by Hansraj Agrawal | Aug 16, 2024 | Trending News
Shocking News in Pune : पुण्यातील हडपसर इथल्या एका नामांकित शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतापामुळे एकच खळबळ उडालीय. विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या वर्गातील मैत्रिणींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दहावीच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मैत्रिणींचे फोटो टेलिग्राम या ॲपवर अपलोड करून त्याला न्यूड फोटोमध्ये (Nude photos) मॉर्फ (Morph) केले. या दोन विद्यार्थ्यांनी मॉर्फ केलेले फोटो शाळा सोडून गेलेल्या त्यांच्या मित्राला पाठवले. शाळेतील एका शिक्षिकेच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांना याबाबतची माहिती देण्यात आली..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 16 जून ते 30 जून दरम्यान पुण्यातील हडपसर (Hadapsar) भागातील असलेल्या एका नामांकित शाळेत घडला. पिडीत विद्यार्थिनी आणि ताब्यात घेतलेले 2 विद्यार्थी हे इयत्ता दहावीमध्ये शिकत असून एकाच वर्गात आहेत. तर ताब्यात घेतलेला तिसरा मुलगा हा शाळा सोडून गेला असला तरी शाळेतील मित्रांच्या संपर्कात होता. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) सर्व अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांना बाल न्याय मंडळात हजर करण्यात आलं.
या प्रकारानंतर 3 पैकी एका पिडीत विद्यार्थिनीच्या आईनं सदर विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली.. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकारातून मुलांकडून इंटरनेटचा आणि मोबाईलचा कसा दुरुपयोग केला जातो हे अधोरेखित होतंय. मुलांच वय अल्लड असतं. मोबाईलवरील इंटरनेटचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेला धक्का पोहोचवतोय. त्यामुळे पालकांनी मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं मत चाइल्डलाईनकडून व्यक्त करण्यात आलंय..
हडपसर मधील या धक्कादायक प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांवर पालकांनी लक्ष ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. आपली मुलं मोबाईलवर काय पाहातात, कोणते गेम खेळतात, कोणाशी बोलतात? या बारीक सारीक गोष्टीवर पालकांचं लक्ष असायला हवं.
मोबाईलचा दुष्परिणाम
सध्याच्या काळात लहान मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेल्याचे चित्र घरोघरी बघायला मिळते. उठता, बसता, जेवताना देखील मुलांना मोबाईल हातात लागतो, त्यातल्या त्यात किशोरवयीनांमध्ये मोबाईल गेम खेळाची क्रेझ आहे. मोबाईलचा हा मुलांकडून होणारा अतिवापर पालकांसाठी मोठी डोकेदुखी (Headache) ठरत असून, खेळ आणि अभ्यासात दुर्लक्ष, विविध आजार, सायबर गुन्हेगारी अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 16, 2024 | Trending News
Kalyan Crime News: कल्याण तालुक्यातील वरप गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दादर स्थानकात सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर आता वरप येथेही बॅगेत मृतदेह आढळला आहे. एका अज्ञात व्यक्तीचा मृतेदह बॅगेत भरुन कचरा कुंडीत फेकून देण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वरप परिसरातील गावदेवी मंदिर भागात स्थानिकांना ही बॅग दिसली होती. त्यानंतर रहिवाशांना संशय आल्याने त्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी ही बॅग उघडून बघितली तेव्हा त्यांनादेखील धक्काच बसला. या बॅगेत एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह होता. अज्ञात मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
वृद्ध व्यक्तीची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही बॅग कचऱ्यात फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कल्याण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून या संदर्भात तात्काळ तपास सुरू केला आहे .तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि डॉग स्कॉडने हा परिसर पिंजून काढला आहे.
दरम्यान ही व्यक्ती कोणाच्या ओळखीची असेल किंवा मिसिंग असेल तर तात्काळ पोलिसांसोबत संपर्क साधावा, असा आवाहन करण्यात आलंय. अंगाने मध्यम बांधा असलेल्या सावळ्या रंगाच्या या वृद्धाची उंची साधारण 5 फूट 5 इंच इतकी आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच, या वृद्धाच्या परिचितांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असं अवाहनदेखील करण्यात आलं आहे.
पोलिसांनी वृद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसंच, वृद्धाची हत्या कोणी केली याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासून ही सुटकेस कोणी टाकली याचा शोध घेतला जात आहे.
दादर स्थानकातही आढळला होता सुटकेसमध्ये मृतदेह
दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ११ येथे एक अनोळखी व्यक्ती एक मोठी ट्रॉली बॅग घेऊन जात होता. गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव यांना त्याच्याव संशय आल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला थांबवून त्याची बॅग तपासली असता त्यात रक्ताने माखलेला मृतदेह होता. तपासणी तो मृतदेह अर्शद अली सादीक अली शेख (३०) याचा असून तो सांताक्रुझ कलिना परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून दोघे आरोपी मुकबधिर आणि अपंग आहेत. त्यांनीच पायधुनी येथे मित्र अर्शद खान याची हत्या करुन मृतदेह बॅगेत टाकला, असे समोर आले आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तुतारी एक्स्प्रेसमधून नेत होते. प्रवासात एखाद्या पुलावरुन ही बॅग ढकलण्याचा त्यांचा प्लान होता
Source link
by Hansraj Agrawal | Aug 15, 2024 | Trending News
Ajit Pawar : अजित पवार यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौफ्यस्फोट केले आहेत. अजित पवार यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना दिलेली उमेदवारी कुटुंबासाठी चुकीची होती. कुटुंबासाठी हा निर्णय चुकीचा होता. कारण पवार कुटुंबातीलच व्यक्ती हरणार आणि जिंकणार होती. बारामतीच्या निकालाला मीच जबाबदार आहे. सुप्रिया सुळेंविरोधात पत्नीला उभं करणं ही माझी चूक होती. असं अजित पवार म्हणाले.
सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाचा?
सुनेत्रा यांना उभ करणं कुटुंबाच्या दृष्टीने योग्य नव्हतं. बारामतीतून उमेदवार देण्यासंदर्भात माझ्यावर महायुतीतून कोणताही दबाव नव्हता. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा संसदीय समितीचा होता. असं अजित पवार म्हणाले.
सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड
बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेत बिनविरोध निवड झाली.
शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का?
राजकारणातील सर्व निर्णय माझेचं असतात. शरद पवार यांच्यासोबत जाणार का असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार यांनी ‘नो कमेंट’ असं उत्तर दिलं. 1991 मध्ये माझा राजकारणात प्रवेश झाला. माझ्यानंतर येऊन फडणवीस, शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ असणं महत्त्वाचं असते. कधीही निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे महायुतीकडून आम्ही विधानसभा लढवणार. असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 14, 2024 | Trending News
ड्रायव्हर भरतीची… पण ही भरती होणाराय थेट जर्मनीमध्ये… तुम्हालाही जर्मनीत जाऊन ड्रायव्हर बनायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 14, 2024 | Trending News
Job News : नोकरीच्या शोधात असणारी अनेक मंडळी बऱ्याचदा मनाजोग्या संधीच्या प्रतीक्षेत असतात. काही मंडळी ही संधी मिळेपर्यंत पर्यायी नोकरी करण्याला प्राधान्य देत करिअरच्या वाटांवरील प्रवास सुरू करतात. या साऱ्यामध्ये नोकरीच्या परदेशी संधींची भलतीच हवा असते. चांगला पगार, चांगल्या सुविधा आणि तितक्याच चांगल्या सवलती या आणि अशा अनेक कारणांनी परदेशातील नोकरीचा अनेकांनाच हेवा वाटतो. अशीच एक संधी महाराष्ट्रातील अनेकांसाठीच चालून आली आहे.
महाराष्ट्रातील कुशल चालकांसाठी ही संधी असून आता ते थेट जर्मनीला जाऊ शकतात. राज्य शासनाकडून यासाठीची सोय करण्यात येणार असून, आता राज्यातील परिवहन विभाग चांगल्या चालकांचा शोध घेणार आहे.
काय आहे ही संधी…
25 फेब्रुवारीला जर्मनीतील बाडेन-युटेनबर्ग या राज्यासोबत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा एक सामंजस्य करार करण्यात आला. ज्यामध्ये वाहनचालकांचाही समावेश आहे.
शासननिर्णयानुसार मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या या प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्थेसह कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आता शासन मान्यता मिळाली आहे. त्याशिया यासाठी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि तांत्रिक समित्याही गठित करण्यात आल्या आहेत.
राज्यातील उमेदवारांना गरजेनुसार त्यांच्या कौशल्याला अधिक वाव देण्यासाठीचं अतिरिक्त प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेडनिहाय तांत्रिक समिती गठीत करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वाहनचालक (बस, रेल्वे, ट्रक, हलकी, जड वाहनं) या ट्रेडसाठीची समिती सज्ज असेल. दरम्यान या प्रक्रियेमध्ये पुढे जिल्हास्तरावर सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत इच्छुक उमेदवार शोधण्यात येतील.
कशी असेल अर्जप्रक्रिया?
या प्रकल्पाअंतर्गत जर्मनीमध्ये नोकरीसाठी जायला इच्छुक असणाऱ्या वाहनचालकांनी शासनानं जारी केलेला QR Code स्कॅन करुन त्यावर दिलेला अर्ज भरावा.
महत्त्वाची अट विसरू नका…
सदर उपक्रमाअंतर्गत उमेदवाराला जर्मन भाषा येणं अनिवार्य असून, जर्मन भाषा प्रशिक्षणाबाबतची कार्यवाही ही शासनामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळं शासननिर्णयानुसार या उमेदवारांचा सर्व खर्च राज्य शासनच करणार आहे.
इच्छुक उमेदवारानं भारतासह जर्मनीतील वाहनचालन नियमांबाबच महत्त्वाचं प्रशिक्षण घेणं अपेक्षित असेल. त्यामुळं राज्य शासनाकडूनच याबाबतची कार्यवाही आणि खर्च करण्यात येणार असल्याची नोंद घ्यावी.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 13, 2024 | Trending News
सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : पीएचडी मिळवण्यासाठी कसे नियम वाकवले जातात. माजी मंत्र्यासाठी कशी व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाते याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhobale) हे शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि भाजपचे ज्येष्ठ नेतेही आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री ते राहिलेत. त्यांनी PhD केली तर त्यात वावगं काय असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.. मात्र थांबा. लक्ष्मणराव ढोबळे PhD करतायत ही समस्या नाही. तर एका PhD साठी सर्व यंत्रणा कशी राबवली जाते याचं धक्कादायक वास्तव झी 24 तास तुमच्यासमोर मांडणार आहे.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पुन्हा एकदा PhD परीक्षा देतायत. तसा याआधीसुद्धा त्यांनी प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले. गेल्या वर्षी याच परीक्षेत तिन्ही विषयांमध्ये ते नापास झाले होते. हे आम्ही म्हणत नाही तर ते रिपीटर असल्याचा उल्लेख त्यांच्याच हॉल तिकीटवर आहे. यंदा मात्र काहीही करुन PhD पास करायचं असं त्यांनी ठरवलं. मग झाडून यंत्रणा कामाला लागली.
सोलापूर विद्यापीठात 22 ते 26 जुलै 2024 दरम्यान PhD संशोधकांची सर्व विषयांसाठीची कोर्स वर्क परीक्षा पार पडली. सर्वांसाठी विद्यापीठातल्या संगणक शास्त्र संकुलाचं केंद्र होतं. मात्र यात लक्ष्मण ढोबळेंना स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली. ढोबळेंसाठी फक्त एकट्यासाठी सुरुवातीला पंढरपुरातल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात सेंटर देण्यात आलं. मात्र रयतशिक्षण संस्थेतलं हे सेंटर परत बदलण्यात आलं. लक्ष्मण ढोबळेंसाठी परीक्षा विभागाने न्यू सातारा कॉलेज ऑफ बीसीए, पंढरपूर या खाजगी महाविद्यालयात व्यवस्था केली. म्हणजे संपूर्ण सेंटरवर लक्ष्मण ढोबळे हे परीक्षा देणारे एकमेव विद्यार्थी होते.
हा प्रकार इथवरच थांबत नाही. तर एकमेव सेंटरवर पीएचडी परीक्षा देण्यासाठी लक्ष्मण ढोबळेंना लेखनिकही उपलब्ध करुन देण्यात आला. आता लेखनिक घेताना माजी मंत्र्यांनी दिव्यांगाचं प्रमाणपत्र देऊन लेखनिक घेतला. म्हणजे त्यांनी कारण दिलं होतं ते हात थरथरण्याचं. लेखनिक घेण्यासंदर्भातल्या पत्रात स्पष्ट लिहिलंय की उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक देणेबाबत. आणि दिव्यांगाचा तपशील लिहिलाय त्यात कारण आहे हात थरथरणे. त्यामुळेच लक्ष्मण ढोबळेंना लेखनिक उपलब्ध करुन देण्यात आला. म्हणजे लक्ष्मण ढोबळेंनी परीक्षेला लेखनिक घेताना दिव्यांग असल्याचा उल्लेख केलाय. लक्ष्मण ढोबळेंनी मात्र आपण दिव्यांग असल्याचा फायदा घेतला नसल्याचा दावा केला.
बरं हा लेखनिक म्हणजे आनंद मधूकर मसलखांब हा विद्यार्थी सोलापूरमधल्याच दयानंद महाविद्यालयात शिकतोय. हा विद्यार्थी MA भाग एकचा गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे. शिवाय MAचा आणि पीएचडी कोर्स वर्कचा अभ्यासक्रम सारखाच आहे. आता हा विद्यार्थी ज्या दयानंद महाविद्यालयात शिकतो त्याच महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक देविदास गायकवाड हेच माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंचे पीएचडी मार्गदर्शक आहेत. सर्वसामान्यपणे अभ्यासक्रमापेक्षा कमी शिक्षण असणारा विद्यार्थी लेखनिक असावा असा संकेत आहे.
याचमुळे अनेक सवाल निर्माण होतायत. अगदी पूजा खेडकरांच्या प्रकरणातही बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करण्यात आला होता. पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं होतं. डावा गुडघा सात टक्के कायमस्वरूपी अधू असल्याचं या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलं होतं. आता हात थरथरणे या एकमेव कारणाखाली लक्ष्मण ढोबळेंना दिव्यांगाचा लाभ देण्यात आलाय. ढोबळेंना दिव्यांग प्रमाणपत्रामुळे लेखनिक पुरवण्यात आला. हा लेखनिकसुद्धा MA भाग एकचा गुणवत्ताधारक विद्यार्थी होता.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंसाठी स्वतंत्र सेंटर, दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ, त्यानंतर मग गुणवत्ताधारक लेखनिक, अशा अनेक सोयी ढोबळेंच्या पीएचडीसाठी देण्यात आल्यात का असा सवाल उपस्थित होतोय. नियम वाकवून IAS झालेल्या पूजा खेडकरांचं प्रकरण चर्चेत आहे. आता शिक्षणाची सर्वोच्च पदवी मानल्या गेलेल्या पीएचडीसाठी नियम वाकवले जातात का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय..
Source link