सोलापूरात वेलकम वॉर! 'बाहेरचा' म्हणत डिवचणाऱ्या प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

सोलापूरात वेलकम वॉर! 'बाहेरचा' म्हणत डिवचणाऱ्या प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले…


Solapur LokSabha Constituency : भाजपने लोकसभेची पाचवी यादी जाहीर केली अन् पुन्हा धक्कांतत्रांचा अवलंब केला. देवेंद्र फडणवीसांचे मर्जीतील नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम सातपुते यांना सोलापूरच्या जागेवर तिकीट देण्यात आलं. त्यामुळे आता सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात लढत (Ram Satpute Vs Praniti Shinde) पहायला मिळणार आहे. अशातच आता दोन्ही उमेदवारांमध्ये वेलकम वॉर सुरू झालं आहे. राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांच्या या पत्रातून त्यांनी नकळतपणे राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. इथला असो किंवा बाहेरचा, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. तर राम सातपुते यांनी देखील प्रणिती शिंदेंना धन्यवाद पत्र लिहित सोलापूरच्या जनतेने चांगलंच ओळखलंय, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे आता सोलापूरची लढाई ही चांगलीच गाजणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

प्रणिती शिंदे म्हणतात…

राम सातपुते आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा… मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे. पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या होत्या. त्यावर राम सातपुते यांनी पत्र लिहित प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाले राम सातपुते?

मी 2019 पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय. मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय. राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन, असं म्हणत राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना उत्तर दिलंय.

दरम्यान, भाजपच्या पाचव्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कंगना मंडीमधून निवडणूक लढवेल. तर बेगुसरायमधून गिरिराज सिंग यांची उमेदवारी निश्चित झालीये. तसेच पटना साहिबमधून रवी शंकर प्रसाद लढतील. त्याचबरोबर सुल्तानपूरमधून मेनका गांधी यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपने पाचव्या यादीत एकूण 111 उमेदवारांची नावं निश्चित केली.





Source link

महाराष्ट्रातील एकमेव समुद्र किनारा जो रात्रीच्या अंधारात चमकतो! कोकणात गेल्यावर इथं नक्की जा

महाराष्ट्रातील एकमेव समुद्र किनारा जो रात्रीच्या अंधारात चमकतो! कोकणात गेल्यावर इथं नक्की जा


Malvan Beach : कोकण म्हटलं की निसर्गसौंदर्य… पर्यटक इथे निसर्गाचा भरभरून आनंद लुटतात. अथांग सागरी किनाऱ्यावर फिरताना पर्यटक मंत्रमुग्ध होतात. कोकणात एक असाच चमत्कारिक समुद्र किनारा आहे.  हा समुद्र  किनारा रात्रींच्या अंधारात चमकतो. महाराष्ट्रतील हा एकमेव समुद्र किनारा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्र किनाऱ्यावर हा अद्धबूत नजारा पहायला मिळतो. 

भारतात अनेक ठिकाणी असे  रात्रीच्या अंधारात चमकणारे समुद्र किनारे पहायला मिळतात. अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावरील राधानगरी बीचवर हा नजारा पहायला मिळतो. रात्रीच्या वेळेस हा समुद्र निळ्या-हिरव्या रोषणाईने उजळलेला दिसतो.  केरळमधील वर्कला समुद्र किनारा देखील रात्रीच्या अंधारात चमकतो.  पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात स्थित, मंदारमणी बीच देखील रात्री ताऱ्याप्रमाणे चमकतो. गोव्यातील पालोलेम बीच रात्रीच्या अंधारात चमकतो. तर, महाराष्ट्रातील  मालवण समुद्र किनाऱ्यावर देखील असा अद्भूत नजारा पहायला मिळतो. 

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा  समुद्रकिनारा सुंदर सूर्यास्त आणि बायोल्युमिनेसेंट पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुंदर निळ्या-हिरव्या रंगात चमकानारा समुद्र  पाहण्यासाठी अनेकजण रात्री बोटीतून सफर करतात. रात्रीच्या वेळेस चमकणाऱ्या या समुद्र किनाऱ्यांमागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्याला बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन म्हणतात.  समुद्रात असे अनेक जीव आहेत, ज्यांच्या शरीरात प्रकाश निर्माण होतो. समुद्रात डाईनोफ्लॅगेट्स नावाचे जीव असतात. हे जीव रात्रीच्या अंधारात निळा प्रकाश फेकतात.

पर्यटन समृद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्य

सिंधुदुर्ग जिल्ह्य पर्यटन समृद्ध जिल्हा म्हमटल्यास वावगे ठरणार नाही. मालवणसह तारकर्ली, देवबाग असे अनेक सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारे येथे आहेत. यासह सिंधुदुर्ग यासारखे किल्ले देखील येथे आहेत. यामुळे कोकणची सफर अधिक थरारक आणि अविस्मरणीय होते. 

कोकण आणि पर्यटनाचं नातं अलीकडे अधिक दृढ होतंय. गोव्या पाठोपाठ आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंदी मिळू लागलीय मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला त्याच्या दिमतीला स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि माशाचं मस्त जेवण हे सारं पर्यटकांना भुरळ घालत असतं. त्यामुळे सहाजिकच अलीकडे सिंधुदुर्ग मधील पर्यटकांची संख्या वाढली आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्वाचं आकर्षण म्हणजे इथले वॉटर स्पोर्ट्स.. आणि स्कूबा डायव्हींग.. महाकाय समुद्रच्या पोटात काय दडलय हे बघण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते… पर्यटकांची इच्छी इथं कोकणात पूर्ण होते.. तारकर्लीच्या समुद्रतील रंगीत मासे..पाण वनस्पती… आणि समुद्रातला तळ… सारं काही पाहून पर्यटक हरखून जातात..
 

 





Source link

महाराष्ट्रात भाजप – काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर'; 'या' 5 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार

महाराष्ट्रात भाजप – काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर'; 'या' 5 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार


Loksabha Election: लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.  लोकसभा निवडणुकीसाठी मित्र पक्षांना बाजूला ठेवत भाजपने 20 तर काँग्रेस पक्षाने 11 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचे तिकीट कापून काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी आतापर्यंत जाहीर केलेल्या जागांवरुन काँग्रेस आणि भाजपच्या पाच उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. यामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या लढती तुल्यबळ होणार एकतर्फी याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

भाजप उमेदवारांची यादी

नंदुरबार – हीना गावित
धुळे – सुभाष भामरे
जळगाव – स्मिता वाघ
रावेर – रक्षा खडसे
अकोला – अनुप धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर
जालना – रावसाहेब दानवे
दिंडोरी – भारती पवार
भिवंडी – कपिल पाटील
उत्तर मुंबई – पियुष गोयल
उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई – मिहिर कोटेचा
पुणे – मुरलीधर मोहोळ
बीड – पंकजा मुंडे
लातूर – सुधाकर श्रृंगारे
माढा – रणजीत नाईक निंबाळकर
सांगली – संजयकाका पाटील
अहमदनगर – सुजय विखे

काँग्रेस उमेदवारांची यादी

सोलापूर – प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
पुणे – रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाल पाडवी
अमरावती – वळवंत वानखेडे
लातूर – डॉ. शिवाजी काळगे
नांदेड – वसंतराव चव्हाण
नागपूर – विकास ठाकरे
रामटेक – रश्मी बर्वे
भंडारा-गोंदिया – डॉ. प्रशांत पडोळे
गडचिरोली- चिमूर – डॉ. नामदेव किरसान

हिना गावित – गोवाल पाडवी (नंदुरबार)

नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हिना गावित यांची लढत काँग्रेसच्या माजी मंत्री के सी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांच्यासोबत होणार आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये आता वकील विरुद्ध डॉक्टर असा सामना होणार असल्याची चर्चा सुरु आहेत. गोवाल पाडवी हे वकील तर हिना गावित या डॉक्टर आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केसी पाडवी यांना हिना गावित यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे गोवाल पाडवी हे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार का? याकडे नंदुरबारवासियांचे लक्ष लागलं आहे.

नितीन गडकरी-विकास ठाकरे (नागपूर)

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात पक्षाने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नागपुरात गडकरी विरुद्ध ठाकरे अशी लढत होणार आहे. विकास ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. उमेदवारीची घोषणा होताच विकास ठाकरे यांनी गडकरींवर टीका केली आहे. नितीन गडकरी म्हणतात की त्यांनी नागपूर शहराचा विकास केला. मग त्यांच्या आधी हा विकास कधी झाला नव्हता का? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. नितीन गडकरी यांच्यामुळे भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे नागपूरच्या जागेवर नेमका कोणाचा विजय होणार आहे? याकडे राज्यासह देशाचं लक्ष असणार आहे.

प्रताप पाटील चिखलीकर-वसंतराव चव्हाण (नांदेड)

काँग्रेसने नांदेड लोकसभा मतदारसंघातून  खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरोधात वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधील बरीच राजकीय समीकरणे बदलली असून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले एकत्र आल्याने या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.  पूर्वी एकमेकांविरोधात लढलो पण आता एकदिलाने काम करा असा संदेश समर्थकांना अशोक चव्हाण यांनी दिला आहे. तर जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातच कामं होतील असा स्पष्ट संदेश चिखलीकर यांनी  दिला आहे. दुसरीकडे अनेक वर्षे वसंतराव चव्हाण यांच्यासोबत काम केलेल्या अशोक चव्हाणांना त्यांच्याविरोधातील चिखलीकरांना निवडणून आणावं लागणार आहे.

मुरलीधर मोहोळ-रवींद्र धंगेकर (पुणे)

पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे मैदानात उतरले आहेत. धंगेकर यांना उमेदवारी मिळताच काँग्रेस नेते आबा बागुल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना निवडणुकीत काँग्रेससमर्थकांकडून नाराजीचा सामना करावा लागू शकतो.

सुधाकर शृंगारे- डॉ. शिवाजी काळगे (लातूर)

लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे. लातूरमध्ये भाजपकडून खासदार सुधाकर शृंगारे यांना संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने इथे नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे हे निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो पात्र ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न मी करेन, असे डॉ. शिवाजी काळगे यांनी म्हटलं आहे.





Source link

BREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नावांवर शिक्कामोर्तब

BREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नावांवर शिक्कामोर्तब


Congress Maharashtra Loksabha Candidate List : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली जात आहे. आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत. 

काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर 

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापर्यंत तीन यादी जाहीर केल्या होत्या. यातील तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आता काँग्रेसकडून देशभरातील 46 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील 4 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. 

चार जागांवरील उमेदवारांची घोषणा

काँग्रेसने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमुर, रामटेक या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यात रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर मतदारसंघातून विकास ठाकरे निवडणूक लढणार आहे. तसेच गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना तिकीट मिळालं आहे. त्यासोबतच भंडारा-गोंदियामधून प्रशांत पडोले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

यापूर्वी काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवळ पडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजीराव काळगे आणि सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. 





Source link

पंचगंगेतील मगरींनी 'त्या' तरुणाला खाल्लं असं वाटलं पण 5 दिवसांनी जिवंत सापडला; कोल्हापुरातील थरार

पंचगंगेतील मगरींनी 'त्या' तरुणाला खाल्लं असं वाटलं पण 5 दिवसांनी जिवंत सापडला; कोल्हापुरातील थरार



Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरढोणच्या युवकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला अखेर यश आलं आहे. हा तरुण तब्बल पाच दिवस पंचगंगा नदी पात्रातील परिसरात अडकून पडला होता.



Source link

मतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर… आढावा शिर्डी मतदारसंघाचा

मतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर… आढावा शिर्डी मतदारसंघाचा


कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी  : शिर्डी… जगभरातील भाविकांना श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांची शिर्डी (Shirdi Contstituency). अहमदनगर जिल्ह्यातल्या दोन लोकसभा मतदारसंघापैकी एक. पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ. मात्र 2009 सालच्या पुनर्रचनेनंतर शिर्डी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. तरीही इथल्या नागरिकांच्या अडचणी काही सुटल्या नाहीत.

शिर्डीतील रखडलेले प्रश्न 
आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र असूनही शिर्डीचा व्हायचा तसा विकास झाला नाही. शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न वर्षानुवर्षं प्रलंबित आहे. निळवंडे धरणाचा कालवा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना अडचणीचं ठरलेलं निर्यात धोरण अजून बदललेलं नाही

बाळासाहेब विखे पाटलांच्या काळात कोपरगाव, शिर्डी भागात काँग्रेसचं (Congress) वर्चस्व होतं. मात्र 2009 साली मतदारसंघ राखीव झाल्यापासून लागोपाठ तीनवेळा शिवसेनेचाच खासदार विजयी झालाय. 

शिर्डीचं राजकीय गणित
2009 मध्ये शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरेंनी रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला. 2014 मध्ये भाऊसाहेब वाकचौरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळं ऐनवेळी माजी आमदार सदाशिव लोखंडेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली. मोदी लाटेत लोखंडेंनी काँग्रेसच्या वाकचौरेंचा सुमारे 2 लाख मतांनी पराभव केला. 2019 मध्ये लोखंडेंनी काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळेंना सव्वा लाख मतांनी हरवलं. विधानसभेचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, काँग्रेसचे 2 आणि भाजप-शिवसेनेचा प्रत्येकी 1 आमदार विजयी झालेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडेंनी एकनाथ शिंदेंसोबत जाणं पसंत केलं. ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघावर आता भाजपनं दावा केलाय. राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजप उमेदवारीसाठी शक्ती पणाला लावलीय. शिवसेना की भाजप, असा तिढा महायुतीत निर्माण झाला असताना रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवलेंनीही त्यात उडी घेतलीय. लोखंडेंना राज्यसभेवर पाठवावं आणि शिर्डीची उमेदवारी आपल्याला द्यावी, असा प्रस्ताव आठवलेंनी महायुतीपुढं ठेवलाय.

दुसरीकडं महाविकास आघाडीतही शिर्डीच्या जागेवरून रस्सीखेच सुरूय. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतलेत. शिर्डीतून उमेदवारीसाठी त्यांनी मातोश्रीपर्यंत फिल्डिंग लावलीय. मात्र त्यांच्यावर बौद्ध समाज नाराज असल्याचं समजतंय. काँग्रेसकडून राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्ष रुपवते या देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दक्षिण नगरमधून भाजपनं उमेदवार जाहीर केला… मात्र शिर्डीत उमेदवारीसाठी चढाओढ असल्यानं अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही.

मतदारसंघ एक आणि उमेदवार अनेक अशी शिर्डीत अवस्था आहे. त्यात आता मनसेचीही भर पडलीय. राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर, शिर्डी मतदारसंघातून बाळा नांदगावकांच्या नावाची चर्चा सुरू झालीय… त्यामुळं राजकीय गुंता आणखी वाढलाय…





Source link

YouTube
Instagram
WhatsApp