Maharashtra Milk Business: प्रत्येक राज्याचा स्वत:चा दुधाचा ब्रँड असतो. त्याच्याशी सर्वच गोष्टी जोडलेल्या असतात. कधी काळी महानंदा, आरेसह इतर कंपन्या तेजीत होत्या मात्र कालांतरानं किंवा सरकारकडून योग्य ते पाठबळ न मिळाल्यानं त्या मागे पडल्या. सध्या महाराष्ट्राचा 70 टक्के दुधाचा धंदा गुजरातकडे जातोय, असा आरोप होतोय.
दूध जितकं आरोग्यासाठी आवश्यक तितकंच अर्थकारणासाठी आणि राजकारणासाठीही. पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आलाय. देशभरातल्या विविध राज्यांनी आपापल्या राज्यातल्या दूध उत्पादकांचं हित जाणलं.. त्यातून स्थानिक सहकारी ब्रँडवर लक्ष केंद्रित केलं… पण महाराष्ट्रातली परिस्थिती त्या उलट आहे. राज्यातले महानंद, आरे यासारखे ब्रँड टिकवण्याऐवजी परराज्यातल्या कंपन्यांना ते आंदण म्हणून दिले जाताहेत असा आरोप होतोय. राज्य सरकारच्या अनास्थेमुळे महाराष्ट्राचा 70 टक्के दुधाचा धंदा गुजराती कंपन्यांनी पळवलाय.
मुंबईतल्या 85 टक्के पॅकींग दुधावर गुजरातमधल्या कंपन्यांनी कब्जा केलाय. गुजरातच्या अमूल आणि इतर कंपन्यांच्या आक्रमणामुळे पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगरमधले स्थानिक ब्रँड संकटात आलेत. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या दूध व्यवसायात गुजरातमधल्या खासगी डेअरी अतिक्रमण करत असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनीच जाहीरपणे कबूल केलं.
मुळात या सगळ्याला राज्य सरकारचं याबाबतचं धोरण कारणीभूत आहे, असं अखिल भारतीय किसान सभेचे नेते अजित नवलेंनी म्हटलंय. गुजरातच्या अमूल कंपनीनं महाराष्ट्राच्या दूध उत्पादन क्षेत्रावर गेल्या काही वर्षांपासून कब्जा केलाय. त्यातच महानंद हा ब्रँड सरकारनं गुजरातमध्ये मुख्यालय असणा-या एनडीबीकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला… ही धोक्याची घंटा असल्याचंही ते म्हणालेत. यासाठी सरकारनं पावलं उचलावीत, अशी मागणी अजित नवलेंनी केलीय.
कर्नाटक सरकारनं ‘नंदिनी, तामिळनाडू सरकारनं ‘अविन आणि केरळ सरकारनं मिल्मा हे स्थानिक सहकारी ब्रँड विकसित करण्यावर भर दिलाय. तिथले शेतकरी आणि सहकारी शिखर संस्थांना अनुदान आणि पाठबळ दिलं. मुख्य म्हणजे गुजरातची ‘अमूलच्या माध्यमातून होत असलेली घुसखोरी रोखली. मात्र, महाराष्ट्रात सरकारकडूनच इथल्या कंपन्यांवर अतिक्रमणाची संधी दिली जातेय. जर हे असंच होत राहिलं तर येत्या काळात महाराष्ट्राच्या संपूर्ण दूध व्यवसायावर इतर राज्यांचा प्रामुख्यानं गुजरातचा दबदबा निर्माण होईल आणि आपण केवळ दूध आयाती पुरते उरू.
Maharashtra Politics : मुंबै बँक ही मुंबईतली सहकार क्षेत्रातली महत्त्वाची बँक. ही बँक राजकीयदृष्ट्या कायमच चर्चेत असते. या बँकेच्या संचालकपदी शिवसेना ठाकरे पक्षाचे अभिषेक घोसाळकर हे नियुक्त होते. मात्र, गेल्यावर्षी अभिषेक घोसाळकरांची धक्कादायकरित्या फेसबुक लाईव्ह सुरु असतांनाच गोळ्या घालून हत्या झाली. यानंतर अभिषेक घोसाळकरांचे संचालकपद जवळपास वर्षभर रिक्त राहिलं. गेलं वर्षभर रिक्त असणारं हे पद ऐन महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भरलं गेलं. मुंबै बँकेत तेजस्वी घोसाळकर यांची संचालकपदी निवड करुन भाजपनं मुंबईत मोठी खेळी खेळल्याची चर्चा आहे. भाजपच्या खेळीवर उद्धव ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक मारला आहे.
मुंबै बँकचे संचालकपद जवळपास वर्षभर रिक्त होते. मात्र, गेलं वर्षभर रिक्त असणारं हे पद ऐन महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भरलं गेलं. सद्भावना म्हणून हे रिक्त पद अभिषेक यांच्या पत्नी आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना देण्यात आलं. तेजस्वी घोसाळकर या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी सध्या भाजपचे प्रविण दरेकर आहेत. त्यामुळे हे पद तेजस्वी घोसाळकरांना देण्याच्या टायमिंगमागे भाजपची खेळी असल्याची चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे त्यांच्यावर ठाकरे गट सोडण्यासाठी दबाव असल्याचा आरोप त्यांचेच सासरे विनोद घोसाळकरांनी केला होता. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर ठाकरेंना कधीही रामराम ठोकतील अशी चर्चा असतांनाच त्यांच्या मुंबै बँकचे संचालकपदाच्या नेमणूकाच्या टायमींगची चर्चा आहे.
मुंबै बँकेवर संचालकपदी निवड झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवर जाऊन त्या उद्धव ठाकरेना भेटल्या. गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर नाराज असल्याच्या चर्चा आहे. या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील समोर आला नाही. मात्र, भाजपने तेजस्वी घोसाळकर यांना मुंबै बँकचे संचालकपद दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरेंकडून घोसाळकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तेजस्वी घोसाळकरांची दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, हे पद स्विकारण्याबाबत तेजस्वी घोसाळकरांकडून अद्याप मौन आहे. यामुळे तेजस्वी घोसळकर काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
विशाल करोळे (प्रतिनिधी) संभाजीनगर : Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर मध्ये आज इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांनी विराट मोर्चा काढला. इम्तियाज जलील यांना अटक करा त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. संजय शिरसाठ यांच्यावर आरोप करताना इम्तियाज जलील यांनी आंबेडकरी जनतेबाबत आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप आहे. तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी पैसे देऊन हा मोर्चा काढला असा टोला इम्तियाज जलील यांनी या मोर्चावर केलाय.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातल्या संघर्षानं आता रस्त्यावरच्या लढाईचं स्वरुप घेतलंय. इम्तियाज जलील यांच्या अटकेसाठी संजय शिरसाट समर्थक आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला. काही दिवसांपूर्वी शिरसाट यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करताना विशिष्ट जातीसमुहाचा अपमानास्पद उल्लेख केल्याचा आरोप शिरसाट समर्थकांनी केलाय. या प्रकरणी जलील यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जलील यांना अटक करावी यासाठी आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढला होता.
पोलिसांनी इम्तियाज जलील यांना अटक करावी अन्यथा जलील यांच्या घरात घुसण्यासही मागंपुढं पाहणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिलाय. आधीच्या वक्तव्यानं वाद ओढावलेला असतानाही जलील माघार घेण्यासाठी तयार नाहीत. जलील यांनी आंदोलकांवर पुन्हा आरोप केलेत.
मोर्चानंतरही आंबेडकरी अनुयायांचा संताप कमी झालेला नव्हता. पोलिसांनी कारवाई केली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. दुसरीकडं इम्तियाज जलील यांनीही यापुढच्या काळात शिरसाट आणि त्यांच्या समर्थकांचे घोटाळे बाहेर काढण्याचा निर्धार केलाय. त्यामुळं हा संघर्ष आणखी गंभीर वळण घेणार असे संकेत आतापासूनच मिळू लागलेत.
Hindi Compulsory: मनसे नेते संदीप देशपांडे यांचे नेतृत्वाखाली हिंदी सक्तीच्या विरोधात स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली आहे. दादरच्या IES शाळेच्या बाहेर हिंदी सक्तीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. आम्ही सरळ मार्गाने आंदोलन करत आहोत तोपर्यत सरकारने तोपर्यंत दखल Iघ्यावी. उद्या महाराष्ट्रभर थैमान घालायला लावू नये अन्यथा जबाबदारी सरकारची असेल, असे आव्हान यावेळी संदीप देशपांडे यांनी काढले.
सह्यांच्या या मोहिमेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळतोय. महाराष्ट्रात 2 भाषा शिकवल्या जातील, तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रात पहिलीपासून नको. बैठकीमध्ये त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. सध्या सकारात्मक तसा जोर भरपूर आहे. सरकारने सक्तीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उद्याचा रस्त्यावर आम्ही तांडव मांडायला लागलो तर मराठी माणसाला आणि महाराष्ट्र सैनिकांना आवरण सरकारला कठीण होत असेल असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. लोकांची संभ्रमावस्था दूर करणं हे सरकारच कर्तव्य आहे. त्यांनी ते केला पाहिजे. तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार असल्याचेही देशपांडे म्हणाले.
आमदार संग्राम जगताप डोक्यावर पडलेत का? महाराष्ट्रात उर्दू चालते असा मी कधी म्हणालो? डोक्यावर पडलाय का संग्राम? कुठे उर्दू शिकवली जाते विचारात शाळांमध्ये शिकवली जाते का? त्यांच्या स्वतःच्या शाळेमध्ये ती शिकवली जात असेल कदाचित, असा टोला त्यांनी लगावला.
हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न होतोय. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करतेय. सर्व मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. फक्त नऊ वाजता बोलबच्चगिरी करून काही होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा असे आवाहन त्यांनी केले.
अबू आझमींना पुन्हा एकदा कानाखाली
सर्व षंढ लोक सरकारमध्ये बसले असतील तर मराठी माणसाने करायचं काय? असा प्रश्न यावेळी संदीप देशपांडे यांनी विचारला. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचादेखील समाचार घेतला. त्यांना पडलेली कानाखाली ते विसरले असतील तर पुन्हा एकदा आम्हाला कानाखाली द्यावी लागेल. त्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही, असे देशपांडे म्हणाले.
महाराष्ट्राचं दुर्दैव
सरकारला अजूनही हिंदी बद्दल का प्रेम आहे ? कळत नाही. मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिलंय हे तुम्ही विसरून नये. ज्यांनी निवडून दिले तो तुम्हाला घरी पण बसवू शकतो हे लक्षात घ्यावे. हेच मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.
Thackeray Brothers Alliance : मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये द्वंद सुरू झालंय. ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेकडून काही सवाल उपस्थित करण्यात आले होते, तसंच युतीच्या मुद्द्यावरून संदीप देशपांडेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीय.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनंतर दोन्ही पक्षातील नेत्यांची मनं जुळल्याची चित्र होतं. मात्र, याच युतीच्या चर्चांवरून संदीप देशपांडे आणि संजय राऊतांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवरून संदीप देशपांडेंनी राऊतांवर टीकास्त्र डागलंय. ताटातल्या चमच्यांनी चमच्याचं काम करावं असा खोचक टोला देशपांडेंनी राऊतांना लगावला. दरम्यान यानंतर संजय राऊतांनी देखील संदीप देशपांडेंना खडसावलंय. (Thackeray Brothers Alliance shivsena MNS Raj Thackera UddhavThackeray Maharashtra political drama)
युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंकडून कोमणताही प्रस्ताव आला नसल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. तसंच राऊतांवरही त्यांनी निशाणा साधला होता. दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी संदीप देशपांडेंचा समाचार घेतलाय. राज ठाकरेंच्या ताटातले चमचे कोण आहेत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीका केलीय.
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी युतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलं होतं. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच मी करणार असं मोठं विधान त्यांनी केलं . मात्र, त्यांच्या या विधावरूनही संदीप देशपांडेंनी टीका केलीय. 2014 विधानसभा निवडणुकीत जनतेच्या मनातलं न ओळखता उद्धव ठाकरे भाजपसोबत का गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
मनसेसोबत युती करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना कमालीची सकारात्मक आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीसंदर्भात सकारात्मक विधानं केली जात आहेत. मात्र, दुसरीकडे मनसेकडून दुरावा निर्माण करणारी विधान सुरू असल्याची चर्चा आहे. याचं कारण आहे दोन दिवसांपूर्वी संदीप देशपांडेंनी उपस्थित केलेले सवाल.
युतीसाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली. दरम्यान यानंतर उद्धव ठाकरेंनी वारंवार सकारात्मक भूमिका घेतलीय. उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे नेतेही सकारात्मक दिसताय. मात्र, दुसरीकडे मनसे नेत्यांच्या भूमिकेमुळे ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागलाय का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
Bhaskar Jadhav on Shivsena Is Becaming Congress : शिवसेनेची काँग्रेस झाली असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत केलं होतं. त्यांनी 14 जानेवारी 2025 मध्ये चिपळूनमध्ये हे वक्तव्य केलं होतं त्यावरच हा प्रश्न विचारण्यात आला. या मुलाखतीत भास्कर जाधव यांनी त्यांनी केलेल्या शिवसेनेची काँग्रेस झाली हे वक्तव्य करण्याचं कारण सांगितलं.
भास्कर जाधव त्यांच्या या वक्तव्याविषयी बोलताना म्हणाले, ‘ही गोष्ट खरी आहे की शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना हे विधान मी केलं. पण हे विधान अर्धवट दाखवण्यात आलं. पूर्वीची शिवसेनेची कार्यप्रणाली काय होती? त्याचं स्ट्रकचर काय होतं? आणि आताचं शिवसेनेचं स्ट्रकरच बनत चाललंय हा फरक सांगत असताना मी हे विधान केलं. ही गोष्ट खरी आहे.’
शिवसेनेची कॉंग्रेस झाली म्हणजे नेमकं काय?
पुढे शिवसेनेची कॉंग्रेस झाली म्हणजे नेमकं काय? असा सवाल करताच भास्कर जाधव यांनी शिवसेनेचं स्ट्रकचर सांगत म्हणाले, ‘पूर्वी शिवसेनेचं स्ट्रकचर होतं. शिवसेना प्रमुख त्यानंतर शिवसेनेचे 13 नेते, त्यानंतर जिल्हा प्रमुख, त्यानंतर तालुका प्रमुख आणि त्यानंतर शाखा प्रमुख अशा पद्धतीची शिवसेनेची कार्यप्रणाली होती. आज आपण जर पाहिलं तर एक तालुका प्रमुख नेमायचा असेल तर तालुका प्रमुखाच्या बरोबरीनं तालुका समन्वय, एक तालुका संघटक, एक तालुका सचिव, एक तालुका कोण आणखीन. एका पदात्या भोवती आपण किती पद निर्माण करणार आहोत, जी कॉंग्रेसची पद्धत होती. कॉंग्रेसची पद्धत अशीच आहे. कोणी रुसला-रागवला की हा सरचिटणीस, तो उप-सरचिटणीस, तो उपाध्यक्ष. शिवसेनेचं तसं नव्हतं. शिवसेनेचा एक प्रमुख हा जिल्हा परिषदेच्या गटा प्रमुखाप्रमाणे असायचा. एक उपविभाग प्रमुख पंचायतसमिती गणाप्रमाणे असायचा. जेणे करून त्याचं कार्यक्षेत्र हे ठरलेलं असतं. काहीही झालं तरी ते त्यासाठी उत्तर देण्यासाठी बांधील असतो. आपल्या कार्यक्षेत्रात रिझल्ट आणणं त्याच्यावर बंधन कारक असतं. आता एकाच कार्यक्षेत्रात 10 पदाधिकारी नेमले तर कोणाची जबाबदारी कोणावर द्यायची. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये ज्या प्रमाणे फक्त खूश करण्यासाठी पद दिलं जातं होतं, तसं शिवसेनेत दिलं जाऊ नये हा माझा आग्रह त्या भांडणात होता आणि आजही आहे.’
शिवसेनेची कॉंग्रेस होणं चांगलं की वाईट?
शिवसेनेची कॉंग्रेस होणं चांगलं की वाईट? यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की ‘प्रत्येक पक्षाची विचारधारणा ही वेगळी आहे. प्रत्येक पक्षाची कार्यप्रणाली ही वेगळी आहे. कॉंग्रेसची वेगळी आहे शिवसेनेची वेगळी आहे. आघाडी, युती हा विषय सोडून द्या, पण शिवसेनेची कार्यप्रणाली ही शिवसेनेप्रमाणेच राहिले पाहिजे. हे माझं मत आहे.’