Maharashtra Weather : राज्याचा पारा वाढणार; IMD कडून इशारा….

Maharashtra Weather : राज्याचा पारा वाढणार; IMD कडून इशारा….


फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सरताच राज्यातून थंडी कमी होताना दिसत आहे. IMD ने राज्याच तापमान वाढणार असल्याच म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदल होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागातून थंडी गायब झाली असून उकाडा सुरु झाला आहे.  

महाराष्ट्रातून हळूहळू थंडी गायब झाली असून त्याची जागा उन्हाच्या तडाख्याने घेतली आहे. राज्यातील अनेक भागात तापमान वाढलं आहे. आतापर्यंत या तापमानाची नोंद 36 अंश झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक परिसरातही पाहायला मिळतो आहे. आता थंडी अनेक ठिकाणी गायब झाली आहे. तोच आता उकाडाही सुरू झाला आहे. या उकाड्याने आता लोकांना वैतागही आला आहे. 

उष्णतेची तीव्रता वाढत असून तापमानात तसे बदल होताना दिसत आहे. सकाळपर्यंत 24 तासांत ब्रम्हपुरी येथे उच्चांक 37.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने आज कमाल आणि किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

मुंबईमध्ये पुढील दोन ते तीन दिवस थंडी नाहीशी होत तापमान 37 अंशांचा आकडा गाठत नागरिकांच्या अडचणी वाढवू शकते असाही थेट इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, पालघर इथं तापमानाचा आकजडा धडकी भरवेल. त्यामुळं ऐन दुपारच्या वेळी बाहेर पडू नका असाही सल्ला दिला जात आहे. 

फेब्रुवारी हा मुंबईसाठी हिवाळ्यातील शेवटचा आल्हाददायक महिना असतो. कारण मार्चपासून तापमान वाढू लागते आणि कधीकधी फेब्रुवारीच्या अखेरीसच उन्हाळ्याची चिन्हे दिसू लागतात. काल, ५ फेब्रुवारी रोजी, मुंबईचे कमाल तापमान ३२.८° सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा २° सेल्सिअस जास्त होते. याव्यतिरिक्त, आर्द्रतेचे प्रमाण जास्त राहिले, ज्यामुळे दमट आणि अस्वस्थता जाणवत होती. तथापि, गेल्या एका आठवड्यापासून किमान तापमान मध्यम आणि उच्च किशोरावस्थेत राहिले आहे, जे सामान्य श्रेणीत आहे.

मुंबईत हिवाळा प्रभाव कमी 

डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात मुंबईचे हवामान कोणत्याही थंड हवामान प्रणालीपासून अस्पृश्य राहते. हे शहर उत्तर भारताला धडकणाऱ्या पश्चिमी विक्षोभांपासून खूप दूर आहे आणि दक्षिण द्वीपकल्पावर तयार होणाऱ्या प्रणालीच्या बाह्य सीमेवर वसलेले आहे.

मुंबईतील हवामानातील बदल प्रामुख्याने जमीन आणि समुद्रातील वाऱ्यांमुळे होतात. जमीन आणि समुद्रातील वाऱ्याचे हे चक्र तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करते. समुद्राकडून वाहणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांची दिशा आणि वेग आरामदायक हवामान निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.





Source link

धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?

धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?



धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं मानलं जात आहे.



Source link

भाजप नेत्यांशी पुन्हा जवळीक, समरजीत घाटगेंच्या मनात काय?

भाजप नेत्यांशी पुन्हा जवळीक, समरजीत घाटगेंच्या मनात काय?



Samarjit Ghatge: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत कागलच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाल्याने समरजीत घाटगेंनी भाजपला रामराम ठोकला.



Source link

रात्री सिक्युरिटीची नोकरी, दिवसा अभ्यास… मोठ्या जिद्दीनं मारली बाजी; म्हसवडच्या RJ केराबाईंचा नातू PSI अमोल घुटुकडे यांची संघर्षगाथा

रात्री सिक्युरिटीची नोकरी, दिवसा अभ्यास… मोठ्या जिद्दीनं मारली बाजी; म्हसवडच्या RJ केराबाईंचा नातू PSI अमोल घुटुकडे यांची संघर्षगाथा


जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण काही लोकांच्या जीवनात हा संघर्ष अगदी जन्मतःच सुरु होता. पण त्या संघर्षाला न जुमानता  त्याच्याशी दोन हात करत एका व्यक्तीने आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून राज्यातून PSI परिक्षेत आलेले अमोल घुटुकडे. PSI अमोल घुटुकडे यांना या संघर्षाचा जणू वारसाच आपल्या आजीकडून लाभला आहे. ती आजी म्हणजे माण गावची म्हसवड येथील RJ केराबाई सरगर. 

PSI अमोल घुटुकडे यांचं कुटुंब अतिशय दु्र्गम भाग असलेल्या माण मधील म्हसवड गावातील. या कुटुंबाच उपजिवेकच साधन म्हणजे शेती आणि मेंढपाळ हा दुय्यम व्यवसाय. दुष्काळानंतर सर्वच गोष्टी कठीण झाल्या होत्या. 

शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते हे लक्षात आलं होतं. यामुळे दहावी नंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलो. पण पुण्याच वातावरण जमलं नाही आणि पहिल्याच वर्षी म्हणजे अकरावीला नापास झालो, असं अमोल सांगतात. 

इंजिनिअरिंगच शिक्षण घेतल्यानंतर नेटवर्किंग कंपनीत दीड वर्ष काम केलं. पण चार भिंतीत मन रमत नव्हतं. म्हणून २०२१ मध्ये पुन्हा गावाकडे जाऊन PSI ची तयारी केली.आणि २०२३ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त झालं, असं PSI अमोल सांगतात. 

अमोल आता नाशिकमध्ये आपलं ट्रेनिंग सुरु आहे. अमोल सांगतात की, या सगळ्या प्रवासात मला खरी प्रेरणा मिळाली ती माझी आजी केराबाई यांच्याकडून. 

RJ केराबाई या माझ्या आईच्या आई. आजपर्यंतचा तिचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. आम्ही नातवंड कधी कधी परिस्थितीसमोर हतबल होतो. पण आमची आजी आजही परिस्थितीसमोर खंबीर उभी आहे. आज तिच्या कलेने तिला वेगळी म्हणजे RJ म्हणून ओळख मिळवून देते, असं अमोल सांगतात. 

आजही मला तो दिवस आठवतोय जेव्हा माझ्याकडे PSI च्या परिक्षेसाठी शूज नव्हते. तेव्हा ही परिस्थितीसमोर हात टेकले पण आजीनेच माझ्या हातात १० हजार दिले आणि शूज घ्यायला सांगितले. आजी आजही आम्हाला प्रेरणा देतेय, असं PSI अमोल घुटुकडे सांगतात. 

आर जे केराबाई सध्या मुंबईतील नरे पार्क येथे सुरु असलेल्या माणदेशी महोत्सवात उपस्थित आहे. केराबाई यांना तुम्हाला सहज भेटता येणार आहे. हा महोत्सव रविवारी ९ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. 





Source link

घोटाळ्याचे आरोप, अंजली दमानियांचा फॅक्ट चेक, दमानियांनी ऑर्डर केलेल्या मालाची किंमत किती?

घोटाळ्याचे आरोप, अंजली दमानियांचा फॅक्ट चेक, दमानियांनी ऑर्डर केलेल्या मालाची किंमत किती?


Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्यावरील अंजली दमानीया यांच्या आरोपांचा पुढचा अंक आता समोर आलाय. कृषी खात्यानं खरेदी केलेल्या वस्तू अंजली दमानिया यांनी ऑनलाईन खरेदी केल्यात आणि त्या वस्तूंच्या किंमती कृषी विभागानं खरेदी केलेल्या किंमतीच्या अनेक पटीनं कमी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे तत्कालीन कृषीमंत्र्यांनी वस्तू खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा केलाय.

धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषीविभागात 160 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा पुनरुच्चार अंजली दमानिया यांनी केलाय. बाजारभावातील किंमतीपेक्षा अनेक पटीनं वाढीव किंमत देऊन नॅनो युरिया, नॅनो डीपीएची खत खरेदी करण्यात आल्याचं अंजली दमानिया यांनी आरोप केला होता. मात्र अंजली दमानिया यांचे आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले होते.

मात्र आता धनंजय मुंडे यांचा दावा खोटा असल्याचं पुराव्यासह अंजली दमानिया यांनी दाखवून दिलंय. त्यासाठी अंजली दमानिया यांनी एका वेबसाईटवरून नॅनो युरिया, नॅनो डीएपी खरेदी केलीय. त्यात दोन्ही खतांची खरेदी किंमत कृषी विभागानं खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा खूप कमी असल्याचं समोर आलंय.

कृषी मंत्र्यांनी खरेदी केलेला कृषी माल

1. नॅनो युरिया : 220 किंमतीच्या 19,68,408 बॉटल विकत घेतल्या
2. नॅनो डिएपी : 590 रुपयाने 19,57,438 बॉटल विकत घेतल्या.
3. बॅटरी स्प्रे : 3426 रुपयाने 2,36,427 स्प्रे विकत घेतले.
4. मेटाल्डिहाईड  1275 रुपयांनी  1,96,000 किलो विकत घेतलं.
5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 1250 रुपयांनी 6 लाख 18 हजार बॅग घेतल्या

अंजली दमानियांच्या दाव्यानुसार क्रुषी मालाची किंमत

1. नॅनो युरिया : 92 रुपये
2. नॅनो DAP : 261 (500 ML) रुपये
3. बॅटरी स्प्रे : 2450 ते 2946 रुपये
4. मेटाल्डिहाईड : 817 रुपये
5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 20 बॅग 577 रुपये

कृषी खात्यानं वाढीव दरानं शेतकऱ्यांसाठी खतं खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला तत्कालीन कृषी आयुक्तांनी विरोध केला असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

नॅनो युरिआ, नॅनो डीएपीसह इतर 5 वस्तुंची खरेदी 60 ते 70 टक्के वाढीव दरानं करून धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार केला आहे.  त्यामुळे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केलीय.





Source link

दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर साई संस्थानचा मोठा निर्णय, थेट साईभक्तांवर होणार परिणाम

दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर साई संस्थानचा मोठा निर्णय, थेट साईभक्तांवर होणार परिणाम


पुढील
बातमी

देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला मारहाण; हल्लेखोर कृष्णा आंधळेचे मित्र





Source link

YouTube
Instagram
WhatsApp