मुंबईच्या माजी अंडर-16 खेळाडूचा मृतदेह झाडाला लटकलेला, मोबाईलमुळे पटली ओळख!

मुंबईच्या माजी अंडर-16 खेळाडूचा मृतदेह झाडाला लटकलेला, मोबाईलमुळे पटली ओळख!


Sagar sourati Dies: मुंबईचा माजी 16 वर्षांखालील फुटबॉल खेळाडू सागर सोरती (वय अज्ञात) याचा मृतदेह 18 नोव्हेंबर 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील मेंढावन खिंड जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनेनंतर त्याच्या मित्रपरिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना प्रथमदर्शनी आत्महत्येचा संशय आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.    

Add Zee News as a Preferred Source

15 नोव्हेंबरपासून बेपत्ता

सागर 15 नोव्हेंबरला “पुण्यात फुटबॉल खेळायला जातो” असे सांगून घरातून निघाला होता. त्यानंतर त्याचा कुटुंबियांशी संपर्क तुटला आणि तो बेपत्ता झाल्याची माहिती जवळच्यांनी दिली आहे.

दोन वर्षांपासून गंभीर मानसिक तणाव

कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, सागर गेल्या दोन वर्षांपासून गंभीर मानसिक तणावात होता. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या धाकट्या भावाच्या लग्नासाठी नवीन कपडे शिवण्यासही त्याने नकार दिला होता, अशीही माहिती समोर येत आहे.

मोबाईल फोनमुळे ओळख पटली

मृतदेहाजवळ सागरचा मोबाईल फोन सापडल्याने पोलिसांना त्याची ओळख पटवण्यास मदत झाली. सध्या कासा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा (Accidental Death Report – ADR) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

मृतदेह मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण व पुढील तपासाची दिशा स्पष्ट होणार आहे.

FAQ 

प्रश्न: सागर सोरतीचा मृतदेह कधी आणि कुठे सापडला?

उत्तर: सागरचा मृतदेह १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पालघर जिल्ह्यातील मेंढावन खिंड जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

प्रश्न: सागर कधीपासून बेपत्ता होता आणि तो कुठे जातोय असे सांगितले होते?

उत्तर: सागर १५ नोव्हेंबर २०२५ रोजी “पुण्यात फुटबॉल खेळायला जातो” असे सांगून घरातून निघाला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला आणि कुटुंबियांचा त्याच्याशी संपर्क तुटला.

प्रश्न: सध्या पोलिसांनी कोणता गुन्हा दाखल केला आहे आणि पुढे काय होणार?

उत्तर: कासा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा (ADR) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण व पुढील कारवाई ठरेल.





Source link

'भाजपला 130 च्या घरात बसवण्यात शिंदेंचे मोठे योगदान' शिवसेनेकडून आलेल्या पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

'भाजपला 130 च्या घरात बसवण्यात शिंदेंचे मोठे योगदान' शिवसेनेकडून आलेल्या पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!


Akshay Maharaj Post: शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. पण सर्वकाही सुरळीत असल्याचे दोन्हीकडच्या नेत्यांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर आचा शिवसेनेकडून भाजपचे नाव न घेता टीका केलीय. शिवसेना प्रवक्ते अक्षय महाराज भोसले यांच्या पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ झालीय. काय म्हणाले अक्षय महाराज? जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

शिवसेना प्रवक्ते अक्षय महाराज भोसले यांनी सोशल मीडियावर (ट्विटरवर) सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. नाव न घेता त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली, ज्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भोसले म्हणाले, “चिखलात कमळ असत… पण राज्यात ते गटरात रुतलेलं होतं, तेव्हा जनतेच्या सेवेसाठी कोणी बाहेर काढलं? हे काही लोक लवकर विसरतात.” यातून महायुतीतील अंतर्गत तणाव दिसतोय.

शिंदेंच्या नेतृत्वाची प्रशंसा

भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कष्टांची आठवण करून दिली. “राजकारणात आरोप-प्रत्यारोप सोपे आहेत, पण जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करून राज्याला स्थैर्य देणे हे शिंदे यांचे काम! शिंदेंविरोधात लढणे म्हणजे वादळाविरुद्ध मशाल पेटवणे, मशालीने स्वतःच जळून जाल,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना (भाजपला) इशारा दिला. भाजपला 130 च्या घरात बसवण्यात शिंदेंचे मोठे योगदान असल्याचेही सांगितले. “जनतेचा आशीर्वाद, विकासाची गती आणि भगव्याची शक्ती यांसमोर विरोधकांचे राजकारण फक्त धुरकट कुजबुज!” असा टोला त्यांनी लगावला.

‘सर्वसामान्यांची भावना’

हे माझे वैयक्तिक मत नाही, तर साधू-संत, सर्वसामान्यांशी बोलून मांडलेली भूमिका आहे. “शिंदे हे संयमी नेते आहेत, महाराष्ट्राच्या जनतेचा उद्रेक होऊ नये. मी कोणाचे नाव घेतले नाही, पण जनता सुज्ञ आहे, असे ते म्हणाले. सर्वांनी हिंदुत्व दावणीला बांधले तेव्हा शिंदे यांनी बंड केले आणि लोककल्याणाच्या योजना आणल्या, हे विसरू नका,” असे म्हणत त्यांनी जनतेला सावध केले. ही टीका महायुतीतील समीकरणे हादरवू शकते, असे दिसते.

FAQ 

प्रश्न : अक्षय महाराज भोसले यांनी नेमके काय म्हणून भाजपवर टीका केली?

उत्तर : त्यांनी नाव न घेता लिहिले, “चिखलात कमळ असत… पण राज्यात ते गटरात रुतलेलं होतं, तेव्हा जनतेच्या सेवेसाठी कोणी बाहेर काढलं?” यातून भाजपला २०२२ मध्ये सत्ताबाहेर असताना एकनाथ शिंदे यांनीच सत्तेत आणल्याचा अप्रत्यक्ष दावा केला. ते म्हणाले की, काही लोक हे कष्ट लवकर विसरतात.

प्रश्न : शिंदे साहेबांविरोधात लढण्याबद्दल भोसले यांनी काय इशारा दिला?

उत्तर : ते म्हणाले, “ना. शिंदे साहेबांविरोधात लढणे म्हणजे वादळाविरुद्ध मशाल पेटवण्यासारखे आहे. काळजी करू नका… मशालीने स्वतःच जळून जाल!” यातून विरोधकांना (म्हणजे भाजपला) थेट इशारा दिला की, शिंदे यांच्यासमोर कोणी टिकणार नाही आणि जनतेचा आशीर्वाद, विकास व भगव्याची ताकद शिंदे यांच्यासोबत आहे.

प्रश्न : ही पोस्ट वैयक्तिक मत आहे की शिवसेनेची अधिकृत भूमिका?

उत्तर : अक्षय भोसले यांनी स्पष्ट केले की, “हे माझे वैयक्तिक मत नाही. साधू-संत, सर्वसामान्य जनतेला भेटलो, त्यांच्या भावना आहेत. मी कोणाचेही नाव घेतले नाही, पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे.” तरीही ही पोस्ट शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीचे आणि भाजपला “कृतघ्न” ठरवण्याचे प्रतीक मानली जाते.





Source link

शरद पवारांनी फटकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसकडून मनसेबाबत मोठं विधान, 'आम्ही एकत्र…'

शरद पवारांनी फटकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसकडून मनसेबाबत मोठं विधान, 'आम्ही एकत्र…'


Vijay Wadettiwar on MNS: मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मनसेशी आमची विचारधारा जुळत नाही. मात्र भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं आहे. भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक असून मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. शरद पवार या आघाडीला घेऊन सकारात्मक असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. शरद पवारांनी मोर्चात एकत्र, निवडणूक वेगळी का लढवता? अशी विचारणा केली होती. महाविकास आघाडी म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली पाहिजे असं स्पष्ट मत शरद पवारांनी मांडलं होतं. 

Add Zee News as a Preferred Source

“मनसेची आणि आमची विचारधारा जुळत नाही. त्यामुळे तो विषय आला असावा. पण शरद पवारांनी आपण आघाडीत लढलं पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. आपण सर्वांनी भाजपाचा पराभव करण्यासाठी, या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

दरम्यान दडपशाही करणा-यासंबोत काँग्रेस जाणार नाही असं वक्तव्य काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी दिली होती. महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र वडेट्टीवारांनी मात्र भाजप विरोधात मनसेला सोबत घेण्यास सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. त्यामुळे मनसेवरुन काँग्रेसमध्ये दोन प्रवाह असल्याचं समोर येत आहे. 

वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं, “मुंबई एक असं शहर आहे जिथे सर्व राज्यातील लोक असतात आणि मुंबईच्या विकासात प्रत्येकाचा हातभार आहे. त्यामुळे दडपशाही करणाऱ्या किंवा कायदा हातात घेणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही”.

शरद पवारांनी काय म्हटलं?

मुंबईत मनसे पक्षाला सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक आहेत. महाविकास आघाडी म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली पाहिजे असं शरद पवार यांचं मत आहे. मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता? असा स्पष्ट मत शरद पवारांनी मांडलं आहे. 

शरद पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना फोन 

शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला होता. मुंबई महानगरपालिका कशी लढायची  यावरती सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली होती. मुंबई महानगरपालिका निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास काँग्रेस नेत्यांनी हिरवा कंदील दिला होता. मात्र शरद पवार काँग्रेस सोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी म्हणून नव्याने आणखी काही प्रयत्न करणार यावरती स्पष्टता नव्हती. 





Source link

महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका नगराध्यक्ष पदासह सर्व 26 नगरसेवक मतदान न होताच विजयी! 'या' पक्षाचे आहेत सर्वजण; नाव जाणून धक्का बसेल

महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका नगराध्यक्ष पदासह सर्व 26 नगरसेवक मतदान न होताच विजयी! 'या' पक्षाचे आहेत सर्वजण; नाव जाणून धक्का बसेल


Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या ‘झी 24 तास’ डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

…Read More





Source link

बाचाबाचीवरुन हाणामारीपर्यंत पोहोचला भाजपा-शिंदेसेना वाद; ठाण्यात रात्री तुफान राडा

बाचाबाचीवरुन हाणामारीपर्यंत पोहोचला भाजपा-शिंदेसेना वाद; ठाण्यात रात्री तुफान राडा


Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते ‘झी 24 तास’मध्ये ‘डेप्युटी न्यूज एडिटर’ म्हणून कार्यरत आहेत.

…Read More





Source link

लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! आचारसंहितेमुळे नोव्हेंबरला हप्ता लांबणार का? मोठी अपडेट

लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! आचारसंहितेमुळे नोव्हेंबरला हप्ता लांबणार का? मोठी अपडेट



महाराष्ट्र सध्या सगळीकडे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची तयारी पाहायला मिळत आहे. आचारसंहिता लागू झाली झाले अशावेळी लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp