by Hansraj Agrawal | Jun 28, 2024 | Trending News
Pankaja Munde : पराभव होऊनही पंकजा मुंडेंना लॉटरी लागणार आहे. पंकजा मुंडे खासदार नाही तर आमदार होणार आहेत. इतकच नही तर त्यांना मंत्रीपदीही मिळणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंची लवकरच विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे. पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळातही समावेश केला जाणार असल्याची चर्चा आहे. काय आहे यामागील राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट.
विधानसभेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंना दारूण पराभव पत्करावा लागला. मात्र, आता पंकजा मुंडे समर्थकांसाठी भाजपच्या गोटातून आनंदाची बातमी लवकरच येणार आहे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर पाठवून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्लॅन भाजपनं आखल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी ओबीसी मतांची बेगमी करण्यासाठी पंकजा मुंडेंचा मंत्रिमंडळातही समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.
पंकजा मुंडेंचं पुनर्वसन होणार?
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे महिला आणि बालविकास मंत्री होत्या. परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी त्यांना हरवलं. तर, बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनावणेंनी त्यांचा दारूण पराभव केला. ओबीसी-मराठा वादाचा फटका त्यांना बसल्याचं मानलं जातंय. पंकजा मुंडेंना मानणारा मोठा ओबीसी वर्ग महाराष्ट्रात आहे. पंकजा मुंडेंना मंत्रीपद दिल्यास ओबीसी मतं पक्षाकडं वळतील, असं भाजपला वाटतं.
पंकजा मुंडेंसह महादेव जानकर यांचीही उमेदवारी निश्चित
दरम्यान, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 13 जुलैला निवडणूक होणाराय. पंकजा मुंडेंसह महादेव जानकर यांचीही उमेदवारी निश्चित मानली जातेय… विधानपरिषदेसाठी एकूण 10 नावं प्रदेश भाजपनं केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामध्ये पंकजा मुंडे आणि जानकरांसह अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ आणि माधवी नाईक यांचा समावेश असल्याचं समजतंय.. यापैकी 5 जागा भाजप लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून विधानपरिषदेची रणनीती भाजपनं आखलीय…
Source link
by Hansraj Agrawal | Jun 28, 2024 | Trending News
Kolhapur News : सोशल मीडियावर एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 27, 2024 | Trending News
बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव का झाला याचा खुलासा करणारी एक ऑडिक्लिप सध्या व्हायरल झाली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 26, 2024 | Trending News
राष्ट्रवादी अजित पवार गट विधानसभा निवडणुका महायुतीसोबत लढणार की स्वतंत्र लढणार अशी चर्चा सुरू झालीय. याचं कारण म्हणजे अमोल मिटकरी यांनी केलेलं एक ताजं विधान… पाहुया त्यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट..
Source link
by Hansraj Agrawal | Jun 26, 2024 | Trending News
Ashadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पंढरपुरात आतापासूनच राज्यातून आणि देशातूनही भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 25, 2024 | Trending News
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात मेलेली चिमणी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायतीमधील ही घटना आहे. नील शिंदेकर या मुलाला देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेली चिमणी आढळली. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार (Poor Nutrition) देत असल्याचा आरोप करण्यात येतोय. यासंदर्भात, सरपंच आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना निवेदन दिलंय.दरम्यान, तक्रारीनंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीनं दिलीय.
पुण्यातही (Pune) अशाच एका घटनेनं खळबळ उडाली. शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचं समोर आलंय. तांदुळ, मटकीसह मुगडाळीत किडे आणि अळ्या आढळल्या. खेड तालुक्यातल्या बहुळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पोषण आहाराचा उपक्रम सुरू करण्यात आलाय. मात्र, यासाठी लागणारं धान्य निकृष्ट दर्जाचं असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होतायत.
नागपूर असो वा पुणे. दोन्ही घटनांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होतोय, हे वास्तव आहे. शालेय पोषण आहाराच्या नावाखाली नेमकं कोण कुणाचं पोषण करतंय, हा देखील मोठा सवाल आहे.
शालेय पोषण आहार योजना म्हणजे काय?
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसंच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचं प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी राज्यामध्ये 22 नोव्हेंबर 1995 पासून इयत्ता 1 ली ते 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येतं. राज्यामध्ये ही योजना राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानीत व अंशत: अनुदानीत शाळा, वस्तीशाळा, महात्मा फुले शिक्षण हमी योजना केंद्रे यांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते. 2008-09 पासून राज्यातील इयत्ता 6 वी ते 8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेमध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ घरी न देता शिजवलेले अन्न (Cooked Food) द्यावे, असे आदेश दिले. त्यानुसार 2002 पासून या योजनेचे स्वरुप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेले अन्न देण्यात येत आहे. यासाठी काही संस्थांची नेमणुक करण्यात आली आहे. पण अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं जात असल्याच्या तक्रारी करण्यात प्राप्त झाल्यात.
Source link