Ashadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?

Ashadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?


Ashadhi Wari 2024 : महाराष्ट्राला लाभलेल्या थोर संत परंपरेसाठी जितकं कृतज्ञ रहावं तितकं कमीच. प्रपंचही तितकाच महत्त्वाचा आणि परमात्त्म्याशी एकरुप होणंही तितकंच महत्त्वाचं असं सांगत देवाच्या भक्तीसह समाजप्रबोधनाचं काम संतांनी केलं. दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांच्या आधारावर संतांनी समाजाला सन्मार्गावर नेण्यासाठी मोठा हातभार लावला. अशा या संतांच्या मेळ्यातलं अनेकांच्याच तोंडी असणारं एक नाव म्हणजे, श्री संत ज्ञानेश्वर माऊली. पसायदान असो किंवा ज्ञानेश्वरी… माऊलींचा प्रत्येक शब्द म्हणजे प्रमाण. याच माऊलींनी इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला असं म्हटलं जातं. 

निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई या भावंडांनी पैठण मुक्कामी असताना धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला. असं म्हणतात की, धर्म, समाजानं आपल्याला स्वीकारून मुंजीची परवानगी द्यावी या हेतूनं ही मंडळी इथं आली, पण धर्मशास्त्राच्या अभ्यासामुळं त्यांनी वेगळा मार्ग निवडला होता. त्या काळात त्यांच्या एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे संस्कृतात असणारं तत्त्वंज्ञान फक्त ब्राह्मणांनाच वाचता येत होतं. ज्यामुळं सामान्यांना या ठेव्यात डोकावण्याचीही परवानगी नव्हती. 

पुढं समाजाला उपदेश करणारी ही भावंड पैठणहून आळंदीच्या दिशेनं निघाली आणि त्यांचा किर्तीमान जनमानसात पसरू लागला. वाटेत लागलेल्या नेवासा या गावी त्यांचं आपुलकीनं स्वागत झालं. ही आपुलकी आणि गावकऱ्यांचं प्रेम या भावंडांना भारावून गेलं आणि या ठिकाणाला आध्यात्मिक साहित्यात ओळख असावी अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. 

नेवासा येथे मुक्कामी असतानाच ज्ञानेश्वरांनी आपल्या वैचारिक ज्ञानाचा ठेवा वापरत गीता सामान्यांपर्यंत पोहोचवावी अशी इच्छा निवृत्तीनाथांनी व्यक्त केली आणि गीतेचा उपदेश सामन्यांनाही ग्रहण करता यावा यासाठी त्यांनी तो मराठीत लिहिला आणि गीतेचं हे मराठी सार भावार्थदीपिका नावानं ओळखलं जाऊ लागलं. हे शब्द मराठी साहित्यातील उपलब्ध ठेव्यापैकी सर्वात जुनं साहित्य असल्याचं सांगितलं जातं. 

आख्यायिका सांगते… 

ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील पसायदानानंतरच्या ओवी क्रमांक 1802 आणि 1803 नुसार…

ऐसे युगी वरी कळी | आणि महाराष्ट्रमंडळी | श्री गोदावरीच्या कूळी | दक्षिणिली || 1802||

त्रिभुवनैकपवित्र | अनादी पंचकोश क्षेत्र || जेथ जगाचे जीवन सूत्र || श्री महालया असे ||1803||

म्हणजेच, अशा रितीनं कलियुगात, महाराष्ट्रदेशात गोदावरीच्या दक्षिण तटावर जिथं जगाचे जीवनसूत्र मोहिनीराज यांचं वास्तव्य आहे, असं अत्यंत पवित्र आणि अत्यंत पुरातन पंचक्रोश (नेवासे) क्षेत्र वसलं आहे. 

आख्यायिकेनुसार श्री विष्णूनं इथंच मोहिनी रूप धारण केलं होतं.  त्याचं प्रतीक म्हणून इथं श्री मोहिनीराज मंदिर असून ते अतिशय पवित्र क्षेत्र आहे. म्हणूनच माऊलींनी गीतेवरील सार मराठीत लिहिण्यासाठी अर्थात ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी या ठिकाणाची निवड केली असावी.

(वरील माहिती उपलब्ध संदर्भ आणि आख्यायिकांवर आधारित असून, त्यामध्ये साधर्म्य नसू शकतं याची नोंद घ्यावी.)





Source link

नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध

नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध


Nawab Malik : नवाब मलिक सांगा कुणाचे? असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय… ईडी कारवाईनंतर जेलमधून बाहेर आलेल्या नवाब मलिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय… हिवाळी अधिवेशनात ते सत्ताधारी बाकावर येऊन बसले होते. मात्र नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्यात… मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपनं विरोध केला. आता विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकेका आमदाराचं मत महत्त्वाचं आहे. विधानपरिषदेची रणनीती आखण्यासाठी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला नवाब मलिकही हजर होते. याबाबत पत्रकारांनी जेव्हा अजित पवारांकडे विचारणा केली असता त्यांनी संतप्त प्रत्युत्तर दिले. 

महायुतीत घेण्यास भाजपनं विरोध केलाय. आता विधानपरिषद निवडणुकीत मलिकांचं मत महायुतीसाठी महत्त्वाचं असणाराय.. त्यामुळं असून अडचण नसून खोळंबा अशी अजित पवार गटाची अवस्था आहे… दरम्यान, नवाब मलिकांच्या उपस्थितीबाबत जेव्हा पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे विचारणा केली, तेव्हा तुला का त्रास होतोय असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं.

नवाब मलिकांबाबतचा प्रश्न अजित पवारांना आवडला नाही, हे यातून स्पष्ट दिसलं… तर कोर्टानं मला मीडियाशी बोलण्यास मनाई केलंय, असं सांगत मलिकांनी प्रतिक्रिया देणं टाळलं…दरम्यान, मलिकांवरून आता विरोधकांनीही अजितदादांना चिमटे काढायला सुरूवात केलीय…

एकूणच काय तर नवाब मलिक असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अजित पवारांची अवस्था झालीय.. आताच ही स्थिती असेल तर विधानसभा निवडणुकीत मलिकांचं भवितव्य काय, असा सवालही उपस्थित होतोय.

सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्याने नवाब मलिक चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नबाव मलिकांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. मात्र, कामकाज सुरु झाल्यानंतर मलिक थेट सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले.. आणि त्याचमुळे महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आलंय. मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचीच चर्चा आहे.. जामिनावर सुटल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर चर्चा सुरु होती. मात्र आज अधिवेशनासाठी दाखल झाल्यावर मलिकांनी आधी अजित पवार गटाच्या कार्यालयात भेट दिली.. त्यानंतर मग शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांची गळाभेट घेतली होती. 





Source link

महाराष्ट्र हादरला! तीन फुटांचा खड्डा खणला आणि… गुप्तधनासाठी कोल्हापुरात नरबळी देण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र हादरला! तीन फुटांचा खड्डा खणला आणि… गुप्तधनासाठी कोल्हापुरात नरबळी देण्याचा प्रयत्न


पुढील
बातमी

संतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आढळला मृत साप





Source link

झी 24 तासच्या बातमीचा डंका! बोगस शिक्षक भरती घोट्ळ्यात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

झी 24 तासच्या बातमीचा डंका! बोगस शिक्षक भरती घोट्ळ्यात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश



Education Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.



Source link

विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे दोन्ही शिलेदार विजयी

विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे दोन्ही शिलेदार विजयी



Mumbai Graduate Constituency election 2024 :  विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली आहे. ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. 



Source link

नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाचा वाद पेटला; अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्तुपाला धोका असल्याचा आरोप

नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाचा वाद पेटला; अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्तुपाला धोका असल्याचा आरोप



नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाला स्थगिती देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये जाहीर केलंय….दीक्षाभूमीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड पार्किंगमुळे वाद निर्माण झाला आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp