by Hansraj Agrawal | Jan 23, 2025 | Trending News
Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मी मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शंभूराजे नऊ वर्ष स्वराज्याचे छत्रपती म्हणून होते. या काळात संभाजी महाराजांचीही स्वतंत्र राजमुद्रा होती. पण अनेकांना राजमुद्रा आणि त्याचा अर्थ माहिती नाहीये? आज या निमित्ताने जाणून घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर संभाजी महाराज यांचा छत्रपती म्हणून राज्यभिषेक करण्यात आला. 1680 साली शिवरायांचे निधन झाले त्यानंतर एक 1681 साली त्यांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून ते राज्यकारभार पाहू लागले. पण नवीन राज्य चालवण्यासाठी नवी राजमुद्रा लागते. संभाजी महाराज यांनी नवी राजमुद्रा तयार केली. संस्कृत भाषेत राजमुद्रा असून पिंपळाच्या पानावर आहे. त्यावर 16 बुरुज आहेत.
राजमुद्रा काय आहे?
”श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।
यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।”
राजमुद्रेचा अर्थ काय आहे?
राजमुद्रेचा मराठीत अर्थ असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे. आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल.
याच राजमुद्रेच्या आधारावर संभाजी महाराजांचा राज्यकारभार चालवला होता. तसंच, शिवाजी महाराजांनी जशी राज्यात स्वतंत्र नाणी पाडली त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनीदेखील राज्यभिषेकानंतर स्वतंत्र नाणी पाडली. शिवरायांनी आणलेल्या नाण्यांना शिवराई तर शंभूराजांनी पाडलेल्या नाण्यांना शंभुराई असे म्हटलं जातं.
शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय होती.
शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे. 1646 मध्ये पहिल्यांदा या राजमुद्रेचा वापर करण्यात आला असं अभ्यासकांचे मत आहे. तसंच, 1680 पर्यंत या राजमुद्रेचा वापर केला जायचा.
राजमुद्रेवरील संस्कृत मजकूर
”प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता॥
साहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥”
मराठी अर्थ
प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 22, 2025 | Trending News
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी आकाने प्रयत्न केले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी देखील केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 22, 2025 | Trending News
Shaktipeeth Expressway News In Marathi: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच (MERDC) ने नागपुर -गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे तयार करणार आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. यामुळं कनेक्टिव्हीटी वाढणार असून पर्यटन तर वाढेलच पण त्याचबरोबर देवस्थानांचे पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. तसंच, या महामार्गामुळं 18-20 तासांचा प्रवास 8-10 तासांवर येणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणार असून महाराष्ट्र-गोवाच्या सीमेवरील पत्रादेवी येथे संपतो. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी आणि सिंधुदुर्ग सह 12 जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे. जलद आणि अधिक सुविधा असलेल्या या मार्गामुळं प्रवासांचा प्रवास सोप्पा होण्यास मदत मिळणार आहे.
शक्तीपीठ महामार्गाचे प्रमुख उद्दिष्ट्य हे तीर्थस्थळांना जोडणं हे आहे. वर्धा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत असलेल्या महामार्गामुळं भाविकांना आणि पर्यटकांना प्रवास करणे अधिक सुकर होणार आहे. ज्यामुळं देवस्थानांच्या पर्यटनाला चालना मिळणार असून या क्षेत्राचा आर्थिक विकासदेखील होणार आहे.
नागपूर-गोवा महामार्गाचे नाव शक्तीपीठ ठेवण्यात आले आहे कारण हा महामार्ग राज्यातील तीन देवींच्या शक्तीपीठांना जोडतो. शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई, महाराष्ट्राची कुळस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तीपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा शक्तीपीठ माहामार्ग जोडला जाणार आहे.
नागपूर – वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 86,000 कोटी इतका येण्याची शक्यता आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वे 701 किमी लांबीचा आहे. तर, शक्तीपीठ एक्स्प्रेसवे एकूण 802 किलोमिटरचा हा प्रस्तावित रस्ता आहे. यासाठी 27 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. भारतातील सर्वाधीक लांबीचा महामार्गाच्या यादीत समाविष्ट होणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 21, 2025 | Trending News
मुंबईतून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येणार आहे. यासाठी वाहतुकीच्या जबरदस्त पर्याय सुचवण्यात आला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 21, 2025 | Trending News
Beed News Today: एकीकडे गुन्हेगारीमुळे बीड जिल्ह्या देशात चर्चेत आहे तर दुसरीकडे आता बीड जिल्ह्याच्या आष्टीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अफवांचा बाजार सुरू आहे. या अफवांचा आष्टीमधील एका कुटुंबाला मोठा मानसीक त्रास सहन करावा लागला आहे. एका अफवेमुळं एका संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा बीड चर्चेत आलं आहे.
बीडच्या आष्टीमधील एका कुटुंबांला HIVच्या अफवेमुळे वाळीत टाकण्यात आलं आहे. या कुटुंबातील एका मुलीचा मृत्यू झाला, तो मृत्यू HIVमुळे झाल्याची माहिती गावात पसरली आणि गावाने या कुटुंबाला वाळीत टाकलंय. मात्र ही माहिती खोटी असून पोलीस आणि वैद्यकीय अधिका-यांनी अफवा पसरवून कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय. मुलीचे सासरच्यांच्या सांगण्यावरून पोलीस आणि आरोग्य विभागाने अफवा पसरवल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे.
गावकऱ्यांनी कुटुंबाला वाळीत टाकल्याने या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतकंच नव्हे तर या त्रासातून महिलेनं दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावाही करण्यात आलाय. पीडित कुटुंबाने डॉक्टर आणि पोलिसांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार दाखल केली आहे.
‘खोटा आजार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळं आमच्या जवळ कोणी येत नाही. मुलंदेखील जवळ येत नाहीत. एड्स असल्याचे त्यांनी सांगितलं पण रिपोर्टमध्ये तसं काही नाही,’ असं मृत तरुणीच्या आईने म्हटलं आहे. तर, ‘आम्हाला बघितलं की लोकं लांब लांब जातात. आम्हाला एचआयव्ही आहे असं समजून आम्हाला वाळीत टाकण्याचा प्रकार केला आहे. सासरच्या लोकांवर आम्ही केस केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन पोलिस आणि डॉक्टरांना सांगून हा प्रकार केला आहे,’ असं पीडितेच्या पालकांनी म्हटलं आहे.
मुलीचा मृत्यू झाला होता तिच्या सासरच्यांनी तिला मारहाण केली होती. माहेरवरुन पैसे आणावे म्हणून मारहाण केली होती, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केली होती. मुलीला बेदम मारहाण केल्यानंतर ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू होते आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा आरोप सासरच्या मंडळींवर येऊ नये म्हणून अशा पद्धतीची अफवा पसरवल्याचा दावा मुलीच्या पालकांनी केला आहे.
धक्कादायक म्हणजे मुलीच्या अत्यंसंस्काराच्या वेळी पोलिसांच्या काही ऑडिओ क्लिपदेखील समोर आल्या आहेत. मुलीच्या अत्यंसंस्कारावेळी आलेल्या काही लोकांना पोलीस सांगत होते की तुम्ही मुलीच्या जवळ तर गेला नाहीत ना. तुम्ही ब्लड टेस्ट करुन घ्या, मुलीला एचआयव्ही होता, असं सांगतानाच्या ऑडिओ क्लिप समोर येत आहेत. मात्र त्या खऱ्या आहेत की खोट्या हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 20, 2025 | Trending News
Pandharpur Aashadhi wari: कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय टेक्नॉलॉजी चा वापर जगभरात मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.
Source link