महाराष्ट्रात Bitcoin Scam! सुप्रिया सुळेंवर BJP चा आरोप; व्हॉट्सअप स्क्रीनशॉट दाखवत विचारले 5 प्रश्न

महाराष्ट्रात Bitcoin Scam! सुप्रिया सुळेंवर BJP चा आरोप; व्हॉट्सअप स्क्रीनशॉट दाखवत विचारले 5 प्रश्न


Maharashtra Assembly Election Bitcoin Scam: महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. मतदानाच्या एक दिवस आधीच मंगळवारी पुण्यातील एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. माजी आयपीएस अधिकाऱ्याने या दोन्ही नेत्यांनी 2018 साली बिटकॉइनच्या माध्यमातून व्यवहार केलेले आणि त्याच पैशांचा आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. माजी आयपीएस अधिकाऱ्याने सुप्रिया सुळेंवर आरोप केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने यावरुन गंभीर आरोप सुप्रिया सुळेंवर केलेले असतानाच सुप्रिया सुळेंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

नेमकं काय म्हटलं आहे भाजपाने

भाजपाचे नेते सुधांशु त्रिवेदी यांनी या प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मतदानाच्या काही तास आधीच महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले. त्यांनी काँग्रेसला तुम्ही कोणत्या बिटकॉइन व्यवहारांमध्ये सहभागी आहात का? असा सवाल विचारला. सुधांशु यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवरही गंभीर आरोप केले. सुधांशु त्रिवेदींनी, “फारच गंभीर आणि चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. या मधून महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार हळूहळू समोर येत आहे. हे प्रकरण म्हणजे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार आहे,” असं म्हटलं आहे. भाजपाने केलेल्या दाव्यानुसार नाना पटोले, सुप्रिया सुळे, पोलीस कमिश्नर अमिताभ गुप्ता आणि डीलर अमिताभ यांनी एकमेकांना व्हॉइस नोट्स पाठवल्या होत्या. 

व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट दाखवत गंभीर आरोप अन् पाच प्रश्न

सुधांशु त्रिवेदी यांनी व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट दाखवत, “या चॅट आणि नोट्समधून हे दिसत आहे की सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी बिटकॉइनमधून व्यवहार केले जात आहेत,” असा दावा केला आहे. सुधांशु त्रिवेदी यांनी पाच प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. “पाच बोटं असणारा पंजा या पाच प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नसेल तर देशातील जनतेला समजेल की पंजा कोणासाठी काम करत आहे,” असं सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं आहे. “आता असं वाटत आहे की ते योग्य मार्गाने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असते तर अशाप्रकारे बेकायदेशीर माध्यमातून पैसा कमवण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नसता,” असा टोला सुधांशु त्रिवेदी यांनी लगावला आहे. सुधांशु त्रिवेदी यांनी विचारलेले पाच प्रश्न खालीलप्रमाणे: 

1) तुम्ही बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का?

2) तुम्ही कधी डीलर गौरव मेहता आणि अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क केला आहे का?

3) हे व्हॉट्सअप चॅट तुमचं आहे का?

4) हा तुमचा आवाज आहे की नाही हे तुम्हाला सांगावं लागेल.

5) या नोट्समध्ये कोणत्या मोठ्या व्यक्तीसंदर्भात चर्चा होत आहे.

हे लोक असले धंदे करतात

सुधांशु त्रिवेदी यांनी पुढे बोलताना, “हा केवळ आरोप नाही. महाराष्ट्रातील जनतेने हे ओळखावं की हे लोक कसले कसले धंदे करतात. हा तोच पक्ष आहे ज्यांची सत्ता होती तेव्हा गृहमंत्र्यांवर कोट्यवधी रुपयांची वसुली करण्याचा आरोप करण्यात आलेला,” असंही म्हटलं. 

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “भाजपा घाणेरडं राजकारण करत आहे. सुधांशु त्रिवेदींविरोधात मी मानहानीचा खटला दाखल करणार आहे. मी अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही. यामध्ये माझा आवाज तयार करुन वापरण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडे मी याबाबत तक्रार केली आहे,” असं सुप्रिया यांनी सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या आरोपांवर बोलताना म्हटलं आहे.

थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या आरोपांसंदर्भात सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाकडे एक तक्रार करणारं पत्रही लिहिलेलं आहे. सुप्रिया सुळेंच्यावतीने त्यांच्या वकिलांनी लिहिलेल्या पत्रामध्ये, “पुण्याचे माजी आयपीअस अधिकारी रविंद्रनाथ पाटील आणि गौरव मेहतांविरोधात तात्काळ सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली जावे. हे सुप्रिया सुळेंबद्दल खोटी माहिती पसरवत आहेत,” असं म्हटलं आहे.

तसेच, “त्यांचा आरोप आहे की नाना पटोले आणि सुप्रिया सुळेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये पैसा वाटण्याच्या उद्देशाने बिटकॉइनचा गैरवापर केला. त्यांनी आरोप करताना सुप्रिया सुळेंचा नकली आवाजही वापरला आहे. डिजीटल माध्यमांचा वापर करुन फसवणूक आणि बदनामीच्या उद्देशाने आरोप करणं हा गंभीर गुन्हा आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे असून सुप्रिया सुळेंची प्रतिमा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक रात्र आधीच हे आरोप करण्यात आले आहेत ही आश्चर्याची बाब आहे. यामधूनच या खोट्या आरोपांमागील हेतू स्पष्ट होत आहे. या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्याची आणि अशा व्यक्तींची सखोल चौकशी करण्याची आमची मागणी आहे,” असं म्हटलं आहे.





Source link

ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विजय जंगम यांच्याकडून चॅम्पियन्स महाराष्ट्रातील 1 लाखाहून अधिक कुटुंबांसाठी सामाजिक बदल

ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विजय जंगम यांच्याकडून चॅम्पियन्स महाराष्ट्रातील 1 लाखाहून अधिक कुटुंबांसाठी सामाजिक बदल



Urja Foundation Dr. Vijay Jangam: महाराष्ट्र निवडणुकीच्या अगोदर, प्रसिद्ध प्रबळ लिंगायत सरदार आणि समाजसुधारक, उर्जा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विजय जंगम, 1 लाखाहून अधिक उपेक्षित कुटुंबांच्या उन्नतीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांवर प्रकाश टाकतात.



Source link

महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथं अनुभवता येतो Fly Boarding चा थरार! व्हिडिओत दिसतो तितका सोपा नाही हा खेळ

महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथं अनुभवता येतो Fly Boarding चा थरार! व्हिडिओत दिसतो तितका सोपा नाही हा खेळ



सोशल मिडियावर आपण फ्लाय बोर्डिंगचे व्हिडिओ पाहतो. मात्र, दिसायला खूप भारी वाटणारा हा जल  क्रिडा प्रकार अत्यंत थरारक आहे. 



Source link

पुढचा CM कोण? प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पवारांनी सांगून टाकलं! म्हणाले, 'कोणाचे…'

पुढचा CM कोण? प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पवारांनी सांगून टाकलं! म्हणाले, 'कोणाचे…'



Sharad Pawar On Who Will Be The Next CM Of Maharashtra: महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यासंदर्भात कोणतेही नाव थेट जाहीर करण्यात आलेलं नसतानाच शरद पवारांनी आगदी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.



Source link

Anubal, a startup, takes a crack at nuclear fusion

Anubal, a startup, takes a crack at nuclear fusion


Nuclear fusion is generally thought of as a big boys’ game; one does not relate a startup with this holy grail of energy. But Anubal Fusion, a company set up a few months ago, wants to take a crack at it.

In the last half a century, attempts to produce more output energy and input through nuclear fusion have been by trying to fuse atoms of two isotopes of hydrogen, viz., deuterium and tritium. The fusion produces one helium atom and energy. Deuterium and tritium (indeed, any two atoms) don’t easily merge into one without the aid of sun-level temperatures. However, to achieve this, scientists have taken one of the two approaches—magnetic confinement and inertial confinement. The former is the approach taken by the multi-country ITER project in France. As for the latter, the Lawrence Livermore National Lab of the US was in the news last year for achieving a tiny surplus energy. It did by crushing a pellet containing hydrogen with 200 lasers from all around. The drawback with this is, it also produces flying neutrons, which is a problem. 

Anubal Fusion is taking an entirely new approach towards fusion, trying to bombard protons into an isotope of boron (boron-11), to achieve fusion. “This reaction also produces helium and energy but no neutrons, the founder of the startup, Dr Pravin Kini, told Quantum. However, to shoot protons into boron-11 at the required high energy levels, very powerful lasers are needed—a regular particle accelerator won’t do. Fortunately, the Tata Institute of Fundamental Research (TIFR), is installing a 1 peta-watt laser, costing about Rs 1,000 crore. TIFR, as a partner of Anubal, will let the startup use the laser to do experiments. 

TIFR’s PW-scale laser will be ready next year and till then Anubal will do simulations on supercomputers. The startup recently received pre-seed funding from Speciale Invest, a VC firm that invests in DeepTech startups, but within a year, the company expects to raise Rs 1,000 crore, Kini said.





Source link

'…तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल, विकास झाला म्हणत…'; मोदी-शाहांचं नाव घेत राऊतांचा टोला

'…तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल, विकास झाला म्हणत…'; मोदी-शाहांचं नाव घेत राऊतांचा टोला


Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यांवर निशाणा साधतानाच ‘गौतम अदानी हा या निवडणुकीतील ज्वलंत विषय आहे,’ असं म्हटलं आहे. “महाराष्ट्राचे मराठीपण टिकवायचे असेल तर हे राज्य मोदी-शहा-फडणवीसांच्या हाती जाता कामा नये,” असं म्हणतानाच राऊतांनी, “महाराष्ट्राची लढाई ही आता सरळ सरळ गौतम अदानी व त्यांच्या पैशांच्या साम्राज्याविरुद्ध आहे,” असं विधान केलं आहे. 

महाराष्ट्र म्हणजे मोदी-शहांची दौलत नाही

“मोदी-शहा-फडणवीस व गौतम अदानी हा या निवडणुकीतला ज्वलंत विषय आहे. महाराष्ट्राचे मराठीपण टिकवायचे असेल तर हे राज्य मोदी-शहा-फडणवीसांच्या हाती जाता कामा नये. मुंबईतील सर्व मोक्याच्या जमिनींचा ताबा अदानी यांना देण्यात आला. मिठागरे, जकात नाके अशा जागांवर अदानी यांनी आताच खुंट्या ठोकल्या. नवी मुंबईत सातारा-पाटण रहिवाशांच्या मेळाव्यात गेलो. तेथील रहिवाशांनी माहिती दिली, ”अदानी आता साताऱ्यातही घुसले.” महाराष्ट्रातील सरकार अदानी यांच्यावर विशेष मेहेरबानी दाखवत आहे, कारण अदानी यांच्याकडे मोदी यांची दौलत आहे. पण महाराष्ट्र म्हणजे मोदी-शहांची दौलत नाही. अदानी यांचे उद्योग बांगलादेश, पाकिस्तानसह अनेक इस्लामी राष्ट्रांत पसरले व त्यामुळे या लोकांचे ‘हिंदुत्व’ धोक्यात आले नाही,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे

मोदी परदेशात जेथे जातात तेथे अदानी पोहोचतात व त्यानंतर…

“पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे सध्या महाराष्ट्रातच तळ ठोकून आहेत. महाराष्ट्रातला प्रचार संपताच मोदी हे ब्राझीलला रवाना होतील. ब्राझीलमध्ये त्यांच्यासोबत गौतम अदानी असतील काय? कारण मोदी परदेशात जेथे जातात तेथे अदानी पोहोचतात व त्यानंतर अदानी यांच्या कंपनीला त्या त्या देशात मोठे कंत्राट मिळते. महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप-शिंदे-अजित पवार हे पैशांचा पाऊस पाडत आहेत. हा सर्व पैसा कोठून येतो? ते रहस्य आता राहिलेले नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या बैठका गौतम अदानी यांच्याच घरी झाल्या व स्वत: अदानी त्या बैठकांत हजर असायचे, असा स्फोट आता अजित पवार यांनीच केला. नंतर त्यांनी घूमजाव केले असले तरी त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याचे सरकार कोण चालवत आहे व ठाकरे त्यांना का नको होते? ते उघड झाले,” असं राऊत ‘सामना’मधील ‘रोखठोक’ या विशेष सदरात म्हणाले आहेत. 

नक्की वाचा >> बाळासाहेब ठाकरेंबाबत अमित शाहांना भलताच पुळका आला आहे, पण…; राऊतांचा हल्लाबोल

…तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल

“महाराष्ट्राची लढाई ही आता सरळ सरळ गौतम अदानी व त्यांच्या पैशांच्या साम्राज्याविरुद्ध आहे. मुंबई त्यांना संपूर्णपणे गिळायची आहे व त्याची तयारी पूर्ण झाली आहे. फोर्ट भागात संयुक्त महाराष्ट्रातील 106 हुतात्म्यांचे स्मारक आज आहे. हा मोक्याचा भूखंडही उद्या अदानी ताब्यात घेतील व उद्या त्या स्मारकावर अदानींचा टॉवर उभा राहिलेला दिसेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आता लोकांना माहीत नाही. अदानी त्यांच्यापेक्षा मोठे. एका मोकळ्या भूखंडावर अदानीचा टॉवर उभा राहील. पहा, विकास झाला असे म्हणत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे जाहिराती करतील,” असा टोला राऊतांनी लगावला आहे. “मराठी माणसा, हे तुझ्या डोळ्यांदेखत घडू द्यायचे काय? अदानीचा पराभव हाच शिंदे-फडणवीस-शहा-मोदींचा पराभव; तो करायलाच हवा,” असं राऊत यांनी लेखाच्या शेवटी म्हटलं आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp