दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवायचा गावगुंड, पोलिसांनी काय केलं? तुम्हीच पाहा
Chinchwad Aakurdi Crime: दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडाला गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे.
Source link
Chinchwad Aakurdi Crime: दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडाला गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे.
Source link
MNS Raj Thackeray BJP Alliance : राज ठाकरेंच्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय असणार, हे राज ठाकरे जाहीर करणार आहेत. मनसे महायुतीत सामील होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर होणारा हा गुढीपाडवा खास आहे. कारण या मेळाव्याआधी पडद्याआड बरंच काही राजकारण घडलं आणि केंद्रबिंदू होते खुद्द राज ठाकरे.
राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. मनसे महायुतीत सामील होणार, असं बोललं जात होतं. अगदी राज ठाकरेंच्या हातात शिवसेना येणार आणि मनसेचे उमेदवार धनुष्यबाणावर लढणार इथपर्यंत तर्क लढवले गेले. मात्र या भेटीगाठींना दोन आठवडे उलटले तरी पुढे काहीच घडलं नाही.
अचानक सा-या चर्चा बंद झाल्या. बंद दारा-आड नेमकी काय चर्चा झाली, काय वचनं दिली गेली. याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे आणि नेमका हाच धागा राज ठाकरेंनी पकडला आहे. नक्की काय घडतंय, काय घडलंय हे सांगण्याची वेळ आलीय म्हणत राज ठाकरेंनी मोठी भूमिका जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. मनसे महायुतीत सामील झाली तर त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील याचा परिणाम होणार आहे.
राज ठाकरेंच्या रुपानं चौथा भिडू महायुतीत आल्यास लोकसभा निवडणुकीची गणितं बदलू शकतात. मनसे सोबत आल्यास मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर याठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो, असा अंदाज आहे. लोकसभेसह विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मनसेमुळे महायुती बळकट होईल. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल, अमित शाहांसोबतच्या बंद दाराआड चर्चेत नेमकं काय घडलं, मनसे महायुतीसोबत जाणार..स्वबळावर लढणार की निवडणुकीपासून अलिप्त राहणार. अशा चर्चा होताना दिसतायत. या सा-या चर्चांची उत्तरं गुढीपाडव्याच्या सभेत मिळतील हे निश्चित.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.. 9 तारखेला राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यातून आपली भूमिका मांडणार आहेत. या मेळाव्याआधी शिरसाट-राज ठाकरेंच्या भेटीला महत्त्व आलंय…त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का? या चर्चांना पुन्हा उधाण आलंय.
Maharashtra Politics Breaking of Shivsena And NCP: देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात सूचक विधान केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीने फूट पाडलेली नसून त्या पक्षांमधील जे नेते पक्ष सोडून आमच्याकडे आले त्यांनाच विचारायला हवं की त्यांनी असं का केलं? यामध्ये भाजपाचा काहीच दोष नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांना आमच्याबरोबर यायचं होतं तर आम्ही त्यांना परत जायला का सांगावं? असा प्रतिप्रश्नही सिंह यांनी विचारला आहे.
महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे 2 गट पडले आहेत. एक गट विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असून दुसरा गट उद्धव ठाकरेंचा आहे. तसेच मागील वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला असून शरद पवार गट विरोधकांच्या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे. शिंदे गटाला पाठिंबा जाहीर करत त्यांचे नेते एकनाथ शिंदेंना भाजपाने थेट मुख्यमंत्रीपदी दिलं. राज्यातील भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि त्यानंतर अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. याच घडामोडींसंदर्भात आणि महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल ‘न्यूज 18 हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे आपली मतं मांडली.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या मदतीशिवाय भाजपाला लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करता आली नसती का? असा प्रश्न राजनाथ सिंह यांना विचारला. “शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील ज्या नेत्यांनी पक्ष फोडला त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांनी असं का केलं?” असं उत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं. “कोणी स्वत:चा पक्ष फोडून आमच्याबरोबर येऊ इच्छित असेल तर आम्ही त्याला असं म्हणून शकत नाही की आम्ही तुम्हाला स्वीकारणार नाही,” असंही राजनाथ सिंह म्हणाले. म्हणजेच फोडाफोडीच्या राजकारणासाठी भाजपाला जबाबदार धरण्याऐवजी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीच त्यांचे पक्ष का फोडले आणि ते भाजपाबरोबर का आले हे सांगावं असं राजनाथ सिंह यांना सूचित करायचं आहे.
नक्की पाहा हे फोटो >> 5 कोटींचं घर, 15 प्लॉट, 1.66 कोटींच्या कार्स, एकूण संपत्ती..; शिंदे-BJP वादात अडकलेल्या मतदारसंघातील ठाकरेंच्या उमेदवाराची चर्चा
“केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी हे नेते आमच्याकडे आल्याचा दावा विरोधक करत आहेत. आता विरोधकांचं म्हणणं आहे की ते (भाजपाबरोबर आलेले नेते) दोषी आहेत. मात्र हेच फुटून आलेले गट जेव्हा विरोधकांच्या सरकारचा भाग होते तेव्हा ते निर्दोष असल्याचं विरोधकच सांगत होते. त्यावेळेस ते ईडी आणि सीबीआयची कारवाई चुकीची असल्याचं सांगत होते,” असा टोलाही राजनाथ सिंह यांनी लगावला.
शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपा एकत्र आल्यानंतर आता एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपामध्ये यायचं असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात विचारण्यात आलं असता राजनाथ सिंह यांनी, “त्यांना कोणी आणलं नाही ते स्वत: आले आहेत. असे अनेक नेते आहेत जे असा विचार करत आहेत की 2047 पर्यंत भारत विकसित देश झाला पाहिजे. या मोहिमेचा भाग होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच ते आमच्या पक्षात आले आहेत,” असं उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील नाराजीमुळे खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र आता पुन्हा स्वगृही परतण्यासाठी खडसेंचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.
नक्की वाचा >> ‘…तर पवार PM बनणार नाहीत’, राऊतांची काँग्रेसला वॉर्निंग; ‘त्या’ एका जागेवरुन आघाडीत मोठी बिघाडी?
राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींविरोधात चुकीचे शब्द वापरण्यावरुनही इशारा दिला आहे. पंतप्रधानांविरुद्ध बोलताना सजग राहायला हवं. पंतप्रधान ही केवळ एक व्यक्ती नसते तर संस्था असते. सुदृढ लोकशाहीमध्ये अशा वागणुकीला कोणतेही स्थान नाही, असं राजनाथ म्हणाले.
Kalyan Railway Station: कल्याण रेल्वे स्थानकात एक खळबळ उडवून देणारा प्रकार घडला आहे. डबा शोधण्याच्या नादात एका महिलेची तिच्या कुटुंबीयांसोबत चुकामुक झाली. त्यामुळं कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी महिलेचा एकच गोंधळ पाहायला मिळाला.
कल्याण हे जंक्शन असल्याने लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील या स्थानकात थांबतात. त्यामुळं दादर, ठाणे या स्थानकाबरोबरच कल्याण स्थानकातही मोठी गर्दी असती. एक्स्प्रेस गाड्यादेखील या स्थानकात थांबतात. कधी कधी गर्दी जास्त असल्याने एक्स्प्रेस पकडण्यात अडथळे यातात. असाच एक प्रकार या महिलेसोबत घडला आहे.
कल्याण स्थानकात असलेल्या एलटीटी गोरखपूर या एक्सप्रेसमध्ये डबा शोधण्याच्या नादात एका महिलेची तीन वर्षांच्या मुलीची आणि वडिलांची ताटातूट झाली. खूप वेळ शोधल्यानंतरही मुलगी आणि वडिल सापडले नाहीत. महिला रेल्वे स्टेशनवर खूप वेळापासून वडिलांना शोधत फिरत होती. मात्र, खूप शोधूनही दोघे न सापडल्याने घाबरेलल्या महिलेने थेट गाडीची चेनच खेचली.
महिलेने गाडीची ट्रेन खेचल्यानंतक रेल्वे पोलिसांकडून महिलेला खाली उतरवण्यात आलं. मात्र आपली तीन वर्षांची मुलगी गाडीत राहिली म्हणून महिला आणि तिच्या आईने स्टेशनवर तब्बल अर्धा तास गोंधळ घातला. पोलिसांनी त्या मुलीला आणि तिच्या आजोबाला सामानासकट पुढील स्टेशनवर उतरण्याची व्यवस्था केली. यानंतर पोलिसांनी या महिलांना पोलीस ठाण्यात नेत आपली कारवाई सुरू केली आहे.
भिवंडीत राहणाऱ्या रूपा सिंह या आपल्या कुटुंबासह गोरखपूरला चालल्या होत्या. त्यासाठी त्या कुटुंबासह कल्याण स्थानकात आल्या होत्या. स्थानकात फलाट क्रमांक चारवर त्यांची गाडी आली. त्यांचे एसी 2चे तिकिट होते. मात्र, हे कुटुंब ज्या ठिकाणी उभे होते तिथे त्यांची बोगी आलीच नाही. त्यामुळं ते बोगीत चढण्यासाठी धावले. रुपा या आपल्या मुलासह आणि आईसह डब्यात चढल्या. मात्र, रुपा यांचे वडिल व तीन वर्षांची मुलगी हे गाडीत चढले की नाही याची त्यांना खात्री नव्हती.
घाबरेलल्या रुपा यांनी ट्रेनची चेन खेचली. चेन खेचल्यानंतर गाडी थांबली. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ट्रेन कोणी खेचली याचा शोध घेतला त्यानेळी रुपा यांना खाली उतरवण्यात आले. त्यावेळी त्यांना जे घडलं ते सांगितलं. गाडी सुरू झाल्यानंतर रुपा यांचे वडिल आणि मुलगीदेखील गाडीत चढल्याचे समोर आले. अखेर महिलेने पोलिसांना त्यांना पुढील स्थानकावर उतरवण्याची विनंती केली.
जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोला… मोर्णा नदीच्या काठावर वसलेलं शहर. अकोलसिंह नावाच्या राजाच्या नावावरून अकोला (Akola) हे नाव पडलं. इथलं नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचं प्रवेशद्वार. नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले इथं आहेत. कधीकाळी काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला आता भाजपचा गड बनलाय. जिल्ह्यातल्या अनेक समस्या सोडवल्याचा दावा भाजपनं केलाय. मात्र तरीही इथले प्रश्न सुटलेले नाहीत.
अकोला… समस्यांचा वेढा
अकोल्यात सिंचनाच्या अनेक योजना रखडल्यात, त्यामुळं शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. खारपाणपट्ट्यात नव्या योजना सुरू केल्यात, मात्र त्याचा परिणाम अजून दिसत नाहीय. औद्योगिक वसाहतींची स्थिती फारशी समाधानकारक नाही. शैक्षणिक मागासलेपण अद्यापही कायम आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळं नागरिक त्रस्त आहेत.
अकोल्याचं राजकीय गणित
अकोला हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता तो भाजपचा (BJP) गड बनलाय. 2004 पासून लागोपाठ चारवेळा इथून भाजपचे संजय धोत्रे (Sanjay Dhotre) खासदार झाले. 2009 मध्ये धोत्रेंनी भारतीय बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) 64 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या (Congress) हिदायतुल्ला पटेल यांना 2 लाख मतांनी हरवलं. 2019 मध्ये त्यांनी चौथ्यांदा खासदार होताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना तब्बल पावणे तीन लाख मतांनी पराभूत केलं. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 4, काँग्रेसचा 1 आणि शिवसेना ठाकरे गटाचा 1 आमदार आहे.
यंदा प्रकृतीच्या कारणास्तव संजय धोत्रेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. आता त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. साधी ग्रामपंचायतीची निवडणुकही कधी न लढलेल्या अनुप यांना थेट लोकसभेचं तिकीट दिल्यानं भाजपमध्येच नाराजी उफाळून आलीय. भाजपचे बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी घराणेशाहीला विरोध करत उमेदवारी अर्ज भरल्यानं भाजपची डोकेदुखी वाढलीय.
गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकांची मतं घेणारे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा अकोल्याच्या रणमैदानात उतरलेत. काँग्रेस त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना मविआत घेण्याचे प्रयत्न फोल ठरले आणि डॉ. अभय पाटील यांच्या रुपानं काँग्रेसनं मराठा उमेदवाराला तिकीट दिलं.
अकोला मतदारसंघात मराठा, दलित आणि कुणबी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळं यंदाची बहुरंगी लढत फारच चुरशीची होणाराय. अकोल्यात प्रत्येकवेळी तिरंगी निवडणूक झाली. आणि भाजपनं बाजी मारली. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांचं भांडण आणि लाभ भाजपला, अशीच अकोल्याची मॉरल ऑफ द स्टोरी आहे. यावेळीही तीच कथा असणार की नवी स्क्रिप्ट लिहिली जाणार? याचा फैसला 4 जूनला होईल.
Pune Khadakwasla Dam: उन्हाळा सुरू झाला आहे. तापमानात वाढ झाल्याने उन्हाने काहिली झाली आहे. एकीकडे उकाडा वाढत आहे तर, पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. पाणीसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उन्हाळ्यातील पाणीवाटपाचं नियोजन करण्यात आले. तशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. (Pune Water News)
कोणत्याही परिस्थितीत मेट्रो प्रकल्पासह बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करु नये, अशा स्पष्ट सूचना भोसले यांनी दिल्या आहेत. तसंच, या सूचना पाळल्या नाहीत तर बांधकामे ठप्प होतील, असा इशारादेखील दिला आहे. मात्र मैला शुद्धीकरण केंद्रातील पाणी बांधकामासाठी वापरण्यास बांधकाम व्यावसायिकांचा विरोध आहे. मात्र, असं असलं तरी पिण्याच पाणी बांधकामासाठी वापरता येणार नाही. 34 गावाच्या पाण्याच्या नियोजनाची बैठक घेण्यात आली.
पिण्याचे पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरण्यास नेहमीच बंदी घालण्यात आली आहे. तथापि, पिण्याच्या पाण्याचा वापर करू नका, त्याऐवजी बोअरवेल किंवा एसटीपी सारख्या पर्यायांचा वापर करा, असे पुन्हा सर्वांना बजावले आहे. शिवाय, येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही सर्व नियमांचे उल्लंघन करून पिण्याचे पाणी कोण वापरत आहे हे पाहण्यासाठी सर्वेक्षण करणार आहोत. त्यात कोणी दोषी आढळल्यास पालिकेकडून संबंधितांना नोटिस पाठवण्यात येईल आणि दंड ठोठावला जाईल, असं पालिकेने म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यातील सहा विभागांमध्ये आज 36.71 टक्के पाणीसाठा आहे. 14,862 दलघमी पाणी शिल्लक आहे. नाशिक विभागात 37.54 पाणीसाठा उपलब्ध आहे तर पुणे विभागात 720 धरणांचा पाणीसाठी 35.30 टक्के इतका झाला आहे. नागपुर विभागात 48.24 टक्क्यांवर गेला असून अमरावती विभागात 48.62 टक्के पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यात औरंगाबाद विभागात 920 धरणांमध्ये केवळ 18.90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.