by Hansraj Agrawal | Mar 15, 2024 | Trending News
Group of 7 People Arrested By Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभागाच्या सायबर गुन्हे शाखेने कोलकात्यामधील एका सायबर चोरांच्या टोळीला अटक केली आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे जाऊन मुंबई पोलिसांनी 7 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे 50 लाख रुपये कॅश आणि इतर डिजीटल साहित्य सापडलं आहे. या टोळीनं एका मुंबईकराला तब्बल दीड कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असा संपूर्ण टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे.
1 कोटी 48 लाख 56 हजार रुपयांचा अपहार
चर्चगेट येथे राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीने सायबर पोलिसांकेड 7 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणामध्ये फसवणूक, सायबर कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु करण्यात आला. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार 29 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यानच्या काळात तक्रारदाराच्या कुटुंबियांच्या खात्यावरुन तब्बल 1 कोटी 48 लाख 56 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराबरोबरच त्याच्या कुटुंबियांच्या बँक खात्यातून, डेबीड कार्डमधून आणि क्रेडीट कार्डमधून माहिती मिळवून पैशांचा अपहार केला. तक्रारदार व्यक्तीबरोबरच त्याची पत्नी आणि परदेशात राहणाऱ्या मुलीच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यांमधून पैसे क्रेडीट कार्डद्वारे फ्लिपकार्ट, कार्डलेन, मंत्रा, स्वीगी सारख्या ऑनलाइन माध्यमांवरुन खर्च करण्यात आले. ऑनलाइन पोर्टलवर तब्बल 1 कोटी 48 लाख 56 हजार रुपयांची खरेदी 4 दिवसांमध्ये करण्यात आली. क्रेडीट कार्डवरुन महागड्या वस्तू मागवण्यात आल्या होत्या. या वस्तू कोलकात्यामधील वेगवेगळ्या ठिकाणावर डिलेव्हर करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्यानंतर मुंबई पोलिसांची एक तुकडी तपासासाठी कोलकात्याला रवाना झाली.
चोराची इंग्रजी ऐकून व्हाल थक्क…
मुंबई पोलीस शहरात आल्याचं समजल्यानंतर आरोपी सिलीगुडीमध्ये पळून गेले. मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतलं. चौकशीनंतर या 7 जणांना अटक करण्यात आलं. 7 जणांना अटक करुन सीलीगुडी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता त्यांना 16 मार्चपर्यंत ट्रांझीट रिमांड देण्यात आली आहे. आरोपी कोलकात्यामध्ये कॉल सेंटर चालवत असल्याचं तपासात समोर आलं आहे. आरोपी भारतीय आणि परदेशी लोकांना क्रेडीट कार्डच्या सिक्युरीटीसंदर्भातील सेवा देण्याची ऑफर करत कॉल करुन त्यांच्या क्रेडीट कार्डची माहिती मिळवायचे. या माहितीच्या आधारे ते ऑनलाइन शॉपिंग करायचे. या व्यक्तीला 1.48 कोटींचा गंडा घालण्यात आला होता पण पोलिसांनी वेळीच कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. अगदी परदेशी कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांप्रमाणे ब्रिटीश अॅक्सेंटमध्ये फोनवर हे कर्मचारी बोलत असल्याने कॉल पदेशातून आल्यासारखं वाटायचं. या टोळीतील चोराची इंग्रजी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…
50 लाख कॅश, 27 मोबाईल फोन्स, 5 घड्याळं अन्…
अटक करण्यात आलेल्यांमध्ये रयान शाहदास (22), अरुणभा हल्डर (22), रितम मंडल (23), तमोजीत सरकार (22), रजिब शेख (24), सुजोय नासकर (23) आणि रोहीत बैदय (23) यांचा समावेश आहे. हे सर्वजण कोलकात्याचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 50 लाख रुपये रोख रक्कम, 27 मोबाईल फोन्स, 5 महागडी घड्याळं, 3 एअर बड्स, 1 मॅकबूक, 1 आयपॅड, 11 परफ्युम बॉटल्स, 2 लेडीज बॅग, 2 फ्रिज, 2 एअर कंडिशनर, 2 प्रिंटर आणि 1 किचन चिमणी जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी केलं आवाहन
डल्ला मारलेल्या 1 कोटी 48 लाखांपैकी 60 लाखांच्या सामानची ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून डिलेव्हरी करण्यात आली होती. इतर मालाची डिलेव्ही पोलिसांनी तात्काळ थांबवली. पोलिसांनी अशाप्रकारे अज्ञातांना फोनवरुन आपला बँकिंगसंदर्भातील तपशील देऊ नये असं आवाहन केलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 14, 2024 | Trending News
Sudhakar Shrangare vs congress : लातूर… कधीकाळची राष्ट्रकूट राजघराण्याची राजधानी… तब्बल १९ मार्गांनी जोडली गेलेली गंजगोलाईची बाजारपेठ ही लातूरची खासियत… हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत लातूर हैदराबाद संस्थानच्या अमलाखाली होतं. १९६० मध्ये ते महाराष्ट्रात विलीन झालं. 15 ऑगस्ट 1982 रोजी मराठवाड्यात लातूर जिल्हा अस्तित्वात आला. विलासराव देशमुख आणि डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर असे दोन माजी मुख्यमंत्री लातूरनं दिले. माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, केशवराव सोनवणे अशा दिग्गज राजकीय नेत्यांचा जिल्हा… मात्र एवढे मातब्बर नेते असतानाही लातूर विकासापासून दूरच राहिलं.
लातूरच्या समस्या काय?
भीषण पाणीटंचाई लातूरकरांच्या पाचवीलाच पुजलेली… पिण्याच्या पाण्याअभावी लातूर वर्षानुवर्ष तहानलेलंच आहे. त्यात दूषित पाणीपुरवठ्यानं डोकेदुखी वाढवलीय. लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्नही प्रलंबित आहे. आरोग्याच्या विविध समस्या देखील नागरिकांना जाणवतात. तर रस्ते आणि सोईसुविधांचा अभाव देखील दिसून येतो.
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 पासून लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या सलग दोन निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवारांचा पराभवाची चव चाखावी लागली.
लातूरचं राजकीय गणित
2009 मध्ये काँग्रेसचे जयवंत आवळे यांनी भाजपचे सुनील गायकवाड यांचा ८ हजार मतांनी पराभव केला. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचे डॉ. सुनील गायकवाड यांनी काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे यांना तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्यानं हरवलं. 2019 मध्ये भाजपच्या सुधाकर श्रृंगारे यांनी काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांचा पावणे तीन लाखांनी पाडाव केला. विधानसभेत सध्या लातूर शहरमधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख हे दोन काँग्रेस आमदार आहेत. अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील आणि उदगीरमधून संजय बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. निलंग्यात भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर लोहामध्ये शेकापचे शामसुंदर शिंदे आमदार आहेत.
भाजपकडून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मात्र भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांनाच उमेदवारी जाहीर केलीय. तर काँग्रेसकडेही इच्छुकांची भाऊगर्दी असली तरी मातब्बर, तगडा उमेदवार नाही. माजी सनदी अधिकारी भा. ई. नागराळे आणि बाबासाहेब गायकवाड हे काँग्रेसकडून इच्छुक असल्याचं समजतंय.
दरम्यान, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. भाजपसाठी सध्या तरी पोषक वातावरण असल्याचं मानलं जातंय. भाजपला लागोपाठ तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून विजयाची हॅटट्रिक करायची आहे. तर पुन्हा एकदा पक्षाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं मोठं आव्हान काँग्रेसपुढं आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व मोडून काढणं काँग्रेसला खरंच शक्य होईल? असा सवाल विचारला जातोय.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 14, 2024 | Trending News
Navi Mumbai Crime News: शाळेतील विद्यार्थ्यांची गटा-तटाची भांडणे, हुल्लडबाजी या घटना काही नवीन नाहीत. मात्र, नवी मुंबईतील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या भांडणात एकाचा जीव गेल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर, शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
नवी मुंबईतील तुर्भे परिसरात एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. सी. वि. सामंत शाळेच्या बाहेर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा राडा झाला. या गंभीर घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेबाबत समताच ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्यात हा वाद नेमका कशावरुन झाला हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. आदित्य भोसले असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
तुर्भे येथील मैदानात बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती. बारावीसह इतर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला होता. शाळेत झालेल्या हा वाद शाळेबाहेर आल्यावर पुन्हा उफाळला. एका गटाच्या 10 ते 15 विद्यार्थ्यांनी दोन विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान आदित्यचा मृत्यू झाला. तर, दुसरा मुलगा याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, शाळेतील विद्यार्थ्यांवरही याचा परिणाम झाला आहे. पालकही या गंभीर घटनेने धास्तावलेले आहेत.
गंभीर घटनेचे कारण अद्यापही समोर नाही पण पोलिसांनी घटनेचा संशयित आरोपी विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मयत,जखमी आणि आरोपी मुलगा अकरावीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. दहावीचा पेपर सुरू असताना बाहेर राडा झाला असून एपीएमसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
बुधवारी ही घटना घडल्यानंतर मृत व जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी काही संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे तर, इतरांचा शोध सुरू आहेत. तसंच, या मुलांमध्ये वाद नेमका कशामुळं झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिस याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळं अल्पवयीन मुलांच्या होणाऱ्या वादांचे पडसाद इतक्या गंभीरपणे उमटू शकतात हे वास्तव समोर आले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 13, 2024 | Trending News
Maharashtra politics : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे. कारण महायुतीत असलेले शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारेंनी बारामतीत पवारांनाच ललकारलंय. विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून लढणार आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 13, 2024 | Trending News
BJP Advertising On Medicine Bottle: पूर्वी या योजनेच्या नावामध्ये परियोजना हा शब्द नव्हता. मात्र ‘भा.ज.प’ असे संक्षिप्त स्वरुप लिहिता यावे म्हणून या योजनेच्या नावामध्ये संपूर्ण शब्दाचा समावेश करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 12, 2024 | Trending News
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढाई होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आता या लढाईत आता तिसराही उमेदवार उतरलाय. तोही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा.. या उमेदवाराने थेट पवारांनाच चॅलेंज दिलंय. त्यामुळे बारामतीची लढाई आणखी रंगतदार बनलीय.
Source link