सर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश

सर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश



Ajit Pawar : अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इनकम टॅक्स कडून जप्त करण्यात आलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे.
 



Source link

कोल्हापूर हादरलं! Cupcake मुळे भाऊ-बहिणीचा मृत्यू, 5 जण दगावले; दफन मृतदेह बाहेर काढून…

कोल्हापूर हादरलं! Cupcake मुळे भाऊ-बहिणीचा मृत्यू, 5 जण दगावले; दफन मृतदेह बाहेर काढून…



5 Died In Kolhapur: या प्रकरणामुळे पंचक्रोषीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दफन करण्यात आलेला मृतदेह पोलिसांनी तपासासाठी बाहेर काढवा लागला आहे.



Source link

'निकषाच्या बाहेर जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असेल तर….', पहिल्याच PC मध्ये फडणवीसांचा इशारा

'निकषाच्या बाहेर जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असेल तर….', पहिल्याच PC मध्ये फडणवीसांचा इशारा


Devendra Fadnavis Press Conference; राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचं काय होणार असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं आहे. लाडकी बहीण योजना सुरु राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच निकषाबाहेर कोणी फायदा घेतला असेल तर पुनर्विचार केला जाईल असंही स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना नेमकं कोणत्या गोष्टींवर लक्ष असेल यासंदर्भातही सांगितलं. 

लाडकी बहीण योजनेबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही योजना सुरुच ठेवणार आहोत. 2100 देखील देणार आहोत. बजेटच्या वेळी त्याचा विचार केला जाईल. आपले आर्थिक स्त्रोत पाहून पडताळणी होईल. पण आम्ही जी आश्वासनं दिली आहेत ती सगळी पूर्ण करु. त्यासाठी ज्या व्यवस्थांची गरज आहे त्या निर्माण करु. जर निकषाच्या बाहेर कोणी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा पुनर्विचार केला जाईल. तशा काही तक्रारी आल्या आहेत”. 

“मोदींनी शेतकरी सन्मान योजना सुरु केली तेव्हा लाभार्थ्यांमध्ये अनेक मोठे शेतकरी असल्याचं समोर आलं होतं. नंतर छाननी झाली असता अनेकांनी आपण निकषात बसत नाही सांगत माघार घेतली होती. नंतर ती योजना स्थिर झाली अशी आठवणही त्यांनी सांगितली. अशाप्रकारे लाडकी बहीण योजनेत निकषाच्या बाहेर बसणाऱअया बहिणी मिळाल्या तर पुनर्विचार करु. पण सरसकट पुनर्विचार करण्याचा विषय नाही,” असंही त्यांनी सांगितलं. 

“आमच्या भूमिका बदलल्या असल्या तरी दिशा, गती, समनव्य तोच राहणार आहे. त्यामुळे यात वेगळेपण पाहायला मिळणार नाही,” असं त्यांनी सांगितलं. “पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितलं की, मागच्या काळात 50 ओव्हरची मॅच होती. नंतर अजित पवार आले आणि 20 ओव्हरची मॅच झाली. आता कसोटी सामना आहे. त्यामुळे नीट धोऱणात्मक निर्णय घेत राज्याला पुढे न्यायचं आहे. ज्या योजना सुरु केल्या आहेत, पायाभूत सुविधा, नदीजोड प्रकल्प, वेगवेगळे निर्णय पुढे सुरु ठेवायचे आहेत. आमच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण कऱण्यासाठी पावलं उचलायची आहेत. दिलेली सर्व आश्वासं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक लोकाभिमुख सरकार, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं सरकार पुढेही पाहायला मिळेल. योग्य मार्ग काढत मार्गक्रमण करु असा विश्वास आहे,” असंही त्यांनी सांगितलं. 

पुढे त्यांनी सांगितलं की, “पुढचं राजकारण वेगळं असेल. बदल्याचं राजकारण न करता बदल दाखवेल असं राजकारण करायचं आहे. विरोधकांच्या संख्येवर त्यांचं मूल्यमापन करणार नाही. योग्य विषय मांडले त त्याला योग्य सन्मान देऊ. स्थिर सरकारची 5 वर्षं पाहायला मिळतील. जे बहुमत दिलं आहे त्यानंतर लोकांचीही स्थिर सरकारची अपेक्षा असेल”. 

“विधानसभा अध्यक्षांची निवड अधिवेशनात करु. शपथ झाल्यानंतर अध्यक्षांची निवड करावी लागते. यानंतर राज्यपालांचं अभिभाषण होईल. 7,8,9 ला विशेष अधिवेशन होणार आहे. 9 ला ही शपथ घ्यावी, 9 ला विधानसभा अध्यक्षांची निवड करावी यासाठी प्रस्ताव पाठवला आहे,” अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करु असंही त्यांनी सांगितलं आहे. 

सत्तास्थापनेसाठी झालेल्या विलंबाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “याआधी 2004 मध्ये 12 दिवसांचा उशीर झाला होता, 2009 मध्येही 9 दिवसांची उशीर होता. युतीचं सरकार असताना निर्णय घेताना दिरंगाई होते. एकच पक्ष असताना फार वेळ लागत नाही. खाती वाटपाबद्दल जवळपास निर्णय झाला आहे. मागील जे मंत्रिमंडळ होते त्यात थोडे फार बदल होतील, पूर्ण बदल होणार नाही” 

‘काही गोष्टी डोक्यात आहेत. दोन्ही मित्रांशी चर्चा करणं बाकी आहे. सध्या माझं लक्ष नदीजोड प्रकल्प सुरु झाला यावर आहे. सौरऊर्जेचे प्रकल्प, ज्यामध्ये रोजची डिलिव्हरी सुरु आहे. 2026 पर्यंत 16 हजार मेगाव्हॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. ही शाश्वत विकासाची कामं आहेत. यातील प्रत्येकाचा नीट फॉलो अप करावा लागतो. प्रक्रिया अधिक चांगली करण्याचा प्रयत्न असेल,” असंही ते म्हणाले आहेत. 

शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरेंना स्वत फोन करुन निमंत्रण दिलं. प्रत्येकाने माझं अभिनंदन करत शुभेच्चा दिल्या. व्यक्तिगत कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात राजकीय संवाद संपलेला नाही. काही राज्यात दोन पक्षांमध्ये इतका विसंवाद असतो की खून के प्यासे म्हणतो तसं असतं. ते महाराष्ट्रात नाही, पुढेही नसावं,” अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. 





Source link

महाराष्ट्रातील दुसरा बुलेट ट्रेन प्रकल्प; 350 चा स्पीड, 766 किमीचा प्रवास फक्त साडेतीन तासात

महाराष्ट्रातील दुसरा बुलेट ट्रेन प्रकल्प; 350 चा स्पीड, 766 किमीचा प्रवास फक्त साडेतीन तासात


Nagpur-Mumbai High Speed Bullet Train: मुंबई-अहमदाबाद हा महाराष्ट्रातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे.  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या कामाला वेग आला आहे. अशातच चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची. हा प्रकल्प विदर्भातील महत्वाच्या शहराला जोडणार आहे. या मार्गावर 320 किमी प्रति तास स्पीडने ट्रेन धावणार आहे. यामुळे  844 किमीचा प्रवास फक्त साडेतीन तासात पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही माहिमन्यांपूर्वी महाराष्ट्रातील या  दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केली होती. 

हे देखील वाचा… 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा महाराष्ट्रातील पहिला आणि सर्वात मोठा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचे काम केले जात आहे. 508 कि.मी. लांबीचा हा मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा कॉरीडॉर आहे. त्यापैकी 2 किलोमीटरचा मार्ग जमिनीखालून जाणार आहे. या बोगद्याची खोली जमिनीखाली 25 ते 65 मीटर इतकी असेल.असून बोगद्याचे खोदकाम तीन महाकाय मशीनच्या मदतीने करण्यात येत आहे. हा बोगदाच मुंबईत-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा महत्त्वाचा भाग असणार आहे. बोगदा बीकेसी आणि शिळफाट स्थानकांदरम्यान असणार आहे. ठाण्यात 7 किमी  बोगदा खोदला जात आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड यांचा वापर केला जात आहे.  त्यातून तब्बल ताशी 320 किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवर एकूण 12 स्थानके असणार आहेत. यामधील आठ स्थानकांची गुजरातमध्ये, तर चार स्थानकांची महाराष्ट्रात उभारणी केली जाणार आहे. यामध्ये वांद्रे – कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे.

मुंबई ते नागपूर हा महाराष्ट्रातील दुसरा बुलेट ट्रेन प्रकल्प असणार आहे. यामुशे मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत करता येणं भविष्यात शक्य होईल. या मर्गावर ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. 766 किमी लांबीचा हा मार्ग असेल.  या मार्गावर 13 स्टेशनं असतील. नागपूर, खापरी, वर्धा, पुलगाव, करंजा लाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर या ठिकाणी ही स्टेशन्स बांधण्यात येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर झाला होता. राज्यात नविन सरकार सत्तेत आल्यावर या प्रल्पाला प्रत्यक्षात गती मिळेल अशी चर्चा रंगली आहे. 





Source link

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील माझगाव डॉक! समुद्रात असलेल्या किल्ल्यावर सर्वात मोठा जहाज बांधणीचा कारखाना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील माझगाव डॉक! समुद्रात असलेल्या किल्ल्यावर सर्वात मोठा जहाज बांधणीचा कारखाना


पुढील
बातमी

यावेळची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात सहभागाबद्दलचा सस्पेन्स अखेर दूर





Source link

विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं नवं मिशन! मातोश्रीवर ठरली रणनिती

विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं नवं मिशन! मातोश्रीवर ठरली रणनिती



विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आला आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp