या सूचना


Pune News : 19 ते 23 जानेवारी दरम्यान  पुणे शहरात  आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. पुण्यातील अनेक प्रमुख रस्ते या स्पर्धेकरिता काही काळासाठी बंद ठेवले जाणार आहेत. या काळात विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ शकते. यामुळे विद्यार्थांना याचा फटका बसू नये म्हणून प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 19 जानेवारीला पुणे शहरातील प्रमुख भागांमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source

19 जानेवारी 2026 रोजी पुणे शहरात सायकल रॅली पार पडणार आहे. या निमित्त जंगली महाराज आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक आठ तास सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे. दरम्यान शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली असून, कार्यालयांना देखील शक्य असेल तर सुटी देण्यात यावी अथवा मेट्रो व अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बजाज पुणे ग्रँड टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा

बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  पुणे येथे आयोजित या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूरच्या शुभारंभ आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग मंचावर उपस्थित होते.

पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर येणार

पुणे जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथे प्रत्येक किलोमीटरवर शौर्य, परंपरा आणि संस्कृतीच्या कथा अनुभवायला मिळतील. पुणे हे सांस्कृतिक राजधानीबरोबरच तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी क्षेत्रातील अग्रगण्य शहर असून, पश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य  स्पर्धेला वैशिष्ट्यपूर्ण उंची देईल. ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल, असा विश्वास व्यक्त करत, या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे येईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही भविष्यातील अनेक शतकांसाठी टिकणाऱ्या मार्गाची सुरुवात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, स्पर्धेसोबत विविध पूरक उपक्रम राबवण्यात येणार असून, पर्यटकांना निसर्गासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

‘यूसीआय’च्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व रायडर्सनी  खिलाडूवृत्तीने स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन केले.  जगभरातील किमान 35 देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटू, व्यवस्थापक, प्रशिक्षक  आणि सहकारी अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्वागत करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पर्धेच्या भव्य आणि नेटक्या आयोजनासाठी पुणे जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे विशेष अभिनंदन केले. अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्पर्धेची तयारी पूर्ण करणे हे उल्लेखनीय असून ४३७ किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धेसाठी केवळ रस्तेच नव्हे, तर आवश्यक संपूर्ण सुविधा उभारण्यात आल्या असून, कामाच्या अंमलबजावणीचा हा वेग अभूतपूर्व असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. गेल्या तीन दशकांतील प्रशासनातील अनुभवात पाहिलेला हा एखाद्या आयोजनाच्या तयारीचा सर्वोच्च वेग असल्याचे नमूद करत त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 





Source link

'हा ठाकरेंचा शब्द आहे!' अवघ्या 6 जागा मिळाल्यानंतर अमित ठाकरे भावूक; म्हणाले, 'मला कदाचित…'

'हा ठाकरेंचा शब्द आहे!' अवघ्या 6 जागा मिळाल्यानंतर अमित ठाकरे भावूक; म्हणाले, 'मला कदाचित…'


Amit Thackeray On MNS Poor Performance In BMC Election: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही. मनसेला दोन आकडी नगरसेवकही महापालिकेवर निवडून पाठवता आलेले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करुन लढलेल्या या निवडणुकीमध्ये मनसेचे केवळ सहा उमेदवार निवडून आले आहेत. मराठी, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणारा यासारख्या भावनिक मुद्द्यांच्या आधारे निवडणुकीला सामोरे गेलेल्या ठाकरे बंधूंच्या हाती निराशाच पडली. या निकालाने मनसैनिकांना धक्का बसला असला तरी आता मनसेच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मानसिक आधार देण्याचं काम सुरु झालं असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपाठोपाठ आता अमित ठाकरेंनीही मुंबई महानगरपालिकेच्या निकालावर भाष्य करताना एक शब्द दिला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

माझं आणि तुमचं नातं फक्त…

अमित ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुंबईच्या निकालासंदर्भात एक पोस्ट केली आहे. “मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील! निकाल काहीही असो… खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका ‘बटणापुरतं’ किंवा ‘मतापुरतं’ कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे,” असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. ‘मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील,’ अशी कॅप्शन देत अमित ठाकरेंनी एक पोस्ट शेअर केली आहे.

नक्की वाचा >> आदित्य ठाकरेंमुळे ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका गमावली? ‘ती’ एक कृती ठरली कारणीभूत? खळबळजनक दावा

‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच…

तसेच, “तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला… सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील. ‘महाराष्ट्र’ आणि ‘मराठी’ माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील. खचून जाऊ नका… ‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच एकटं पडू देणार नाही… हा शब्द आहे ठाकरेंचा!” असं अमित ठाकरेंनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

हे विसरायचं नाही, राज ठाकरेंचं आवाहन

दरम्यान, यापूर्वी राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मराठीसाठी लढत राहणार असल्याचं पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे.  ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही,” असं राज यांनी म्हटलं आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp