गेटवे ऑफ इंडिया ते JNPT प्रवास फक्त 25 मिनिटांत; मुंबईच्या समुद्रात धावणार ई-स्पीड बोट

गेटवे ऑफ इंडिया ते JNPT प्रवास फक्त 25 मिनिटांत; मुंबईच्या समुद्रात धावणार ई-स्पीड बोट



नवीन वर्षात मुंबईच्या समुद्रात धावणार ई-स्पीड बोट धावणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते JNPT प्रवास फक्त 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. 



Source link

परीक्षेला गेला अन् घडलं भलतंच; महिला शिक्षेकेचा 10तील विद्यार्थ्यावर बलात्कार, आधी जाळ्यात ओढलं…

परीक्षेला गेला अन् घडलं भलतंच; महिला शिक्षेकेचा 10तील विद्यार्थ्यावर बलात्कार, आधी जाळ्यात ओढलं…



Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. 
 



Source link

मुंबईतील छुपे समुद्र किनारे; इथं जाण्यासाठी पैसा नाही तर फक्त जोडीदाराची सोबत पाहिजे, शांत, निवांत…

मुंबईतील छुपे समुद्र किनारे; इथं जाण्यासाठी पैसा नाही तर फक्त जोडीदाराची सोबत पाहिजे, शांत, निवांत…


Romantic Places In Mumbai :  जोडीदाराचा हात हातात घेऊन शांत निवांत ठिकाणी वेळ घालवावा असं प्रत्येकालाच वाटते.  मात्र, मुंबईच्या गर्दीत हे शक्य होतच नाही. कारण, मुंबईतील पर्यटनस्थळ देखील गर्दीने गजबजलेली. लांब कुठे फिरायला जाणे शक्य नसल्याने कुणी मुव्ही पहयाला जातात. तर, कुणी कॉफी किंवा डिनर डेटला जातात.  मात्र, मुंबईत असे काही छुपे समुद्र किनारे आहेत. जिथे जाण्यासाठी जास्त खर्च येणार नाही. 

मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी हे मुंबईतील सर्वात फमेस समुद्र किनारे आहेत. या समुद्र किनाऱ्यावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. यामुळे अनेकजण इथं जायला टाळतात.  अशा वेळस मुंबईतील हे छुपे समुद्र किनारे बेस्ट ऑप्शन ठरु शकतात. या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी तुम्हाला प्रवास खर्चाव्यतीरीक्त इतर कोणताही खर्च येत नाही. 

वर्सोवा 

वर्सोवा हा समुद्र किनारा जुहू चौपाटीपासून जवळ आहे. मात्र, इथं जुहू चौपाटी इतकी गर्दी नसते. अंधेरी स्टेशनला उतरुन रिक्षाने येथे जाता याते. तसेच मेट्रो ट्रेनने गेल्यास वर्सोवा मेट्रो स्टेशनवरुन हा समुद्र किनारा जवळ आहे.

वांद्रे रेक्लेमेशन

वांद्रे रेक्लेमेशन या मार्गालगत हा समुद्र किनारा आहे. येथून माहिम चौपाटी, दादर चौपाटी संपूर्ण परिसर दिसतो. 

बँंड स्टँड

बँंड स्टॅंड हे तसे मुंबईतील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथील वांद्रे किल्ल्याचा परिसर तसेच आसपासचा समुद्र किनारा सुशोभित करण्यात आला आहे. येथे ठराविक वेळेत पर्यटकांना प्रवेश दिला जातो.

कार्टर रोड

कार्टर रोड हा मुंबईच्या वांद्रे परिसरात येणारा छुपा समुद्र किनारा आहे. येथे आसपास कोळी बांधवांच्या वसाहती आहेत. या किनाऱ्याभोवती कठडे बांधण्यात आले आहेत. यामुळे या समुद्र किनाऱ्यावर बसून तुम्ही जोडीदारासह वेळ घलावू शकता. 

मनोरी

मनोरी संमुद्र किनारा हा मालाड परिसरात आहेत. मालाड स्टेशनपासून हा समुद्र किनारा तसा दूर आहे. मात्र, हा समुद्र किनारा मुंबईच्या गर्दीपासून अलिप्त आहे.

मढ

मढ हे मुंबईत छोटसं आर्यलंड आहे. या समुद्रकिनाऱ्यावर देखील पर्यटांकाची फारशी गर्दी नसते. यामुळे तुम्ही जोडीदारासोबत जाण्याचा प्लान करु शकता. 

गोराई 

बोरीवली परिसरातील गोराई समुद्र किनारा देखील अतिशय सुंदर आहे. येथे देखील पर्यटकांची फार गर्दी नसते. जोडीदारासह छान सुंदर सूर्यास्त अनुभवयाचा असेल तर गोराई समुद्र किनाऱ्याला नक्की भेट द्या.      

वसई, नालासोपऱ्यातील समुद्र किनारे

वसई नालासोपारा परिसरात देखील छुपे समुद्र किनारे आहेत. वसईतील राजौडी, नालासोपाऱ्यातील कळंब बीच आहे देखील छुपे समुद्र किनारे आहेत. 





Source link

मोठा ट्विस्ट? संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या तिघांचा मर्डर झाल्याचा दावा; रात्री 11.30 ला…

मोठा ट्विस्ट? संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या तिघांचा मर्डर झाल्याचा दावा; रात्री 11.30 ला…


Beed Massajog Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडकडे रवाना झालेल्या अंजली दमानिया यांनी आपण मोर्चात सहभागी होणार नसून ठिय्या आंदोलन करुन संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणार असल्याचं ‘झी 24 तास’शी बोलताना सांगितलं. इतक्यावरच न थांबता या प्रकरणातील तीन आरोपींचा मर्डर करण्यात आल्याचा फोन आपल्याला आल्याचा दावाही अंजली दमानियांनी केला आहे.

राजकीय ड्रामा

बीडमधील सर्वपक्षीय मोर्चाबद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी, “सध्या तिथे राजकीय ड्रामा सुरु झालेला आहे. संदीप क्षीरसागर, सुरेश धस हे दुसरे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच आहेत. ते आपआपल्या क्षेत्रात तिचं काम करतात. अशा लोकांनी बोलावं हे हस्यास्पद आहे. आम्ही हातभर चांगली माणसं जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारत नाही आणि वाल्मिक कराडला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत,” असं सांगितलं. 

फरार आरोपींचा मार्डर?

पुढे बोलताना अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील तिन्ही फरार आरोपींचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक दावा केला आहे. “बाकी आरोपींना अटक करण्याची मागणी घेऊन आम्ही आलो होतो. पण एक धक्कादायक बातमी मला सांगायची आहे. काल रात्री जवळपास साडेअकराच्या आसपास मला फोन आले आणि त्यात असं सांगण्यात आलं की, ते तीन आरोपी आता तुम्हाला कधीच मिळणार नाही कारण त्यांचा मर्डर झाला आहे. हे ऐकून इतकं हदरायला झालं की मी ताबडतोब पोलीस निरिक्षकांना फोन करुन याची माहिती दिली. ते मेसेज त्यांना सांगितले. त्याची चौकशी ते करतील. हे किती खरं किती खोटं मला ठाऊक नाही. पण असं झालं असेल तर हे अतिशय भयानक आहे,” असं अंजली दमानिया म्हणाल्या.

नक्की वाचा >> Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्…; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम

मर्डरसंदर्भात पोलीस काय म्हणाले?

वाल्मिक कराडलाच वाचवण्यासाठी त्यांचा मर्डर केला असेल? असं विचारलं असताना अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडही आहे की नाही ठाऊक नसल्याचं विधान केलं. “आता वाल्मिक कराड देखील आहे की नाही काय माहिती? कोण काय कोणाला मारतंय काय चाललंय काहीच कळत नाहीये. मी पोलीस निरिक्षकांना ही माहिती दिली तर त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले यावर कन्फॉर्मेशन आलेलं नाही असं ते म्हणाले. मात्र असं काही झालं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं नाही. म्हणून काहीच कळत नाहीये,” असंही दमानियांनी म्हटलं.

नक्की वाचा >> संतोष देशमुख हत्या: न्यायाच्या मागणीसाठी आज सर्वपक्षीय मोर्चा! राऊत म्हणाले, ‘खरे गुन्हेगार…’

कुटुंबियांचं भावनिक आवाहन

सर्व पक्षीय मोर्चासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मस्साजोगमधून बीड शहराकडे रवाना झाले आहेत. संतोष देशमुख यांची मुलगी, पत्नी, भाऊ व बहीण मोर्चासाठी निघाले आहेत. संतोष देशमुख यांच्या आईची तब्येत खालवली असल्यामुळे त्या मोर्चात सहभागी होणार नाहीत. मस्साजोगचे गावकरी देखील संतोष यांच्या कुटुंबीयांबरोबर बीडकडे रवाना झाले आहेत. मोर्चाला निघताना देशमुख कुटुंबीय भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. न्यायासाठी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन संतोष देशमुख यांच्या मुलीचे केलं आहे. तर माझा एक भाऊ मी गमावला असला तरी माझे हजारो भाऊ मला न्याय मिळवून देतील असं म्हणताना संतोष देशमुख यांची बहीण भावूक झाली. मसाजोग गावात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.





Source link

सराफांना गंडा, लुटीचा नवा फंडा! दोन व्यापा-यांना 7 लाखांना गंडवलं; नागपुरात खळबळ

सराफांना गंडा, लुटीचा नवा फंडा! दोन व्यापा-यांना 7 लाखांना गंडवलं; नागपुरात खळबळ


पुढील
बातमी

‘महादेव अ‍ॅप घोटाळ्यात राजकीय ‘आका’चा सहभाग’; सुरेश धसांचा आरोप, महाराष्ट्रात खळबळ





Source link

Maharashtra Weather News : गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; राज्याच्या कोणत्या भागांना अवकाळी झोडपणार?

Maharashtra Weather News : गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; राज्याच्या कोणत्या भागांना अवकाळी झोडपणार?


पुढील
बातमी

महाराष्ट्रातील रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन मंत्र्याचा जबरदस्त प्लान; मुंबई आणि ठाण्यात धावणार केबल टॅक्सी





Source link

YouTube
Instagram
WhatsApp