नाना पटोलेंचा 'सरंजामी' प्रताप आणि राजकीय ठणाणा; चूक मान्य न करता लंगडं समर्थन!
Nana Patole muddy feet: . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलात माखलेले पाय त्यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याला धुवायला लावले.
Source link
Nana Patole muddy feet: . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलात माखलेले पाय त्यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याला धुवायला लावले.
Source link
Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंबरोबरच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत ठाकरे गटाने लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देणे म्हणजे नक्षलवाद आहे का? असा प्रश्न विचारला आहे. राज्यातील काही स्वयंसेवी संस्था म्हणजेच एनजीओ या शहरी नक्षलवाद पोसत असून या शहरी नक्षलवाद्यांनी पंतप्रधान मोदी यांना हटविण्यासाठी काम केले, या मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानासंदर्भ देत ठाकरे गटाने ही टीका केली आहे.
“घटनाबाह्य मुख्यमंत्री मिंधे महोदय हे पूर्णपणे भाजपची भाषा बोलू लागले आहेत यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. भाजपने शिंदे यांना नकली शिवसेनेचे खेळणे दिले आहे. त्याच्याशी खेळत मिंधे मुख्यमंत्री भाजपच्या सुरात सूर लावतात. राज्यातील काही स्वयंसेवी संस्था म्हणजेच एनजीओ या शहरी नक्षलवाद पोसत असून या शहरी नक्षलवाद्यांनी पंतप्रधान मोदी यांना हटविण्यासाठी काम केले, असे मुख्यमंत्री मिंधे यांनी सांगितले. एनजीओंनी मोदींविरोधात प्रचार केला असे मिंधे म्हणतात. तरीही मोदी पंतप्रधान झालेच याचा आनंद मिंधे यांना झाला. मिंधे यांचे बोलणे असंबद्ध आहे,” अशी भूमिका ‘सामना’मधून मांडण्यात आली आहे.
“शहरी नक्षलवाद ही संकल्पना काही काळापूर्वी भाजपच्याच सुपीक डोक्यातून बाहेर पडली. नक्षलवाद देशाच्या काही दुर्गम भागात आहेच. पण शहरातील काही सुशिक्षितांमध्येही नक्षलवाद शिरला हा प्रचार भाजपने सुरू केला. मुख्यमंत्री मिंधे तेच करत आहेत. मोदी यांची हुकूमशाही, लोकशाहीविरुद्ध कृत्य, अमित शहा यांचा दहशती कारभार यावर शहरातील सुशिक्षितांनी प्रश्न विचारले की त्यांच्यावर शहरी नक्षलवादाचा शिक्का मारून बदनाम करायचे, हे धोरण गेल्या दहा वर्षांपासून राबवले जात आहे. जे मोदींच्या मनमानीविरुद्ध प्रचार करतात त्यांना नक्षलवादी ठरवण्याचे तंत्र भाजपने सुरू केले. आता मिंधे व त्यांच्या लोकांच्या खोकेशाहीविरुद्ध बोलणाऱ्यांनाही शहरी नक्षलवादी ठरवणार की काय?” असा प्रश्न ठाकरे गटाने ‘सत्तेतले नक्षलवादी’ या लेखातून विचारला आहे.
नक्की वाचा >> मोदी-मेलोनी Memes वरुन ठाकरे गटाचा संताप; म्हणाले, ‘यावरुन देशातील…’
“शहरी नक्षलवादाचा बागुलबुवा सरकारी यंत्रणांकडून उभा केला जातो. लोकसभा निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रातील पाच प्रमुख शहरांमध्ये हिंसक घटना घडवण्याचा नक्षलवाद्यांचा कट असल्याचे वारंवार सांगितले गेले. सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी घातपात घडवले जातील, असे पोलिसांतर्फे सांगितले. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील निवडणुका सुरळीत पार पडल्या व जो काही गोंधळ घातला तो पोलिसांनी व सत्ताधाऱ्यांनी. त्यामुळे शहरी नक्षलवादाचे भूत जर कुणाच्या मानगुटीवर बसले असेल तर ते भाजपच्या,” असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
“आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, फादर स्टेन स्वामी अशा काही सुशिक्षितांना अटक करून त्यांच्यावर सरकार उलथवण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला व वर्षानुवर्षे तुरुंगात ठेवले. पुण्यातल्या ‘एल्गार’ परिषदेच्या निमित्ताने पोलिसांनी ही कारवाई केली. सरकारी यंत्रणेविरुद्ध आवाज उठवण्याचे स्वातंत्र्य ब्रिटिश काळात भारतीय जनतेस होते, पण आता असे करणाऱ्यांना स्वतंत्र भारतात राजद्रोही ठरवले जाते. शहरी नक्षलवाद्यांनी मोदींविरुद्ध प्रचार केला म्हणजे काय केले? मोदी व त्यांचे लोक 400 जागा जिंकून देशाचे संविधान बदलणार आहेत. त्यामुळे मोदींचा पराभव व्हायला हवा ही जर स्वयंसेवी संस्थांची भूमिका असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? आदिवासी पाड्यांवर, जंगलात बऱ्याच स्वयंसेवी संस्था काम करतात. आदिवासींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देतात, लढण्याचे बळ देतात. असे करणे हा गुन्हा आहे काय?” असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
नक्की वाचा >> ‘मोदी-शाह आता हे 4 पक्ष फोडणार’, राऊतांनी घेतली पक्षांची नावे; म्हणाले, ‘इंडिया आघाडी..’
“झारखंडच्या जंगलात पोलिसी अत्याचारांविरुद्ध तेथील आदिवासींचे नेतृत्व करणाऱ्या रूपेश कुमार सिंग या पत्रकारास शहरी नक्षलवादी ठरवून चार वर्षांपासून तुरुंगात डांबले आहे. हे सर्व लोक डाव्या विचारांचे असू शकतात, पण डाव्यांनी अनेक राज्यांत लोकशाही मार्गाने निवडणुका लढवून राज्ये जिंकली आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी संघटनांचे लोक नक्षलवादी असल्याचे आरोप भाजपकडून होत असतात. हाच आरोप कन्हैया कुमारवर झाला, पण कन्हैया कुमार संविधानाचा रक्षक म्हणून लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रियेत उतरला. म्हणजे लोकशाही व्यवस्थेवर त्याचा विश्वास आहे. असा विश्वास मोदी, शहा, फडणवीस, मिंधे वगैरे लोकांचा आहे काय?” असंही ठाकरे गटाने विचारलं आहे.
लेखाच्या शेवटी भाजपावर निशाणा साधत भाजपा करत असलेल्या गोष्टी सुद्धा शहरी नक्षलवादाचाच भाग असल्याची टीका करण्यात आली आहे. “सुप्रीम कोर्टाचे निर्देश हे घटनाबाह्य सरकारविरोधी असतानाही या मिंधे सरकारला जबरदस्तीने जनतेच्या छाताडावर बसवणे या अतिरेकी कृतीलाच शहरी नक्षलवाद म्हणावे लागेल. मोदी-शहांची तपास यंत्रणा राजकीय विरोधकांना धमक्या देऊन खंडण्या गोळा करते व पक्षांतरे करायला लावते हासुद्धा शहरी नक्षलवादाचाच भाग आहे. राज्यात सत्ता उलथवण्याचा कट या लोकांनी केला. पण मोदी यांची एकाधिकारशाही जनतेने मतपेटीतून उलथवली. यात नक्षलवादाचा विषय येतो कोठे? छत्तीसगड, झारखंड, आंध्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत नक्षलवाद आहे, पण हा नक्षलवाद सामाजिक-आर्थिक विषमता, बेरोजगारी व पोलिसी अत्याचारांतून उगम पावला. मोदी, शहा, फडणवीस यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून निर्माण केलेला दहशतवाद व नक्षलवाद यात मोठा फरक नाही,” असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला आहे.
Maharashtra police bharti 2024 : ऐन पावसाळ्यात पोलीस भरतीचा घाट घालण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिस दलात विविध 17 हजार रिक्त पदासांठी भरती होत आहे. 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. 21 जूनपासून होणाऱ्या भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी राज्यभर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे.
अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी या पोलिस भरतीबाबत सविस्तर माहिती दिली. लोकसभा निवडणूकीमुळे ही भरती करण शक्य नव्हतं. मात्र, 19 जून पासून भरती प्रक्रिया होणार आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. उमेदवार दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही.
मात्र दोन वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतात असे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी परीक्षा एकाच दिवशी देता येणार नाही. त्यांना त्यात सुटं देण्यात आलेली नाही. भरती प्रक्रियेत शासनाने दिलेल्या आदेशानुसार भरती प्रक्रिया होतं आहेत.
ज्या ठिकाणी पाऊस पडत असेल त्या ठिकाणी भरती प्रक्रिया थांबवली जाईल ही भरती प्रक्रिया दुसऱ्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी घेतली जाईल. दरवर्षीप्रमाणे गोपनीय यंत्रणा मैदानी चाचणी किंवा लेखी परीक्षा त्याठिकाणी होते प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी कुठलाही एजंट अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल.
रायगड पोलीस दलात 422 रिक्तपदांसाठी 21 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होतेय. त्यासाठी 31 हजार 63 उमेदवारांनी अर्ज केलेत. साधारण सलग 25 दिवस ही प्रक्रिया चालेल. ऐन पावसाळ्यात भरती होणार असल्यानं पोलिसांनी मैदानी चाचणी केली.
पुणे शहर पोलीस दलात 19 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. चालक आणि शिपाई पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. पुण्यात 202 पदांसाठी 21 हजार अर्ज दाखल झाले आहेत. तसेच येरवडा कारागृहात देखील 513 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात 19 तारखेला पोलीस भरती होणारे… 143 पदासाठी हि भरती होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिलीये… शिपायाच्या 99 जागा तर चालक पदाच्या 44 जागांसाठी भरती होतेय… चालक पदासाठी साडे चार हजार अर्ज दाखल झाले… तर पोलीस शिपाई या पदासाठी साडे तीन हजार अर्ज दाखल झाले..
कोल्हापूरमध्ये 19 जून ते 27 जूनदरम्यान पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलीस परेड ग्राऊंडवर ही भरती प्रक्रिया चालणार आहे. यावेळी पावसामुळे अडथळा आल्यास कसबा बावडा ते शिये मार्गावर भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे.
चंद्रपुरात 19 जूनपासून पोलीस भरतीचं आयोजन करण्यात आलय. यामध्ये शिपाई आणि बँड्सन या पदांची भरती केली जाणार आहे. एकूण 22 दिवस ही भरती प्रक्रिया चालणार आहे.
Uday Samant vs Narayan Rane : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीतच जोरदार राजकीय धूमशान सुरू झालंय. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः बॅनर वॉर सुरू झालंय.
Source link
राज्य एसटी महामंडळाने विद्यार्थांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
Source link
Vishwajeet Kadam on Sangli : सांगली लोकसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे काम केलं, त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं, असं विश्वजित कदमांनी म्हटलंय. त्यामुळे विश्वजीत कदम यांचा नेमका रोख कुणावर आहे? याचीच चर्चा सुरू आहे.
Source link