Pune Loksabha : भाजपकडून पुण्यात पैसे वाटप? रविंद्र धंगेकर पोलिस ठाण्याच आंदोलनाला बसले

Pune Loksabha : भाजपकडून पुण्यात पैसे वाटप? रविंद्र धंगेकर पोलिस ठाण्याच आंदोलनाला बसले



Ravindra Dhangekar Accused On BJP : पुण्यातील सहकार नगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.



Source link

मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात…

मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात…



Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.
 



Source link

कोकणातलं मीनी महाबळेश्वर! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषीत केलेले रत्नागिरीतलं माचाळ गाव

कोकणातलं मीनी महाबळेश्वर! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषीत केलेले रत्नागिरीतलं माचाळ गाव


Machal Village Ratnagiri : कोकणात समुद्र किनारे आणि इथला निसर्ग कायमच पर्यटकांना खुणावत असतो. मात्र याच कोकणात असं एक ठिकाण आहे  ते पर्यटकांना आता खुणावतंय. या ठिकाणाला कोकणातलं मीनी महाबळेश्वर असंही संबोधलं जातं. हे आहे रत्नागिरीतलं माचाळ गाव.  

हिरवीगार झाडी… नागमोडी वळणाचा रस्ता… परिसरात पूर्णपणे धुके… थंड वातावरण… डोंगरावरून कोसळणारे धबधबे… अशा सर्व गोष्टीनी वेढलेले हे गाव सध्या रत्नागिरीतलं मीनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. या गावाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण अर्थात पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. 

लांजा तालुक्यातील छोटसं माचाळ गाव समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार फुटांवर वसलेलं आहे. खाली उतरलेले आभाळ. आल्हाददायक स्वच्छ हवा. या वातावरणातला प्रवास आपल्याला ताजातवाना करतो आणि पावसाळ्यात हे गाव पर्यटकांना खासकरून खुणावतो.

माचाळ गावातून मुचकुंदी नदीचा उगम होतो खरं तर या गावात मुचकुंदी  ऋषिंची गुहा आहे याच ठिकाणाहून या नदीचा उगम झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळेच या नदीला मुचकुंदी नदी असं संबोधलं जातं. अवघे तीनशे ते चारशे लोकवस्तीचं हे माचाळ गाव आहे. येथील घरे कौलारु डोंगर उताराची आणि मातीची आहेत. पावसाळ्यात येथे कायम धुके असते त्यामुळे घरांच्या चहूबाजूला झाडांच्या पानांनी पूर्णपणे शाकारणी करावी लागते.  माचाळची दुसरी खासियत म्हणजे इथून विशाळगडावर एक ते दीड तासांत पोचता येतं. माचाळचे ग्रामस्थही विशाळगडावर पाणी, दूध पुरवणे किंवा इतर कामांसाठी सतत येऊन जाऊन असतात.

एका डोंगरावर वसलेले माचाळ घनदाट जंगलानी समृद्ध तर आहेच पण इथल्या जंगलाचं वैशिष्टय़ हे की या जंगलांमध्ये औषधी वनस्पती मोठय़ा प्रमाणात आढळतात आणि म्हणूनच या ठिकाणी आल्यावर इथला निसर्ग पाहिल्यानंतर पर्यटकांना या ठिकाणाबद्दल शब्दात वर्णन करणं कठीण जातं.

माचाळ हे गाव पदभ्रमणासाठी रत्नागिरी जिल्हा हा एक उत्तम पर्याय. सुंदर निसर्ग, खळाळणारे पाणी, दाट धुके, नागमोडी वाटा, अतिशय नयनरम्य परिसर माचाळचा पाहण्याजोगा आहे. तुम्हीही एकदा येथे पावसाळ्यात भेट देऊन कोकणातल्या निसर्गसोंदर्याचा आगळा वेगळा आंनद नक्कीच घेऊन पहा. 





Source link

Bhendwal Ghatmandni : भेंडवळची भविष्यवाणी! यंदा भरपूर पाऊस, शेतकऱ्यांसाठीही Good News

Bhendwal Ghatmandni : भेंडवळची भविष्यवाणी! यंदा भरपूर पाऊस, शेतकऱ्यांसाठीही Good News


मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : वऱ्हाडातील सुमारे 350 वर्षांपासूनची परंपरा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी इथली घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. त्यामुळे शेतकरीच नव्हे, आता बी-बियाणे कंपन्याही ‘बिझनेस’साठी येथे गर्दी करतात.

वाघकुळातील चंद्रभान महाराज यांनी घटमांडणी व भविष्यवाणीस प्रारंभ केला होता. यामध्ये मुख्यत्वे कृषीविषयक पीके, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तविण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात येत असते. भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी, पाण्याचे नियोजन करतात.

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर गट मांडणी केल्यानंतर आज सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र यावर्षी सध्या आचारसंहिता सुरू असल्याकारणाने राजकीय भाकीत या ठिकाणी वर्तवले गेले नाही.

कसा असेल पाऊस

या ठिकाणी अंबाडी हे कुलदैवत असून यावर्षी बऱ्यापैकी पाऊस सांगितलं आहे.

पहिला महिना कमी पाऊस तर बरसणार असून दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.

तिसरा महिना जास्त आणि भरपूर पाऊस असणार आहे.

चौथ्या महिन्यात अवकाळी पावसासह बऱ्यापैकी पर्जन्यमान सांगितले आहे. 

कपाशी पिक सर्वसाधारण असल्याच भाकित भेंडवळची घटमांडणी येथे सांगण्यात आलं आहे. 

पीक पाण्याचा नियोजन आणि भाकीत पुढील प्रमाणे

ज्वारी सर्वसाधारण असल्याचं भाकित सांगण्यात आलंय.

तूर सर्वसाधारण मात्र अनिश्चित उत्पादन असल्याचं सांगण्यात येत आहे. 

मूग आणि उडीद देखील सर्वसाधारण असेल.

यंदा तीळ चांगला असेल. 

एवढंच नव्हे तर पिकांवर रोगराई असेल

बाजरी सर्वसाधारण असेल तर साळीचं चांगल पिक असेल. 

जवस सर्वसाधारण पिक येईल तर वाटाणा देखील सर्वसाधारण आहे. 

गहू मात्र यंदा भरपूर प्रमाणात असेल.

हरभरा चांगल पिक मात्र भाव निश्चित नाही. 

राजकीय भाकित नाही

 भेंडवळ घटमांडणीमध्ये यावर्षी पीक पाण्याचे भाकीत आचारसंहितेमुळे राजकीय भाकीत स्थगित करण्यात आलं होतं. 





Source link

Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट


Maharashtra Weather Forecast : उन्हामुळं अंगाची लाहीलाही झाली असताना आता राज्यात पुढील 3 दिवस बहुतांशी भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Unseasonal Rain In Maharastra) आहे. पुणे, सातारा, नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. आजपासून मंगळवारपर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचेही भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं आहे. त्यामुळे आता बळीराजा संकटात आल्याचं पहायला मिळतंय. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 40-50 किमी प्रतितास वाऱ्याचा वेग राहिल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह बिहार, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. 

मुंबई, ठाणे आणि रायगडच्या अनेक भागात येत्या रविवारपासून पाऊस आणि वादळाची शक्यता देखील हवामान विभागाच्या अंदाजानुसार वर्तविण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना गर्मीपासून सुटका मिळणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.

दरम्यान, येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आता हातातोंडाशी आलेलं पीक गेल्याचं पहायला मिळतंय. कोकणात आंब्याला मोठा फटका बसला आहे. 





Source link

विधानसभा निवडणुकीत 'हेट यू', लोकसभेला मात्र 'लव्ह यू', महायुतीचं अफेअर अन् गुलाबरावांची फटकेबाजी

विधानसभा निवडणुकीत 'हेट यू', लोकसभेला मात्र 'लव्ह यू', महायुतीचं अफेअर अन् गुलाबरावांची फटकेबाजी


Gulabrao Patil Warne Bjp : प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सगळं माफ असतं, असं म्हणतात. जळगावमधल्या (Jalgoan News) महायुतीच्या सभेत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटलांनी तुफान फटकेबाजी करताना हेच तर विस्कटून सांगितलं. विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढणारे नेते लोकसभेला एकत्र आलेत. राजकारणातल्या या लव्ह-हेट रिलेशनशीपवरच गुलाबरावांनी (Gulabrao Patil) गुलाबी टोला लगावला. राजकारणात दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते है, असं गुलाबरावांनी भाषणात सांगितलं. मात्र त्याचवेळी भाजपच्या नेत्यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला. लोकसभेला आम्ही मदत करतोय, विधानसभेला तुम्ही मदत केली नाही तर लक्षात ठेवा, असंही त्यांनी बजावलं.

गुलाबरावांच्या या हटके भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. दरम्यान, विधानसभेलाही महायुतीचं जागावाटप गोडीगुलाबीनं पार पडेल, असं उद्योगमंत्री उदय सामंतांनी सांगितलं. केवळ जळगावच नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रात सध्या असेच राजकीय प्रेमसंबंध जुळून आलेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना शिंदे गट आणि भाजपचं अफेअर घट्ट झालंय. या दोघांमध्ये राष्ट्रवादीच्या निमित्तानं तिसरा भिडूही सामील झालाय. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीवाल्यांचं हे अफेअर टिकतं की, लव्ह यूवरून प्रकरण पुन्हा हेट यूवर जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी खिचडी पहायला मिळतेय. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट असं समिकरण आहे. लोकसभेच्या तिकीट वाटपाला पक्षश्रेष्ठींना अनेकांची मनधरणी करावी लागली होती. काही नेत्यांना विधानसभेला तिकीट देऊ म्हणून बंड शांत झालं खरं पण आता विधानसभेला तिकीट देताना खरा कस लागणार आहे. 

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर निशाणा लगावला होता. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, असं पाकिस्तान आणि काँग्रेसला वाटतं. विरोधी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे ‘मुंगेरीलाल’ अधिक आहेत, असा टोला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला होता. त्यावेळी त्यांनी संजय राऊतांवर देखील टीका केली होती. संजय राऊतांनी पक्षाचा सत्यानाश केला, असा आरोप देखील गुलाबरावांनी केलाय.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp